“संजय राऊत अन् उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही…”; भातखळकरांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, मोहीत कंबोज, नील सोमय्या यांच्यासह अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली. “संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही. मुंबई महानगर पालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणुकीतही संजय राऊत कधी निवडून आले नाहीत,”असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

आज भाजप नेते अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल जे काही भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर आरोप केले गेले. ते आरोप करणारे संजय राऊत म्हणजे काय महाराष्ट्र आहे का? मुंबई महानगर पालिकेत सोडा, पण नगरपालिकेच्या निवडणुकीतही संजय राऊत कधी निवडून आले नाहीत.

खरं तर आमच्यासोबत युती केल्याशिवाय यांना कधी शंभर जागा मिळाल्या नाहीत. राऊतांना वाटतं की त्यांचे भांडुपचे घर आणि मातोश्री म्हणजे महाराष्ट्र आहे. गैरसमजात राहू नका. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाहीत. राऊतांनी एक महानगर पालिकेची निवडणूक तरी लढवावी. आयुष्यभर तुम्ही राज्यसभेत गेला आहात. राऊत-उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही”, असे भातखळकर यांनी म्हंटले.

Leave a Comment