Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5233

देशातील ‘या’ 6 बँकांना RBI ने केले आपल्या लिस्टमधून बाहेर, कारणे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI- Reserve Bank of India) ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’ (OBC-Oriental Bank of Commerce) आणि ‘अलाहाबाद बँक’ (Allahabad Bank ) सहित या सहा सरकारी बँकांना RBI कायद्याच्या दुसऱ्या वेळापत्रकातून वगळले आहे. म्हणजेच आता या बँकांना RBI चे नियम लागू होणार नाहीत. वास्तविक या बँका अन्य बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत. म्हणूनच या बँकांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. या सहा बँकांमध्ये सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. या निर्णयाचा बँकेच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही. कारण, विलीनीकरणानंतर या बँकांचे ग्राहक विलीन झालेल्या बँकेचे ग्राहक झाले आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने 10 राज्य-बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. या योजनेनुसार युनाइटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विलीन झाले आहेत. विलीनीकरणानंतर PNB देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक बनली आहे. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन होत आहे. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन होईल. तर आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक हे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाले आहे.

27 मार्चपासून सिंडीकेट बँकेने आपला व्यवसाय बंद केला आहे – रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेत असे सांगितले गेले आहे की, 27 एप्रिल 2020 च्या अधिसूचनेमुळे रिझर्व्ह बँकेच्या अधिनियम 1934 च्या दुसऱ्या वेळापत्रकातून सिंडिकेट बँकेला वगळण्यात आले आहे. त्यानुसार, 1 एप्रिल 2020 पासून त्याचा बँकिंग व्यवसाय बंद झाला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक क्षेत्रातील अन्य पाच बँकांच्या संदर्भात अशीच एक अधिसूचना जारी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्याच्या दुसर्‍या वेळापत्रकात समाविष्ट केलेली बँक शेड्यूल्ड कमर्शियल बँक म्हणून ओळखली जाते. या सहा बँका 1 एप्रिलपासून सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांमध्ये विलीन झाल्या आहेत.

विलिनीकरणामुळे हा निर्णय घेण्यात आला – ओबीसी आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँकमध्ये सिंडिकेट बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचे युनियन बँक ऑफ इंडिया तर अलाहाबाद बँक यांचे इंडियन बँकेत विलीनीकरण झाले आहे. या विलीनीकरणानंतर आता देशात सात मोठ्या आणि पाच लहान सरकारी बँका आहेत. सन 2017 मध्ये देशात 27 सरकारी बँका होत्या, आता विलीनीकरणानंतर त्या 12 झालेल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

रोहित शर्माचा मोठा विक्रम ; रैनाने केलं तोंडभरून कौतुक

rohit and raina

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पंजाब विरुद्ध जबरदस्त खेळी करत मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. रोहितने ४५ चेंडूंत ७० धावांची दमदार खेळी केली. त्याच्या जोरावर मुंबईने ४ बाद १९१ धावांची मजल मारल्यानंतर पंजाबला १४३ धावांवर रोखत मुंबईने एकतर्फी विजय मिळवला. आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

या सामन्यात रोहितने महत्त्वाचा विक्रम करताना सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या बरोबरीने स्थान मिळवले. पंजाबविरुद्ध रोहितने आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला. याआधी केवळ सुरेश रैना आणि विराट कोहली यांनीच अशी कामगिरी केली असल्याने रोहित ५ हजार धावा पूर्ण करणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला. यामुळेच रैनाने सोशल मीडियावरुन रोहितचे कौतुक केले.

रैनाने  ट्वीट केले की, ‘आणखी एक मैलाचा दगड पार करुन आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा पल्ला पार केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन माझ्या भावा. तुझा अभिमान आहे. आणखी अशीच कामगिरी करत रहा.’ यावर रोहितनेही त्याला ‘थँक्स ब्रो..’ असा रिप्लाय करत आभार मानले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

ग्राहकांना बँकांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी तयार केलीनवीन योजना, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । बँकांमधील ग्राहकांना सर्वोत्तम आणि उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी बँकांना प्रादेशिक भाषा समजून घेण्यास व त्यामध्ये संवाद साधणाऱ्या अधिकाऱ्यांचा संवर्ग तयार करण्यास सांगितले गेले आहे. सीतारमण म्हणाल्या की, यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने भारतीय प्रशासकीय सेवांप्रमाणेच ऑल इंडिया सर्व्हिसेस सारखे बनवतील. सीतारमण पुढे म्हणाल्या की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकाऱ्यांसाठी एंटी-सतर्कता मॉड्यूलसह ​​(anti-vigilance module) श ट्रेनिंग संबंधित कार्यक्रम सुरू करणार आहेत.

अनेक भागात हिंदी समजत जात नाही त्यावेळी स्थानिक भाषेत संवाद साधण्याची गरज असते
सीतारमण म्हणाल्या की, देशातील अनेक भागात हिंदी समजली जात नाही. त्यावेळी बँक अधिका-यांनी ग्राहकांना सेवा देण्यासाठी स्थानिक भाषा शिकण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत, अखिल भारतीय पातळीवर बँकांचे अस्तित्व आहे, असा दावा करण्यात अर्थ नाही. त्या म्हणाल्या की,’आम्हाला अशा एका केडरची गरज आहे जे ते तैनात असलेल्या राज्याची भाषा समजू आणि बोलू शकतील.

स्थानिक लोक शाखेत येतात पण तेथील अधिकारी स्थानिक भाषा बोलू शकत नाहीत- FM
अर्थमंत्री म्हणाल्या की,’ बँकांमध्ये नेमणूक अखिल भारतीय पातळीवर केली जाते. परंतु ज्या राज्यात हिंदी बोलली जात नाही अशा दुर्गम भागात आणि अधिकाऱ्यांची नेमणूक केल्यास त्यांना स्थानिक भाषा बोलता येत नाही. मी अशी बरीच प्रकरणे आढळळी ज्यावरून अशी माहिती मिळाली आहे की, स्थानिक लोक शाखेत येतात, परंतु तेथे काम करणारे अधिकारी स्थानिक भाषा बोलू शकत नाहीत.

सीतारमण यांनी यावर जोर दिला की, अधिकाऱ्यांनी, विशेषत: नवीन नेमणुकांच्या बाबतीत, त्यांना कोणत्या भाषेत खास कौशल्य पाहिजे आहे या इच्छेच्या आधारे निर्णय घेणे महत्वाचे आहे. गेल्या वर्षी दक्षिणेकडील राज्यांतील बर्‍याच सदस्यांनी बँक अधिकाऱ्यांना स्थानिक भाषेत बोलता येत नसल्याची बाब उपस्थित केली. त्याचवेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले होते की, कर्नाटकसारख्या दक्षिणेकडील राज्यांतील खासदारांच्या मागणीवर विचार करीत असल्याचे सांगितले की नियुक्ती ही स्थानिक भाषेतच केली जावी.

बँकिंग क्षेत्रात मातृभाषा अधिकारी असणे यामुळेच महत्वाचे आहे
यावेळी मुख्य दक्षता आयुक्त-सीव्हीसी (Chief Vigilance Commissioner -CVC) संजय कोठारी म्हणाले की, नागरी सेवेप्रमाणेच बँकिंग क्षेत्रातही मातृभाषे व्यतिरिक्त एकापेक्षा जास्त भाषा शिकण्याची शक्यताही शोधली पाहिजे. जेणेकरून लोकांचे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकतील. सीतारामन म्हणाल्या की, कोठारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर CVC ने बरेच बदल केलेले आहेत. त्यांनी स्वतः बँकेच्या क्षेत्राबद्दलची आवड दर्शविणारी अनेक सकारात्मक मते दिली. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, CVC ला घाबरण्याची गरज नाही. त्याऐवजी त्यांना त्यांच्याबरोबर एकत्रितपणे कार्य करण्याची आणि जाणीव असणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

एमआयएम पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी उतरली बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंत राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची २५ सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. त्यामुळे बिहारमध्ये काय निकाल येतात याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे. अशा वेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभा लढवत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी . खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमनं केली होती. त्यापाठोपाठ आज अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनंही बिहार निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.

“बिहार विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्समध्ये (पीडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीत अन्य पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आघाडीच्या माध्यमातून एनडीएच्या अमानवी सरकार सत्तेवरून हटवून मानतावादी सरकार स्थापन करू,” असा विश्वास वंचित आघाडीनं व्यक्त केला आहे.

“बिहार विधानसभा निवडणूक जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष व प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्सचे समन्वय राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्यासोबत लढणार आहोत. यशवंत सिन्हा व काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही एनडीएचं सरकार दूर करू,” असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये ३ टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना दिले जात आहे 2 लाख रुपये, या बातमीचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेची एक बनावट बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली मुलींना दोन लाख रुपये देण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. पण सरकार असे काही करत नाही आहे. आपण या खोट्या बातमीत अडकू नये, म्हणून आम्ही तुम्हाला हे सत्य सांगत आहोत.

सत्य काय आहे ते जाणून घ्या: – हा फॉर्म बनावट असल्याचे ट्विट करून PIB ने याबाबतची माहिती दिली आहे. अशा प्रकारच्या फॉर्मचे वितरण बेकायदेशीर असून या योजनेंतर्गत कॅश प्रोत्साहन दिले जात नाही.

PIB Fact Check काय करते?
PIB Fact Check केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काम करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. यासाठी PIB Fact Check चा व्हाट्सऍप नंबर 918799711259 वर सदर बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल पाठवू शकता किंवा [email protected] वर मेल करू शकता

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

उत्तरप्रदेश पोलिसांची मनमानी, तृणमूल काँग्रेस खासदारांना धक्काबुक्की ; मिडियालाही गावात जाण्यास बंदी

TMC MP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे. याठिकाणी नेते आणि मीडियाला सुद्धा तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यातच तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आम्ही पीडित कुटुंबीयांना भेटणारच यावर अडून राहिलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन हे पोलिसांच्या धक्काबुक्कीत खाली कोसळले.

https://twitter.com/ANI/status/1311925656586915840?s=20

आम्हाला जाऊ द्या, आम्ही सर्व नियमांचे पालन करू, अशी विनंती तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पोलिसांना केली. तरीही, पोलिसांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतरही पीडित कुटुंबाला भेटायला जाण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ ठाम राहिले. यावेळी खासदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर झालेल्या धक्काबुक्कीत खासदार डेरेक ओ ब्रायन यांचा तोल जाऊन खाली कोसळले.

हाथरसमध्ये पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी केले असता उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार ममता ठाकूर यांनी केला आहे. आम्ही पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात होतो, मात्र आम्हाला परवानगी देण्यात आली नाही. ज्यावेळी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी गैरवर्तन करत धक्काबुक्की केली आणि प्रतिनिधी मंडळावर लाठीचार्ज केला, असे खासदार ममता ठाकूर यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आजन्म अहिंसेची शिकवण देणाऱ्या बापूंनी महिलांना दिला होता आत्मसंरक्षणासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश

हॅलो महाराष्ट्रात । वर्तमानात देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊन हा समाजच स्त्रियांचा भक्षक बनला आहे असं चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये मागील दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस पीडितेला मरणानंतरही सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. दर दिवशी बलात्कारानंतर हत्येच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना देशाच्या कुठल्यानं कुठल्या कोपऱ्यातून कानी पडत आहेत. या संपूर्ण कोलाहलात बापू म्हणजेच महात्मा गांधींचे महिलांविरोधातील अत्याचार थांबवण्यासाठी त्यांचे विचार देशाला मार्गदर्शक ठरतात.

आयुष्यभर अहिंसेची शिकवण देणारे बापू महिलांना मात्र, आत्मसंरक्षणासाठी जे करता येईल ते करा! असा संदेश देतात तेव्हा महिलांविरोधातील अत्याचार, गुन्ह्यांवर गांधी यांचे विचार किती स्पष्ट होते हे दिसून येते. मुलांना त्यांनी या संदर्भात एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी महिलांनी आत्मसंरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते करावे, असा सल्ला दिला होता. बलात्कार झालेल्या स्त्रीचा कोणत्याही प्रकारे तिरस्कार केला जाऊ नये असे त्यांचे मत होते. तसेच त्यांनी आपल्या मुलांनाही महिलांसोबत आदरपूर्वक वागण्याची सक्त ताकीद दिली होती. आपल्या मर्यादांचे उल्लंघन करू नये, असेही त्यांनी म्हटले होते.

‘द माइंड ऑफ महात्‍मा गांधी’ पुस्तकात वाईट प्रवृत्ती आणि महिलांवरील अत्याचारावर गांधींचे विचार मांडण्यात आले आहेत. यानुसार गांधींनी म्हटले आहे की, जर महिला हल्लेखोराच्या शारीरिक ताकदीला प्रतिकार करू शकत नसेल तर तिचे पावित्र्यच तिची ताकद बनेल. सीतेचे उदाहरण घ्या. शारीरिक दृष्ट्या सीता रावणासमोर शक्तीहीन होती. मात्र, तिची पवित्रता रावणाच्या ताकदीपेक्षा जास्त शक्तीशाली होती. अनेक प्रलोभने देऊन रावणाने सीतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीतेला तो हातही लावू शकला नाही. माझ्या मतानुसार निडर महिला हे जाणते की तिचे पावित्र्यच तिची सर्वात मोठी ढाल आहे. मनुष्यच नाही तर अग्नीही तिच्यासमोर लाजेल, असे गांधी यांनी म्हटले आहे.

महिलेच्या प्रश्नांना गांधींचे खुले उत्तर
एका महिलेने बापुजींना महिलांवरील अत्याचाराबाबत काही प्रश्न विचारले होते. यावर त्यांनी दिलेले उत्तर खरेच विचार करायला लावणारे आहे. गांधींनी 1942 मध्ये ‘हरिजनबंधु’ नावाच्या गुजराती नियतकालीकेमध्ये हे उत्तर दिले होते. ”ज्या महिलेवर बलात्काराचा प्रसंग ओढवला ती तिरस्काराच्या नाही तर दयेची पात्र आहे. ती स्री जखमी झालेली असते, यामुळे ज्याप्रकारे आपण जखमींची सेवा करते तशीच सेवा तिची केली पाहिजे. शील भंग कोणाचे होते? जी स्त्री शारिरीक संबंधांना तयार होते तिचे. बलात्कार झालेली स्त्री त्या नराधमाला विरोध करते. यामुळे शील भंग हा शब्द बदनामी करतो. यामुळे बलात्कार हा योग्य शब्द त्या स्त्रीबाबत वापरला जावा, असेही गांधी म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

RBI म्हणाले,”तुम्ही तुमच्या एटीएम कार्डद्वारे आजच ‘ही’ 3 कामे करा, जेणेकरून तुमचे पैसे नेहमीच सुरक्षित राहतील”

हॅलो महाराष्ट्र । बँक खात्यात सामान्य लोकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी RBI ने डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या वापरावर काही नवीन नियम बनवले आहेत. या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याबाबत RBI ने आपल्या ट्विटर हँडलवर महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. RBI ने यासाठी तातडीने तीन कामे करण्याचा सल्ला दिला आहे. पहिला रोजच्या व्यवहारासाठीचे लिमिट सेट करा. दुसरे – देशांतर्गत / आंतरराष्ट्रीय वापरासाठीचे लिमिट सेट करा. तिसरे -आंतरराष्ट्रीय वापर चालू / बंद करा.

रिझर्व्ह बँक याबाबत म्हणते की,’ असे केल्याने बँक ग्राहकांचे फसवणूकीमुळे होणारे नुकसान आणि आपल्या खर्चावर मर्यादा आणते.’ या संदर्भात एसबीआय, बीओबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनेही आपल्या ग्राहकांना मेसेजेस पाठवले आहेत. त्यात म्हटले गेले आहे की, त्यांच्या क्रेडिट व डेबिट कार्डवरील काही सेवा 1 ऑक्टोबरपासून बंद केल्या जात आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवहार सेवा देखील समाविष्ट आहेत.

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, आता बँक ग्राहक स्वत: आपल्या एटीएम आणि क्रेडिट कार्डचे लिमिट देखील ठरवू शकतात. समजा आपल्याला असे हवे असेल की, जर आपल्या कार्डावरून एक हजाराहून अधिक रक्कम निघाली नाही पाहिजे तर ते इंटरनेटमधील मॅन्युअलमध्ये जाऊन आपल्या व्यवहाराचे लिमिट बदलू शकतात. आपण कधीही मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीन किंवा आयव्हीआरद्वारे आपल्या कार्डचे लिमिट बदलू शकता.

ही सुविधा 24 तास आणि सात दिवस उपलब्ध असेल. म्हणजेच, आता आपल्या एटीएम कार्डच्या व्यवहाराचे लिमिट आपण स्वत:च ठरवू शकता. RBI ने ग्राहकांना कोणत्या सेवा घ्यायच्या व कोणत्या थांबायच्या आहेत हे त्यांच्या सोयीनुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे.

डेबिट आणि क्रेडिट कार्ड देताना आता ग्राहकांना फक्त देशांतर्गत व्यवहारासाठीच परवानगी मिळेल. याचा अर्थ असा की, आता गरज नसल्यास एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आणि पीओएस टर्मिनल्सवर खरेदी करण्यासाठी परकीय व्यवहारास मान्यता दिली जाऊ नये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

बापूंचे चित्र पहिल्यांदा नोटेवर कधी आणि कसे आले, आतापर्यंत त्यात किती बदल झाले आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 151 वी जयंती आहे. बापूंच्या योगदानाची आठवण करून संपूर्ण राष्ट्र त्यांना श्रद्धांजली वाहात आहे. महात्मा गांधींच्या योगदानामुळे त्यांना भारतीय चलनात स्थान देण्यात आले. आज प्रत्येक संप्रदायाच्या भारतीय नोटांवर बापूंचे चित्र आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का गांधीजींचे हे चित्र कोठून आले आहे आणि बापू पहिल्यांदा चलनी नोटांवर कधी आले होते….

1969 मध्ये महात्मा गांधींचे पहिले चित्र भारतीय नोटेवर आले होते. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे होते. या नोटांवर गांधीजींच्या चित्रामागील सेवाग्राम आश्रमही होते. नोटांवर गांधीजींचे चित्र पहिल्यांदा आले तेव्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि लालकृष्ण झा हे आरबीआयचे गव्हर्नर होते.

 पहली बार 100 के नोट पर राष्ट्रपिता की जन्म शताब्दी के मौके पर पहली बार देखा गया था. दरअसल, 1947 में भारत के आजाद होने के बाद महसूस किया गया कि करंसी पर मौजूद ब्रिटिश किंग जॉर्ज की तस्वीर को महात्मा गांधी की तस्वीर से रिप्लेस किया जाए. इसके लिए फैसला लेने में तत्कालीन सरकार को थोड़ा वक्त चाहिए था. इस बीच किंग के पोट्रेट को सारनाथ स्थित लॉयन कैपिटल से रिप्लेस किया गया.

100 च्या नोटांवर राष्ट्रपिता पहिल्यांदा जन्मशताब्दीनिमित्त दिसले होते. खरं तर,1947 मध्येच भारत स्वतंत्र झाल्यानंतर असे वाटले की, आपल्या चलनावरील ब्रिटिश राजा जॉर्जचे चित्र महात्मा गांधींच्या चित्राने बदलले पाहिजे. यासाठी तत्कालीन सरकारला निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा होता. दरम्यान, राजाच्या पोर्ट्रेटची जागा सरनाथ येथील लायन कॅपिटलने घेतली.

 1969 में आई सेवाग्राम आश्रम वाली तस्वीर-रिजर्व बैंक ने पहली बार गांधी जी की तस्वीर वाले कोमेमोरेटिव यानी स्मरण के तौर पर 100 रुपये के नोट 1969 में पेश किए. यह साल उनका जन्म शताब्दी वर्ष था और नोटों पर उनकी तस्वीर के पीछे सेवाग्राम आश्रम भी था. गांधी जी की मौजूदा पोर्ट्रेट वाले करेंसी नोट पहली बार 1987 में आए. गांधी जी के मुस्कराते चेहरे वाली इस तस्वीर के साथ सबसे पहले 500 रुपये का नोट अक्टूबर 1987 में पेश किया गया. इसके बाद गांधी जी की यह तस्वीर अन्य करेंसी नोटों पर भी इस्तेमाल होने लगी.

1969 मध्ये आले सेवाग्राम आश्रमातील चित्र – रिझर्व्ह बँकेने 1969 मध्ये पहिल्यांदाच गांधीजींचे छायाचित्र असलेले कोमेमोरेटिव किंवा स्मारक नोट म्हणून सादर केले होते. हे वर्ष त्यांची जन्मशताब्दीचे होते आणि नोटांवरील चित्रामागे सेवाग्राम आश्रमही होते. गांधीजींच्या सध्याच्या पोर्ट्रेटवाल्या चलनी नोटा पहिल्यांदा 1987 मध्ये आल्या. ऑक्टोबर 1987 मध्ये गांधीजींच्या हसऱ्या चेहऱ्यासह ही 500 रुपयांची नोट पहिल्यांदा आणली गेली होती. यानंतर गांधीजींचे हे चित्र इतर चलनी नोटांवरही वापरण्यास सुरवात झाली.

 RBI ने 1996 में एडिशनल फीचर्स के साथ नई महात्मा गांधी सीरीज नोटों को पेश किया. इन फीचर्स में बदला हुआ वाटरमार्क, विंडोड सिक्योरिटी थ्रेड, लेटेंट इमेज और विजुअल हैंडीकैप्ड लोगों के लएि इंटेग्लियो फीचर्स शामिल रहे. 1996 से पहले 1987 में महात्मा गांधी की तस्वीर को वाटरमार्क के रुप में इस्तेमाल किया जाता था. जो कि नोट के बाईं तरफ दिखाई देते थे. बाद में हर नोट में गांधी जी की तस्वीर छापी जा रही है.

आरबीआयने 1996 मध्ये महात्मा गांधीच्या नवीन नोटांच्या मालिकेची अतिरिक्त वैशिष्ट्यांसह ओळख करून दिली. या वैशिष्ट्यांमध्ये बदललेला वॉटरमार्क, विंडो असलेला सुरक्षा थ्रेड, सुप्त प्रतिमा आणि व्हिज्युअल अपंग लोकांसाठी अविभाज्य वैशिष्ट्यांचा समावेश आहे. 1996 पूर्वी, 1987 मध्ये महात्मा गांधींची प्रतिमा वॉटरमार्क म्हणून वापरली जात होती. जो नोटेच्या डाव्या बाजूला दिसला. यानंतरच्या प्रत्येक नोटेमध्ये गांधीजींचे चित्र छापले जात आहे.

 1996 से महात्मा गांधी की तस्वीर वाले जो नए नोट चलन में आए उनमें 5, 10, 20, 100, 500 और 1000 रुपये वाले नोट शामिल थे. इस दौरान अशोक स्तंभ की जगह राष्ट्रपिता महात्मा गांधी का फोटो और अशोक स्तंभ की फोटो नोट के बायीं तरफ निचले हिस्से पर प्रिंट कर दी गई.

1996 पासून महात्मा गांधींच्या चित्र असलेल्या नवीन नोटांमध्ये 5, 10, 20, 100, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचा समावेश होता. यावेळी अशोकस्तंभऐवजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आणि अशोक स्तंभाचा फोटो नोटेच्या खालच्या डाव्या बाजूला छापला गेला.

 कहां की है नोट पर बापू की मौजूदा तस्वीर-बापू की जो तस्‍वीर आज हम नोट पर देखते हैं, वह वायसराय हाउस (अब राष्‍ट्रपति भवन) में 1946 में खींची गई थी. राष्‍ट्रपिता म्यांमार (तब बर्मा) और भारत में ब्रिटिश सेक्रेटरी के रूप में कार्यरत फ्रेडरिक पेथिक लॉरेंस से मुलाकात के लिए पहुंचे थे. वहीं ली गई गांधी जी की तस्वीर को पोट्रेट के रूप में भारतीय नोटों पर अंकित किया गया. हालांकि, यह तस्‍वीर किस फोटोग्राफर यह तस्‍वीर किस फोटोग्राफर ने खींची इसके बारे में कोई जानकारी उपलब्ध नहीं है.

त्या नोटेवरचे बापूंचे सध्याचे चित्र कुठले आहे – आज आपल्याला प्रत्येक नोटेवर दिसणारा बापूंचा फोटो हा 1946 मध्ये व्हायसरायच्या घरात (सध्याचे राष्ट्रपती भवन) काढला गेला होता. गांधीजी म्यानमार (तत्कालीन बर्मा) आणि भारतात ब्रिटीश सचिव म्हणून काम करणारे फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांना भेटायला आले होते. तेथे घेतलेल्या गांधीजींच्या या छायाचित्राला पोर्ट्रेटच्या रूपात भारतीय नोटांवर छापले गेले होते. मात्र, कोणत्या छायाचित्रकाराने हे छायाचित्र काढले याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

 1949 में आया था अशोक स्तंभ वाला नोट-गांधी जी की तस्वीर से पहले विभिन्न मूल्य वर्ग के नोटों पर अगल-अलग डिजाइन और इमेज रहती थीं. 1949 में तत्कालीन सरकार ने अशोक स्तंभ के साथ नई डिजाइन वाला 1 रुपये का नोट पेश किया था. 1953 से हिंदी को नोटों पर उल्लिखित करना शुरू किया गया. 1000, 5000 और 10000 के उच्च मूल्य वर्ग वाले नोटों को 1954 में रिइंट्रोड्यूस किया गया. 1000 रुपये के नोट पर तंजोर मंदिर की डिजाइन थी, 5000 रुपये के नोट पर गेटवे ऑफ इंडिया और 10000 के नोट पर लॉयन कैपिटल, अशोक स्तंभ थे. हालांकि इन नोटों को 1978 में बंद कर दिया गया. 1980 में नोटों के नए सेट लाए गए.

1949 मध्ये आली होती अशोकस्तंभ असलेली नोट – गांधीजींच्या या चित्राच्या आधी वेगवेगळ्या नोटांवर वेगवेगळ्या डिझाईन्स आणि प्रतिमा होत्या. 1949 मध्ये तत्कालीन सरकारने अशोक स्तंभासमवेत नव्याने डिझाइन केलेली 1 रुपयांची नोट आणली. 1953 पासून हिंदीचा उल्लेख नोटांवर होऊ लागला. 1954 मध्ये 1000, 5000 आणि 10000 च्या उच्च मूल्यांच्या नोटा रिइंट्रोड्यूस केल्या गेल्या. 1000 रुपयांच्या नोटमध्ये तंजोर मंदिराची रचना, 5000 रुपयांच्या नोटवर गेट वे ऑफ इंडिया आणि 10000 च्या नोटवर लायन कॅपिटल, अशोक स्तंभाची रचना होती. मात्र या नोटा 1978 मध्ये बंद करण्यात आल्या. 1980 मध्ये नोटांचे नवीन संच सादर करण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची तडकाफडकी बदली

suraj gurav

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मागील वर्षभरात कणखर भूमिका घेत कराडच्या गुन्हेगारी विश्‍वाच्या मुसक्या आवळणार्‍या कराडचे पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची गुरुवारी अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. सुरज गुरव यांनी कराडचा पदभार स्वीकारून नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. अचानक बदली झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले असून या बदलीस ‘मॅट’मध्ये आव्हान दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्यावर्षी 22 सप्टेंबर 2019 रोजी पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांची नियुक्‍ती झाली होती. पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांना गेल्या महिन्यात सात सप्टेंबर रोजी कोरोनाची बाधा झाली होती. तेव्हापासून ते रजेवर होते. गुरुवारी ते पुन्हा सेवेत रुजू होणार होते. मात्र सकाळीच त्यांच्या बदलीच्या आदेशाची माहिती समोर आली.

कराड शहरात रात्री – अपरात्री वाढदिवस साजरा व्हायचा. मात्र कठोर कारवाई करत सुरज गुरव यांनी वाढदिवस सिलेब्रेशन करणार्‍यांच्या समाचार घेत थेट गुन्हे दाखल केले होते. व्हॉट्सअ‍ॅप, युट्युब चॅनेलच्या माध्यमातून गुंडगिरीचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या युवकांसह गुन्हेगारी टोळ्यांचा सुरज गुरव यांनी चांगलाच समाचार घेतला होता. मोक्कासारख्या दोन कठोर कारवाई करत त्यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रावर पोलिसांनी चांगला अंकुश ठेवला आहे.

कराडची माणुसकी नावाचा ग्रुप तयार करून त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. या ग्रुपने कराड व परिसरात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांची कोल्हापूर येथील कारकीर्द चांगलीच गाजली होती. दोन वर्षापूर्वी महापौर निवडीवेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर त्यांची तडकाफडकी चिपळूणला बदली झाली होती. तेथे वर्षभर सेवा बजावली असतानाच अचानक तेथूनही त्यांची थेट कराडला बदली झाली. कराडमध्ये एक वर्षाचा कालावधी होतो न होतो तोच त्यांची कराडातून तडकाफडकी नागपूरला बदली झाली आहे. त्यामुळे या बदलीला आव्हान दिले जाण्याची शक्यता पोलिस वर्तुळात व्यक्‍त केली जात असून पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या भूमिकेबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’