Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 617

Low Blood Pressure | कमी रक्तदाबाची समस्या आरोग्यासाठी आहे धोकादायक; करा ‘हे’ उपाय

Low Blood Pressure

Low Blood Pressure | लोकांची जीवनशैली आजकाल मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. त्यांचे शारीरिक कष्ट कमी झालेले आहेत. आणि त्या शारीरिक कष्टाची जागा आता यंत्रांनी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे बैठी जीवनशैली, जास्त स्क्रीन टाईम यामुळे त्यांना अनेक आजारांनी ग्रासलेले आहे. यातील अनेक लोकांना रक्तदाब्याच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत. यात हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर दोन प्रकार पडतात. रक्तदाब वाढणे जितके हानिकारक आहे. तितकेच तो कमी होणे देखील अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब कमी होतो. आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला जर लो ब्लड (Low Blood Pressure) प्रेशरची समस्या असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुमचे मोठे शारीरिक नुकसान होऊ शकते.

आपल्या धमन्यांमधून ज्या दाबाने रक्त वाहते. त्याला रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब हा दिवसभर सारखा नसतो. तो कमी जास्त होत असतो. व्यायाम करताना, झोपताना, खेळताना आपल्या शारीरिक हालचालीनुसार आपला रक्तदाब हा कमी जास्त होत असतो. त्याचप्रमाणे आपली जीवनशैली आणि आहारामुळे देखील रक्तदाबामुळे बदल होतो. रक्तदाब वाढला तर अनेकांना त्रास होतो. परंतु तोच रक्तदाब जर कमी झाला, तरी देखील अनेक समस्या उद्भवतात. यावर जर तुम्ही नियंत्रण नाही ठेवले, तर तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

कमी रक्तदाब म्हणजे काय ? | Low Blood Pressure

कमी रक्तदाबाला हायपोटेन्शन असे देखील म्हणतात. जेव्हा रक्तदाब 90 /60 मिलिमीटर जी खाली येतो. तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. याला अनेक कारणे असू शकतात. खराब जीवनशैली कोणत्याही प्रकारचे आजार औषध उपचारांचे दुष्परिणाम. रक्तदाब कमी झाला, तर आपल्याला चक्कर येणे यांसारख्या घटना दिसतात. तुम्ही अशा परिस्थितीत लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

आहारात मिठाचा वापर वाढवावा

जास्त मीठ खाणे हे आरोग्यासाठी हाणीकारक असते. परंतु ज्या लोकांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी आहारात मिठाचे प्रमाण वाढवावे. त्यामुळे रक्तदाब नॉर्मल राहतो. परंतु हे मीठ जास्त प्रमाणात घेताना, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील गरजेचे असते.

संतुलित आहार

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला आहार संतुलित घेणे देखील गरजेचे आहे. आपल्या शरीराला जीवनसत्वे, खनिजे, फायबर, प्रथिने यासारख्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे आहारात या घटकांचा समावेश करा. त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित राहील.

अचानक उठू नका

तुम्ही जर अचानक उठला तर रक्तदाब काही सेकंदासाठी कमी होतो. आणि तुम्हाला चक्कर येते आणि तुमची स्थिती अचानक बदलू शकते. त्यामुळे उठताना अचानक उठू नका.

दररोज व्यायाम करा | Low Blood Pressure

रक्तदान नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे, खूप गरजेचे असते. यासाठी तुम्ही चालणे, जॉगिंग करणे, योगा करणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.

भरपूर पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता असेल, तरी देखील तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी प्या. म्हणजे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहील.

Viral Video | जुगाड करून पठ्ठ्याने बनवली अनोखी गाडी; व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये लोक आपली नवीन कलाकृती दाखवत असतात. आपल्या भारतात जुगाड करणाऱ्या लोकांची काही कमतरता नाही. लोक असे जुगाड करतात की, एखाद्या इंजिनियरला देखील लाज वाटेल. सोशल मीडियावर विनोदी तसेच जुगाड यांनी भरलेले अनेक व्हिडिओ आहेत. काही व्हिडिओ आपल्याला आपले मनोरंजन करतात. तर काही व्हिडिओमधून आपल्याला नवीन नवीन टेक्निक समजतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

याआधी तुम्ही जुगाड करण्याचे वेगवेगळे व्हिडिओ (Viral Video) पाहिले असेल. परंतु हा एक खतरनाक जुगाड समोर आलेला आहे. ती म्हणते म्हणजे एका तरुणाने खराब झालेल्या बाईकला सायकलची चाके लावलेली आहे. आणि नवीन बाईक तयार केलेली आहे. तो या बायकला बाईकला पेंडल मारून रस्त्यावर बाईक चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसायला देखील येत आहे. परंतु या व्यक्तीने चांगलेच डोके वापरून ही नवीन अशी बाईक तयार केलेली आहे.

हा तरुण ग्रामीण भागातील दिसत आहे. त्याने त्याच्या जुगाडी आयडियाच्या मदतीने ही अनोखी मोटरसायकल तयार केलेली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. ही गाडी चालवण्यासाठी कोणत्याही इंधनाची गरज नाही. एक जुनी बाईक पडलेली असते. त्या बाईकला पेंडल आणि चैन जोडली आहे. आणि बाईक पेंडल मारत तो गाडी चालवत आहे. तरुणाने भंगारात पडलेल्या सगळ्या वस्तूंचा आणि बाईकचा चांगलाच वापर केलेला आहे. त्यामुळे अनेक लोक सोशल मीडियावर त्याचे कौतुक देखील करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केलेला जात आहे.

Weather Update | मुंबईसह ‘या’ जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय

Weather Update

Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. कोकणात तर अति मुसळधार पाऊस पडत आहे. त्यासोबतच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याची देखील सांगण्यात आलेले आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

कोकणातील शाळांना सुट्टी | Weather Update

8 जुलै 2024 रोजी मुंबई मधील सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली होती. परंतु पावसाचा वेग काही ओसरला नाही. म्हणूनच आता आज म्हणजेच 9 जुलै 2024 रोजी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. कारण नवी मुंबईमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या उद्देशाने शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

हा आदेश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी केलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि बारावीपर्यंतच्या कॉलेजला सुट्टी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील शाळा आणि कॉलेज आज बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे.

पुण्यात पावसाचा रेड अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9जुलै रोजी पुण्यात अति मुसळधार पाऊस पडण्याचा शक्यता आहे. त्यामुळे त्यामुळे पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी, भोर या तालुक्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. अतिवृष्टीमुळे काही अनुचित घटना घडू नये आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या काळात नागरिकांनी देखील सावधानता बाळगावी, तसेच धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनाला जाऊ नये. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.

IRCTC : राजधानी एक्सप्रेस मध्ये जेवणात आढळले झुरळ ; रेल्वेला मागावी लागली माफी

IRCTC : आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यातही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आवर्जून रेल्वेचा वापर केला जातो. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये बहुतांशी जेवणाची सुविधा असते. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये भारतीय रेल्वे अँड केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी तर्फे ही सेवा पुरवली जाते. मात्र अनेकदा त्याचा दर्जा हा खालावण्याची अनेक उदाहरणं आपण माध्यमातून पाहत असतो. आता असेच आणखी एक उदाहरण समोर आले आहे. मुंबई -दिल्ली राजधानी एक्सप्रेस (IRCTC) च्या जेवणात चक्कं झुरळ आढळल्याची माहिती एका प्रवाशाने ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे.

नक्की काय घडले ? (IRCTC)

हा प्रवासी मुंबई हुन दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस मधून प्रवास करीत होता. याचवेळी या प्रवाशाने आपल्या तिकीट बुकिंग सोबत जेवणाचे देखील बुकिंग घेतले होते. मात्र या व्यक्तीला रेल्वेमध्ये जेवणाचे पार्सल मिळाले (IRCTC) त्यामध्ये चक्क झुरळ सापडले. त्यानंतर वैतागून प्रवाशाने याबाबत आपल्या ट्विटर अकाउंट वरून याबाबत रोष व्यक्त केला. त्याने आपल्या X प्लॅटफॉर्म वर फोटो पोस्ट करत म्हंटले आहे की, “काल CSMT #मुंबई – दिल्ली राजधानी एक्सप्रेस मध्ये प्रवास करत असताना जेवण तिकिटासोबत बुक केले होते. या जेवणात एक झुरळ तरंगत होता, सोबत फोटो जोडत आहे. तक्रार केल्यानंतर मॅनेजर आले आणि म्हणाले तुम्हाला पैसे परत देतो, तिकिटाचे पैसे ही परत देतो. “

रेल्वे विभागाकडून माफी (IRCTC)

घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागत या प्रवेशाच्या ट्विटला IRCTC कडून उत्तर देण्यात आले असून झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. IRCTC ने त्याच्या ट्वीटवर कमेंट केली आहे. ” सर, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल अत्यंत क्षमस्व. या (IRCTC) घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सेवा पुरवठा दारावर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच या स्वयंपाकगृहाची सुविधा तात्पुरती बंद केली गेली आहे,” असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

शरद पवारांच्या पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!! नेमका निकाल काय??

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत वापरल्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये देखील शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) तुतारी हेच चिन्ह कायम राहणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीमुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरल्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला परवानगी दिली आहे. तसेच आता शरद पवार यांच्या पक्षाला देणगी देखील स्वीकारता येणार आहे. याबाबतचे अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिली आहे. या अधिकृत मान्यतेमुळेच आता कलम 29 ब नुसार शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

दरम्यान, आज निवडणूक आयोगासमोर याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्येच देणगी स्वीकारण्याबाबत आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला परवानगी दिली आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हता. परंतु आता आमची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.”

Champions Trophy 2025 चं वेळापत्रक समोर!! भारत- पाक सामना कधी?

Champions Trophy 2025 schedule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेनंतर आता सर्व क्रिकेटप्रेमी चाहत्यांचे लक्ष्य पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीकडे (Champions Trophy 2025) लागलं आहे. हि चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असून याबाबतचे वेळापत्रक समोर आलं आहे. 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात असून भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तर भारत- पाक या २ कट्टर प्रतिस्पर्धी संघात २० फेब्रुवारी रोजी रंगतदार मुकाबला बघायला मिळेल. क्रिकेटप्रेमींसाठी भारत- पाकिस्तान सामना म्हणजे एक पर्वणीच असेल. मात्र भारतीय संघ पाकिस्तानला जाणार कि याबाबत अजूनही शंका आहे.

खरं तर तब्बल सात वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आलं आहे. याआधी 2017 मध्ये ही स्पर्धा पार पडली होती. यात पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. नियमाप्रमाणे विजेत्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जातं. त्यामुळे यंदा पाकिस्तानने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. लाहोर, कराची आणि रावळपिंडीच्या स्टेडिअमवर हे सामने होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण आठ संघ पात्र ठरले आहेत. यात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले असून त्यांच्या व्यतिरिक्त बांगलादेश आणि न्यूझीलंडचे संघ या गटात आहेत.

कधी आहेत भारताचे सामने ? Champions Trophy 2025

Champions Trophy 2025 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारीला भारत न्यूझीलंड विरुद्ध लढेल. आमने सामने असतील. ग्रुप स्टेजमधला भारतीय संघाचा शेवटचा सामना 1 मार्चला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी असणार आहे. टीम इंडियाचे हे तीनही सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

चॅम्पियन ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक –

19 फेब्रुवारी : न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान – कराची
20 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध भारत – लाहोर
21 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – कराची
22 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – लाहोर
23 फेब्रुवारी: न्यूझीलंड विरुद्ध भारत – लाहोर
24 फेब्रुवारी : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश – रावळपिंडी
25 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड – लाहोर
26 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका – रावळपिंडी
27 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड – लाहोर
28 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया – रावळपिंडी
1 मार्च: पाकिस्तान विरुद्ध भारत – लाहोर
2 मार्च: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड – रावळपिंडी
5 मार्च: पहिली उपांत्य फेरी – TBC विरुद्ध TBC – कराची
6 मार्च: दुसरी उपांत्य फेरी – TBC विरुद्ध TBC – रावळपिंडी
9 मार्च: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनल – TBC विरुद्ध TBC – लाहोर

Travel : काय डोंगर ! काय हिरवळ ! भारीच …! एकदा आवर्जून भेट द्या भारतातल्या ‘या’ अप्रतिम ठिकाणाला

Travel : या लेखाचे शीर्षक पाहून नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रातली एक नाट्यमय राजकीय घडामोड आठवली असेल मात्र आज आम्ही अशाच काहीशा सुंदर निसर्गाने परिपूर्ण असलेल्या एक ठिकणाबद्दल सांगणार आहोत जिथलं वातावरण पाहून तुमचं मन प्रसन्न होईल. सुंदर हिरवीगार झाडे , डोंगर, दऱ्या आणि अधूनमधून जमिनीला स्पर्श करणारं आभाळ …! असा मनमोहक नजारा तुम्हाला येथे अनुभवायला मिळेल. उत्तराखंड येथील रानीखेत या हिल स्टेशनवर. आपल्याकडे उत्तराखंडला देवभूमी म्हणतात. इथली तीर्थस्थळं शिवाय अप्रतिम निसर्ग तुमहाला जणू स्वर्गासम (Travel) भाषातील यात शंका नाही मात्र त्यातही छोटंसं हिलस्टेशन असलेलं रानीखेत निव्वळ लाजवाब आहे. चला ट्राम जाणून घेऊया या ठिकाणाबद्दल…

कॅम्पिंग साठी उत्तम ठिकाण (Travel)

जर तुम्ही राणीखेतला एकदा भेट दिलीत तर पुन्हा पुन्हा इथे जावंसं वाटेल. हे हिल स्टेशन उत्तराखंडच्या कुमाऊंमध्ये आहे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. राणीखेतमध्ये दाट जंगल, देवदार ची उंच झाडं, धबधबे, नद्या आणि सुंदर दऱ्या पर्यटकांना पाहता येतात. उन्हाळ्यातही पर्यटक येथे कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. हिवाळ्यात राणीखेतमध्ये पर्यटकांना बर्फवृष्टी पाहायला (Travel) मिळते.

मन प्रसन्न करणारी शांतता (Travel)

हे एक शांत हिल स्टेशन आहे आणि इथली शांतता पर्यटकांना सुखावते. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही एकदा राणीखेतला भेट द्या. दिल्ली ते राणीखेत हे अंतर 376 किलोमीटर आहे. हे राणीखेत हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १८०० मीटर उंचीवर आहे. या हिल (Travel) स्टेशनचे हवामान नेहमीच आल्हाददायक असते.

झुला देवी मंदिर

इथून तुम्ही हिमालयाची सुंदर दृश्य बघू शकता. हे हिल स्टेशन नैसर्गिक सौंदर्य आणि सफरचंदाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही झुला देवी मंदिराला भेट देऊ शकता. हे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. राणीखेतपासून झुलादेवी मंदिर ७ किलोमीटर अंतरावर आहे. येथील चौबटीया गार्डन सुद्धा पाहण्यासारखे आहे. चौबटीया बागेत सफरचंद, बदाम आणि जर्दाळूच्या बागा पाहायला मिळतात. शिवाय तुम्ही राणीखेत (Travel) येथील बिनसार महादेव मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर राणीखेतपासून अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर आहे.

NEFT, IMPS की RTGS? कोणत्या पद्धतीने पैसे जलद आणि सुरक्षित जातात? घ्या जाणून

Online Banking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. इंटरनेटचा वापर देखील वाढलेला आहे. त्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने बँकेच्या सगळे व्यवहार देखील ऑनलाईन माध्यमातून होत असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्याला पैसे ट्रान्सफर करायचे असेल, तरीदेखील आता बँकेत जाण्याची काही गरज लागत नाही. तुम्ही ऑनलाईन मोबाईलमधून पैसे ट्रान्सफर देखील करू शकता. आणि दुसऱ्याकडून पैसे घेऊ शकता.

UPI व्यतिरिक्त बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी वेगवेगळे पर्याय देखील दिले जातात. तुम्हाला जर एखाद्याला निधी ट्रान्सफर करायचा असेल, तर तुम्हाला नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर म्हणजे NEFT या सेवेद्वारे पैसे ट्रान्सफर करावे. लागतात किंवा RTGS चा देखील वापर केला जातो तसेच IMPS देखील वापरले जाते.

बँकेतून पैसे ट्रान्सफर करताना या तिन्हींपैकी कोणत्यातरी एका पर्यायाचा वापर केला जातो. परंतु या तिन्ही पैकी सगळ्यात जलद आणि कार्यक्षम कोणता पर्याय आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पैसे पाठवताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर

आणि NEFT च्या माध्यमातून आपल्याला अनेक फायदे मिळतात. या सुविधेत भारतात कुठेही तुम्ही 24 तास पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा 365 दिवस देखील चालू असते या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही रियल टाईममध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करून घरबसल्या देखील NEFT द्वारे पैसे पाठवू शकता.

IMPS तात्काळ पेमेंट सेवा

ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे चालवली जाते. याच्या माध्यमातून तुम्ही त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा देखील 24 तास उपलब्ध असते तुम्ही मोबाईल तसेच इंटरनेट बँक शाखेतून त्याचप्रमाणे एटीएमच्या माध्यमातून देखील पैसे ट्रान्सफर करू शकता. ही एक सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित असा पर्याय आहे. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही जवळपास 2 लाख रुपयांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करू शकता.

RTGS

RTGS ही एक पैसे पाठवण्याची विश्वासहार्य प्रणाली आहे. तुम्ही बँकेच्या माध्यमातून RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा देखील 24 तास चालू असते. या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही 2 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार करू शकता.

FD Interest Rates | ‘या’ बँकेच्या FD व्याजदरात मोठा बदल, कुठे मिळणार चांगले व्याजदर?

FD Interest Rates

FD Interest Rates | यावर्षी रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो दरात कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. त्यामुळे देशातील सर्वात मोठी बँक आता FD वर खूप जास्त व्याज देत आहे. यामध्ये आता आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी बँक, कॅनरा बँक इत्यादींचा समावेश आहे. तुम्हाला जर FD करायची असेल, तर तुम्ही या बँकांमध्ये करू शकता. आता या बँकांमध्ये जुलै महिन्यात FD कोणती बँक सर्वाधिक व्याज देत आहेत? हे आपण जाणून घेणार आहोत.

SBI बँक | FD Interest Rates

SBI बँक FD वर 3.50% ते 7.10% पर्यंत व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर 4% ते 7.60% एवढे आहे. त्याचप्रमाणे 400 दिवसांच्या विशेष योजनेवर 7.10% व्याजदर मिळते.

ICICI बँक

ही बँक FD वर सामान्य लोकांना 3 टक्के ते 7.20% एवढे व्याज देते. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.75 टक्के व्याज देते. 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी 7.75 टक्के ते 7.20% पेक्षा जास्त व्याजदर या बँकेत दिले जाते.

HDFC बँक

ही बँक FD वर जे सामान्य नागरिकांना 3 टक्के ते 7.25% एवढे व्याजदर देते. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांसाठी 3.50 ते 7.75 टक्के व्याजदर देते.

कॅनरा बँक

ही बँक 7 दिवस ते 10 दिवसाच्या मुदतीच्या FD वर व्याजदर सामान्य नागरिकांसाठी 4% वरून 7.22 टक्के एवढा आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 7.75 टक्के एवढा व्याजदर देते.

PNB बँक | FD Interest Rates

ही बँक सामान्य नागरिकांना 3.50 ते 7.25% एवढे व्याजदर देते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना 4% ते 7.75 टक्के एवढे व्याजदर देते. 400 दिवसांच्या कालावधीसाठी ही बँक 7.25% ते 7.75 टक्के एवढे व्याजदर देते.

BSNL Recharge Plan : BSNL चा परवडणारा रिचार्ज!! 397 रुपयांत मिळतोय 150 दिवस लाभ

BSNL Recharge Plan 397 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे Jio Airtel आणि VI सारख्या देशातील कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप लागला आहे. अशावेळी देशी टेलिकॉम एजन्सी बीएसएनएलने आपल्या यूजर्ससाठी अनेक उत्तम रिचार्ज प्लॅन BSNL Recharge Plan) आणले आहेत. इतर कंपन्यांपेक्षा BSNL चे रिचार्ज स्वस्त असल्याने ग्राहकांसाठी ते अतिशय फायदेशीर ठरत आहे. आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच एका रिचार्ज प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही तब्बल 150 दिवस लाभ घेऊ शकता. खास बाब म्हणजे या रिचार्ज प्लॅनची किंमत अवघी 397 रुपये आहे. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

कमी किमतीत रिचार्ज प्लॅन (BSNL Recharge Plan) उपलब्ध असल्याने सध्याच्या या महागाईच्या काळात अनेक ग्राहक बीएसएनएल कडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनी सुद्धा वेगवेगळे प्लॅन लाँच करत असते. त्यातच पार्श्वभूमीवर 397 रुपयांचा रिचार्ज ग्राहकांनाही वरदान ठरणार आहे. BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 2GB इंटरनेट डेटा देखील मिळतो.याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस ची सुविधा मिळतेय. यात एक गोष्ट लक्षात ठेवा कि, हे अतिरिक्त फायदे फक्त एका महिन्यासाठी उपलब्ध असतील. तुम्ही 30 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा वापरु शकता.

BSNL चा 797 रुपयांचा प्लान – BSNL Recharge Plan

397 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन शिवाय तुम्ही बीएसएनएलचा 797 रुपयांचा प्लान देखील वापरून पाहू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तुम्ही जर इट टेलिकॉम कंपन्यांचा विचार केल्यास Jio आणि Airtel सारख्या मोठमोठ्या आणि मुरलेल्या कंपन्या तुम्हाला फक्त 84 दिवस किंवा 90 दिवसांची व्हडिलिटीची सुविधा देतात अशावेळी त्याच किमतीत BSNL तुम्हाला 300 दिवसांची व्हॅलिडिटी देत असेल तर ग्राहकांसाठी ही नक्कीच परवडणारी गोष्ट आहे.