Monday, December 29, 2025
Home Blog Page 2935

दिल्लीप्रमाणे गोव्यातही मोफत वीज देणार – अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध राजकीय पक्षातील नेत्याकडून दौरे केले जात आहेत. यावेळी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली जाणार आहे. दरम्यान आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात जाऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गोव्यासाठी व्हिजन मांडल. “आमचे सरकार गोव्यात आल्यास दिल्लीप्रमाणे गोव्यातही आरोग्य, शिक्षण व्यवस्था बदलून वीजही मोफत देणार असे आहोत,”आश्वासन केजरीवाल यांनी दिले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज गोव्यात जात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही दिल्लीत सरकार स्थापन केले आहार. या ठिकाणी तेथील जनतेला आरोग्य, शिक्षण व्यवस्था बदलून वीजही मोफत दिली आहे. आम्ही गोव्याच्या बाबतीत एक व्हिजन घेऊन आलो आहे. या ठिकाणी सरकार आल्यास बेरोजगारांना महिना 3 हजार दिले जाणार आहेत. तसेच सरकार झाल्यावर 6 महिन्यात मायनिंग सुरु केली जाईल. सहा महिन्याच्या आत जमीन हक्क मिळतील. तसेच दिल्लीप्रमाणे गोव्यामध्ये शाळा, शिक्षण व्यवस्था बदलणार आहोत.

गोव्यात दिल्लीत ज्या प्रकारे सरकारच्यावतीने सुविधा दिल्या आहेत. त्याप्रकारे सुविधा दिल्या जातील. विशेष करून आम्ही गोव्यात मोफत स्वरूपाची वीज देऊ. तसेच या ठिकाणाला एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेऊ. या ठिकाणी यावेळच्या निवडणुकीत जर आपचे सरकार आल्यास पुढील पाच वर्षात एका कुटुंबला 10 लाख रुपयांचा फायदा होईल. त्यामुळे येथील लोकांनी आता कशा प्रकारे फायदा घ्यायचा हे ठरवावे, असे केजरीवाल यांनी म्हंटले आहे.

गोव्याच्या राजकारणाची सूत्रे भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रासह गोव्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणाही साधला. “आमची लढाई हि प्रस्थापितांविरूद्ध आहे. गोव्यातील राजकारणाची सूत्रे ही भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात आहेत, असे विधान राऊत यांनी यावेळी केले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यात निवडणूक लढविण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तर आघाडी आहे, काँग्रेसही आमच्यासोबत आहे. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी उमेदवाऱ्या देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केले. गोव्यात हे होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करु.

गोव्याच्या राजकारणाबद्दल सांगायचे झाले तर मोजक्याच दहा-बारा लोकांकडून गोव्याचे राजकारण केले जात आहे. आणि हि लोक कधी या पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामध्ये भूमाफिया, ड्रग्ज माफिया यांचाही समावेश आहे. भाजपात अशा क्षेत्रातील लोक गेलेले आहेत कि ज्यांचा संबंध ड्रग्ज माफियांशी आहे. आणि या लोकांचे नाते भ्रष्टाचाराशी आहे. आम्ही या प्रस्थापित, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया याच्या विरोधात उमेदवार उतरवणार आहोत, असे राऊत यांनी म्हंटले.

मध्यरात्री थरार ! जुन्या वादातून 9 जणांकडून युवकाची हत्या

औरंगाबाद – शहरातील मिसरवाडीत भागात जुन्या वादातून एका युवकाचा खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. हसन साजीद पटेल (वय 25, रा. मिसारवाडी) असे मृताचे नाव आहे. यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसारवाडीत मध्यरात्री हसन पटेल याचा जुन्या वादातून 9 जणांनी खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी मृतांचा भाऊ जावेद पटेल यांच्या तक्रारीवरून नऊ जनाच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तालेब सुलतान चाऊस, सुलतान चाऊस, नासेर सुलतान चाऊस, अली सुलतान चाऊस, नासिर अब्दुल पटेल, राहील अन्सारी, मुसा शेख, रियाज उर्फ डॉन, आखेफ उर्फ गोल्डन युनूस कुरेशी यांचा समावेश आहे. मृत हसन हा प्लॉट खरेदी – विक्रीचा व्यवसाय करीत होता. संध्याकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. रात्री 11 वाजता त्याच्यावर मिसारवाडीतील एक टपरीजवळ नऊ जणांनी हल्ला चढवला. यातील मुख्य आरोपी तालेब चाऊस याने हसनच्या पोटात चाकू खुपसला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

घटनास्थळाला पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, उज्वला वनकर, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, ड्युटी ऑफिसर उपनिरीक्षक कृष्णा घायाळ आदींनी भेट दिली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विनोद सलगरकर करीत आहेत.

पुण्यातील 20 वर्षीय तरुणीला निर्जनस्थळी नेऊन शेजाऱ्याने दिल्या ‘या’ नरक यातना

rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील लोणी काळभोर या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 30 वर्षीय तरुणाने घराजवळ राहणाऱ्या एका तरुणीला हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बहाणा करून तिच्यावर अत्याचार केला. हे दोघेजण जेवण करून परत येत असताना आरोपीने एका निर्जनस्थळी कार थांबवून पीडित तरुणीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले आहेत. यानंतर पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. चंदननगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
आरोपी तरुण आणि पीडित महिला हे दोघेही लोणी काळभारे परिसरातील रहिवासी आहेत. हे दोघेही एकमेकांच्या घराशेजारी राहतात. घटनेच्या दिवशी आरोपी तरुणाने पीडित तरुणीला जेवणासाठी बाहेर जाऊ असे सांगितले. तसेच मला तुझ्याबरोबर काही वेळ घालवायचा आहे असेदेखील सांगितले. हा आरोपी तरुण पीडित महिलेच्या चांगला ओळखीचा असल्याने हि पीडित तरुणी त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली.

यानंतर हे दोघेजण घटनेच्या दिवशी रात्री आठच्या सुमारास खराडी येथील ‘पाजी दा ढाबा’ या हॉटेलात जेवण करण्यासाठी गेले. यानंतर जेवण केल्यानंतर दोघंही कारने परत खराडीवरून लोणी काळभोरकडे येण्यासाठी निघाले. घरी परतत असताना आरोपीने खराडी ते लोणी काळभोर रस्त्यावरील एका निर्जनस्थळी गाडी थांबवली. यानंतर त्याने पीडितेसोबत जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करून पुढील तपासाला सुरवात केली आहे.

दागिन्यांसाठी 3 वृद्ध महिलांचा वाईट प्रकारे खून; गावातच डांबून ठेवत दिल्या यातना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैशासाठी काही व्यक्ती कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. काहीजण पैशासाठी कोणाचाही जीव घेण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली याठिकाणी घडली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरात तीन वृद्ध महिलांना डांबून ठेवत चक्क दागिन्यांसाठी आरोपीने त्यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे सत्यवती पाटणे (57), पार्वती पाटणे (90) आणि रुक्मिणी पाटणे (80) अशी हत्या झालेल्या वयोवृद्ध महिलांची नावे आहेत. अज्ञात चोरट्यांनी या तिन्ही वृद्ध महिलांची हत्या करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपयांचे दागिने चोरून नेले असल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली पालगड रस्त्यावर असणाऱ्या वणोशी खोतवाडी या गावात केवळ 25 घरे आहेत. यातील अनेकजण कामा निमित्त मुंबईत स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे गावात सध्या केवळ चार ते पाच कुटुंबेच वास्तव्याला आहेत. दरम्यान, संक्रातीचा सण असल्यामुळे सत्यवती पाटणे (57), पार्वती पाटणे (90) आणि रुक्मिणी पाटणे (80) या तिन्ही वृद्ध महिला बाहेर गेल्या.

संक्रात असल्यामुळे या दिवशी सकाळी तिन्ही वृद्ध महिला घराबाहेर आल्या नाहीत. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या इंदूबाई पाटणे यांनी आपल्या कुटुंबीयांसह संबंधित घराची पाहणी केली. यावेळी एका महिलेचा मृतदेह हा घराच्या हॉलमध्ये तर दुसरा मृतदेह हा बेडरुममध्ये आणि तिसरा मृतदेह हा किचनमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती इंदूबाई पाटणे यांनी तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तपासाअंती घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात आरोपींनी बंद असलेल्या घरात तीन वृद्ध महिलांचे अपहरण केले. तसेच त्यांना 4 दिवस ठेवले. आणि त्यांची हत्या करून मृतदेह जाळून टाकले. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

नाच करे बंदर, माल खाये मदारी….; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कळवा-खारेगाव उड्डाणपुलाचा काल लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रेयवादाचे नाट्य पार पडले. यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा “नाच करे बंदर, माल खाये मदारी….”, असे ट्विट केले असून त्यांनी शिवसेनेसह मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

काल कळवा-खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील श्रेयवाद दिसून आला. यावरून आता राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी “नाच करे बंदर ……, माल खाये मदारी….,” असे म्हणत शिवसेना आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेतेही काल उड्डाणपुलाच्या कायर्कर्मास उपस्थित होते. या कार्यक्रमातही भाषणादरम्यान नेत्यांनी एकमेकांविरोधात टोलेबाजी केली. त्यानंतर रात्री मंत्री आव्हाड यांनी ट्विट केरल्यानंतर वाटेवर अधिकच तापले आहे.

धक्कादायक ! अवघ्या दहा मिनिटांत लॅबच्या रिपोर्टमध्ये केला बदल

Corona

औरंगाबाद – कोरोना व अन्य आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येत रक्त, लघवी व अन्य तपासणीच्या नावाखाली पॅथॉलॉजी लॅबनी लातूर जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कुठे पॅथॉलॉजिस्ट कोऱ्या लेटरपॅडवर स्वाक्षरी करून निघून जातात तर कुठे त्यांची स्वाक्षरी रिपोर्ट तयार करणाराच करतो. संगणकीय प्रयोगशाळेत तर पॅथॉलॉजिस्टची स्वाक्षरी स्कॅन करूनच ठेवली जाते. या गोंधळात एका महिला रुग्णाचा दिलेला अहवाल लॅबने दहा मिनिटांत बदलून दिला आणि रुग्णाकडून घेतलेले शुल्कही गुपचूप परत करून टाकले.

लातूर शहरातील एका लॅबमध्ये शनिवारी घडलेल्या या प्रकाराची वैद्यकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शहरातील एका कॉप्युटाराईज्ड पॅथॉलॉजिकल लॅब्रोटरीमध्ये शनिवारी एकाने त्याच्या आईची लुपीड प्रोफाइलची स्वतःहून तपासणी केली. काही वेळानंतर लॅबमधून अहवाल (रिपोर्ट) देण्यात आला. त्यात व्हेरी लो डेन्सीटी लिपीडचे (व्हीएलडीएल) प्रमाण 119 टक्के मिलीग्रॅम दाखवण्यात आले होते. सर्वसाधारण हे प्रमाण 34 टक्के मिलिग्रॅम असायला हवे. एवढे प्रमाण पाहून संबंधित व्यक्तीला धक्का बसला. या प्रमाणात रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. रिपोर्टवरून संबंधित पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरने तातडीने रुग्णाला सल्ला देणे बंधनकारक आहे. व्यक्तीला याची माहिती असल्याने त्याने रिपोर्टबाबत लॅबमधील कर्मचाऱ्याला जाब विचारला. त्याने पुन्हा तपासून पाहण्याचे सांगून दहा मिनिटांत परत येण्याची सूचना व्यक्तीला केली. दहा मिनिटांनंतर व्हीएलडीएलचे 23.8 टक्के मिलिग्रॅम करून नवीन अहवाल दिला. काही तपासण्या मशीनद्वारे करून उर्वरित माहिती गणितीय आकडेमोड करून देण्यात असल्याचे सांगत कर्मचारी दुरुस्त अहवालाचे समर्थन करू लागला. यानंतर संतप्त व्यक्तीने डॉक्टरांची भेट घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केली व शुल्क परत देण्याची मागणी केली. त्यानंतर डॉक्टरने तातडीने शुल्क परत दिले.

कोणाचेही नियंत्रण नाही –
यानिमित्त पॅथॉलॉजी लॅबचा राम भरोसे कारभार पुढे आला असून, रुग्णांना या लॅबच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लॅबवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचेही समोर आले. लॅबवाल्यांचे डॉक्टरांसोबत असलेले लागेबांधे लपून राहिलेले नाहीत. काही डॉक्टरांच्या स्वतःच्याच लॅब असून, त्यातून रक्त व अन्य तपासणीसाठी हजारो रुपये उकळले जात आहेत. तपासणीचे दर निश्चित नसल्याने मनमानी पद्धतीने आकारणी केली जाते. कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या रक्त तपासणीसाठीही पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील पंजाबसह इतरत्र ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पंजाबमध्ये दि. 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, याला पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी विरोध दर्शवला आहे. हि निवडणूक आयोगाने किमान सहा दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी आयोगाला पत्र पाठवून केली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार, राज्यातील सर्व 117 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, 16 फेब्रुवारी 2022 रोजी श्री गुरु रविदास यांची जयंती आहे. या दिवशी मोठ्या संख्येने लोक उत्तर प्रदेशातील वाराणसीला जातात. अशा स्थितीत 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येने लोक मतदानापासून वंचित राहू शकतात.

संत रविदास जयंतीनिमित्त 10 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सुमारे 20 लाख भाविक वाराणसीला जाणार आहेत. दरम्यान निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यास संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात आपल्यालाही सहभागी होता येईल आणि मतदानाचा हक्क देखील बजावता येईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक किमान सहा दिवस पुढे ढकलावी.

पंजाबचे मुख्यमंत्री आणि यांनी निवडणूक पुढे ढकलण्याबाबतची मागणी हि 13 जानेवारी रोजी निवडणूक आयोगाला तर पाठवून केली आहे. काँग्रेसनेही आगामी निवडणुकीसाठी शनिवारी 86 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सीएम चरणजीत सिंग चन्नी यांना चमकौर साहिबमधून उमेदवारी दिली आहे, तर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

औरंगाबाद मेट्रो- वाळूज ते शेंद्रा मेट्रो मार्गातून छावणीला वगळणार !

Mumbai Metro

औरंगाबाद – वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसीला जोडणाऱ्या मेट्रो रेल्वेचा डीपीआर तयार करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने महामेट्रोला (महाराष्ट्र रेल्वे कार्पोरेशन लि.) शुक्रवारी कार्यारंभ आदेश दिले आहेत. या मार्गात छावणी परिषदेचा मोठा भाग असून, संरक्षण खात्याकडून त्यासाठी परवानगी घेणे जिकिरीचे आहे. त्यामुळे छावणी परिषदेचा भाग वगळून अन्य मार्गाने मेट्रो रेल्वे नेता येईल का? यावर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक स्वरूपात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

झपाट्याने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहरासाठी आता मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे सीईओ तथा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी महामेट्रोला मेट्रोचा डीपीआर तयार कण्यासंदर्भात कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या आठ-नऊ महिन्यात वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी अशी मेट्रो रेल्वे व एकच उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात डीपीआर तयार होण्याची शक्यता आहे.

त्यापूर्वी चार महिन्यात शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (सीएमपी) तयार केला जाणार आहे. दरम्यान, मेट्रोचा मार्ग निश्‍चित करताना छावणी भागाला अन्य पर्याय काय? यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. छावणी परिषदेतून मेट्रो व उड्डाणपूल करायचा झाल्यास त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ना-हरकत घ्यावी लागणार आहे. हे काम मोठे जिकिरीचे आहे. गोलवाडी चौकापासून छावणीची हद्द सुरू होते तर महावीर चौकात ती संपते. केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडून परवानगी मिळाली नाही म्हणून या रस्त्याचे रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांत होऊ शकले नाही. हा अनुभव पाहता छावणी भाग मेट्रोतून वगळल्यास अन्य पर्यायी रस्त्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

2019 ला भाजपच्या गद्दारीमुळेच पराभव झाला ; शिवसेना नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक लागण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे. भाजपची गद्दारी हे माझ्या पराभवाचे प्रमुख कारण आहे, अशी टीका क्षीरसागर यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर केली.

शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमदार चंद्रकांत जाधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील होते. ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी भाजपला जागा मिळाली नाही म्हणून ते काँग्रेस पक्षात गेले. तशी कबुलीही काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात दिली आहे.

मागच्यावेळी मी निवडणूक लढवली. त्यावेळी भाजपने माझ्याशी गद्दारी केली. माझ्या पराभवाचे मुख्य कारण कोणते असेल तर ते भाजपची गद्दारी हे आहे. निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांनीही माझ्या बद्दल गैरसमज पसरवले होते. मी निवडून आलो असतो तर मंत्रिमंडळात गेलो असतो. मात्र, भाजपकडून शत प्रतिशत सुरू झाल्या पासून ते मित्रांना विसरले. दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकला नाही, असं म्हटलंय. मग, जिल्हा बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजपला सोबत घ्यावस का वाटलं? शिवसेनेवर अन्याय होतोय ही भावना शिवसैनिकांमध्ये आहे, असेही क्षीरसागर यांनी यावेळी म्हंटले.