नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवांनाच परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना रुग्ण वाढीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान रात्री ८ ते सकाळी ५ यावेळेत बाहेर निघण्यास बंदी आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली आहे. मात्र या काळात नियम मोडणाऱ्या अनेक नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याने स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरले असून अशा नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे.

शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने संगनमताने अंशत लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच नुकतेच शहरात रात्री आठ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता दररोज रात्री शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करत आहे.

काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालया समोरील अण्णा भाऊ साठे चौकात या दोन्ही अधिकाऱ्यांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. परवाच्या पाहणीत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या झोमॅटो बॉय कडून प्रोझोन मधील दुकाने सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी प्रोझोन गाठून तेथील सुरू असणारी केएफसी, करीमस किचन, डोमिनोज आणि दुकाने सील केली होती.

पेट्रोल पंपावर होणारेे नियमांचे उल्लंघन निदर्शनास येताच तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप देखील सील करण्यात आले आहे. तसेच पुंडलिकनगर येथे मास्कचा वापर न करता रात्री पावणे दहाच्या सुमारास अनेक जण समूह करून गप्पा मारत होते अशावर ही दंडात्मक कारवाई केली.
औरंगाबादकरांनो आता तरी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन विनाकारन बाहेर पडणे टाळा, अशीच बाजारात गर्दी होत राहिल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणे अटळ म्हणावे लागेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment