Monday, December 22, 2025
Home Blog Page 2839

…आणि वहिदा रेहमानसोबत रोमान्स करताना देव आनंदला वाटू लागला संकोच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वहिदा रहमान आज आपला 84 वा वाढदिवस साजरा करत आहेत, 50-60 च्या दशकातील या दिग्गज अभिनेत्रीचे सौंदर्य आणि ग्रेस आजही कायम आहे. 3 फेब्रुवारी 1938 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या वहिदा यांना अभिनेत्री बनण्याची इच्छा नव्हती. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीसाठीच बनवले होते असेच काहीसे वाटते.

भरतनाट्यम नृत्यात पारंगत असलेल्या वहिदा या अशा अभिनेत्री आहेत ज्या सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये सहजपणे बसत असत. 1972 मध्ये पद्मश्री, 2011 मध्ये पद्मभूषण, तीनदा फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या या होतकरू अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही मनोरंजक किस्से त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेउयात.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणाऱ्या वहिदा रहमान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांचे ‘प्यासा’ आणि ‘गाइड’ हे चित्रपट नेहमीच आठवणीत राहतात. अभिनयाची जबरदस्त प्रतिभा लाभलेल्या वहिदा यांच्या आयुष्यात ‘प्यासा’ चित्रपट खास असाच आहे. याच चित्रपटातून वहिदा आणि गुरु दत्त यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. त्यांची जोडी त्या काळात जबरदस्त हिट ठरली होती. ‘कागज के फूल’ आणि ‘चौधवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री देखील पाहायला मिळते. मात्र, कालांतरा नंतर दोघे वेगळे झाले आणि ज्यानंतर गुरु दत्त यांनी आत्महत्या केली.

वहिदा रहमानच्या फिल्मी करिअरच्या यशात ‘गाइड’ चा मोठा वाटा आहे. वहिदा आणि देव आनंद यांच्या जोडीने रुपेरी पडद्यावर कमाल केली. या चित्रपटासाठी वहिदा यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत वहिदा म्हणाल्या होत्या की,”जेव्हा मी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर पोहोचायचे तेव्हा देव आनंद यांना गुड मॉर्निंग मिस्टर आनंद म्हणायचे. त्यावर ते माझ्याकडे न बघता आजूबाजूला पाहत म्हणायाचे की, तू गुड मॉर्निंग कोणाला म्हणत आहेस?”. यावर ते म्हणाले की, “मी कोणी मिस्टर आनंद नाही, मला फक्त देव म्हण.”

यांनतर वहिदा रहमान यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे आहात, त्यामुळे मी तुमच्याशी असे बोलू शकत नाही, तेव्हा ते म्हणायचे की, माझ्या चित्रपटातील लीड एक्ट्रेसने मला सर किंवा मिस्टर आनंद म्हटले तर मग मला तिच्यासोबत रोमान्स करणं अवघड होईल.” ‘गाइड’ हा आपला आवडता चित्रपट असल्याचे सांगताना एकदा वहिदा रहमान म्हणाल्या होत्या की, “या चित्रपटासाठी मला पहिल्यांदाच पुरस्कार मिळाला. त्यावेळी मला हा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते कारण लोकांचा असा विश्वास होता की, या चित्रपटातील माझ्या भूमिकेबद्दल कोणीही सहानुभूती दाखवत नाही आणि त्यावेळी अशा भूमिकांना पसंती दिली जाते ज्यांना पाहून वाईट वाटेल, म्हणून जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटले.”

मुंबईकरांची वाट लावणारा हा अर्थसंकल्प; अतुल भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेचा 2022-2023 या आर्थिक वर्षसााठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला. यावरून भाजपकडून आता टीका होऊ लागली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत भ्रष्टाचाराला वाव देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबईकरांची वाट लावणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज मांडण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. खरे पहिले तर या अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. हा अर्थसंकल्प बोगस स्वरूपाचा आहे.

मुंबई महानगरपालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे. या आजच्या अर्थसंकल्पातून काहीही दिलेले नाही. सर्वसामान्य मुंबईकर तसेच झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या लोकांच्या तोंडाला अर्थसंकल्पातून पाने पुसण्यात आलेली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प मुंबईकरांची वाट लावणारा असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे/

आता जमिनीचाही ‘आधार’ नंबर येणार; PM किसान योजनेमध्येही मदत होईल

PM Kisan

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. यामध्ये जमिनीच्या रेकॉर्डचे डिजिटलायझेशन देखील समाविष्ट आहे. वन नेशन वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमांतर्गत सरकारने 2023 पर्यंत जमिनींचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची तयारी केली आहे. यामध्ये प्रत्येक जमिनीला किंवा शेताला एक युनिक रजिस्टर्ड नंबर – URN देण्याची तयारी सुरू आहे. हा 14 अंकी नंबर असू शकेल.

या युनिक नंबरद्वारे (URN) कोणतीही व्यक्ती आपल्या जमिनीचे संपूर्ण रेकॉर्ड फक्त ऑनलाइन पाहू शकणार नाही तर ते डाउनलोड देखील करू शकणार आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या जमिनीची कागदपत्रे मिळणे सोपे होणार आहे. त्याच वेळी, हा URN प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सारख्या अनेक योजनांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो.

पोर्टल तयार केले जाईल, ड्रोनद्वारे केले जाईल जमिनीची मोजणी
देशातील संपूर्ण जमिनीचा डेटा डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी एकत्रित करण्यासाठी केंद्र सरकार एक पोर्टल तयार करणार आहे. सर्व डेटा फक्त या डिजिटल पोर्टलवर उपलब्ध असेल. कोणतीही व्यक्ती या पोर्टलवर त्याच्या जमिनीचा युनिक रजिस्टर्ड नंबर टाकून त्याची माहिती काढू शकेल. या क्रमांकाला जमिनीचा आधार नंबर देखील म्हणता येईल.

वन नेशन, वन रजिस्ट्रेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकार ड्रोनच्या मदतीने जमिनीची मोजणी करणार आहे. ड्रोनमधून जमिनीच्या मोजणीमध्ये कोणतीही चूक किंवा गडबड होण्याची शक्यता राहणार नाही. त्यानंतर हे मोजमापही मोजणी सरकारी डिजिटल पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल.

त्याचा फायदा होईल
URN सह, कोणतीही व्यक्ती त्याच्या जमिनीचे संपूर्ण तपशील आणि कागदपत्रे सहजपणे पाहू शकेल. त्यामुळे सर्वसामान्यांना कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच यामुळे जमीन खरेदी-विक्रीतही पारदर्शकता येण्यास मदत होईल. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसारख्या अनेक योजनांमध्ये जमिनीची माहिती द्यावी लागते आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अशा योजनांमध्ये, URN नंतरच उपयोगी पडेल आणि कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही.

सुप्रियाताई, पंकजाताई दारू पिऊन नाचतात : बंडातात्याची वादग्रस्त वक्तव्ये

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सुप्रियाताई सुळे, पंकजा मुंडे या दारू पिऊन नाचतात, या मतावर मी ठाम आहे. पतंगराव कदमांचा एक मुलगा झाडावर कसा गेला आणि मेला. कोणत्या पुढाऱ्याची पोरं दारू पित नाहीत. कराडचे आमदार बाळासाहेब पाटील याचं पोरंगही दारू पितो का नाही मी सांगतो तुम्हांला असे म्हणत राजकीय पुढाऱ्यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी केलेली आहेत.

सातारा येथे आंदोलन स्थळी भाषण करताना बंडातात्या कराडकर यांनी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बंडातात्या कराडकर यांच्यासह व्यसनमुक्त युवक संघचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहे. पाेवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदाेलकांनी दंडवत घालून सरकाराच्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा विराेध केला आहे. यावेळी बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील गंभीर टीका केली आहे. ते पुढे म्हणाले, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. पवळा म्हणजे उध्दव ठाकरे आणि ढवळा म्हणजे अजित दादा. अजित दादाने दारू विकण्याचा गुण लावला. ज्ञानोबारायाची दिंडी नाही काढायची हे पण सांगितले.

मूठभर आमदारांच्यामध्ये विधानसभेत नव्हे हा दारूविक्रीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये लादलेला आहे. त्याविषयी अत्यंत पोटतिडकीने काम करणारी एकच संस्था व्यसनमुक्ती संस्था आहे. 1996 पासून हे काम आम्ही करत आहोत. केवळ समाजाच्या कल्याणासाठी काम करत आहोत. शासनाला इशारा देण्यासाठी आज अत्यंत शांततेने आंदोलन केले आहे. पुढील काळात हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल. वाईन विक्रीची धुंदी कधी उतरेल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल, असाही इशारा ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.

 

हॉटेलच्या रूममध्ये गर्लफ्रेंडसोबत गेला अन् काही दिवसांनी पॉर्न साइटवर व्हिडिओ पाहताच….

बेंगळुरू । कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून सायबर गुन्ह्याची एक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या हॉटेल रूम मधील व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अशोक नगर येथील एका 25 वर्षीय बीपीओ कर्मचाऱ्याने 24 जानेवारी रोजी सेंट्रल सायबर इकॉनॉमिक्स आणि नार्कोटिक्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या नकळत आपला खासगी व्हिडिओ शूट करून वेबसाइटवर अपलोड केल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. फिर्यादीने पोलिसांना सांगितले की,”हा व्हिडिओ त्या हॉटेलच्या खोलीतला आहे जिथे तो काही दिवसांपूर्वी त्याच्या मैत्रिणीसोबत राहिला होता.”

याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र, हा व्हिडीओ त्या तरुणाने स्वत: किंवा त्याच्या मैत्रिणीने कि इतर कोणी शूट केला हे अद्याप समजू शकलेले नाही. वृत्तानुसार, पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “सदर व्हिडिओ वेगवेगळ्या कोनातून घेण्यात आला आहे आणि प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की त्यासाठी कोणताही गुप्त कॅमेरा वापरला गेलेला नाही.”

अपलोड केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याचा आणि त्याच्या मैत्रिणीचा चेहरा अस्पष्ट असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे, मात्र त्याने आपल्या छातीवरील जन्मखूणावरून तो ओळखला. पॉर्न साइटवर व्हिडिओ आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की,” तो इतर काही साइटवर देखील उपलब्ध आहे.”

उद्धवदादा, जर काही विकायचंच असेल तर…; वाईन विक्री वरून अभिजित बिचुकलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिग बॉस फेम अभिजित बिचुकले हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपासून ते बॉलीवूड अभिनेता सलमान खान वर जोरदार टीका करत आहेत. त्याच दरम्यान त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्री च्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजब सल्ला दिला आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाले, उद्धवदादा तरूणपिढीला व्यसनाधीन करू नका. तुम्ही किराणामालाच्या दुकानामध्ये आणि मॉल्समध्ये जर वाइन विकणार असाल तर याच मी कधीही समर्थन करणार नाही. जर तुम्हाला सगळीकडे काही विकायचं असेल तर अभिजीत बिचुकले अॅण्ड सन्स स्वीट्सचे सातारी कंदी पेढे आहेत ते द्या, कारण ते दुधाचे आहेत आणि त्या दुधातून माणसांना ताकद मिळेल आणि येणारी पिढी सुद्रुढ होईल.

दरम्यान, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सलमान खान वर आगपाखड केली. सलमान खान हा काही भाई नाही. त्याची भाई म्हणवून घ्यायची लायकी नाही असे म्हणत त्यांनी सलमान खानवर सडकून टीका केली. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने सलमान खान वर कडक शब्दांत टीका करत आहेत.

‘…पर हम झुकेंगे नहीं !’; ईडीच्या कारवाईवर राऊतांचे ‘पुष्पा’ स्टाईलने उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी ईडीने अटक केली. गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लांड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यवर कारवाई करण्यात आली. या प्रकरनावरून आज संजय राऊत यांनी ट्विट करीत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘केंद्रीय एजन्सी आमच्या मागे लावल्या. हे असेच 2024 पर्यंत चालेल.पण आम्ही कधीच झुकणार नाही!’, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत केंद्र सरकावर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून ‘आधी आमिष दाखवले, ऑफर्स दिल्या. मग घाबरवले, धमकावले पण आम्ही झुकलो नाही. नंतर कुटुंबाला धमकावले. आम्ही दुर्लक्ष केले, जाऊ दिले. त्यानंतर केंद्रीय एजन्सी आमच्या मागे लावल्या. हे असेच 2024 पर्यंत चालेल..पण आम्ही कधीच झुकणार नाही!’, असे पुष्पा चित्रपटातील ‘झुकेंगे नहीं’ हा डायलॉग मारत राऊत यांनी टीका केली आहे.

दरम्यान, राऊत यांनी आज माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य केले. मोदी सरकार राजकीय विरोधकांच्या नातेवाईकांवर कारवाई करते. आम्ही त्या कारवाया 2024 पर्यंत सहन करू. त्यांना काय सर्च करायचे आहे ते सर्च करू द्या. मी त्यांना विचारतोय ‘कुछ मिला क्या?’ हा खेळ असाच सुरू राहणार, अशी टीका राऊत यांनी केली.

बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोलिसांच्या बदल्यांच्या याद्या मला अनिल परब द्यायचे असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल परब यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर यांनी यावरून ट्विट करत सवाल केला आहे “बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?,” असा सवाल त्यांनी ट्वीट करत केला आहे. दरम्यान, देशमुखांच्या गौप्यस्फोटाने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख नेमक काय म्हणाले होते-

राज्यातील पोलीस बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब आपल्याकडे देत असल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी ईडीकडे केला आहे. कदाचित परब यांना शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी मिळायची आणि ते माझ्याकडे द्यायचे, पुढे तीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असे अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केले आहे. अनिल देशमुखांच्या गौप्यस्फोटाने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

येथे गुंतवणूक करा अन् दुप्पट पैसे मिळवा; कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । गुंतवणुकीची प्लॅनिंग करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात केवळ आपले जमा झालेले भांडवलच आपल्याला नेहमी उपयोगी पडते. मात्र गुंतवणुक कुठे करायची, आपला पैसा कुठे सुरक्षित राहील आणि त्याबरोबरच चांगला रिटर्न मिळेल या संभ्रमात व्यक्ती अडकून राहते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत जिथे तुमचे पैसे सुरक्षित तर राहतीलच आणि त्याबरोबरच मॅच्युरिटीवर तुम्हाला डबल रिटर्नही मिळेल. ही पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (KVP) योजना आहे.

किसान विकास पत्र ही भारत सरकारची वन टाईम इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, जिथे तुमचे पैसे एका निश्चित कालावधीत दुप्पट केले जातात. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये आहे. त्याची मॅच्युरिटी पिरियड सध्या 124 महिने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. ही योजना खास शेतकर्‍यांसाठी बनवण्यात आली आहे, जेणेकरून ते त्यांचे पैसे दीर्घकाळ वाचवू शकतील. मी तुम्हाला त्याबद्दल सर्व काही सांगतो…

कोण कोण गुंतवणूक करू शकेल?
किसान विकास पत्र (KVP) मध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे किमान वय 18 वर्षे आहे. सिंगल अकाऊंट व्यतिरिक्त यामध्ये जॉइंट अकाउंटचीही सुविधा आहे. त्याच वेळी, ही योजना अल्पवयीन मुलांसाठी देखील उपलब्ध आहे, ज्याची देखरेख पालकांनी करावी. ही योजना हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजेच HUF किंवा NRI वगळता ट्रस्टसाठी देखील लागू आहे. किसान विकास पत्र (KVP) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी रु. 1000, रु. 5000, रु. 10,000 आणि 50,000 पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, जे खरेदी केली जाऊ शकतात.

व्याज दर
2021 च्या पहिल्या तिमाहीत KVP साठी व्याज दर 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. येथे तुमची गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होईल. जर तुम्ही एक लाख रुपये एकरकमी गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 124 महिन्यांचा आहे. ही योजना इन्कम टॅक्स कायदा 80C अंतर्गत येत नाही. त्यामुळे जो काही रिटर्न येईल, त्यावर टॅक्स आकारला जाईल. या योजनेत TDS कापला जात नाही.

ट्रान्सफरची सुविधा देखील उपलब्ध आहे
किसान विकास पत्र जारी केल्याच्या तारखेपासून अडीच वर्षांनी कॅश केली जाऊ शकते. KVP एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील ट्रान्सफर केली जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केले जाऊ शकते. KVP मध्ये नॉमिनेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या स्वरूपात जारी केले जाते.

‘ही’ कागदपत्रे आवश्यक आहेत
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, KVP अर्ज फॉर्म, ऍड्रेस प्रूफ आणि बर्थ सर्टिफिकेट आवश्यक आहे.

LIC चा IPO मार्चमध्ये येणार, पुढील आठवड्यात दाखल होऊ शकतात कागदपत्रे

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मेगा IPO (LIC IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा सरकारने स्पष्ट केले आहे की, बाजार नियामक सेबीच्या मंजुरीनंतर LIC चा IPO मार्चमध्ये येऊ शकतो. मंगळवारी त्यांच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की,” सरकार लवकरच LIC चा IPO जारी करणार आहे.”

इश्यूचा काही भाग अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे
सरकार पुढील आठवड्यापर्यंत LIC च्या IPO साठी कागदपत्रांचा मसुदा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे दाखल करू शकते. बुधवारी ही माहिती देताना, डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे म्हणाले की,”या प्रकरणाचा काही भाग अँकर गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवला जाऊ शकतो.”

सरकार कागदपत्रे सादर करेल
पांडे म्हणाले की,”विमा नियामकाच्या मंजुरीची वाट पाहत आहे. यानंतर, शेअर विक्रीच्या आकाराचे तपशीलवार कागदपत्रांचा मसुदा दाखल केला जाईल.” सेबीची मंजुरी मिळाल्यानंतर LIC चा IPO मार्चपर्यंत बाजारात येऊ शकतो, असे ते म्हणाले.

निर्गुंतवणुकीसाठी FDI पॉलिसीमध्ये बदल होणार आहे
दुसरीकडे, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) लवकरच LIC च्या निर्गुंतवणुकीसाठी FDI पॉलिसीमध्ये बदलांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाशी संपर्क साधेल. ही माहिती देताना DPIIT चे सचिव अनुराग जैन म्हणाले की,”या विषयावर आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत अंतिम टप्प्यात आहे.”

IRDA च्या मंजुरीची वाट पाहत आहे
पांडे म्हणाले की,” LIC ची एम्बेडेड व्हॅल्यू आली आहे आणि आता ते विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) च्या मंजुरीची वाट पाहत आहे.” ते म्हणाले, “LIC च्या IPO साठी ड्राफ्ट (DRHP) 7 ते 10 दिवसांच्या दरम्यान दाखल केले जातील. अनौपचारिकपणे आम्ही सेबीशी विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहोत. IPO चे डिटेल्स DRHP मध्ये असतील.”