Thursday, January 1, 2026
Home Blog Page 2995

मलकापूर पालिकेच्या मनमानी नियमाबाह्य शुल्कला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती : महेश पाटील

Malkapur

कराड | मलकापूर पालिकेकडून होणारी नियमबाह्य शुल्क आकारणीला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्थगिती दिली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी सिंह यांनी पालिकेस दिले आहेत. बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संस्थेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी त्या शुल्क आकारणीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. लोकवर्गणी, मागणीपत्र, पावती या नावाखाली पालिका बांधकाम परवाना देताना अतिरिक्त शुल्काची आकारणी करत होती. ती आकारणी नियमबाह्य आहे, असे तक्ररीत म्हटले होते. ती तक्रार ग्राह्य धरून त्या नियमबाह्य शुल्क आकारणीला स्थगिती देण्यात आली आहे.

क्रेडाईचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी त्या शुल्क आकारणीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून त्याचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ती शुल्क आकारणी नियम बाह्य ठरवत त्याच्या आकारणीला स्थगिती दिली आहे. पालिका घेत असलेले अतिरिक्त शुल्क नियमबाह्य आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात स्पष्ट केले आहे. पालिका अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार कोणत्याही प्रकारचे शुल्क, फी अथवा देणगी आकारणीसाठी मंजूर उपविधी असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यासंबंधातील शुल्क आकारणीबाबत उपविधीची विहित मंजुरी होईपर्यंत शासकीय मान्य शुल्क व्यतिरिक्त अन्य शुल्क, फी अथवा देणगी आकारणीस घेता येत नाही. त्यामुळे मलकापूरची ती शुल्क आकारणीही नियमबाह्य आहे. त्यामुळे त्याला स्थगिती मिळाली आहे.

आजपर्यंत घेतलेल्या शुल्काचे काय

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मलकापूरच्या कार्यक्षेत्रात बांधकामावेळी दिले जाणारे परवाण्यावेळी ते नियमबाह्य शुल्क आकारण्यात बंदी आहे. त्याबाबतचा कोणताही ठराव मलकापूरला नाही. कामगार कल्याण निधीसाठी जे शुल्क जमा केले जात होते. ते राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करणे बंधनकारक होते. मात्र, मलकापूर पालिका दुसऱ्याच बँकेत जमा करत आहे, असेही समोर आल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले. मग अशावेळी मलकापूर नगपरिषदेने आजपर्यंत  घेतलेले मनमानी शुल्काचे काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. शुल्काचे पैसै परत मिळणार का?

प्रेयसी सोबत किसींग स्टंट करणाऱ्या ‘त्या’ युवकाला पोलिसांकडून अटक

औरंगाबाद – शहरातील स्टंटबाज प्रियकराला जिन्सी पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे. प्रियसीला गाड़ीवर समोरच्या बाजुला बसवून किसींग करत हा तरुण गाडी चालवित होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणाचा शोध सुरु केला.

त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण अपेक्स हॉस्पिटलजवळ असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. सुरज कांबळे (वय 24. रा.बीडबायपास, अशोकनगर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याची चौकशी केली असता त्याने, सदरील कृत्य हे 31 डिसेंबर रोजी रात्री क्रांतीचौक ते सेव्हनहील दरम्यान केल्याची कबूली दिली. मित्रांनी डेअरिंग दिल्याने असे केल्याचीही त्याने कबुली दिली. यावरुन त्याच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंता तांगडे, हेड कॉन्स्टेबल जगताप, संतोष बमनात आणि बाविस्कर यांनी यशस्वी पार पाडली.

म्हणून आज काही जण ‘आयत्या बिळावर नागोबा’; राणेंचा राऊतांवर प्रहार

sanjay raut narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री नारायण राणे व शिवसेना यांच्यात अनेक दिवसापासून एकमेकांवर टीकाटिप्पणी केले जात आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावर शिवसेनेचे अग्रलेखातुन राणेंवर टीका करण्यात अली होती. त्या टीकेला राणे यांनी ‘प्रहार’मधून प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊत मुळात शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत नव्हते. अनेक शिवसैनिकांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी आणि कर्तव्ये पार पाडली. म्हणूनच आज काही जण ‘आयत्या बिळावर नागोबा’ आहेत. त्यातील एक संजय राऊत !”, अशी टीका राणेंनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या प्रहारमधील अग्रलेखात म्हणाले की, ” शिवसेनेचे चांगले दिवस आले तेव्हा ‘सामना’ वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा राऊत शिवसैनिक झाले. आज ते जशी आमच्यावर टीका करताहेत तशी टीका एकेकाळी शिवसेनेवर करत होते, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे माहीत नाही. कोकणात हत्या झाली त्यांची यादी छापली. कोकणात शिवसेनेमुळे दहशत, खून, अपहरण असे प्रकार वाढले असणारे म्हणणारे राऊतच आहेत.

शिवसेनेच्या जन्मापासून लाखो तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शिवसैनिक झाले. मात्र, आज काही जण ‘आयत्या बिळावर नागोबा’ आहेत. त्यातील एक संजय राऊत होय. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतरचे माझे एक वाक्य राऊतांच्या जीवाशी लागले. जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली, आता महाराष्ट्राकडे पाऊल, असे मी म्हण्टल्याने राऊत अस्वस्थ झाले असल्याचे राणे यांनी म्हंटले आहे.

गोपीचंद पडळकरांनी बनावट कागदपत्रे दाखवून शेतकर्‍याची जमिन लाटली? अट्रोसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल

gopichand padalkar

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

आटपाडी तालुक्यातील झरे इथल्या शेतकऱ्याची जमीन बनावट खरेदी पत्र करून, ठरलेला व्यवहार प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी महादेव अण्णा वाघमारे (वय ७७ रा. झरे) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भाजपचे आमदार गोपीचंद पुंडलिक पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू ब्रह्मदेव पुंडलिक पडळकर यांच्यावर फसवणुकीसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना हि २१ मार्च २०११ ते आज अखेर घडली.

याबाबत वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे, आटपाडी तालुक्यातील झरे येथे त्यांच्या मालकीची गट नंबर ६२४, ५५६ आणि ५५७ हि जमीन आहे. सदरची जमीन हि खरेदी करण्यासाठी संशयित ब्रह्मदेव पडळकर आणि गोपीचंद पडळकर यांनी समर्थता दर्शवली. वाघमारे आणि पडळकर यांच्यामध्ये ६ लाख २० हजार प्रमाणे जमिनीचा व्यवहार ठरला.

२१ मार्च ते २०११ ते आज अखेर जमीन खरेदी पत्राचे दस्त करून घेतला होता. त्यावेळी त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून १ लाख ६० हजार रुपये दिले व राहिलेली उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते. अनेक वर्षे उलटली तरी अद्यापही ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे उर्वरित ४ लाख ६० हजार रुपयांची रक्कम पडळकर बंधूंनी अद्याप दिली नाही.

वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे वाघमारे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू ब्रम्हदेव पडळकर यांच्यावर फसवणुकीसह अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वस्थमुळे सिंधुताई यांच्यावर पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुर होते. अनाथांची माय अशी सिंधुताई यांची ओळख होती.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते.

सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असे सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.

हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर..म्हणत तरुणानं तलावात उडी मारुन सगळंच संपवलं

औरंगाबाद – इंस्टाग्रामवर ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे करून हजारो मे हम नही मिलेंगे’ असे स्टेटस ठेवून आणि आत्महत्या करीत असल्याचा मित्राला कॉल करून पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचे शो आज हर्सूल तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली. तरुणाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याची चर्चा घाटी परिसरात आलेले त्याचे मित्र करीत होते. कुणाल काकासाहेब देहाडे (19, रा. सराफा गल्ली, सिटी चौक) असे मृताचे नाव आहे.

याविषयी हर्सूल पोलिसांनी सांगितले की, कुणाल हा वडिलांसोबत रंगकामाचा (पेंटर) ठेका घेत असे. 31 डिसेंबर रोजी त्याने सकाळी दुचाकीवर वडिलांना चिकलठाणा एमआयडीसीतील एका संस्थेत सुरू असलेल्या कामावर नेऊन सोडले. यानंतर तो दुचाकी घेऊन तेथून बाहेर पडला. एका मित्राला फोन करून तो आत्महत्या करणार असल्याचे म्हणाला. नंतर त्याने फोन बंद केला. नंतर त्याने हर्सूल तलाव गाठला. तेथून पुन्हा मित्राला कॉल करून आत्महत्या करण्यासाठी तलावावर आल्याचे त्याने सांगितले.

आदल्या दिवशी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट ठेवली होती. यात त्याने म्हटले होते की, ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर उन हजारो में हम नहीं मिलेंगे.’ ही पोस्ट वाचून मित्राने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक आणि मित्र त्याचा शोध घेत होते. तो हरवल्याची तक्रार सिटी चौक ठाण्यात नोंदविण्यात आली होती.

तलावाजवळ त्याची मोटारसायकल आढळून आली होती. यामुळे अग्निशामक दलाचे जवान चार दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. मात्र यात यश आले नव्हते. आज सकाळी कुणालचे प्रेत तरंगताना दिसले. अग्निशामक दलाच्या जवानांनी ते काढले, तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. याविषयी हर्सूल ठाण्यात नोंद करण्यात आली.

पोरीची छेड काढल्याच्या संशयातून आचाऱ्याची निर्घृणपणे हत्या

murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील मानखुर्द या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलीची छेड काढल्याच्या संशयातून एका ६२ वर्षीय आचारीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटकोपर मानखुर्द लिंक रोड साठे नगरच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या उड्डाणपुलाच्या खाली फेकण्यात आला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मो.सलीम जफर, मो. अख्तरआलम उर्फ सलीम याच्यासह त्याची पत्नी फिरोजा हिला अटक केली आहे.

रविवारी सकाळच्या सुमारास साठे नगर येथील उड्डाणपुलाच्या खाली एक मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर या मृतदेहाच्या अंगावरील जखमांवरून या व्यक्तीची हत्या झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो सगळीकडे व्हायरल केले. यानंतर मृतदेहाचा फोटो पाहून नंन्ने साबीर शेख यांनी मृत व्यक्ती त्यांचे सासरे असल्याचे सांगितले.

मृत व्यक्ती अब्दुल खलील शेख हे सलीम यांच्या घरात आचारी म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली पण त्या ठिकाणी सलीम आढळून आला नाही. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता सलीम हा पांजरपोळ परिसरात असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सलीमने शेखची हत्या केल्याची कबुली दिली. मुलीची छेड काढल्याच्या संशयातून सालिमने शेखला मारहाण केली. या मारहाणीत शेखचा मृत्यू झाला. यानंतर सलीमने आपल्या पत्नीच्या मदतीने मानखुर्द परिसरात फेकले. यानंतर मानखुर्द पोलिसांनी आरोपीला अटक केली.

चिंताजनक ! औरंगाबादेत कोरोनाचा विस्फोट; रुग्णसंख्या शंभरीपार

Corona

औरंगाबाद – जिल्ह्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा घडत होत असून, आज तर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दिवसभरात 103 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. याच शहरात सर्वाधिक 87 तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली आहे.

आज दिवसभरात 24 रुग्ण बरे होऊन घरी परतले यात मनपा हद्दीतील 20 आणि ग्रामीण भागातील रुग्णांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 39 झाली असून सध्या जिल्हाभरात 83 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.

राज्यात कोरोनाचा विस्फोट!! दिवसभरात सापडले तब्बल 18 हजारांहुन अधिक रुग्ण

corona

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आज कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. आज तब्बल 18 हजारांहुन अधिक रुग्ण सापडले असून लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात अनेक निर्बंध लावून देखील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत 18 हजार 466 नवे रुग्ण आढळले आहेत. आज 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत राज्यात 66308 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ओमायक्रोन चे 653 रुग्ण आत्तापर्यंत सापडले आहेत.

दरम्यान, राजधानी मुंबईत तब्बल 10 हजार 860 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तर मुंबईतील रुग्णवाढ पाहता पालिका प्रशासन सतर्क झाले असून काही इमारतींसाठी काही नव्या नियमावली जारी करण्यात आल्या आहेत.

इमारतींसाठी काय आहेत नियम

एखाद्या मजल्यावर सक्रिय रुग्ण आढळले तर तो मजला सील करण्यात येणार आहे.

इमारतीत 10 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे

कोरोना रुग्ण सापडलेल्या मजल्यावर बाहेर येण्यास जाण्यास मज्जाव असणार आहे

आरटीपीसीआर  टेस्ट होत नाही तोपर्यंत इमारत उघडण्यात येणार नाही किंवा अशा इमारतीस सक्तीने 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल

anita gutte

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील देवकरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने झाडाला गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव अनिता गुट्टे असे होते. त्या 32 वर्षांच्या होत्या. मृत अनिता यांनी पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी हि घटना उघडकीस आली.अनिताने सासू- सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिताचे सासरे नामदेव गुट्टे आणि सासू हे मुलाला घेऊन नवऱ्या सोबत मुंबईला राहायला जा म्हणून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर अनिताने सुभाष चाटे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून किनगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.