“महाविकास आघाडीचे सरकार हे लुटारूंच्या पाठिमागे उभे, मुख्यमंत्र्यांनी विचार करावा”; राजू शेट्टींचा हल्लाबोल

0
61
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजपसह अनेक संघनातील नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. दरम्यान वीजबिलाच्या मुद्दायवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे( नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकावर हल्लाबोल केला आहे. “राज्यातील महाविकास आघाडीचे हे सरकार लुटारूच्या पाठिशी उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किती दिवस लुटारूच्या मागे उभे राहायचे याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे,अशी टीका शेट्टी यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली येथे एफआरपी आणि वीज कनेक्शन तोडणी विरोधात तिरडी मोर्चा काढला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेट्टी म्हणाले की, आजच्या मिर्चयातील फौज हि स्वाभिमानीची फौज आहे. महाराष्ट्रात असलेल्या विरोधीपक्षाची फौज नाही. हे सरकारने लक्षात ठेवावे. आम्ही रडणारे नाही लढणारे आहोत आणि आम्ही सांगितलेले आहे. संघर्षच करायचा असेल तर तारीख ठरवून करू.

राज्यातील कारखानदार, साखर आयुक्त त्यांच्यात ताटा खालचे मांजर झाले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि राज्य मंत्री हे दोघे ही बेकायदेशीर ऊसामध्ये कपाती करतात. मग न्याय मागायचा कुठे? ज्या खाजगी वीजनिर्मिती कंपनी आहेत. चांदोलीला आहे, वीरला आहे. त्यांच्यामध्ये पवार कुटुंब चे शेअर्स नाहीत हे अजित पवार यांनी जाहीर करावे, असे आव्हानही यावेळी शेट्टी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here