Friday, December 12, 2025
Home Blog Page 1686

ऊसतोड मजुराच्या 17 वर्षीय मुलीवर बंद खोलीत 2 वर्ष बलात्कार; तुला नोकरी लावतो, लग्न करतो म्हणत..

pune rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीचं आमिष दाखवून ऊसतोड मजूराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पीडित मुलगी ही मूळ बीडची असून कामानिमित्त पुण्यात आली होती. तुला नोकरीला लावतो, तुझ्याशी लग्न करतो अशा खोट्या भूलथापा देत तिच्यावर तब्बल २ वर्ष बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपी संदीप किसन बडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबत फिर्यादी मुलीने केलेल्या आरोपानुसार, तिची आई 2017 पासून कामानिमित्त उत्तरप्रदेश येथे राहते त्यामुळे ती तिची मावशी शिला मुंजाजी तरकशे रा.चाकण, जि. पुणे यांच्या ओळखीने घरकाम शोधण्यासाठी चाकणला आली. चाकणमध्ये मावशी राहत असलेल्या परिसरात तिला घरकाम मिळाले. जवळपास वर्षभर तिने तिथे काम केले मात्र त्यांनतर तेवढ्या पैशात परवडत नसल्याने सदर पीडित तरुणीने तिची मोठी बहीण राजश्री शिंदे (रा. आढळगाव, ता. श्रीगोदा, जि. अहमदनगर) हिस काम शोधण्यास सांगितलं. तेव्हा तिने तिचा दूरवा नातेवाईक संदीप बडेकर याला चाकण बस स्टँडला पाठवले व तिला बस स्टॅण्डवर जाउन त्याला भेटायला सांगितले. तेव्हा आरोपी आणि पीडित मुलीची सर्वप्रथम ऑक्टोबर 2018 मध्ये पहिल्यांदा भेट झाली.

त्यावेळी सदर मुलीने संदीप बडेकर याला घरकाम शोधून देण्यास सांगितले, तेव्हा त्याने तिला त्याच्या गाडीत बसायला सांगितले व दोघे तळेगाव दाभाडे येथे काम शोधण्याकरिता गेले. तेथे एका बिल्डींगमधील एका रूममध्ये संदीप बडेकर याने पीडित मुलीला राहण्यास सांगितले. दोन दिवस ती एकटी तेथेच राहिले, . तिस-या दिवधी संदीप बडेकर हा दारू पिउन ती राहात असलेल्या खोलीत आला आणि शिवीगाळ करत तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. मुलीने त्याला विरोध करूनही त्याने जबरदस्तीने बलात्कार केला आणि त्याबाबत कोणाला सांगू नकोसे अशी दमदाटी केली. आसपास कोणीही ओळखीचे नसल्याने सदर मुलीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.

परंतु संदीप बडेकर याने घरकाम शोधून तर दिलेच नाही, उलट तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून दुस-या दिवशीही तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला तळेगावमधील राहात असलेल्या रूममध्येच राहण्यास सांगितले. मुलीची आई कामानिमित्त उत्तरप्रदेशाला असल्याने आणि इतर नातेवाईक मूळ गावी राहात असल्याने ती तेथेच राहिली. यादरम्यान, ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2020 पर्यंत म्हणजे जवळपास २ वर्षांच्या कालावधीत संदीप बडेकर हा लग्न करतो असे सांगून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संभोग करीत होता. परंतु त्याने तिच्यासोबत लग्न केले नाही.

त्यांनतर सप्टेंबर 2020 मध्ये तिची विवाहित बहीण राजश्री शिंदे हिचे पती बाबासाहेब शिंदे हे मयत झाले. त्यानंतर पीडितेने काही दिवसांनी बहीण राजश्री शिंदे आणि आई मंगल कनकुटे या दोघींना तळेगावला राहात असलेल्या रूमवर फोन करून बोलावून घेतले आणि ती त्यांच्यासोबत श्रीगोंदा येथे राजश्री शिंदे हिच्या घरी गेली आणि त्यांनतर परळीला मावशीकडे राहायला गेली. त्यांनतर सदर पीडित मुलीने आरोपीवर कायदेशीर ऍक्शन घेतली. ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत अल्पवयीन असताना बलात्कार केल्याप्रकरणी संदीप बडेकर याच्याविरूध्द तिने कायदेपीर तक्रार आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कलम ३७६(२) (n), कलम ५०४, ५०६ , बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार, कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी एफडीवर देत आहे बँकांपेक्षा जास्त व्याज

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता ICICI हाउसिंग फायनान्स कंपनीने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातवाढ केली आहे.

ICICI Home Finance launches home loan festival

3 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू

हे नवीन दर 3 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. हे लक्षात घ्या कि, CRISIL, ICRA आणि CARE कडून ICICI HFC ला AAA रेटिंग मिळाले आहे. म्हणजे कंपनीच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित आहेत. या कंपनी कडून क्युम्युलेटिव्ह आणि नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीची ऑफर दिली जाते. या बदलानंतर, कंपनी आता क्युम्युलेटिव्ह एफडीवर 7.50 टक्क्यांपर्यंत तर, ICICI HFC नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवर दरमहा जास्तीत जास्त 7.25 टक्के दराने व्याज देईल. FD Rate

क्युम्युलेटिव्ह पर्यायांतर्गत, ICICI HFC 12 ते 24 महिन्यांच्या FD वर 7.00 टक्के, 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.30 टक्के आणि 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.40 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के व्याज देईल. FD Rate

ICICI HFC expands presence in AP, TS

नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवरील व्याजदरातही वाढ

हे लक्षात घ्या कि, या कंपनीने नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. त्यानंतर आता कंपनी 12 ते 24 महिन्यांच्या FD वर दरमहा 6.80 टक्के दराने व्याज देईल. त्याच प्रमाणे, आता ग्राहकांना 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.05 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.25 टक्के मासिक व्याज मिळेल. FD Rate

‘या’ एफडींवरही मिळेल जास्त व्याज

कंपनीने 12 ते 24 महिन्यांच्या FD वर तिमाही दराने 6.85 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता ग्राहकांना 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.10 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.20 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.30 टक्के दराने व्याज मिळेल. या अंतर्गत, ICICI HFC कडून आता 12 ते 24 महिन्यांच्या नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवर वार्षिक 7.00 टक्के, 24 ते 36 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.30 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.40 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.50 टक्के व्याज दिले जाईल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. FD Rate

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. FD Rate

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicihfc.com/fixed-deposit/fd-interest-rate

हे पण वाचा :
Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळेल 1000GB डेटा
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Google Pixel 7 वर मिळवा 28,000 रुपयांपर्यंतची सूट, अशा प्रकारे घ्या ऑफरचा लाभ

Bucket Water Heater : कडाक्याच्या थंडीतही अवघ्या काही मिनिटांत मिळवा गरम पाणी; फक्त 1,599 रुपयांमध्ये घरी आणा ही बादली

Bucket Water Heater

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bucket Water Heater : भारताच्या अनेक भागांमध्ये सध्या कडाक्याच्या थंडीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत पाण्यामागे हात घालणे अनेकदा नकोसे वाटते. मात्र पाण्याशी संबंधित कामासाठी जसे कि, कपडे, भांडी धुणे अशा अनेक कामासाठी पाण्यामध्ये हात घालण्यास गत्यंतर नसते. मात्र जर गरम पाणी असेल तर त्यातून थोडाफार दिलासा मिळतो. यासाठी गिझर कामी येईल. थंडीच्या ऋतूमध्ये लोकांकडून गिझरची खरेदी केली जाते. मात्र, किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच गिझर घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत आज आपण गिझरच्या एका स्वस्त पर्यायाबाबतची माहिती जाणून घेउयात…

Buy Abirami Instant Bucket Water Heater | Portable Water Heater | SHOCKPROOF Instant Heating power saving Low Electicity Bill | 20 Ltrs Capacity (Mustard Color) Online at Low Prices in India - Amazon.in

वास्तविक, ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर सध्या एक बादली विकली जाते आहे, जी गिझरसाठी चांगला पर्याय ठरू शकेल. त्याची किंमत देखील कमी आहे. याशिवाय यामुळे जास्त वीज बिल देखील येणार नसल्याचा दावा देखील कंपनीने केला आहे. Bucket Water Heater

Abirami Bucket Water Heater at Rs 1599/unit | Coimbatore | ID: 21498931633

खरं तर आपण ज्या बादली बाबत चर्चा करत आहोत ती एक Abirami 20 L इन्स्टंट वॉटर गीझर आहे. फ्लिपकार्टवरून सवलतीनंतर ती 2,499 रुपयांऐवजी 1,599 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याबरोबरच कंपनीकडून यावर ग्राहकांना एक वर्षाची वॉरंटी देखील मिळत ​​आहे. यावर 10 दिवसांची रिप्लेसमेंट ऑफर देखील दिली जाते आहे. या मल्टीपर्पज वॉटर हीटरची क्षमता 20 लिटरची आहे. Bucket Water Heater

Bucket Water Heater: कड़कड़ाती ठंड में भी मिनटों में पानी होगा गर्म, बस  1,599 रुपये में घर ले आएं ये बाल्टी - bucket water heater buy instant water  heater for winter from

ही बादली गिझरसारखीच अवघ्या काही मिनिटांतच पाणी गरम करते. फ्लिपकार्टवरील माहितीनुसार, या प्रॉडक्टद्वारे गरम होणारे पाणी आंघोळ, पिणे, स्वयंपाकघर आणि इतर अनेक कामांसाठी देखील वापरता येईल. शॉकप्रूफ डिझाइन असलेले हे एक पोर्टेबल प्रॉडक्ट आहे. जे प्रवासासाठी देखील वापरता येऊ शकते. या बादलीमध्ये पाणी घेण्यासाठी नळही दिला गेला आहे. Bucket Water Heater

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/abirami-20-l-instant-water-geyser-instant-bucket-heater-shockproof-power-saving-low-electricity-bill-green/p/itma24ca4ae41175

हे पण वाचा :
Samsung Galaxy S21 SE फोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या किंमत अन फिचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिला शेवटचा इशारा, लवकरात लवकर करा ‘हे’ काम अन्यथा निष्क्रिय होईल Pan Card
Smart TV Offers : फक्त 4999 मध्ये घरी आणा 32 इंच ब्रँडेड स्मार्ट टीव्ही, डिस्काउंट अन् फीचर्स तपासा
Indian Overseas Bank च्या ​​FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा – काँग्रेस

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता पातळी अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर ढासळली आहे. यामुळे शेतकरी वर्गातील अन् ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यापार्श्वभुनीवर जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना भेटून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी राज्यातील जिल्हापरिषद शाळेतील सुमार गुणवत्तेचा लेखा जोखा मांडला आहे. तसेच अधिकारी व शिक्षक यांच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. बालाजी गाडे यांनी प्रधान सचिवांना निवेदन देऊन शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्न मांडले.

गाव खेड्यातल्या गोर गरीब शेतकरी, कामगार, शेतमजूर या अडाणी जनतेचे पाल्य येथे शिकत असतात. या पालकांना त्यांची मुले काय शिकतात त्यांची किती प्रगती झालीय हे समजेल असे नाही त्यामुळे शिक्षकांनी प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे. पण असे होतांना दिसत नाही. माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्याला साधं मराठी सुद्धा नीट वाचता व लिहिता येत नाही .मग शिक्षक आणि शिक्षण विभाग करतोय तरी काय ? ज्यांना वाचता येत नाही त्यांना पुढच्या वर्गात पाठवलंच कसं जातंय? असा सवाल त्यांनी केला. धर्म आणि जातीच्या राजकारणात मश्गूल असलेले सत्ताधारी याकडे अजिबात लक्ष देणार नाहीत.

शिक्षका अभावी शाळा बंद पडत आहेत. अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. ती रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी बालाजी गाडे यांनी केली तसेच शिक्षकांवर शिकवण्या व्यतिरिक्त अनेक प्रशासकीय कामांचा भार टाकला जातो त्यामुळे त्यांना मूळ शिक्षकी पेशाला न्याय देता येत नाही याकडे सुद्धा त्यांनी प्रधान सचिवांचे लक्ष वेधले.

गाव खेड्यातल्या शाळा ओस पडत आहेत आणि शिक्षकांच्या सुमार दर्जा मुळे विद्यार्थी सुद्धा सुमार तयार होत आहेत. हेच विद्यार्थी पुढे प्रौढ झाल्यावर गुणवत्ता नसल्यामुळे बेरोजगार होऊन समाजावर भार होऊन जगत आहेत. त्यातूनच गुन्हेगारीचे , नशाखोरीचे प्रमाण ही वाढत आहे . गुणवत्ता प्रधान शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसल्या मुळे लाखो मुलांचे आज लग्न होत नाहीयेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बालाजी गाडे पाटील यांनी शिक्षण विभागाला दिला आहे. समाजा तील सुजाण नागरिक व पालकांनी या समाजहिताच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.

मांढरदेव यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

सातारा : मांढरदेव यात्रा अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी श्री काळुबाई मंदिर व मांढरदेव परिसराची पहाणी केली.

मांढरदेव यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांढरदेव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संयुक्तपणे केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंदिर ट्रस्ट व प्रशासनाच्या विविध विभागानी केलेली तयारी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून तयारी बाबत समाधान व्यक्त केले व कर्तव्यवर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यात्रा कालावधी दरम्यान दक्ष राहून काम करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स

Samsung Galaxy F04

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Samsung ने आज भारतीय बाजारात Samsung Galaxy F04 लॉन्च केला आहे. हा कंपनीच्या Galaxy F-सिरीज अंतर्गत एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. सॅमसंगच्या या मोबाईल ची किंमत अवघी 7,499 रुपये आहे. चला आज आपण जाणून घेऊया या मोबाईलची खास वैशिष्ट्ये..

6.5-इंचाचा डिस्प्ले-

या सॅमसंग (Samsung Galaxy F04) मोबाईलमध्ये (1600 × 720 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 60 Hz रिफ्रेश रेटसहसह 6.5-इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. हा फोन Android 12 वर आधारित One UI 4.1 वर काम करतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह येईल. सॅमसंगच्या या मोबाईल ला 5000 mAhची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी USB टाइप-सी पोर्टद्वारे 15W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्हाला हा मोबाईल जेड पर्पल आणि ओपल ग्रीन या २ रंगामध्ये मिळू शकतो.

Samsung Galaxy F04

कॅमेरा – (Samsung Galaxy F04)

मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, (Samsung Galaxy F04) तर या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. याशिवाय व्हिडिओ कॉल आणि सेल्फी साठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G, Wi-Fi, Bluetooth v5, GPS, FM रेडिओ आणि USB Type-C पोर्ट आहे.

Samsung Galaxy F04

किंमत किती –

मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy F04 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. हा मोबाईल 12 जानेवारीपासून Flipkart, Samsung.com आणि इतर रिटेलर्सवर सुरू होईल. या मोबाईल वरील सेल ऑफरमध्ये 1,000 रुपयांची त्वरित सूट समाविष्ट आहे. ही सवलत ICICI क्रेडिट कार्ड व्यवहाराद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे.

हे पण वाचा : 

Jio Family Recharge Plan : एका Recharge चा फायदा 4 जणांना; 200 GB Data अन् बरंच काही

Nokia C31 : अवघ्या 10 हजार रुपयांत मिळणार Nokia चा जबरदस्त मोबाईल; पहा फीचर्स

Moto X40 लॉन्च; 60 MP सेल्फी कॅमेरा अन् बरंच काही; किंमतही पहा

भारतात Oppo A58x 5G स्मार्टफोन लॉन्च, आता कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स

Samsung Galaxy S21 SE फोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या किंमत अन फिचर्स

Samsung Galaxy S21 SE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy S21 SE : सध्या बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. अशातच आता Samsung Galaxy S21 SE फोन पुन्हा एकदा कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट वर सॅमसंगचा हा मिड-रेंज प्रीमियम 5G फोन 39,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर विकला जातो आहे. हे लक्षात घ्या कि, ही किंमत 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची आहे. मात्र या फोनवर बँकेची कोणतीही ऑफर उपलब्ध नाही. मात्र तरी एक्सचेंज ऑफरच्या मदतीने ग्राहकांना त्याची किंमत आणखी कमी करता येऊ शकेल.

Buy Samsung Galaxy S21 FE 5G Phone | Samsung UK | Samsung UK

Samsung Galaxy S21 SE हा स्मार्टफोन भारतात 49,999 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आला होता. मात्र ई-कॉमर्स वेबसाइटवर ग्राहकांना यावर 10,000 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच या ऑफरवर कोणत्याही अटी किंवा नियम नाहीत. फ्लिपकार्ट कडून या सॅमसंग स्मार्टफोनवर फ्लॅट डिस्काउंट दिला जातो आहे.

दरम्यान, एका लीक झालेल्या बातमीमध्ये असा दावा केला जातो आहे की, यावर्षी Galaxy A74 लाँच करण्याची कंपनीची कोणतीही योजना नाही आणि सॅमसंग याला Galaxy S22 FE म्हणून लाँच करू शकते. मात्र, ग्राहक या फोनच्या नवीन व्हर्जनची तुलना जुन्या मॉडेलशी करू शकतील.

Samsung Galaxy S21 FE 5G Price In India & Mobile Specs IN | MobGsm

किंमत जाणून घ्या

एका मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, याची किंमत Galaxy A73 इतकीच असेल. जर असे झाले तर भारतात Galaxy S22 FE ची किंमत सुमारे 41,999 रुपये असू शकते. हे लक्षात घ्या कि, काही देशांमध्ये Galaxy S21 FE हा फोन 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

फीचर्स विषयी जाणून घ्या

टिपस्टरच्या मते, हा नवीन फोन सॅमसंगच्या नवीन प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच हा स्मार्टफोन Exynos 2300 4nm चिपसेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. हे लक्षात घ्या कि, फेब्रुवारी 2023 मध्ये हा फोन लॉन्च केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Mua Galaxy S21 FE 5G Mới | Giá & Ưu Đãi | Samsung VN

108MP कॅमेरा सेन्सर उपलब्ध

या Samsung Galaxy S21 SE स्मार्टफोनमध्ये नवीन कॅमेरा सेन्सर वापरला जाण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये Samsung 108MP HM6 कॅमेरा दिला जाऊ शकेल. सध्याच्या Galaxy S21 FE शी तुलना केल्यास, Galaxy S21 FE फोनमध्ये 12MP कॅमेरासह येतो. अशा परिस्थितीत, Galaxy S22 FE हँडसेटचा संभाव्य 108MP कॅमेरा हा एक जबरदस्त अपग्रेड आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.flipkart.com/samsung-galaxy-s21-fe-5g-lavender-128-gb/p/itm3b094762fb621

हे पण वाचा :
Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या

वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

Electricity workers strike called off

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला 3 दिवसांचा संप आजच्या पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावरील ऊर्जा संकट टळले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बैठक झाली. या बैठकीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही, याउलट राज्य सरकार पुढच्या तीन वर्षांमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करणार आहे हे स्पष्ट केलं .

ओडिशा, दिल्ली येथे खासगीकरण झाले आहे, तसे महाराष्ट्रात करण्याचा कोणताही विचार नाही. संघटना आणि सरकारची बैठक यापुर्वीच झाली असती तर गैरसमज निर्माण झालेच नसते. सरकारने मांडलेली भूमिका संघटनांना पटली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. कालांतराने त्यावरही तोडगा काढला जाईल अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

Satara Bajarbhav : सातारा बाजारसमिती तेजीत; कोणत्या शेतमालाला काय भाव पहा

Satara Bajarbhav-2
शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.  
कारली क्विंटल 8 2000 2500 2250
दुधी भोपळा क्विंटल 3 1500 2000 1750
वांगी क्विंटल 16 2000 2500 2250
कोबी —- क्विंटल 27 500 600 550
ढोवळी मिरची क्विंटल 14 2000 3000 2500
गाजर क्विंटल 30 1500 2000 1750
काकडी क्विंटल 21 1000 1500 1250
फ्लॉवर क्विंटल 23 1000 1500 1250
लसूण क्विंटल 28 500 3000 1750
आले क्विंटल 6 3000 4000 3500
मिरची (हिरवी) क्विंटल 27 3000 4000 3500
मटार क्विंटल 112 2000 2500 2250
भेडी क्विंटल 4 3000 4000 3500
कांदा क्विंटल 87 1500 2000 1750
पावटा (भाजी) क्विंटल 9 3000 4000 3500
शेवगा क्विंटल 5 7000 8000 7500
टोमॅटो क्विंटल 70 500 700 600

8 वर्षांच्या जुळ्या भावांनी सुरू केले 2 Start-Up; 5 लाखांचा निधीही मिळाला

Anay Ramakrishnan and Abeer Ramakrishnan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षात 2 जुळ्या भावांनी स्टार्ट अप (Start-Up) उपक्रम सुरु केल्याची अभिमानास्पद माहिती समोर येत आहे. अनय रामकृष्णन (Anay Ramakrishnan) आणि अबीर रामकृष्णन (Abeer Ramakrishnan) अशी या दोन्ही भावांची नावं असून या दोघांच्या नावावर दोन स्टार्टअप आहेत. “एक ट्रॅक्शन स्टेजमध्ये आहे आणि दुसरा अजूनही विचारात आहे. यातील पहिला स्टार्टअप ना नफा ना तोटा या तत्वावर आहे आणि दुसरी एक सखोल टेक स्टार्ट-अप आहे.

गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या पहिल्या उपक्रमासाठी निधीचा पहिला लॉट म्हणून 5 लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे अनय रामकृष्णन आणि अबीर रामकृष्णन हे नवीन युगातील व्यवसायातील सर्वात तरुण उद्योजकांपैकी एक असू शकतात. त्यांचे वडील आर रामकृष्णन एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत आणि आई प्रिती रामकृष्णन आयटी प्रोफेशनल असून त्यांच्याकडे व्यवस्थापन आणि खर्चाची पदवी आहे.

त्यांचा not-for-profit हा उपक्रम वंचित मुलांसाठी काम करतो. ते देणगीदारांकडून कपडे, खेळणी आणि पुस्तके यासारख्या वस्तू गोळा करतात, जे गरीब मुलांना दिले जातात. चॅरिटी त्याच्या कृतींमुळे कमी झालेल्या कार्बन फूट प्रिंटचीही गणना करते. या वस्तू, उदाहरणार्थ कपड्यांसारख्या, अन्यथा टाकल्या गेल्या असत्या, पण आता त्या चॅरिटी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा वापरल्या जात आहेत. या वेळी यापैकी एकाने कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटरच्या आधारे ही समस्या कमी करण्यासाठी खेळणी, काही कपडे किंवा पुस्तकं पुन्हा वापरणं किती गरजेचं आहे, हे दाखवलं.

Sharingmitra.org या चॅरिटी स्टार्ट-अपसाठी 2.40 लाख किलो कार्बन फूटप्रिंट मिटवले गेले, असे दोन्ही भावांकडून सांगण्यात येते. गेल्या उन्हाळ्यात, आम्ही अमरावती येथे एका शिबिरात गेलो होतो आणि झोपडपट्टीतील मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती आणि त्यांची परिस्थिती पाहून आमचे मन हलले. आम्ही परत आलो आणि इंटरनेटवर संशोधन केले की भारतात 10 कोटी आणि जगभरात 150 कोटी मुले आहेत अशी माहिती अबीर रामकृष्णन यांनी दिली.

त्यांनतर या दोन्ही भावांनी ओपन कोड प्लॅटफॉर्म वापरून वेबसाइट तयार केली. त्यांच्या मॉडेल अंतर्गत, देणगीदारांकडून घेतलेल्या वस्तू गरीब मुलांना पाठवल्या जातात. त्यापैकी बहुतेक कपडे किंवा खेळण्यांसारख्या गोष्टी आहेत. शक्यतो पालिका शाळेतील मुलांना फायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

दान केलेल्या वस्तूंच्या वितरणासाठी Zomato किंवा Swiggy सारख्या कंपन्यांना गुंतवून ठेवण्याची त्यांची योजना आहे. सध्या, आम्ही लोकलवर काम करत असून देणगीदार आणि स्वीकारणारे दोघेही नागपूरपुरते मर्यादित आहेत, परंतु आम्ही इतर शहरांमध्येही विस्तार करण्याची योजना आखत आहोत असे त्यांनी सांगितलं.

त्यांनतर आपल्या दुसऱ्या उपक्रमाबाबत सांगताना अनयने म्हंटल कि, आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोकांना अमर करण्याची योजना आखत आहोत. व्हर्च्युअल होलोग्राम तयार करण्याची योजना आहे जी तुमच्या डिव्हाइसमधून पॉप आउट होऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने होलोग्राम इंटरनेटवर सर्च करून बोलू शकतात आणि आवाजाला प्रतिसाद देऊ शकतात. “आपल्याला अॅपद्वारे महात्मा गांधी आणि अल्बर्ट आइनस्टाईन सारखी व्यक्तिमत्त्वे मिळू शकतात. तुमच्या प्रियजनांना जिवंत करण्यासाठी, प्रीमियम सेवेचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे असे ते म्हणतात. पुढील 15 महिन्यांत प्रॉडक्ट बनवण्याच्या आशेने, ते पुन्हा एकदा निधीसाठी प्रयत्न करतील. या पैशाचा उपयोग कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्यासाठी केला जाईल.