जि.प.च्या भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प, वैज्ञानिकच नसल्याने टंचाईग्रस्त गावांची पंचाईत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वैज्ञानिकांची तीन पदे मंजूर असून त्यापैकी एक पद भरण्यात आले आहे. तेसुद्धा वैद्यकीय रजेवर गेल्याने भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी सध्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे भूवैज्ञानिकच नसल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची पंचाईत झाली आहेत, दरम्यान पाणीपुरवठा विभागासाठी 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे.

यात जिल्ह्यात वैज्ञानिकच नसल्याने पाणीपुरवठ्याची 78 कामे ठप्प झाली आहेत, गाव पातळीवर पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी सर्वेक्षणाची गरज असते जिल्ह्यात दरवर्षी ग्रामीण भागामध्ये सतत पाणी टंचाई असते परंतु वैज्ञानिकच नसल्याने ही कामे ठप्प झाली आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून मिळाली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment