राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषणात केला एकेरी उल्लेख; मिटकरींची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagatsingh koshyari) हे मागच्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत चर्चेत आहेत. सध्या अशाच एका भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामुळे राज्यपालांच्या (bhagatsingh koshyari) अडचणींत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी (bhagatsingh koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचा हा व्हिडिओ ट्विट करून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?
‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख ! नेमके राज्यपालांच्या (bhagatsingh koshyari) मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी आणखी एक वक्तव्य केले आहे. राज्यपाल बनणं म्हणजे सर्व दु:खच दु:ख आहे, सुख काहीच नाही, असे राज्यपाल (bhagatsingh koshyari) म्हणाले. त्यामुळे त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागले आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

हे पण वाचा :
Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज
LIC मध्ये महिन्याला 1358 रुपये जमा करा आणि 25 लाख रुपये मिळवा
PM Kisan Yojana : 13 वा हप्ता तुम्हांला मिळणार की नाही?
नवीन वर्षात अगदी स्वस्तात घरी घेऊन जा ‘हे’ 10 स्मार्ट अन् ब्रँडेड TV
धक्कादायक घटना : बाल्कनीत अडकलेल्या 15 वर्षीय मुलीचा आगीमुळे तडफडून मृत्यू