पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सोनिया गांधींना पत्र; केली ‘ही’ तातडीची मागणी

0
66
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल नुकतीच वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यानंतर वक्तव्यावरून भाजप नेते आक्रम झाले. काल पटोले याच्यावर टीका केल्यानंतर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अपात्र लिहले आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंना तत्काळ पदावरून बरखास्त करा, अशी मागणी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रात म्हंटले आहे की, “काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे वारंवार समाजविघातक अशा प्रकारची वक्तव्य करीत आहेत. तसेच ते सामाजिक शांतता बिघडवित आहेत. आपल्या पक्षासोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जिथे असते तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून आपण एकत्र यावे हा आपल्या समृद्ध लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून आपणास हे पत्र लिहीत आहे. पटोले यांनी अलीकडच्या काळात दोन वादग्रस्त विधाने केली आहेत.

नाना पटोले याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजात त्याच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पटोले यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे विधान केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा ‘वध’ असा उल्लेख केला. वध हा राक्षसांचा होत असतो, महापुरुषांचा नाही, ही सामान्य गोष्ट या जबाबदार व्यक्तीला समजू नये, ही अत्यंत खेदाची बाब आहे.” या दोन्ही आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधानाबद्दल पटोले यांनी माफी देखील मागितलेली नाही.

काँग्रेस पक्ष हा या देशातील जुना पक्ष आहे. मात्र, पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करत आहेत. अशा बेजबाबदार वक्तव्यावर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने बरखास्त करावे, अशी विनंती या पत्रातून करीत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here