व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Indian Railways: मास्क न घालणाऱ्यांना रेल्वेकडून दणका, आतापर्यंत साडेआठ लाख रुपये दंड केला वसूल

नवी दिल्ली । महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे लक्षात घेता रेल्वे विभाग विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून दंड आकारत आहे. आतापर्यन्त पश्चिम रेल्वेने प्रवाशांकडून 1 ते 6 मार्च दरम्यान एकूण 8.83 लाख रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वेने एक निवेदन जारी करून यासंदर्भाची माहिती दिली आहे. तत्पूर्वी, पश्चिम रेल्वेने (Western Railways) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या सहकार्याने फेब्रुवारी महिन्यात एकूण 5.97 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात असे सांगितले आहे की, 1 ते 6 मार्च मार्चदरम्यान मास्क न घालता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड आकारण्यात आला आहे. एका निवेदनानुसार 3,819 लोकांना फेस मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी पकडल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. 26 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक 430 दंड ठोठावण्यात आले होते. परिणामी 75,200 रुपये दंड म्हणून मिळाले आहेत.

रेल्वेचे 17000 कोटींचे नुकसान झाले आहे
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संकटात रेल्वेला सुमारे 17000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. मागील वर्षाच्या तुलनेत रेल्वेने भाड्यातून मिळणाऱ्या महसुलात 8,283 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सन 2020 मध्ये कोरोना संकटामुळे रेल्वेने सर्व रेल्वे सेवा रद्द केल्या. श्रमिक स्पेशल ट्रेन आणि इतर काही गाड्यांची सेवा 12 मेपासून सुरू करण्यात आली. आता मेल प्रवर्गामध्ये आणखी काही प्रवासी गाड्या चालवल्या जात आहेत.

वेगाने वाढणारी कोरोनाची प्रकरणे
पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. यावेळी महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 11,141 नवीन प्रकरणे, 6,013 रिकव्हरी आणि 38 मृत्यूची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी ही माहिती दिली. राज्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 99,205 आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.