Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2694

कराड जुन्या कोयना नदीत बेपत्ता 32 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू

कराड | कराड शहरातील ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पूलाजवळ बेपत्ता 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. नदीपात्रात एका पुरूषाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पूलाजवळ मृतदेह सापडल्यानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सदरचा मृतदेह आढळलेला व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार कालच कराड शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील नारायणवाडी येथील हैबुद्दीन काक शेख (वय- 32) हे दि. 1 मार्च रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. त्यानंतर घरातील लोकांनी हैबुद्दीन यांचा नातेवाईकांनी परिसरात घेतला, मात्र मंगळवारी रात्री घरी आलाच नाही.  त्यामुळे दुसऱ्या दिवशी दि. 2 मार्च रोजी नातेवाईक सिंकदर शेख यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात हैबुद्दीन बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती.

आज दि. 3 रोजी सकाळी जुन्या कोयना पुलाजवळ पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास पो. हवा. एम. एम. खान, सुनिल माने करत आहेत.

सांगलीत शिवसेनेची राज्यपालांच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौकामध्ये निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशारा उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी दिला. स्टेशन चौकात जिल्हा शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

यावेळी लई झाल. गो बॅक कोश्यारी, या टोपी खाली चाललंय काय…., मुकुटा खाली चाललंय काय…. इतिहासात छेडछाड करणार्‍या राज्यपाल महोदयांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचा पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचा धिक्कार करण्यात आला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्राचे राजभवन हे भाजपच्या विरोधी पक्षाचे कार्यालय झाले आहे. राज्यपाल हे राज्याचे पालक नसून सरकारच्या विरोधात समांतर सरकार चालवण्याचे काम करीत असल्याची टीका सेनेच्यावतीने करण्यात आली.

युद्धजन्य युक्रेनमध्ये अडकलेला विद्यार्थी पोहोचला सांगलीत, केंद्र सरकारने उपाययोजना केली नसल्याची व्यक्त केली खंत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली मधील विश्रामबाग परिसरात राहणारा तोहीद मुल्ला हा वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेला होता. गेल्या आठवड्यापासून युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरु असल्याने हजारो विद्यार्थी त्याठिकाणी अडकून पडले होते. यामध्ये सांगली जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. यातील तोहीद मुल्ला हा सुखरूप सांगली मध्ये पोहोचला. त्याने युक्रेन ते सांगली पर्यंतचा थक्क करणारा प्रवास यावेळी सांगितला. तसेच केंद्र सरकारने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे त्याने यावेळी सांगितले.

सांगलीतल्या विश्रामबाग परिसरात राहणार तोहीद बशीर मुल्ला हा २०१८ साली एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेन इथल्या नॅशनल युनिव्हर्सिटी येथे गेला होता. युनिव्हर्सिटी पासून तीन किलोमीटर अंतरावर एअर पोर्ट आहे. त्याच्या समोरच मिलिटरी बेस आहे. त्याठिकाणी पहाटे स्फोट झाल्यानंतर मुल्ला आणि त्याच्या सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांना जाग आली. त्यांनी बाहेर पहिले असता आकाशातून फायटर प्लॅन धावत होते.

त्यांनी तातडीने भारतीय दूतावासांशी संपर्क साधला त्यावेळी सांगण्यात आलं कि, तुमची युनिव्हर्सिटी जेंव्हा ऑनलाईन होईल तेंव्हा तुम्ही जाऊ शकता. मात्र, युद्ध सुरु होई पर्यंत युनिव्हर्सिटी मध्ये ऑफलाईन शिक्षण सुरु होते. त्यामुळे त्यांना निघेता आले नाही. युद्ध सुरु होताच काही विद्यार्थ्यांनी विमानाचे तिकीट काढले होते. मात्र, सदरची विमाने हि रद्द करण्यात आली. त्यामुळे सदरचे विद्यार्थी हे तेथून बाहेर पडले. तब्बल आठवड्याच्या त्रासानंतर मुल्ला हा सांगलीत दाखल झाला.

“गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाईकासोबत जेवणं केलेय”

girish mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिला 5 लाख रुपये दिले असल्याने याची ईडीकडून चौकशी केली जात आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला जात असताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमधील नेते गिरीश महाजन याच्यावर गंभीर आरोप केला आहे. “भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिर्ची हा दहशतवादीच होता. गिरीश महाजन यांनी तर नाशिकमध्ये दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले होते,” असा आरोप खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिक याच्यावर आरोप करणाऱ्या भाजपचा आणि भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी खडसे म्हणाले की, नवाब मलिक याचा नाही तर भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिर्ची कोण आहे? तो तर दहशतवादी आहे. दाऊदच्या नातेवाईकांसोबत गिरीश महाजन यांनी एकत्र बसून जेवण केलं होतं. मग त्यांचाही दाऊदच्या नातेवाईकांशी संबंध आहे असं म्हणायचं का?,’ असा सवाल खडसे यांनी केला.

दाऊद इब्राहिम यांच्या प्रकरणाबाबत भाजपची दुटप्पी भूमिका आहे. दाऊदशी व्यवहार झाला किंवा दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला म्हणून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. मलिक यांच्यावरील आरोप अजून ते सिद्ध झालेले नाहीत. एकीकडे भाजपचे नेते दहशतवाद्यांशी संबंध ठेवतात. इक्बाल मिर्चीसारख्या लोकांकडून पक्षासाठी देणग्या घेतात हे काय आहे? ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. नवाब मलिक हे भाजपला चुकीचे वाटत असतील तर भाजपनंही काही गोष्टींवर खुलासा करावा, असे खडसे यांनी म्हंटले.

कराडला दोन दिवस भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन : सुभाषकाका पाटील

कराड | लिबर्टी मजदूर मंडळाने 70 किलो खालील भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सातारा जिल्हा कबड्डी असो. व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यतेने दि. 5 व 6 मार्च 2022 रोजी कराडमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील यांनी दिली.

विजेत्या स्पर्धक संघांना अनुक्रमे बक्षीसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांक रु.51 हजार 1 व चषक (स्वर्गीय रामभाऊ रेपाळ यांचे स्मरणार्थ), व्दितीय क्रमांक रु. 31 हजार 1 व चषक (स्व. उस्मानभाई बागवान यांचे स्मरणार्थ), तृतीय क्रमांक : रु. 21 हजार 1 व चषक (स्व. ज्ञानदेव जाधव यांचे स्मरणार्थ), चतुर्थ क्रमांक :- रु. 11 हजार 1 व चषक (स्व. वसंतराव सोनवले यांचे स्मरणार्थ), वैयक्तिक बक्षीसे : उत्कृष्ट खेळाडू. रुपये 2500 व चषक (स्वर्गीय जयवंतराव जाधव यांचे स्मरणार्थ), उत्कृष्ट चढाईपटू- रुपये 2000 व चषक (स्वर्गीय धोंडीराम भोसले यांचे स्मरणार्थ), उत्कृष्ट पक्कड रुपये 2000 व चषक (स्व. मुनीर मोमीन यांचे स्मरणार्थ), उत्कृष्ट शिस्तबध्द व आदर्श संघ रुपये 3000 व चषक (स्व. भिमराव जाधव यांचे स्मरणार्थ), उत्तेजनार्थ: स्पर्धेत जे संघ उपउपांत्य फेरीत प्रवेश करतील त्यापैकी बक्षीसाचे मानकरी सोडून इतर चार संघाना प्रत्येकी 1500 रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती सुभाष पाटील यांनी दिली.

राज्यातील सहभागी होणाऱ्या कबड्डी संघानी भास्कर पाटील (7218675399), दादासाहेब पाटील (9923339207), राजेंद्र जाधव (942326394), सुरेश थोरात (8698460086) संपर्क साधावा. प्रवेश फी 1000 रुपये असुन ती स्पर्धेपूर्वी गुगल पे व्दारे भरावी लागणार आहे. संघाचा प्रवेश निश्चित करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण आंतरराष्ट्रीय व प्रो-कबड्डी खेळाडू गिरीश इरनाक हे उपस्थित राहणार आहेत.

औरंगाबाद मनपा निवडणूकीचा मार्ग मोकळा; राजकीय वर्तुळात आनंदाला उधाण 

 

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाला काही निर्देश देऊन सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयीची याचिका (एसएलपी) आज निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व्ही रामण्णा, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग खुला झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आरक्षण प्रक्रीयेत सर्वांचे म्हणणे ऐकून नियमानुसारच कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. औरंगाबाद महापािलकेतील प्रभाग रचनेविषयी समीर राजूरकर व इतर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. सुनावणी दरम्यान नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने याचिकेचा हेतू साध्य झाल्या असल्याने ते निकाली काढावी असा युक्तिवाद राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आला. नव्याने प्रभाग रचना होणार असल्याने याचिका निकाली काढण्यास याचिकाकर्त्यांनी सहमती दर्शविली. मात्र, पूर्वीच्या प्रभाग रचनेत गोपनीय माहिती मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांना पुरवण्यात आली होती व त्याआधारे बेकायदेशीर प्रभाग रचना करण्यात आली होती. सदर बाब राज्य निवडणूक आयोगाने खंडपीठासमोर शपथपत्राद्वारे मान्य केली होती.

औरंगाबाद मनपा आयुक्तांनी यासंदर्भात संबंधितांवर कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यामुळे यापुढे गोपनीयतेचा भंग होणार नाही असे निर्देश निवडणूक आयोगास द्यावे त्याचप्रमाणे प्रभाग रचना करताना कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी करून सविस्तर सुनावणीची संधी देण्यात यावी. त्यानंतरच प्रभाग रचना व आरक्षण अंतिम करावे असे निर्देश राज्य निवडणूक आयोगास देण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आली. सुनावणी अंती सर्वोच्च न्यायालयाने नव्याने प्रभाग रचना करण्यात येणार असल्याने याचिका निकाली काढली. मात्र यापुढे प्रभाग रचने संदर्भातील गोपनीय व संवेदनशील माहिती राजकीय पक्षांना पुरविण्यात येणार नाही याची खबरदारी राज्य निवडणूक आयुक्तांनी घ्यावी प्रमाणे नव्याने प्रभाग रचना करताना सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देऊन त्यांचे म्हणणे विचारात घेऊन नियमानुसारच कार्यवाही करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या; सरकारने आता काय पावले उचलावीत ?

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे क्रूडच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती ज्या प्रकारे वाढत आहेत, लवकरच त्याच्या किंमती $150 च्या पुढे जातील.

गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली आणि जेपी मॉर्गन या जागतिक कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किंमतींवर मोठे भाकीत केले आहेत. या एजन्सींचे म्हणणे आहे की क्रूडची किंमत लवकरच प्रति बॅरल $ 150 च्या पुढे जाऊ शकते. हा अंदाज थोडा जास्त वाटत असला तरी रशियावरील निर्बंधांमुळे अमेरिकेचा तेलसाठा 20 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. जर हा ट्रेंड अजून चालू राहिला तर काही वेळात $150 चा आकडा पूर्ण होईल.

गुरुवारी सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडच्या किंमती आदल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे 8 डॉलर प्रति बॅरलने वाढल्या होत्या. ब्रेंट क्रूडची फ्युचर्स किंमत सकाळी 7.31 वाजता प्रति बॅरल $118.13 वर पोहोचली होती. ऑगस्ट 2013 नंतरची ही सर्वोच्च किंमत आहे. याशिवाय, यूएस ऑइल डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत देखील प्रति बॅरल $ 113.01 वर पोहोचली आहे, जी 11 वर्षातील उच्चांक आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही 10 रुपयांनी वाढ होणार आहे
कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर लवकरच भारताच्या रिटेल मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 10 रुपयांनी वाढतील. मात्र, निवडणुकीच्या दबावाखाली सरकार आणि सरकारी तेल कंपन्या गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करू शकलेली नसून, आता हा दबाव सहन करणे कठीण होत असून, लवकरच मोठ्या वाढीच्या रूपात त्याचे निकाल येऊ शकतात.

सरकारकडे काय पर्याय आहेत ?
सर्व प्रथम, सरकारने तेल निर्यातदार देशांच्या संघटनेवर (ओपेक) आणि त्यांच्या सहयोगी देशांवर उत्पादन वाढवण्यासाठी दबाव आणला पाहिजे, जे अजूनही 4 लाख बॅरल प्रतिदिन वाढीवर अडकले आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढविण्यावर सरकारला वेगाने काम करावे लागेल, जेणेकरून त्याच्या किंमती काही प्रमाणात नियंत्रित करता येतील.

तेल कंपन्या आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा उत्पादन शुल्कात कपात करावी लागणार आहे. मात्र, उत्पादन शुल्क आठ रुपयांनीही कमी केले, तर पुढील आर्थिक वर्षात 1 लाख कोटींचा महसूल कमी होईल.

सरकार पेट्रोलमध्येही पामतेल भेसळ करते, ते आता 15-20 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्याचे प्रमाण आणखी वाढवले ​​तर इंधन स्वस्त होईल, मात्र त्यामुळे स्वयंपाकाचे तेल महाग होऊ शकते.

सरकारने आपल्या रिझर्व्ह स्टॉकचा काही भाग मार्केटमध्ये सोडावा. यामुळे किंमती तात्काळ कमी होण्यास मदत होईल.

रिलायन्स आणि सन्मिना भारतात जागतिक दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग हब स्थापन करणार

नवी दिल्ली । रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि सन्मिना कॉर्पोरेशन यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक्स हब स्थापन करण्यासाठी जॉईंट व्हेंचर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स सनमीनाच्या सध्याच्या भारतीय युनिटमध्ये 1670 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्सचा जॉईंट व्हेंचरमध्ये 50.1 टक्के हिस्सा असेल, तर व्यवस्थापन सनमिनाच्या सध्याच्या टीमकडेच राहील.

जॉईंट व्हेंचर 5G, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, हायपर स्केल डेटासेंटर्स यांसारख्या कम्युनिकेशन नेटवर्किंगला प्राधान्य देईल. हे हेल्थ सिस्टीम, औद्योगिक आणि संरक्षण आणि एरोस्पेस सारख्या उद्योगांसाठी हाय टेक्नोलॉजी हार्डवेअर देखील तयार करेल. ते JV Sanmina च्या सध्याच्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सर्व्हिस देणे सुरू ठेवेल. याशिवाय, एक अत्याधुनिक ‘मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स’ तयार केले जाईल, जे भारतातील प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि हार्डवेअर स्टार्टअप्सच्या इको-सिस्टमला प्रोत्साहन देईल.

व्यवसाय वाढवण्यासाठी Sanmina ची मदत मिळेल
JV युनिटमध्ये RSBVL कडे 50.1% इक्विटी स्टेक असेल तर उर्वरित 49.9% सनमीनाकडे असेल. RSBVL ही मालकी प्रामुख्याने सनमीनाच्या सध्याच्या भारतीय विभागातील नवीन शेअर्स मध्ये रु. 1,670 कोटी गुंतवणुकीद्वारे मिळेल. या गुंतवणुकीमुळे सन्मीनाला आपला व्यवसाय वाढण्यास मदत होईल. चेन्नईतील सन्मिनाच्या 100 एकर कॅम्पसमध्ये सुरुवातीला सर्व बांधकाम केले जाईल. भविष्यात त्यांचा विस्तारही होऊ शकतो.

ज्युरे सोला, अध्यक्ष आणि CEO, Sanmina, म्हणाले, “आम्ही भारतात इंटीग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तयार करण्यासाठी रिलायन्ससोबत भागीदारी करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. हे जेव्ही देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही बाजारांच्या गरजा पूर्ण करेल आणि भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” साठी मैलाचा दगड ठरेल.

भारतात इनोवेशन आणि प्रतिभा वाढवणे
रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी म्हणाले, “भारतातील हाय -टेक्नोलॉजी मॅन्युफॅक्चरिंगसाठी महत्त्वाच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी सन्मिनासोबत काम करताना आम्हाला आनंद होईल. भारताच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी स्वावलंबी होणे आवश्यक आहे. टेलिकॉम, IT, डेटा सेंटर, क्लाउड, 5G, न्यू एनर्जी आणि इतर उद्योगांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वावलंबी पणा आवश्यक आहे कारण आपण नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेत जात आहोत. या भागीदारीद्वारे, आपण भारतीय आणि जागतिक मागणीची पूर्तता करताना भारतातील नवकल्पना आणि प्रतिभा वाढविण्याची योजना आखत आहोत.

पगाराचे पैसे माझ्याकडे द्या म्हणत, पत्नीचा पतीवर चाकूहल्ला

murder

औरंगाबाद – पगाराचे पैसे माझ्याकडेच देत जा असे म्हणत बँकेतील पतीच्या पोटावर पत्नीने चाकूने वार केला. ही घटना सुधाकर नगर रस्त्यावरील नाथनगर आता उघडकीस आली आहे.

शेख निजामुद्दीन इस्माईल (28) हे बँकेत नोकरीला आहेत ते कुटुंबीयांसोबत राहतात. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पत्नीने आपण वेगळे राहू व तुम्ही पगाराचे पैसे माझ्याकडेच देत जा असे म्हणाली. त्याला शेख निजामुद्दीन यांनी विरोध दर्शवला. त्यावरून पत्नीने वाद घालत शिवीगाळ करून चाकूने भोसकले.

तसेच जीवाचे बरे वाईट करून घेईल व तुझे नाव घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आता मनरेगामुळे वाढली बेरोजगारी, जाणून घ्या किती महिन्यांचा विक्रम मोडला

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटानंतर, कच्च्या तेलाच्या किंमती आणि महागाईत विक्रमी वाढ झाल्यानंतर आता बेरोजगारीने जोरदार झटका दिला आहे. फेब्रुवारीमध्ये बेरोजगारीचा दर 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. वाढती महागाई आणि ग्रामीण भागात कामाचा अभाव यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE Report) च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, फेब्रुवारीमध्ये देशातील बेरोजगारीचा दर 8.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. बेरोजगारीचा हा सहा महिन्यांचा उच्चांक आहे. यापूर्वी, जानेवारी 2022 मध्ये बेरोजगारीचा दर 6.57 टक्के होता, जो 10 महिन्यांतील सर्वात कमी आहे.

ग्रामीण भागात बेरोजगारी वाढत आहे
वाढत्या बेरोजगारीच्या संदर्भात ग्रामीण भागात दिलासा मिळालेला नाही. गेल्या महिन्यात गावांमधील बेरोजगारी आठ महिन्यांच्या विक्रमी उच्चांकावर होती. फेब्रुवारी 2022 मध्ये गावांमधील बेरोजगारी 2.51 टक्क्यांनी वाढून 8.35 टक्क्यांवर पोहोचली. CMIE चे म्हणणे आहे की, खेड्यांमध्ये महागाई वाढण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये महागाईचा समावेश आहे.

शहरांमध्ये दिलासा
याउलट, शहरांमधील बेरोजगारीचा दर 8.16 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर घसरला, जो चार महिन्यांचा नीचांक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहरांमधील नोकऱ्यांच्या आघाडीवर चांगली परिस्थिती. याशिवाय, महामारीशी संबंधित निर्बंध शिथिल केल्याने आणि औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या सुधारणांमुळेही शहरांमधील बेरोजगारी कमी झाली आहे.

मनरेगाच्या बजेटमध्ये कपातीचा परिणाम
काही राज्यांच्या मनरेगाच्या बजेटमध्ये झालेली कपात आणि खेड्यांमध्ये बिगर कृषी क्षेत्रात नवीन रोजगाराची मर्यादित उपलब्धता यामुळे खेड्यापाड्यातील बेरोजगारीच्या दरात मोठी झेप झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फेब्रुवारीमध्ये तो आठ महिन्यांचा उच्चांक गाठला. ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारला तातडीने सक्रिय भूमिका बजावून हस्तक्षेप करावा लागेल.