“महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर हल्लाबोल केला. भाजपसोबतच्या युती संबंधी त्यांनी अनेक महत्वाची विधानेही केली. यावेळी त्यांनी भाजपला टोलाही लगावला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. “महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे, असे दरेकर यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाजपवरील टीकेनंतर आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करीत पलटवार केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. आम्हीही महाराष्ट्राचे आहोत, सर्व पक्ष महाराष्ट्राची काळजी घेणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याची काळजी भाजपलासुद्धा आहे.

 

दिवस हे सगळ्यांचे येत असतात. त्यातून सोने करायचे कि माती हे खरं आहे ठरवायचे असते. पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेची सेवा करण्याची संधी मिळाली. मात्र, आज खऱ्या अर्थाने त्याची सेवा करून सोने केले कि माती याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे, असे दरेकर यांनी मांडली.

Leave a Comment