Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2771

गैरहजर शिक्षकांवर पंचायत समिती कारवाई करणार ः राजाभाऊ शेलार

Patan Panchyat samiti

पाटण | शासनाच्या आदेशानुसार नियमांची अमंलबजावणी करत ऑफलाइन शाळा सुरू झालेल्या आहेत. तरीही पाटण तालुक्यातील जे शिक्षक शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी दिला.

पाटण पंचायत समितीची मासिक सभा छ. शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी सभापती राजाभाऊ शेलार होते. यावेळी गटविकास अधिकारी मीना साळुंखे, उपसभापती प्रतापराव देसाई, स. गटविकास अधिकारी व्ही. बी. विभुते उपस्थित होते. सभेत शिक्षण, आरोग्य विभाग, विद्युत महामंडळ, तालुका कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग, लघू पाटबंधारे, जि. प. बांधकाम विभागाचा आढावा देण्यात आला.

अडूळला 15 दिवसात शिक्षक मिळणार

सभेत शिक्षण विभागाचा आढावा देताना, तालुक्यातील 610 शाळा सुरू आहेत. 1072 मुलं लसीकरण न झालेली आहेत. 67 पैकी 40 शाळांमध्ये शंभर टक्के लसीकरण झालेले आहे. इन्सपायर अवाॅर्डमध्ये तालुक्यातील 42 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. दहावी, बारावी परिक्षेबाबत प्रत्येक शाळा तिथे बोर्ड नियोजन आहे. यामध्ये बदल ही होऊ शकतो. पंधरा पेक्षा कमी पटाच्या 4 शाळा जवळील शाळेला जोडण्यात येतील. मनरेगाच्या माध्यमातून शंभर शाळांंचा दुरुस्ती प्रस्ताव दिले होते. यामधील वीस शाळांची कामं झालेली आहेत. तालुक्यात शिक्षकांची 216 पदं रिक्त आहेत. यावेळी अडूळ येथे शिक्षक नसल्याने शाळेला टाळे ठोकणार असा इशारा देण्याऱ्या ग्रामस्थांना दिलासा देत सभापती शेलार यांनी येणाऱ्या 15 दिवसात शिक्षक देणार असा दिलासा दिला.

बनपेठ आता “क्षेत्र येराड”

ग्रामपंचायत विभागाचा आढावा देताना, सन 2022-23 ची अंदाजपत्रक तयार झाली आहेत. कोरोना काळात कोरोनाने मृत झालेल्या लोकांच्या वारसांना मिशन वात्सल योजनेच्या अंतर्गत घरकुल देण्यात येणार आहेत. बनपेठवाडी गावाच्या नावात बदल करुन “क्षेत्र येराड” करण्यात यावा असा ठराव घेण्यात आला. यानंतर पं स कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला.

“किरीट सोमय्यांच्या वादात पडू नका, अन्यथा…”; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आज आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सोमय्यांची बाजू घेणाऱ्या भाजप नेत्यांनाही सूचक इशारा दिला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांची बाजू घेऊ नये. पाटील तुम्ही यात पडू नका. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील,” असा इशारा राऊतांनी दिला.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पुनर्वसनाच्या नावाखाली राज्यात मोठा घोटाळा झाला आहे. सोमय्या यांनी प्रत्येकाकडून किमान 25 लाख रुपये घेतले आहेत. या पुर्नवसन प्रकल्पाच्या घोटाळ्यातील कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. आता सोमय्या यांचे घोटाळे बाहेर निघाल्यानंतर लोक त्यांची धिंड काढणार आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी यात पडू नये, अन्यथा तुम्हीही उघडे पडाल, असे राऊत यांनी म्हंटले.

सोमय्या यांनी केलेल्या घोटाळ्या प्रश्नी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. ते असे करणार नाहीत मी अगोदर बोललो आहे. फडणवीसांशी झालेल्या चर्चेवेळी किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पैसे उकळले, असे सांगितले आहे. किरीट सोमय्याने गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी रुपये गोळा केले आहेत. ईडी आणि सीबीआयच्या नावावर वसुली केली. दिल्लीतील मंत्र्यांच्या नावावर, अमित शाह यांच्या नावावर पैसे उकळले. त्यामुळे भाजप नेत्यांनी आता तरी सोमय्या याची बाजू घेऊ नये, अन्यथा ते उघडे पडतील, असे राऊत यांनी म्हण्टले

काय केले आहेत राऊतांनी आरोप ?

पवई पेरु बाग प्रकल्पाच्या अंतिम यादीवर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. 433 लोकांकडून 25 लाख रुपये घेण्यात आले. हा 200 ते 300 कोटींचे प्रकरण आहे. ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांना ही कागदे दाखवत आहोत. किरीट सोमय्या सांगायचे की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 50 कोटी उकळले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर किरीट सोमय्यांनी घेतले. हा घोटाळा 400 कोटींचा असल्याची आम्हाला शंका आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींचं राहुल गांधींना पत्र

Raju shetti rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भूमी अधिग्रहण कायद्यावरुन महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.

राजू शेट्टी पत्रात काय म्हणतात-

२०१३ मध्ये काँग्रेसने तयार केलेल्या भूमी अधिग्रहण कायद्यात २०१५ ला मोदी सरकार दुरुस्ती करत बदल करणार होतं. तेव्हा तुमच्या पक्षाने शेतकऱ्यांना साथ देत त्याचा विरोध केला होता. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या कायद्यात दुरुस्ती करत शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहणाचा कायदा केला. काँग्रेसचं धोरण बदललं आहे की, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते तुमचं ऐकत नाहीत? असा सवाल राजू शेट्टी यांनी राहुल गांधी यांना केला.

शेतकऱ्यांची जमीन संपादित करताना नुकसान भरपाई निम्म्याने कमी करण्याचा ठराव करून सध्याच्या राज्य सरकारने यूपीए सरकारने मंजूर केलेल्या धोरणातच बदल सुचवले आहे. यामुळे असे दिसते की आता महाराष्ट्र सरकार मोदीजींना पाठिंबा देत आहे अगदी हा कायदा केलेल्या खात्याचे राज्याचे महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे आहेत.  हा कायदा लागू झाल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व गमावले आहे.

माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने नुकतीच केलेली दुरुस्ती मागे घेण्यास महाराष्ट्र नेतृत्वाला सूचना द्या. मला आशा आहे की तुम्ही या प्रकरणाकडे नक्कीच लक्ष द्याल आणि गरीब शेतकर्‍यांना मदत कराल राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटूंबाची उपजीविका या भरपाईच्या रकमेवर पूर्णपणे अवलंबून आहे, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

“संजय राऊतांची नुसतीच स्टंटबाजी; एकतरी पुरावा दिला का?”;किरीट सोमय्यांचा पलटवार

raut somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आज आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांवर सोमय्या यांनी पलटवार केला आहे. “राऊतांची नुसतीच स्टंटबाजी बाजी चालली आहे. त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल एक तरी पुरावा दिले आहेत का? त्याच्याकडे पुरावेच नाहीत. महाराष्ट्रातला माफिया सेनेने लुटले आहे. राऊत कोव्हीड सेंटरच्या घोटाळ्याबाबत का बोलले नाहीत? राऊतांना एवढंच चॅलेंज करतो कि काय मागे लावायचे ते लावा, मी तयार आहे, अशा शब्दात सोमय्यांनी राऊतांवर पलटवार केला.

राऊतांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांच्याकडून जे आरोप केले जात आहेत. त्या आरोपाबद्दल राऊत यांनी एक ही पुरावा दिलाय का? राऊतांकडून नुसते स्टंट करण्याचे काम केले जात आहेत. वास्तविक पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ईओडब्ल्यू आणि काय लावायचे मागे ते लावा. माझी पुढची भूमिका हि आता कोव्हीडची हत्या करणारे संजय राऊत यांचे सहकारी व बेनामी कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे, असे सोमय्या यांनी म्हंटले.

काय केले आहेत राऊतांनी आरोप ?

पवई पेरु बाग प्रकल्पाच्या अंतिम यादीवर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. 433 लोकांकडून 25 लाख रुपये घेण्यात आले. हा 200 ते 300 कोटींचे प्रकरण आहे. ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांना ही कागदे दाखवत आहोत. किरीट सोमय्या सांगायचे की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 50 कोटी उकळले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर किरीट सोमय्यांनी घेतले. हा घोटाळा 400 कोटींचा असल्याची आम्हाला शंका आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

पालकांच्या विरोधानंतर मनपाने ‘तो’ निर्णय घेतला मागे

औरंगाबाद – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुट्टीच्या दिवशीही शाळा सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा असे आवाहन केले होते. औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण विभागाने दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करूनही टाकली. पण हा निर्णय पालकांना विश्वासात घेऊन घेतला नाही. आता पालकांनीच कडाडून विरोध केल्याने महापालिकेला बॅकफूटवर यावे लागले. रविवारी शाळा बंदच राहणार असे महापालिकेच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या तिन्ही लाटांमध्ये शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण होते. पण अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते, काही भागात इंटरनेट नसल्याने ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला. त्यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी अजित पवार यांनी रविवारी सुट्टी रद्दचा पर्याय दिला होता.

एक दिवस तरी विद्यार्थ्यांना मोकळा हवा अशा प्रतिक्रिया काही पालकांनी नोंदविल्या आहेत. त्यामुळे आता शनिवारी पूर्णवेळ शाळा भरली जाईल. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून केली जाईल. येत्या शनिवारी शिवजयंतीचे सुट्टी आहे, असे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले. अशाप्रकारे निर्णयाच्या अंमलबजावणीत आधीच महापालिकेला बॅकफूटवर यावे लागले.

खळबळजनक !! विहिरीत पडून 11 महिलांचा मृत्यू; लग्नसमारंभात शोककळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका लग्नसमारंभा दरम्यान, 11 महिलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तरप्रदेश येथे झाली आहे. यावेळी पोलीस आणि गावकऱ्यांनी जवळपास १५ महिलांची सुटका केली मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तरप्रदेश येथे नौरंगिया शाळेच्या मैदानात एका लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काही महिला आणि मुली विहिरीवर लावलेल्या जाळीवर उभ्या होत्या. त्याचवेळी हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि काही महिला जाळीवर चढल्याने महिलांच्या वजनाने लोखंडी पातळ जाळी तुटली. त्यामुळे या जाळीवर उभ्या असलेल्या सर्व महिला एकापाठोपाठ एक करून विहिरीत कोसळल्या.

एकूण 13 महिला या विहिरीत कोसळल्या. त्यात दोन मुलींचाही समावेश होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पाण्याने भरलेल्या विहिरीत जीव वाचवण्यासाठी काही महिला शेवटची धडपड करताना दिसत होत्या. मात्र, या महिलांना पाण्यातून बाहेर काढेपर्यंत 11 महिलांचा बुडून मृत्यू झाला. दोन महिला गंभीर असून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आहे.

“सोमय्या दलाल, लफ़ंगा अन् चोर, हजारो कोटींचा घोटाळा केला”; संजय राऊतांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. दरम्यान राऊत यांच्याकडून अजूनही सोमय्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी आज माध्यमांशी साधत पुन्हा हल्लाबोल केला. सोमय्या हा चोर, दलाल अन् लफ़ंगा आहे. त्याने केंद्रीयमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हजारो कोटींची वसुली केली आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणं महा आयटी घोटाळ्यातील लोकांना पळवून लावल्याची माहिती आहे. अमोल काळे, विजय रहांगळे कुठं आहेत? हे केंद्र सरकारला विचारणार आहे. पेरुबाग पासपोली येथील आयआयटी पवईचा 138 चा भूखंड साफ करुन घेतला. पूनर्वसनाच्या नावाखाली 433 बोगस लोकांना आत घुसवले आहे. त्या लोकांचा संबंध नसताना किरीट सोमय्यांच्या लोकांनी त्यामध्ये आत घुसवले आहे. खऱ्या बाधितांना धमकावले जात आहे.

पवई पेरु बाग प्रकल्पाच्या अंतिम यादीवर त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली. 433 लोकांकडून 25 लाख रुपये घेण्यात आले. हा 200 ते 300 कोटींचे प्रकरण आहे. ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा यांना ही कागदे दाखवत आहोत. किरीट सोमय्या सांगायचे की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर 50 कोटी उकळले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर किरीट सोमय्यांनी घेतले. हा घोटाळा 400 कोटींचा असल्याची आम्हाला शंका आहे, असे राऊत याणी यावेळी म्हंटले.

हरिहरेश्वर बॅंकेच्या 38 कोटीच्या घोटाळ्यात 5 जणांना पोलिस कोठडी

वाई | येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या 37 कोटी 46 लाख 89 हजार 334 रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या 5 जणांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बँकेचे संस्थापक व मुख्य संशयित नंदकुमार खामकर यांना न्यायालयाने ताब्यात दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली.

हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक मोहन शिंदे करत आहेत. बँकेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक वाईत आले होते. त्यांनी रमेश ज्ञानेश्वर खामकर, अॅड. ललित सूर्यकांत खामकर, अॅड. अविनाश अशोक गाडे, तुषार सखाराम चक्के, अमोल खोतलांडे यांना अटक केली. त्यानंतर मुख्य संशयित नंदकुमार खामकर स्वतः दुपारी सातारा येथील न्यायालयात हजर झाले होते.

पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर स्वतः हजर झालेल्या नंदकुमार खामकर यांनाही न्यायालयाने पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच बँकेचे सरव्यवस्थापक रमेश दगडू जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

“कॉलेजच्या परवानगीसाठी एका दिवसात सात वेळा फोन केल्याचं विसरलात?”; राणेंच्या टीकेला नार्वेकरांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांच्यावरही टीका केली. त्यांच्या टीकेला मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करीत प्रत्युत्तर दिले आहे. “बॉय का? अच्छा ! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? असा सवाल नार्वेकरांनी केला आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करीत राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?,”

काय केली होती टीका?

कोण मिलिंद नार्वेकर? मातोश्रीवर बॉयचे काम करायचा तोच ना? अहो माझ्यासमोरची गोष्ट आहे. बेल मारली की, यस सर काय आणू? असे म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे.

गुंड गजा मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या पत्नी आणि मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्याची प्रतिक्रिया मारणेंनी पक्षप्रवेशावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस चे पुण्याचे नगराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत जयश्री मारणे यांनी प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे मनसे साठी हा मोठा धक्का बसला आहे.

मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २०१२ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या. मारणे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरू झाले असून येत्या काळात यात आणखी होणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले. महापालिकेची पाच वर्षांची मुदत येत्या १४ मार्चला संपत आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ मार्चला भाजपाचे विद्यमान १६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.