Monday, December 29, 2025
Home Blog Page 2934

छत्रपतींचा पुतळा बसविण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही; नवनीत राणांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा बसवलेला पुतळा अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने हटवला. दरम्यान, यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. “उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत आहे. आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ अशी टीका रवी राणा यांनी केली तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे नवनीत राणा यांनी म्हंटले.

खासदार रवी राणा यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत आहे. आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे. एखाद्या अतिरेक्यांप्रमाणे आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे.

नेमके काय घडले प्रकरण?
अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी विना परवानगी राजापेठ येथील उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. अमरावती मनपा आणि पोलीस प्रशासनाने आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा पुतळा उड्डाणपुलावर काढला. त्यानंतर आज अमरावती येथे राणा दांपत्याकडून ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवण्यात आला.

ग्रामपंचायतीच्या “त्या” पत्रानंतर ”मुलगी झाली हो” मालिकेचे शूटींग सुरूच

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

अभिनेता किरण माने यांना मूलगी झाली हाे मालिकेतून काढल्यानंतर वाई तालुक्यातील गुळुंब या गावात सुरू असलेले शूटिंग बंद करा अशा आशयाचे सरपंचाच्या सहीचे पत्र व्हायरल झाले. दरम्यान सध्या गावामध्ये शूटिंग सुरू आहे. या बद्दल सरपंच स्वाती माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अभिनेते किरण माने यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून नुकतंच काढण्यात आले आहे. माने यांनी समाज माध्यमातून राजकीय पाेस्ट केल्याने त्यांना काढल्याची चर्चा आहे. दरम्यान माने यांच्या कारवाई झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेसह राजकीय मंडळी ठामपणे उभी राहिली आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच अभिनेते माने यांनी तक्रार दिल्यास राज्य शासन याेग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान मूलगी झाली हाे या मालिकेचे शुटींग तातडीने बंद करा असे पत्र वाई तालुक्यातील गुळुंबचे सरपंच स्वामी माने यांच्या सहीचे समाज माध्यमातून व्हायरल झालं आहे. मात्र, तरीही आज गुळूंब येथे मालिकेचे शूटींग सुरू असल्याचे दिसून आले.

या गावात सुरू असलेले शूटिंग बंद करा असा आशय पत्रात नमूद आहे. दरम्यान गावामध्ये सध्या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. याबद्दल सरपंच स्वाती माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

स्कार्पिओ जीप झाडाला धडकून मोठा अपघात; 3 जण जागीच ठार

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये एक स्कार्पिओ जीप झाडाला धडकून मोठा अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये किशोर आण्णाराव भोसले, नितीन भगवान भांगे, आणि व्यंकटेश राम म्हेत्रे यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर राकेश हुच्चे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात घडला तेव्हा हे चौघेजण स्कार्पिओ गाडीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गेले होते.

या दुर्घटनेतील मृत नितीन भांगे हा मंडप कंत्राटदार होता. यामुळे मृत नितीन औराद येथे विद्युत रोषणाईच्या कामासाठी आपल्या सहका-यांना सोबत घेऊन गेला होता. त्या ठिकाणाहून परतत असताना विजापूर-सोलापूर महामार्गावर तेरा मैलजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर त्यांची स्कार्पिओ जीप आदळली आणि हा भीषण अपघात घडला. मंद्रूप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हजारीपार : सातारा जिल्ह्यात 1 हजार 117 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 117 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधिताचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 22 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 79 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 117 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 22 टक्के आला आहे. शनिवारी जिल्ह्यात 20 जणांना विविध रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 3 हजार 676 जण उपचार्थ आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण….

गेल्या वर्षी आजच्या दिवशी कोरोना लस देण्यास सुरवात करण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण झालंय. 16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. 138 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात 157 कोटी डोस देण्यात आलेत. आता कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचे पाहायला मिळतंय. येत्या काळात बूस्टर डोसचं आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आज विशेष टपाल तिकीट जारी करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात पहिला डोस 93% पूर्ण तर दूसरा डोस 67% पूर्ण झाला आहे.15 ते 18 वयोगटासाठीचे लसीकरणाचा पहिला डोस ही मोठ्या प्रमाणात दिला गेला आहे.

खळबळजनक : आजीचा मृतदेह सापडला पण सात वर्षाचा नातू बेपत्ता तर घरात एकाचा मृत्यू

सातारा | खंडाळा तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील विचित्र घटना घडली असून यामध्ये एक सात वर्षांचा मुलगा आपल्या 65 वर्षांच्या आजीसोबत दोन दिवसापूर्वी घरातून निघून गेला आहे. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र बेपत्ता आजीचा मृतदेह नीरा उजव्या कालव्यात आढळून आला आहे, तर दुसरीकडे त्याची आजारी आईही राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरे बुद्रुक येथे कांताबाई बापू कराडे (वय- 65) या आपली मुलगी पद्मा बापुराव कराडे (वय- 32) व तिचा मुलगा सत्यजित ऊर्फ बंटी दादासो गलांडे (वय- 7) हे एकत्र राहतात. त्यांची मुलगी पद्मा गेल्या दोन वर्षांपासून आजारी होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आजी कांताबाई व नातू सत्यजित हे गावातून बेपत्ता झाले होते. दि. 14 रोजी दुपारी 4 च्या सुमारास कांताबाई यांचा रावडी बुद्रुक (ता. फलटण) गावाच्या हद्दीत नीरा उजव्या कालव्यात मृतदेह आढळून आला. नातू सत्यजित ऊर्फ बंटी अद्यापही बेपत्ता आहे. लोणंद पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, घरी आजारी अवस्थेत असलेली सत्यजितची आई व मृत कांताबाई यांची मुलगी पद्मा याही शनिवारी राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार नसून आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कांताबाई यांचे दीप हणमंत चांगदेव कराडे ( रा.पिंपरे बुद्रुक) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सपोनि विशाल वायकर व पोलिस कर्मचारी या घटनेचा तपास करत आहेत.

महिला कलाकाराचा गाैप्यस्फोट : वाटेल ते बोलणे, टाॅन्ट करण्याच्या वागणुकीमुळे किरण मानेंना मालिकेतून काढले

Kiran Mane

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

किरण माने यांची सेटवरील वर्तणूक चांगली नव्हती. तसेच महिला कलाकारांना वाटेल ते बोलणे, टाॅन्ट करणे अशा वागणुकीमुळे त्यांना काढून टाकण्यात आले आहे. तेव्हा सेटवरच्या महिला कलाकारांना अशी का वागणूक द्यावी, असा आरोप महिला कलाकारांनी किरण माने यांच्यावर केला आहे.

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून किरण माने यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले. मात्र त्यांनी त्याचा त्यांनी राजकीय स्टंट म्हणून उपयोग करत पोस्ट व्हायरल केल्या आहेत. राजकीय पोस्ट करून दबाव निर्माण करण्याचा किरण माने प्रयत्न करत आहेत. मात्र साताऱ्यातील वाई तालुक्यात गूळुंब या गावात शूटिंग सुरळीत चालू असून शूटिंग बंद करण्यात आल्याच्या निव्वळ अफवा असल्याचे कलाकार सांगत आहेत. किरण माने यांनी ग्रामपंचायतीचे लेटर घेऊन चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलं असल्याचे लाईन प्रोड्युसर सचिन ससाणे यांनी सांगितलं आहे.

सविता मालपेकर म्हणाल्या,  राजकीय पोस्टमुळे किरण माने यांना काढण्यात आले नाही तर त्यांच्या वागणुकीमुळे काढण्यात आले आहे. त्याला तडफडाकी काढण्यात आले नाही, त्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी शेवटची मिटींग घेवून त्याला फायनली सांगण्यात आले होते की सेटवरून तुझ्याबाबत तक्रार आली तर मालिकेतून काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते. चॅनेलने त्याला काढले नाही, आमचा प्रोड्योक्शनशी आमचा करार झालेला असतो.

श्रावणी पिल्लई म्हणाल्या, आम्ही कामापुरत केवळ बोलतो. आमचा कलाकारांचे नाव घेतले नाही कारण आम्ही तोंड उघडले तर खरे काय ते बाहेर येईल, त्यामुळे कलाकारांवर आरोप केले नसतील. राजकीय पोस्टमुळे चॅनेलने कधीच आक्षेप घेतला नाही.

 

राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” अशी केलीय; पडळकरांची वडेट्टीवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. दरम्यान, आज पडळकरांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “केवळ वाहवा मिळवण्यासाठी वडेट्टीवार व उपमुख्यमंत्री पवार यांनी ४५० कोटींची घोषणा केली आहे. वडेट्टीवारांनी तर टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे,” अशी टीका पडळकरांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, “ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली आहे. मात्र, यासाठी त्यांनी फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेशही आयोगाला मिळाले नाहीत. ना ऑफिस ना पुर्णवेळ सचिव, आयोगाचे संशोधक सोलापूरात तर आयोग पुण्यात आहे. तर दुसरीकडे मंत्री वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे.

यावेळी पडळकर पुढे म्हणाले की, “काही मंत्री नुसते ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवत आहेत. आणि त्यांच्याकडून प्रस्थापितांसाठी पोपटपंछी केली जात आहे. उद्या १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. या सुनावणी करिता ठाकरे सरकारने आयोगाला अंतिम अहवाल मागितला होता.

मात्र, इथे आयोगाचेच काम सुरू नाही झाले तर आयोग अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच वडेट्टीवारांनी दिशाभूल करण्यासाठी घाई गडबडीने तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार, असे जाहीर केले. त्यामुळे या जनतेने आता ओबीसी मंत्र्यांना ते ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी त्यांना गाठावे आणि त्यांना जाब विचारा, असे पडळकर यांनी म्हंटले.

फक्त 21 दिवसांत पैसे डबल करुन देतो; बार्शीत 200 कोटींच्या घोटाळ्याने खळबळ

vishal fate

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – बार्शीच्या स्कॅममुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शीतल्या प्रत्येक चौकात, चहाच्या टपऱ्यांवर, दुकांनामध्ये केवळ एकच विषय सुरु आहे कोणाचे किती बुडाले.आरोपी विशाल फटे हा गुंतवणुकदारांनी कोणत्याही मार्गाने पैसे दिले तरी स्विकारायचा. त्यामुळे ज्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी काळे धन जमा केले आहे. ते दुप्पट करण्याच्या आमिषाने विशालकडे दिले होते. आरोपी विशाल फटे याने बार्शीत बरेच मित्र जमवले होते. अगदी सख्या भावाप्रमाणे विशालचे मित्र त्याला वागणूक देत होते. विशालने याच विश्वासाचा फायदा घेत अनेक मित्रांचे अकाऊंट वापरले. गुंतवणुकदारांना मित्राच्या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगायचे. मित्रांकडून चेक घेऊन ते पैसे काढून घ्यायचे असे उद्योग तो करत होता. फरार होण्याआधी देखील त्याने अशाच पद्धतीने एका मित्राच्या अकाऊंटवर जवळपास 35 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. नंतर चेकद्वारे त्याने ते काढून देखील घेतले. अशी माहिती या प्रकरणातील फिर्य़ादी दीपक आंबरे यांनी दिली आहे.

कशा प्रकारे करायचा स्कॅम?
आरोपी विशाल हा गुंतवणुकदारांना स्वत: तयार केलेल्या एका वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला सांगायचा. जेव्हा लोक त्याला डिमॅट अकाऊंटबद्दल विचारायचे तेव्हा तुम्ही त्याची चिंता करु नका आम्ही ते लिंक करुन घेऊ असे तो सांगायचा. गुंतवणुकदारांकडून पैसे घेतल्यानंतर दर महिन्याला त्यांना कितीचा फायदा झालाय हे तो मेसेज करुन सागांयचा मात्र वास्तव्यात अकाऊंटमध्ये कोणतेही पैसे नसायचे. जेव्हा कोणी पैसे काढण्यासाठी सांगायचे तेव्हा तो त्यांना आणखी आमिष दाखवयाचा. तसेच पैसे काढल्यास नुकसान होईल अशी भिती दाखवयाचा. त्यामुळे लोक पैसे काढण्याऐवजी त्यामध्ये अधिक गुंतवणूक करायचे.

लोकांना कशाप्रकारे करायचा आकर्षित ?
आरोपी विशाल हा दरवेळी गुंतवणुकदारांना वेगवेगळी स्किम सांगून तो प्रलोभन देत होता. डिसेंबर महिन्यात अशाच पद्धतीची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. ‘एक जानेवारी 2022 पासून एक नवीन स्कीम सुरु होत आहे. ज्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्कीम केवळ नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे. या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर 1 वर्ष कोणताही परतावा घेतला नाही तर तुम्हाला 2023 साली 6 हजार टक्के परतावा मिळेल. म्हणजेच 10 लाखांचे वर्षात 6 कोटी रुपये होतील’ अशी ऑफर त्याने दिली होती.

बड्या लोकांना हुसकावून लावायचा
विशालच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक जण पैसे घेऊन ऑफिसच्या चकरा मारत होते. ऑफिसमध्ये लोकांची गर्दीच गर्दी होती. या गर्दीत अनेक मोठे लोक देखील येत होते. मात्र तुम्हाला पैशाची काय कमी आहे. ही ऑफर सामान्यांसाठी आहे असे म्हणून तो त्यांना परत पाठवायचा. यामुळे लोकांना विशाल जणू देव आहे असेच वाटू लागले. त्यामुळे त्याच्यावर अनेक जणांनी 10 लाख रुपयांप्रमााणे कोट्यावधी रुपये विशालकडे जमा केले. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आपल्या जमीनी विकल्या, फ्लॅटवर लोन काढले. कित्येकांनी सोने गहाण ठेवले. तर काही जणांनी तर खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन विशालकडे गुंतवणूक केली.

शिक्षणासाठी काही वर्षे पुण्यात वास्तव्य
विशालच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काही वर्ष शिक्षणासाठी पुण्यात होता. तिथून तो बार्शीत परतला. त्याच्याकडे कोणती डिग्री होती की नाही याची कोणाला माहिती नाही. मात्र तो उत्तम इंग्रजी बोलत होता. अनेकांना केवळ आपल्या बोलण्याने त्याने भुरळ घातली होती. उच्च पदस्थ अधिकारी, राजकारण्यांसोबतचे फोटो तो लोकांना दाखवयाचा.यामुळे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून केवळ बार्शीच नाही तर महाराष्ट्रातील अन्य भागांमधून देखील लोकांनी पैसे गुंतवले.

अनेक तरुणांना करत होता टार्गेट
बार्शीतल्या या स्कॅममध्ये सावज ठरलेले अनेक गुतंवणूकदार हे तरुण आहे. 25 ते 35 वर्षातील तरुणांचा आकडा हा मोठा आहे. या तरुणांचे केवळ आर्थिक नाही तर मानसिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे.

स्टेडियम उभारुन चालणार नाही, दराराही निर्माण झाला पाहिजे – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तब्बेतीच्या कारणामुळे व्हिडीओ कॉन्फरसद्वारे कार्यक्रम, बैठकींना हजेरी लावली जात आहे. आज नवी मुंबई येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. यावेळी”नुसती मैदान बनवून, स्टेडियम उभारुन चालणार नाही, भारताचा संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊन तिथे भारताचा दरारा निर्माण व्हावा,” अशी इच्छा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

नवी मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, फुटबॉल हा केवळ पायाने खेळायचा खेळ नव्हे, यात देखील बुद्धीचा खूप वापर करावा लागतो. जितका बुद्धीबळ खेळताना करावा लागतो तितकाच या खेळातही देखील करावा लागतो. वास्तविक मलाही फुटबॉलचे फार ज्ञान नाही, मात्र आदित्यला फुटबॉल खेळायला आवडते.

आज उदघाटन करण्यात आलेल्या या मैदानावर लवकरच महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा पार पडणार आहे. या मैदानावर अनेक फुटबॉलपटू घडतील यात शंका नाही. मात्र, नुसती मैदान बनवून, स्टेडियम उभारुन चालणार नाही. तर त्यासाठी भारताचा संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी भारताचा दरारा निर्माण होणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हंटले.

बार्शीच्या ‘त्या’ तरुणाला बनायचं होतं पाब्लो एस्कोबार; 200 कोटींची फसवणूक करुन दुबईला पळाला..

Vishal Fate

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – आपण अनेकदा पैसे डबल करून देतो, पाच वर्षांत पैसे डबल अशा स्कीम आपण पहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. त्यामुळे आपण लगेच त्यामध्ये थोड्या जास्त पैशांच्या हव्यासापायी आपण ह्यामध्ये आपल्या आयुष्यभराची कमाई गुंतवतो. यानंतर काही दिवसांनी आपल्यासोबत धोका झाल्याचे समजते आणि आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. अशीच काहीशी घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यात घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बार्शीमध्ये एका व्यक्तीने तीन महिन्यात दुप्पट पैसे करुन देण्याचे आमिष दाखवून बार्शीतील लोकांकडून 200 कोटी रुपये जमा केले आणि अचानक तो हे सगळे पैसे घेऊन गायब झाला. त्यामुळे, पैसे मिळण्याच्या आशेनं गुंतवणूक केलेल्या लोकांमध्ये आता आपले पैसे मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बार्शीसह संपूर्ण तालुक्यात या शेअर मार्केट गुंतवणूकदारांचीच चर्चा रंगली आहे. या व्यक्तीने महिन्याला फिक्स पाच ते दहा टक्के रिटर्न देतो अशी स्कीम गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सांगितली. तसेच त्याने आपण आयपीओच्या ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करतो असेदेखील सांगितले. यामधून तो दर महिन्याला दोन आयपीओ होतात, असे सांगत एक आयपीओला साधारणपणे 15 ते 20 टक्के रिटर्न आले असे सांगत मुद्दल, व्याज कंपौंडिंग करीत पुढील आयपीओला लावून महिन्यात 30 ते 35 टक्के रिटर्न मिळवून देतो असे म्हणून तो गुंतवणूकदारांना आकर्षित करत होता.

या व्यक्तीच्या स्वतःच्या तीन कंपन्या होत्या. त्याची विविध बँकांत खाती होती. तो लोकांकडून अकाउंट आणि कॅश रक्कम घेत होता. त्याच्याकडे लोकांनी कमीत कमी पाच लाख ते कोट्यवधी रुपयांची त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. या व्यक्तीकडे अनेक लोकांनी घर, जमीन गहाण ठेवून, सोने बँकेत ठेवून त्याच्याकडे गुंतवणूक केली होती. या व्यक्तीकडे बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरासोबत पुणे, सांगली या भागातील अनेक लोकांच्या गुंतवणुका त्याच्याकडे होत्या.

पैसे घेऊन आरोपी फरार
या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव विशाल फटे असे आहे. रविवारी हा व्यक्ती लोकांचे पैसे घेऊन आपल्या पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीला घेऊन कुटुंबासमवेत फरार झाला आहे. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद लागत आहे. त्यामुळे त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिली आहे .

किती जणांनी केली गुंतवणूक
आलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून बार्शी शहरातील लोकांनां आकर्षक परताव्याचे अमिश दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आतापर्यंत 6 लोकांनी जवळपास 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, रामदास गणपती फटे, वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे सर्वजण रा.उपळाई रोड बार्शी यांच्या विरोधात भा.द. वि.कलम 420 , 409, 417 , 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधीनियम 1999 प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी नागरिकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून संबंधित कंपनी सील करण्यात आली असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती अप्पर अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिलीय.