Monday, December 29, 2025
Home Blog Page 2937

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून अंगापूर येथे दोन पूलासाठी 2 कोटी 15 लाख

MP Shrinivas Patil

कराड | खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगाव येथील पूलाच्या बांधकामासाठी 2 कोटी 15 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या पूलामुळे परिसरातील नागरिकांसह कोरेगाव व कराड तालुक्याला जोडणारी वाहतूक सुलभ व सोयीची होण्यास मदत मिळणार आहे. रा. मा.140 ते ब्रम्हपुरी, अंगापूर, निगडी, कामेरी, फत्यापूर, देशमुखनगर, जावळवाडी, वेणेगाव, कोपर्डे, कालगाव मार्गावरील अंगापूर वंदन येथील पूलासाठी 1 कोटी 5 लाख आणि अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगाव या दोन्ही गावच्या ओढ्यावरील पूलासाठी 1 कोटी 10 लाखाची निधी राज्य शासनाच्‍या डिसेंबर 2021 च्या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे.

खा. श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावामुळे यास यश आले आहे. दोन्ही अंगापूर ही गावे विभागाच्या दृष्टीने हे महत्वाची गावे असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. त्यामुळे येथे आठवडा बाजारासाठी येणारे व्यापारी व ग्राहक, परिसरातून येणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच या मार्गावरून वाहतूकीचे प्रमाणही मोठे आहे. सध्या याठिकाणी कमी उंचीचे व अरूंद पूल असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम प्रगतीत असताना तात्पुरत्या स्वरूपातील सदर पूलामुळे दळणवळणाच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे याठिकाणी जादा उंचीचा व रूंद पूल व्हावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती.

खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला होता. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या दोन पूलासाठी पुरवणी अर्थसंकल्पात भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या पूलांचे काम मार्गी लागल्यानंतर सातारा तालुक्यासह कोरेगाव व कराड तालुक्याला जोडणा-या मार्गावरील वाहतूक सुलभ व सोयीची होणार आहे. यासाठी आ.शशिकांत शिंदे, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय मुनगिलवार, कार्यकारी अभियंता एस. पी. दराडे, उप अभियंता आर. टी. अहिरे, शाखा अभियंता आर.बी.शिंदे यांचे सहकार्य लाभले.

भाजपची सेफ खेळी!! योगी आदित्यनाथ ‘या’ मतदारसंघातुन निवडणूक लढवणार

Yogi Adityanath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातुन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले आहे. उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे योगींनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. भाजपने आज 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, याबाबत उत्सुकता होती. ते यावेळी अयोध्या किंवा मथुरेतून लढतील असे बोलले जात होते. उत्तरप्रदेशात भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्याने योगी आदित्यनाथ यांना अयोध्येमधून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. योगी आदित्यनाथ हे सुद्धा यासाठी इच्छुक होते. मात्र भाजपने पुन्हा एकदा गोरखपूरमधूनच योगी आदित्यनाथ यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला आहे.

भाजपची सेफ खेळी-

गोरखपूर मतदारसंघ हा मुख्यमंत्री योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे. पक्षाच्या नेतृत्वाने सगळ्यांशी विचारविनिमय करून योगींना गोरखपूरमधून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट; दोघांत तब्बल दीड तास चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी अभिनेते किरण माने याना स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढुन टाकल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. राजकीय विषयांवर भाष्य केल्यामुळेच मला काढून टाकण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केला होता. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे पवारांसोबत त्यांनी तब्बल दिड तास चर्चा केली.

माझी बाजू मी शरद पवार यांच्या समोर मांडली आहे. माझ्यावर जो अनन्या झाला आहे याबाबत शरद पवार यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं म्ह्णून मी आज येऊन भेट घेतली असे किरण माने यांनी सांगितलं. शरद पवार यांनी माझी बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली आणि आमच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. मला आशा आहे मला न्याय मिळेल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पण यानंतर भेटणार आहे.भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचीही भेट आपण घेणार आहोत असे किरण माने म्हणाले. उदयनराजे सध्या गोव्यात असल्याने आपली भेट झाली नाही असे ते म्हणाले.

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग कुठे फसला?? राऊतांनी सांगितले नेमकं कारण

pawar raut gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोव्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार अशा शक्यता असतानाच जागावाटपाच्या मुद्द्यांवरून एकमत न झाल्याने आघाडीचा प्रयोग फसल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी नेमकं कारण सांगत काँग्रेस वर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने आम्हांला दोन-तीन जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. पण आमच्यासोबत राष्ट्रवादीही आहे. त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. महाविकास आघाडी जेव्हा आपण बोलतो तेव्हा केवळ शिवसेना राहत नाही. राष्ट्रवादी आहे. त्यांना कोणत्या जागा हव्यात, ते कोणत्या जागांवर लढू इच्छितात यावर चर्चा होणं गरजेचं आहे. ती होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसला शुभेच्छा दिला, असं राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, ज्या जागा राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या सोडायला काँग्रेस तयार नाही. काँग्रेसने 40 पैकी 30 जागा लढाव्यात. उरलेल्या दहा जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डला द्याव्यात असं आम्हाला वाटत होतं पण काँग्रेस ला असं वाटतं की गोव्यात त्यांना 40 पैकी 45 जागा मिळतील असा टोलाही त्यांनी लगावला

एनी डेस्क ॲप डाऊनलोड केला अन् 10 लाखांचा फटका बसला 

Cyber Froud

 

औरंगाबाद – पैठण तालुक्यातील चणकवाडीच्या सेवानिवृत्त फौजदाराचा खात्यातून सायबर भामट्याने 10.24 लाख रुपये लांबवण्याचे खळबळजनक घटना उघडकीस आली. एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करतात भामट्याने फौजदाराचे खातेच रिकामे केले.

चणकवाडी येथील सेवानिवृत्त फौजदार तुकाराम मोहिते (63) यांचे एसबीआय बँकेत खाते असून गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एसबीआयचे ऑनलाईन ॲप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी मोहिते हे मोबाईल मध्ये सर्चिंग करत होते. त्यांना गुगल वर एसबीआय चा हेल्पलाइन नंबर मिळाला त्या नंबर वर त्यांनी फोन केला. समोरुन मी एसबीआयचा अधिकारी बोलतोय असे सांगितले. बँकेचे ॲप डाऊनलोड करायचे असेल तर त्यापूर्वी एनी डेस्क नावाचे ॲप डाऊनलोड करा असे मोहिते यांना सांगण्यात आले. त्यामुळे मोहिते यांनी एनी डेस्क ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर सदर व्यक्तीने ॲप आयडी कोड विचारला बँकेचा अधिकारीच बोलत असल्याने मोहिते यांनी कोडही सांगितला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातील तब्बल 10 लाख 24 हजारांची रक्कम सायबर भामट्याने काढून घेतली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तुकाराम मोहिते यांनी पैठण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दापोलीत तीन वृद्ध महिलांचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात ?

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – दापोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या नातू खोतवाडी या ठिकाणी एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये तीन वृद्ध महिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा अपघात आहे कि घातपात याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व इंदुबाई पाटणे अशी जळून मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. या मृत महिलांपैकी सत्यवती पाटणे आणि पार्वती पाटणे या दोघीच घरी राहत होत्या. तर इंदुबाई पाटणे या त्यांच्या नातेवाईक होत्या. त्या समोरच्याच घरात राहत होत्या. या वृद्ध महिलांचे नातेवाईक कामानिमित्त मुंबईमध्ये राहतात. या तिन्ही महिलांचा एकमेकांना आधार होता. या घटनेत सत्यवती पाटणे या चुलीजवळ, पार्वती पाटणे या दुसऱ्या खोलीत तर इंदुबाई पाटणे या हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या.

गावकऱ्यामुळे उघडकीस आली घटना
पाटणे यांच्या घरासमोरच कुलदेवतेचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये गावातील विनायक पाटणे हे दररोज पूजा करण्यासाठी येत असतात. सध्या थंडीचे दिवस असल्याने या महिला रोज सकाळी उन्हात बसायच्या. मात्र नेहमीप्रमाणे विनायक पाटणे कुलदैवताची पूजा करण्यासाठी आले तेव्हा या महिला त्यांना घराबाहेर दिसल्या नाहीत. तसेच त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. विनायक यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. यानंतर त्यांनी मागच्या दरवाज्याकडे जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा उघडा होता. यानंतर त्यांनी आत जाऊन पाहिले असता या तिन्ही वृद्ध महिला मृतावस्थेत आढळल्या. यानंतर त्यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

श्वान पथकाद्वारे अधिक तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घराच्या आजूबाजूला कसून तपास केला. या प्रकरणाच्या तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. हा अपघात आहे कि घातपात आहे याचा दापोली पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पालीत 144 कलम : आजच्या खंडोबा- म्हाळसा विवाह सोहळ्याला 79 पोलिसांचा बंदोबस्त

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड पालीच्या खंडोबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. खंडोबाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असून मोजक्या 50 मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवाचे यात्रेचे धार्मिक विधी होणार आहेत. पाली गावात 144 कलम लागू करण्यात आले असून बाहेरील लोकांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आज पाली गावात 10 अधिकारी आणि 69 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.

कराड तालुक्यातील पाली येथे आज खंडोबा देवाच्या यात्रेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. आज शनिवारी सकाळी अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी गावात पाहणी केली. तसेच पाली गावात येणाऱ्या मुख्य मार्गावरील काशिळ, तारळे, इंदोली यासह प्रमुख मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी पाली गावात येणाऱ्यांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाली गावात खंडोबा देवाची यात्रा रद्द झाल्याने गावात शुकशुकाट जाणवत आहे. दरवर्षी येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भक्तांच्या उपस्थितीत पार पडत असते. मात्र यंदा सलग दुसऱ्या वर्षी यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने पोलिस बंदोबस्तात मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत पार पडत आहे. श्री क्षेत्र खंडोबा पाल यात्रा सोहळा आज दि. 15/01/ 2022 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून लाईव्ह दर्शनासाठी युट्यूब व फेसबुकवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  https://www.youtube.com/channel/UC_tPRAlCnilRZFu0yV0mhYw 

मोठा अनर्थ टळला ! राजधानी एक्स्प्रेस उलटवण्याचा कट फसला

वलसाड : वृत्तसंस्था – गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील अतुल रेल्वे स्थानकाच्या रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब सापडल्यामुळे मोठा अपघात टळला आहे. काल सायंकाळी 7.10 वाजता राजधानी एक्सप्रेस या सिमेंटच्या खांबाला धडकली. मात्र सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. हा सिमेंटचा खांब मुद्दाम रेल्वे रुळावर टाकल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना टळली आहे. यामध्ये अतुल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब टाकून ट्रेन उलटवण्याचा कट रचण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी 7.10 वाजता राजधानी एक्सप्रेस धडकली मात्र सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, सुरत रेंजचे डीजी, वलसाड पोलीस, जीआरपी आणि आरपीएफ यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेनंतर राजधानी एक्सप्रेससह सर्व गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. अतुल रेल्वे स्थानकाच्या तारखुंटाजवळ शुक्रवारी सायंकाळी काही अज्ञातांनी हा सिमेंटचा खांब उखडून अहमदाबादकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर टाकला होता. यादरम्यान त्या ठिकाणाहून राजधानी एक्स्प्रेस गेली. हि एक्सप्रेस या खांबाला धडकल्याने हा सिमेंटचा खांब तुटला. यानंतर राजधानी एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट मोहम्मद सिद्दीकी यांनी अतुल रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्टरला या घटनेची माहिती दिली. यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन हा खांब रेल्वे रुळावरून बाजूला करण्यात आला.

पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 15 जानेवारी ”क्रिडा दिन” म्हणून जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे गोळेश्वर गावचे सुपुत्र पै. खाशाबा दादासाहेब जाधव यांची जयंती आहे. पै. खाशाबा जाधव यांची 97 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोशिएशन यांनी पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा महाराष्ट्राचा क्रिडा दिन म्हणून जाहीर केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी होती, अखेर 15 जानेवारी हा क्रिडा दिवस जाहीर केल्याबद्दल आभार पै. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी मानले आहेत.

कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे पै. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 साली झाला. खाशाबा जाधवांना लहानपणापासूनच पैलवानकीची प्रचंड आवड होती. गोळेश्वर जाधव कुटुंबातील भावंडे पैलवान होती तर त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे स्वत: एक नामांकित पैलवान असल्याने घरात कुस्तीसाठी चांगले वातावरण होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती शिकले. त्यांचे शालेय शिक्षण टिळक हायस्कूल, कराड येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज,कोल्हापूर येथे झाले.

पै. खाशाबा जाधव हे 1948 साली ऑलिम्पिक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर पोहचणारे पहिले भारतीय होते. तर पुढे 1952 साली त्यांनी हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत 52 किलो वजनगटात कांस्यपदक पटकावणारे पहिले भारतीय होते. भारताचे हे ऑलिंपिकमधील पहिले वैयक्तिक पदक होते. आज त्यांना कराड येथील कार्वे नाका येथे 97 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

महामार्ग भूसंपादनासाठी 20 ते 60% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महामार्गासाठी जमीन अधिग्रहित झाल्यास आता भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी (शेत) जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल. राज्य सरकारने याबाबत जीआर जारी केला असून या निर्णयामुळे भूखंडधारकांमध्ये निराशा पसरली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे भूखंडधारकांना मोठा फटका बसणार आहे. यापूर्वी आकृषी जमिनीसाठी मोबदला गुणक 2 दिला जात होता तो देखील आता अर्ध्यावर आला असून 1 केला आहे. तसेच भूखंडाचा मोबदला निश्चित करताना जो रेडीनेकरचा दर आहे तो सुद्धा 20 टक्के कमी करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली आहे. आमच्या सरकारने समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना भरपूर मोबदला दिला आहे. ज्यांना मोबदला मिळाला ते सर्व शेतकरी समृद्ध झाले. परंतु, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना धुळीस मिळविण्याची तयारी करताना दिसते. अशी टीका समीर मेघे यांनी केली.