Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2828

‘हरिभाऊ बागडेंनी धोका दिला; दुध संघाची चौकशी लावणार’

औरंगाबाद – हरिभाऊ बागडे यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले असून तीन मराठा नेत्यांनी एकत्र येत एका ओबीसी उमेदवाराचा पराभव केला, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज झालेल्या जिल्हा दुध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समर्थकाच्या पराभवानंतर दिली. यासोबतच दुध संघाची चौकशी लावणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

जिल्हा दुध संघाची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. दुध संघात आमदार हरिभाऊ बागडे यांच्या सर्वपक्षीय पॅनलने सर्वच सर्व 14 जागांवर विजय मिळवला. या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षांचे नेते एकत्र आले होते. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक चुरशीची होणार याचा अंदाज आला होता. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाल्याने निवडणुकीची उत्सुकता शिगेला होती.

दरम्यान, आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात अपेक्षेप्रमाणे आमदार हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आमनेसामने आले. भुमरे गटाचे दिलीप निरफळ तर सत्तार गटाचे गोकुळ सिंग राजपूत यांच्यात उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यात सत्तार गटाचा पराभव झाला. भुमरे गटाचे निरफळ 9 विरुद्ध 5 मतांनी निवडून आले. समर्थकाच्या पराभवानंतर, एका ओबीसी उमेदवाराच्या पराभवासाठी तीन मराठा नेते एकत्र आले. हरिभाऊ बागडे यांनी धोका दिला, त्यांच्या वरचे एकतर्फी प्रेम भोवले, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री सत्तार यांनी दिली. तसेच जिल्हा दुध उत्पादक संघाची चौकशी लावणार अशी घोषणाही सत्तार यांनी यावेळी केली. आ. बागडे यांच्या विरोधात फुलंब्री मतदार संघातून किशोर बलांडेंना उभे करणार असेही ते यावेळी म्हणाले.

VIdeo अबब ! सातारा- सोलापूर मार्गावर 44 प्रवाशी वाहतूक करणारी बस जळून खाक

दहिवडी | सातारा – सोलापूर मार्गावरील बस अचानक पेटली. या बसमध्ये चक्क 44 प्रवाशी होते. म्हसवड जवळ सागर ढाब्याजवळ बस आगीच्या भक्ष्यस्थानी जळून खाक झाली आहे. चालकांच्या प्रसंगावधानाने सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, बसमधील प्रवाशांच्यात भीतीचे वातावरण होते. म्हसवड नगरपालिकेची अग्निशामक दलाने आग विझविण्यात यश मिळविले आहे.

 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा येथून सोलापूरकडे निघालेली बस क्रमांक (MH-11-BL-9355) म्हसवड येथून काही अतंरावर सागर ढाब्याजवळ धुळदेव येथे गेल्यानंतर एक प्रवाशी उतरला. यावेळी बाॅनेटमधून धूर निघू लागल्याने चालक खाली उतरले. तेव्हा गाडीने पेट घेतल्याचे चालकांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी प्रवाशांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. तेव्हा काहीजण खिडकीतून उतरले, तर काहीजणांनी बसमधून खाली उडी मारली.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1992595967614152

एसटी बसने काही वेळातच संपूर्ण पेट घेतला. या आगीच्या भक्ष्यस्थानी बस जळून खाक झाली. सदरील घटना 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी म्हसवड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र बस संपूर्ण जळून खाक झाली. त्यामुळे बसचे मोठे अर्थिक नुकसान झाले.

शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या जखमी; रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पुणे महापालिकेत जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे आज पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात असताना  काही शिवसैनिक त्यांच्या अंगावर धावून गेले. या एकूण प्रकरणात सोमय्या जखमी झाले असून ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. आज ते जम्बो कोविड सेंटरबाबत तक्रार करण्यासाठी पुण्यात आले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या जमिनीवर पडले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीने एकच गोंधळ उडाला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणा बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

माझ्या मुलाला मोबाइल विकला म्हणून आरोपीने 14 वर्षीय मुलासोबत केले ‘हे’ कृत्य

आष्टी : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नांदूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने मोबाइल विकल्याच्या कारणातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा जीव घेतला आहे. आरोपीने मृत मुलाला आपल्या घरी बोलावून अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे मृत मुलगा जागीच बेशुद्ध झाला. यानंतर उपचारादरम्यान पीडित मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
लहू लिंबराज खिळदकर असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर राजू खिळदकर असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. आरोपी आणि मृत मुलगा हे दोघेही आष्टी तालुक्यातील नांदूर येथील रहिवासी आहेत. मृत लहू याने त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या राजू खिळदकर याच्या मुलाला आपला मोबाइल फोन विकला होता. याचा राजू खिदळकर याला खुप राग आला होता. यानंतर आरोपीने मृत लहुला घरी बोलावून ‘तू माझ्या मुलाला मोबाइल फोन का विकला?’ असा जाब विचारला. यावेळी आरोपीने मृत लहूला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हि मारहाण एवढी भयंकर होती कि, लहू जागीच बेशुद्ध पडला. या धक्कादायक घटनेनंतर त्यास अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर उपचारादरम्यान लहुचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत मुलाचे वडील लिंबराज झुंबर खिळदकर यांनी आरोपीविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लहुचा मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी राजू खिळदकर फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंभोरा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नितेश राणेंचा रक्तदाब वाढला; रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांची तब्बेत बिघडली आहे. नितेश राणेंचा रक्तदाब वाढला असून त्यांना रुग्णवाहिकेने कोल्हापूर ला हलवणार आहेत.

शुक्रवारी रात्री त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले होते. काल रात्रीपासून नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरीही नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार आहे. अशातच ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्डियाक यंत्रणा आणि ह्रदयरोग तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे नितेश राणे यांना कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात येणार आहे

कोर्टाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यावेळी नितेश यांच्या वकिलांनी नितेश यांची प्रकृती ठिक नसल्याचं सांगितलं होतं. राणे यांच्या आजारावर शिवसेनेने टीका केली होती. दरम्यान, राणे खरोखरच आजारी आहेत की हा राजकीय आजार आहे? असा सवाल शिवसेनेने केला होता.

शेतीच्या वादातून दोन गटात भिडले; वृद्धाला काठीने मारहाण

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोनी या गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेत जमिनीच्या वादातून हे दोन गट आपसात भिडले आहेत. यावेळी दोन्ही गटांनी लाठ्या-काठ्या तसेच शेतातील दगडाने एकमेकास मारहाण केली आहे. कुटुंबातील एका सदस्याने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.

या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात शिवुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत दोन्ही गटांविरोधात गुन्हा दाखल केला असून व्हिडीओच्या आधारे तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील बिलोनी येथील रहिवासी असणाऱ्या या दोन गटात मागील काही दिवसांपासून शेतीचा वाद सुरू होता. याच वादातून ही हाणामारी झाली आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्यांवर घाटी रुग्णालयात उपचार केले जात आहे. मारहाणीची ही घटना घडताच परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हा वाद आणखी वाढू नये, यासाठी गावात काटेकोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस प्रत्यक्षदर्शी, व्हायरल व्हिडीओ आणि दोन्ही गटातील फिर्यादींच्या जबाबावरून तपास करत आहेत.

उत्तरप्रदेशात शिवसेना किती जागा लढवणार; संजय राऊतांनी आकडाच सांगितला

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 60 जागा लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीतही शिवसेना 20 जागांवर आपले उमेदवार उभे करेल असे संजय राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत हे सध्या उत्तरप्रदेश दौऱ्यावर असून आज पत्रकार परिषद घेत याबाबत त्यांनी माहिती दिली.

उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची असून उत्तर प्रदेशातील निकालाने देशाची दिशा आणि दशा दाखवली जाते. त्यामुळे संपूर्ण देश उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे पाहत आहे. मी आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात आलो आहे. याच राज्यातून पंतप्रधान निवडून येतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही 50 ते 60 उमेदवार आम्ही उभे केले आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 15 उमेदवार रिंगणात आहेत. पाचव्या आणि सातव्या टप्प्यात 30 उमेदवार उभे करणार आहोत, असं राऊत म्हणाले.

दरम्यान, शिवसेने सोबत राष्ट्रवादी काँग्रेसही उत्तरप्रदेश निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे भाजपसाठी उत्तरप्रदेश निवडणूक ही म्हणावी तशी सोप्पी राहिली नाही.

राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित झालेल्या ‘त्या’ महिला पोलिसावर गुन्हा दाखल

Police shalini sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात पोलिसी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये चेंबूर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांकडे दोन लाखांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी आरोपीच्या बहिणीने वरिष्ठ पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर महिला पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खंडणी प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल होताच पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?
शालिनी शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. त्या चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तसेच शालिनी शर्मा यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव आणि पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा हस्तक आणि आरोपी राजू सोनटक्के याने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून फिर्यादी महिलेकडे दोन लाख रुपयांची मागणी केली होती. जामीन हवा असेल तर लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा, अन्यथा या प्रकरणात आरोपीला अडकवू अशी धमकी देखील आरोपीकडून देण्यात आली होती.

यानंतर आरोपीची बहीण शहिदा कुरेशी यांनी पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यासह, निलंबित पोलीस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव आणि पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जामिनासाठी आरोपीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले पोलीस अधिकारी जाधव याने यापूर्वीदेखील अन्य एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरणात सर्वात महत्वाचे म्हणजे महिला पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

मुख्याध्यापकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या रोडरोमिओला पुण्यातून अटक

औरंगाबाद – छेडछाडीच्या प्रकरणास प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड शहराजवळ मुख्याध्यापकांसह अधीक्षक यांच्यावर रोडरोमिओने तलवारीने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी समोर आली. यात दोघेजण जखमी झाले होते. हल्ल्यानंतर फरार झालेला आरोपी मज्जीद जमील शेख (23, रा. मक्रणपूर) यास शहर पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. दिवसाढवळ्या तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

कन्नड शहराजवळील कनकावतीनगरातील कर्मवीर काकासाहेब देशमुख शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब पंडित चव्हाण (55) आणि अधीक्षक संतोष राधाकिसन जाधव हे शाळा सुटल्याने आवारात उभे होते. विद्यार्थी आवाराबाहेर पडत असताना शुक्रवारी दुपारी तीन वाजता आरोपी मज्जीद जमील शेख (रा. मक्रणपूर) हा त्याच्या दुचाकीवरून आल्यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारामोर विनाकारण चकरा मारत होता. मुख्याध्यापक चव्हाण यांना पाहून तो त्यांच्याकडे आला व म्हणाला की, ‘स्कूल के सामने गाडीपर चक्कर मारते हुए मेरे फोटो निकालकर मेरे बाप को मोबाइल पे भेजता है,’ असे म्हणून वाद घालून शिवीगाळ केली. यासह ‘तेरे को देख लूँगा,’ अशी धमकी देऊन तो निघून गेला.

या घटनेबाबत मज्जीद याच्या वडिलांना समजावून सांगण्यासाठी शिक्षकांनी त्याच्या घरी जाण्याचे ठरविले; परंतु मक्रणपूरमधील त्याच्या घराकडे जाण्यापूर्वीच चौकात हातात तलवार घेऊन थांबलेल्या मज्जीदने संतोष जाधव याच्या डाव्या हाताच्या खांद्याच्या पाठीमागील बाजूस तलवारीने दोन वार करून त्यांना जखमी केले. यानंतर लगेच आबासाहेब चव्हाण यांना मारण्याच्या उद्देशानेे त्यांच्या मानेवर वार केला. मात्र, त्यांनी धडपड केल्याने वार त्यांच्या खांद्याच्या मागे लागला. दुसरा वार डाव्या कानावर बसला. सोबत असलेल्या शिक्षकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी घटनास्थळ गाठून जखर्मीना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मुख्याध्यापक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मज्जीद यास ताब्यात घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांनी तीन पथके तैनात केली. आज सकाळी पोलिसांच्या एका पथकाने पुणे येथून आरोपी मज्जीद जमील शेख यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके करीत आहेत.

दुध संघाच्या उपाध्यक्षपदी भुमरे गटाचे दिलीप निरफळ विजयी

औरंगाबाद – दुध संघाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या जिल्यातील दोन मंत्री आमनेसामने आले होते. यात कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना धोबीपछाड दिला आहे. भुमरे गटाचे दिलीप निरफळ 9 विरुद्ध 5 मतांनी विजयी झाले आहे. तर सत्तार गटाच्या गोकुळसिंग राजपूत यांचा पराभव झाला आहे.

जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची झाली. सुरुवातीला 14 सदस्यांसाठी बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न झाले, मात्र यात अर्धे यश आले. यामुळे भाजप, शिवसेना, कॉंग्रेस पक्षातील नेते एकत्र आले. सर्वपक्षीय विरुद्ध अपक्ष अशी निवडणूक झाली. यात भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांच्या पॅनलने सर्व जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता होती.

आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे हरिभाऊ बागडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मात्र, उपाध्यक्षपदासाठी अनेपक्षितरित्या शिवसेनेचे जिल्यातील दोन मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार आमनेसामने आले. भुमरे गटाकडून दिलीप निरफळ तर सत्तार गटाकडून गोकुळ सिंग राजपूत यांच्यात यांच्यात निवडणूक झाली. यात दिलीप निरफळ यांनी 9 विरुद्ध 5 मतांनी राजपूत यांच्यावर विजय मिळवला.