Friday, December 19, 2025
Home Blog Page 2673

पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही; सदाभाऊंचा शरद पवारांना टोला

sadabhau pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करताना म्हंटल होत की, काही लोक म्हणायचे की मी पुन्हा येईन मात्र आम्ही काय त्यांना परत येऊ दिले नाही. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी पवारांवर निशाणा साधत जळजळीत टीका केली.

सदाभाऊ खोत यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, येणारे येतीलच पण पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्या नशिबी येणार नाही हे मात्र नक्की !! सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस कडून नेमकं काय प्रत्युत्तर येते हे देखील पाहावं लागेल.

दरम्यान, यापूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पवारांवर निशाणा साधत फडणवीस हे शरद पवारांच्या डोळ्यात खुपतात असे म्हंटल होत. तसेच तुम्ही पावसात भिजूनही तुमचे फक्त 54 च आमदार निवडून आले तसेच गेल्या 30 वर्षात तुम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नेता मुख्यमंत्री पदावर बसवता आला नाही असा टोलाही लगावला होता

पवार नेमकं काय म्हणाले-

निवणडणूक लागायच्या अगोदर, निकाला आधीच काही लोक मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले.

विद्यापीठात कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

bAMU
bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

विद्यापीठात सोमवारी अधिसभेची बैठक होती. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर तिन्ही महापुरुषांच्या नावाचा जयघोष झाला. त्यानंतर निषेधाच्या घोषणा झाल्या. त्यानंतर डॉ. संभाजी भोसले आणि अॅड. विजय सुबुकडे यांनी निषेधाचा ठराव मांडला. सभागृहात अर्धातास गोंधळ झाला.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाट या दोघांनी ठरावात भाग घेतला नाही आणि सभागृहाने हा ठराव बहुमताने मंजूर केला. कुलगुरूंनी आढेवेढे घेत स्पष्टीकरण दिल्याचे सांगितले. तरीही अधिसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने निषेधाचा ठराव घेण्यात आला.

भाग…भाग…! : साताऱ्यात टेस्ट राईडच्या बहाण्याने बुलेट पळविली

सातारा | सातार्‍यात टेस्ट राईड मारण्याच्या बहाण्याने एकाने चक्क बुलेट पळवून नेली. शहरातील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. बुलेट घेवून गेलेला बराचवेळ झाला परत न आल्याने बुलेट चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली असून तक्रारदाराने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार आरीफ शेख यांचा शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी बुलेट विकायची असल्याचे त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यासंबंधी एकाने पुण्यातून बोलत असल्याचे सांगून व व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करून बुलेटची माहिती घेतली. किमतीबाबत विचारणा झाल्यानंतर फायनल किंमत शेख यांनी सांगितली. त्यानुसार सोमवारी संबंधित व्यक्ती पुण्यातून आली.

आरीफ शेख यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर बुलेटची ट्रायल घेतो, असे सांगून त्यांनी बुलेटला किक मारली. बुलेट ट्रायलसाठी घेवून गेल्यानंतर अर्धा तास होवून गेल्यानंतरही संबंधित व्यक्ती न आल्याने शेख यांनी शोधाशोध केली. बुलेट व संबंधित व्यक्ती येत नसल्याने व ते सापडत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

लग्नाचे आमिष दाखवून जवानाचे तरुणीसोबत ‘हे’ कृत्य

Rape

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एका गावामधील तरुणीवर लष्करातील जवानाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने आरोपी जवाना विरोधात उमदी पोलीस ठाण्यात बलात्कार व फसवणुकीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण ?
जत तालुक्यातील पीडित तरुणी आपले महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गेली होती. या पीडित तरुणीचे आई-वडील हे ऊसतोडणी मजूर आहेत. आरोपी जवानाची आणि पीडित तरुणीची दीड वर्षांपूर्वी ओळख झाली होती. यानंतर या दोघांमध्ये बोलणे सुरु झाले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

यानंतर आरोपी जवान सुट्टीवर आल्यानंतर त्याने पीडित तरुणीस स्वतःच्या बुलेटवरून सांगली या ठिकाणी नेले. त्या ठिकाणी विश्रामबाग येथील लॉजवर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर जत येथील लॉजवर नेऊन पुन्हा बलात्कार केला. यानंतर पीडित तरुणीने आरोपी जवानाच्या मागे वर्षांपासून लग्नाचा तगादा लावला होता. मात्र आरोपी तिला टोलवाटोलवीची उत्तरे देत होता. यानंतर या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे समजताच तिने उमदी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेबरोबर घडले भलतेच ! फेशिअल करण्यासाठी हॉटेलवर बोलावलं अन्…

Rape

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या आरोपीने फेशिअल करण्याच्या नावाखाली पीडित महिलेला एका हॉटेलवर बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. हा आरोपी नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेचे अश्लील व्हिडीओ देखील शूट केले. यानंतर या आरोपीने या अश्लील व्हिडीओच्या आधारे आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करत तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
गणेश प्रकाश चौधरी असे अटक करण्यात आलेल्या 48 वर्षीय आरोपीचे नाव असून तो जळगाव शहरातील तुळसाई नगर परिसरातील रहिवासी आहे. रामानंदनगर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. पीडित महिला एक ब्युटीशिअन असून तिचं जळगाव शहरात ब्युटी पार्लर आहे. आरोपी गणेश यानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरून पीडितेशी संपर्क साधला होता. यानंतर आरोपीनं ओळख वाढवून पीडितेशी चांगली मैत्री केली होती. यानंतर त्यांच्या प्रत्यक्षात भेटीगाठी देखील वाढल्या. यानंतर आरोपीने या महिलेला जानेवारी महिन्यात डी मार्ट परिसरात बोलावून तिला मोबाईल भेट दिला. तसेच मला माझ्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचं आहे. माझं फेशिअल करुन दे, असे आरोपीने पीडितेला सांगितले यानंतर पीडितेने लगेच त्याला होकार दिला.

याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी फेशिअल करण्याच्या बहाण्याने पीडितेला भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलात घेऊन गेला. याठिकाणी गणेशच्या नावाने आधीच खोली बुक होती. याठिकाणी फेशिअल केल्यानंतर आरोपीने जबरदस्ती करत महिलेशी शारिरीक संबंध ठेवले. यानंतर घाबरलेल्या महिलेने आरोपीशी असलेला संपर्क तोडला. यानंतर आरोपीने अनेकदा तिची माफी मागितल्यावर पीडितेने त्याला माफ केले. त्यानंतर पुन्हा दोघांत बोलणं होऊ लागलं. यानंतर आरोपीने फेब्रुवारी महिन्यांत पुन्हा एकदा पीडितेला त्याच हॉटेलमध्ये घेऊन जात लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडितेनं आरोपीशी कायमचा संपर्क तोडला. पण आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरून फोन करून पीडितेला बोलायचं नसेल तर माझा मोबाइल पर दे, असे सांगितले. यानंतर पीडित महिला मोबाइल देण्यासाठी गेली असता, आरोपीने आपल्याकडील अश्लील व्हिडीओ दाखवून पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने 50 हजार रुपये दे, नाहीतर माझ्याशी संबंध ठेव, अशी धमकीसुद्धा दिली. मात्र पीडितेने तसे न केल्याने आरोपीने पीडित महिलेच्या पतीला फेसबुकवर मेसेज करून त्याच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. हा सगळा प्रकार पीडित महिलेच्या पतीला समजताच तिने रामानंद नगर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील लसीकरण कमी असल्याने पुन्हा निर्बंध

collector

 

औरंगाबाद – औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा टप्पा कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची मोठी घोषणा केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर संबंधित व्यक्तीला उद्यापासून पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तसेच गॅस, सीएनजीसुद्धा मिळणार नाही. संबंधित व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय त्यांना इंधन मिळणार नाही. याशिवाय विजेची समस्या असेल तरी दोन्ही लस घेतल्याशिवाय सोडवली जाणार नाही, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुन्हा निर्बंध लागू करत असल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने ते जिल्हे निर्बंधमुक्त करण्यात आले. त्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा नंबर लागला नाही. कारण औरंगाबादची लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 74 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. 26 टक्के नागरिकांचं अद्यापही लसीकरण झालेलं नाही. तर दोन लस घेतलेल्या नागरिकांची संख्या फक्त 54 टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण वाढवण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पेट्रोल पंपावर लसीकरणाचं प्रमाणपत्र तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनातील कर्मचारी किंवा पोलीस असतील. ते कुणाचं लसीकरण झालंय याची शहानिशा करतील. कारण पेट्रोलपंपावर लसीकरणाचं प्रमाणपत्र कुणी तपासावं यावरुन गेल्यावेळी संघर्ष झाल्याचं बघायला मिळाला होता. मात्र, आता सरकारी कर्मचारीच पेट्रोलपंपावर लसीकरणाचं प्रमाणपत्र तपासण्यासाठी असणार आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस याबाबत सतर्कता पाळणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये थोडासा वचक असणार आहे. विशेष म्हणजे पेट्रोलपंपावरही लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

बाईकवरून जाणाऱ्या दाम्पत्यास घाटात अडविले, पतीला मारहाण करत महिलेसोबत केले ‘हे’ दुष्कृत्य

rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये धाडकडून बुलडाण्याकडे येणाऱ्या पती-पत्नींची दुचाकी अडवून पतीस मारहाण करून विवाहितेवर दोघांनी मिळून लैंगिक अत्याचार केला आहे. हि घटना काल रात्री 11 ते 11.30च्या दरम्यान बुलडाणा-धाड रोडवरील चिखला घाटामध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध विविध कलमान्वये ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
या प्रकरणातील पीडित महिलेने बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित महिला व तिचे पती काही कामानिमित्ताने धाड येथे सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान गेले होते. काम अटोपून रात्री दहा वाजता धाडहून बुलडाण्याकडे येत असताना रात्री ११.३०च्या सुमारास चिखला घाटाजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवली. यानंतर त्या दोघांनी हातात दगड घेऊन पतीला बेदम मारहाण केली. यानंतर त्यांच्यातील एकाने तिच्या पतीला धरून ठेवले व दुसऱ्याने तिला रस्त्याला कडेला नेऊन तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले.

यानंतर दुसऱ्या आरोपीनेदेखील तिच्यावर अशाचप्रकारे लैंगिक अत्याचार केले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर घाबरलेल्या अवस्थेत पती-पत्नी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडिता व तिच्या पतीचा जबाब घेतला. याप्रकरणी विवाहितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी दोन अज्ञातांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या पीडित महिला आणि तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बेलवडे हनुमान सोसायटी निवडणुकीत ‘जय हनुमान विकास’ पॅनेल विजयी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील बेलवडे हनुमान विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक शनिवार, दि. 5 रोजी पार पडली. अत्यंत संवेदनशील ठरलेल्या या निवडणुकीत जय हनुमान विकास पॅनेलने हनुमान सोसायटी बचाओ पॅनेलचा 13/0 असा पराभव केला. विजयानंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.

बेलवडे बुद्रुकमधील सर्वाधिक जास्त सभासद असणाऱ्या या सोसायटीत एकूण 706 सभासद असून 423 जणांनी मतदान केले. या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले समर्थक हर्षवर्धन मोहिते संचालक कृष्णा बँक, ऍड. उदयसिंह पाटील – उंडाळकर समर्थक जयवंतराव मोहिते संचालक रयत साखर कारखाना व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण समर्थक शिवाजीराव मोहिते अध्यक्ष कराड दक्षिण सेवा दल काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान विकास पॅनेलने हनुमान सोसायटी बचाओ पॅनेलचा 13/0 ने पराभव केला.

राजकीय दृष्ट्या ,ह्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तसेच संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेलया या निवडणुकीत 13 जागा होत्या. त्या 13 जागांसाठी निवडणूक लढवण्यात आली होती. यामध्ये विजयी जय हनुमान विकास पॅनेलच्या दोन जागा बिनविरोध झाल्याने 11 जागेसाठी शनिवारी मतदान पार पडले. यामध्ये सर्व 13 जागा जिंकून जय हनुमान विकास पॅनेलने आपले वर्चस्व सिद्ध केले.

विजयी उमेदवारात जयवंतराव माणिकराव मोहिते, चित्रसेन मोहिते, शिवाजी पवार, अजित मस्कर (मोरे), धनंजय माने, उत्तमराव मोहिते, तानाजी मोहिते, संजय मोहिते, विजयमाला मोहिते, शालन मोहिते, मोहन कुंभार, पराग माने दिनकर वाघमारे यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. आर. मोरे यांनी काम पाहिले. निकालानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गावातून आभार फेरी काढली.

मोदींची पुतीन आणि झेलेन्स्की दोघांशीही फोनवरून चर्चा ; नेमकं काय झालं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेन चे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत फोन वर चर्चा केली. सध्या भारतातील हजारो नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांन मायदेशी आणण्यासाठी  केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या नागरिकांची सुटका करण्याची वेळ द्यावी. त्या दरम्यान दोन्ही देशांनी युद्ध थांबवावे, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत.

मोदींनी झेलेन्स्कींसोबत ३५ मिनिटं चर्चा केली तर पुतिन यांच्यासोबत मोदींचा कॉल जवळजवळ ५० मिनिटं सुरु होता यावेळी झेलेन्स्की यांनी युद्धाची सारी माहिती मोदी यांना दिली. यावेळी मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे स्वागत केले. शिवाय युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक बाहेर काढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन झेलेन्स्की यांना केले. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी युक्रेनचे आभारही मानल्याचे समजते

तर दुसरीकडे पुतीन यांच्याशी संवाद साधत मोदींनी त्यानं झेलेन्स्की यांच्यासोबत थेट चर्चा करण्याचे आवाहन केले तसेच सूमीमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांच्या लवकरात लवकर सुरक्षित सुटकेवर जोर दिला. यावर, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही पंतप्रधान मोदींना भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं

“सातारच्या लेकीने मोठं व्हावं”; श्रीनिवास पाटील यांचे गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा येथील सनबीम आयटी पार्कमध्ये श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला ‘ती’ चा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कला, क्रीडासह विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महिलांचा ‘आदिशक्ती पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी “सातारा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घ्यावी. तिने उज्ज्वल यश संपादन करावे. यासाठी त्यांना प्रोत्साहन व पाठबळ देणे गरजेचे आहे. महिलांचा आदर करणे, त्यांना सन्मान देणे हा खरा स्त्री शक्तीचा जागर आहे, असे गौरवोद्गार काढले.

यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने देश सेवा बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील लुप्त होत चाललेल्या पाककृती व पारंपारिक खाद्यपदार्थ यांच्या संवर्धनासाठी ‘सुगरण साताऱ्याची’ ह्या पाककला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले, समाजाला परिपूर्ण करण्यासाठी नारीशक्ती महत्वाची भूमिका बजावते. पुरस्कार एक मोठी जबाबदारी देऊन जातो. महिलांना आपापल्या क्षेत्रात काम करण्यासाठी हुरूप यावा, तसेच समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची जाणीव होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुरस्कार देण्यात येतो. आजच्या काळात महिला केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तिने रोजच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत.

सारंग पाटील म्हणाले, “स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. वेळोवेळी तिने तिचे वर्चस्व आणि क्षमता आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांचे योगदान व समर्पित वृत्तीमुळे महिला भगिनी कौतुकास पात्र आहेत. त्यांना अशीच प्रेरणा मिळत राहण्यासाठी यापुढे देखील त्यांच्यासाठी श्रीनिवास फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यातून आदर्श महिलांची एक मोठी फळी यानिमित्ताने तयार होऊन ती समाजासाठी दिशादर्शक ठरेल. ”

यावेळी सौ. रजनीदेवी पाटील, श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.रचना पाटील, कराडच्या माजी नागराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, सोल डिटोक्स टीमच्या ज्योती काटकर, सर्वेश जाधव, कुणाल घोडके, यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.