Monday, December 29, 2025
Home Blog Page 2945

औरंगाबादकरांसाठी खुशखबर ! संक्रांतीच्या मुहूर्तावर महामेट्रोचा होणार कार्यारंभ

Mumbai Metro

औरंगाबाद – वाळूज ते शेंद्रा डीएमआयसीपर्यंत मेट्रो व उड्डाणपुलाचा डीपीआर तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महाराष्ट्र रेल्वे कार्पोरेशनची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज या कामाचा कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. डीपीआरच्या कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षीत आहे. पहिल्या टप्प्यात वाळूज ते शेंद्रा डीएमआयसीपर्यंत मेट्रोचा डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यासोबतच शहरात एकच उड्डाणपूल तयार करण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे मेट्रोसोबतच उड्डाणपुलाचा डीपीआर तयार केला जाणार आहे. मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा आणि मेट्रो, उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महा मेट्रोची निवड करण्यात आली. महामेट्रो ही केंद्र व राज्य सरकारची संयुक्त कंपनी असल्यामुळे या कंपनीला डीपीआरसाठी लागणारे पाच कोटी रुपये देण्याची तयारी स्मार्ट सिटीने दर्शवली आहे. शुक्रवारी स्मार्ट सिटीतर्फे महामेट्रोला कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

मेट्रो रेल्वे, उड्डाणपुलासह शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्याचे काम महा मेट्रोला देण्यात आले आहे. हा आराखडा तयार होणार असल्याने शहर विकासातील अडथळे दूर होणार आहेत. आगामी सहा महिन्यात हा आराखडा तयार होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

साताऱ्यातून काॅलेजच्या दोन युवतीचे अपहरण, पालकांची पोलिसाकडे धाव

सातारा | सातारा शहरातील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन दोन युवतींचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे.

साताऱ्यातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरून एक महाविद्यालयीन युवती गायब झाली आहे. ही युवती तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असे सांगून गेली आहे. मात्र ती परत न आल्याने तिच्या पालकांनी तिच्या फोनवर फोन केला. त्यावेळी ही मुलगी अज्ञात युवकासोबत असल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीच्या आईने यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दुसरी घटनाही साताऱ्यातील महाविद्यालयाच्या परिसरात घडली आहे. 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी कॉलेजला गेली होती. काॅलेजला गेलेली अल्पवयीन मुलगीही कॉलेजच्या परिसरातून गायब झाली असल्याचे मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणाचा सातारा शहर पोलीस तपास करत असून मुलींचे मोबाईल लोकेशन तपासले जात आहे. त्यानंतरच मुली नेमक्या कुठे आहेत हे समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोरोनाचा आलेख वाढताच ! आज आकडा 550 च्या पुढे

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसाडेपाचशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 573 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 382 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 191 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 613 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 52 हजार 589 झाली आहे. आज जिल्ह्यात तीन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3661 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1839 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहराच्या एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या भागांत नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला कोरोनाने पुन्हा स्वत:च्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात 94 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील 82 तर ग्रामीणमधील 12 रुग्णांना सुटी देण्यात आली.

वारंवार बोलावूनही पत्नी माहेरून येत नव्हती; यानंतर पतीने केले असे काही कि….

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील कांदिवलीमध्ये एक विचित्र घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वारंवार बोलावूनही माहेरी गेलेली पत्नी घरी परतत नव्हती. यानंतर या महिलेच्या पतीने संतापून या महिलेचा आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला. या प्रकरणाची माहिती पत्नीला कळताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पत्नीने केलेल्या तक्रारीवरून मालाडमधील कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
कांदिवलीत राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीचा विवाह 2015 मध्ये भिवंडीतील तरुणाशी झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर पती, सासू, सासरे, नणंदेनं या तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. यानंतर या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून हि तरुणी माहेरी निघून आली. यानंतर काही दिवसांनी पतीनं तिची समजूत काढून तिला घरी आणले. यानंतर काही दिवसांनी त्यांना जुळी मुले झालीत.

यानंतर सुद्धा या महिलेचा सासरच्यांकडून छळ सुरूच होता. त्यामुळे या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सामोपचारानं प्रकरण मिटले. त्यानंतर या दाम्पत्यानं स्वतंत्र घर घेतले. यानंतर काही दिवसांनी पतीने पुन्हा छळ सुरू केल्यानं हि महिला माहेरी निघून गेली. तिने घरी परत यावे म्हणून तिच्या पतीचे प्रयत्न सुरु होते. वारंवार बोलावूनही पत्नी माहेरून येत नव्हती म्हणून तो संतापला. यानंतर त्याने छुप्या पद्धतीनं काढलेला तिचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवला. हा व्हिडीओ नातेवाईक आणि मित्र मंडळींनी पाहिला. या महिलेला हे समजताच तिने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

बसच्या धडकेतून थोडक्यात बचावला तरुण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात रोज हजारो रस्ते अपघात होतात. यामध्ये काही लोक अपघातांना बळी पडतात तर काही लोकांचे नशीब चांगले असते म्हणून त्यांना काहीच होत नाही. याच गोष्टीचा प्रत्यय कर्नाटकातल्या मंगळुरू या ठिकाणी पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि भरधाव वेगानं स्कूटी चालवणारा तरुण बसला धडकल्यानंतर थोडक्यात बचावला आहे.

देव तारी त्याला कोण मारी
मंगळुरूमधल्या एलियार पडवू रोडवर हि दुर्घटना घडली आहे. हा रस्ता जास्त वर्दळीचा नसतो. मात्र मंगळवारी संध्याकाळी या ठिकाणी एक विचित्र घटना घडली. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि एक खासगी बस मंगळुरूहून एलियार पडवूला जात होती. त्यावेळी रस्त्यावर फारशी वाहनं नव्हती. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर बस चालकाने अचानक यू-टर्न घेतला. यावेळी पलीकडून भरधाव वेगाने बाईकस्वार या बसचालकाला दिसला नाही. हा बाईकस्वार कसाबसा या बसच्या धडकेतून वाचण्यात यशस्वी होतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्याठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मँगलोर सिटी या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि स्कूटरस्वाराचे बाइकवरील नियंत्रण सुटलं आणि त्याची स्कूटर तिथे असलेल्या फिश प्रोसेसिंग युनिटच्या दरवाजाला धडकली. मात्र नशीब बलवत्तर म्हणून या बाइकस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही.

पीडित मुलगी हात जोडत विनवणी करत राहिली तरीही नराधम दीड वर्षे करत होता ‘हे’ दुष्कृत्य

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील पाली या ठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून दीड वर्षे बलात्कार करण्यात आला आहे. हि अल्पवयीन मुलगी या नराधमाला हात जोडत राहिली, मात्र त्याला तिची अजिबात दया आली नाही. तो तिच्यावर बलात्कार करतच राहिला. जर या मुलीने त्याला शरीरसंबंधास नकार दिला तर तो मुलीला अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. यानंतर या सगळ्या प्रकाराला वैतागून पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
या नराधम आरोपीचे नाव कल्पेश शर्मा असे असून त्याचा बांगड्या निर्यात करण्याचा व्यवसाय होता. आरोपीचे पीडितेच्या घरी सतत येणं-जाणं सुरू होतं. तो मुलीसाठी कधी चॉकलेट तर कधी गिफ्ट घेऊन येत होता. यानंतर हळूहळू हि पीडित मुलगी त्याच्या प्रेमात पडली. यानंतर आरोपीने संधी साधून तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. यानंतर या आरोपीने तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीने या मुलीने हि गोष्ट कोणालाही सांगितली नाही.

हा आरोपी दिड वर्षे मुलीला तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करीत होता. तो तिला अनेकवेळा हॉटेलमध्येसुद्धा बोलवत होता. यादरम्यान पीडित मुलगी अनेकवेळा त्याच्यासमोर रडली, हात जोडले मात्र तो नराधम तिच्यावर अत्याचार करीत राहिला. सातत्याने होत असलेल्या बलात्कारामुळे पीडितेने आरोपीसोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर तिने त्याचे फोन उचलणे बंद केले. आरोपीला या गोष्टीला राग आल्याने त्याने पीडितेचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. यानंतर या मुलीने हि गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने कल्पेशविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर Toilet साठी थांबले..तितक्यात मागून आलेल्या ट्रेलरने उडवलं, 1 ठार

raigad

रायगड : हॅलो महाराष्ट्र – मुंबई गोवा हायवेवर एक विचित्र दुर्घटना घडली आहे. यामध्ये लघुशंका करण्यासाठी गाडीतून खाली उतरलेल्या तिघा तरुणांना ट्रेलरने उडवले आहे. मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी सकाळी सात वाजता हि दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मित्र अर्टिगा कारने ठाण्याहून मालवणच्या दिशेने प्रवास करत होते. मात्र मालवणला पोहोचण्याच्या अगोदरच यामधील एकाला मृत्यूने गाठले. या तिघा मित्रांच्या अपघातामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके ?
मुंबई गोवा महामार्गावर सकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ठाण्याहून मालवणला जाणाऱ्या अर्टिगा गाडीतील तिघे जण लघुशंका करण्यासाठी गाडीतून खाली उतरले होते. यादरम्यान मुंबईच्या बाजूने येणाऱ्या ट्रेलरने या तिघांना धडक दिली. यानंतर या ट्रेलरने रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या त्यांच्या अर्टिगा कारलासुद्धा धडक दिली.

एकाचा मृत्यू तर दोघे जखमी
या अपघातात अमित विनोद कवळे याचा जागीच मृत्यू झाला आहे तर टेरेस करवालो आणि रोहन जाधव हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड; चित्रा वाघ यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून सध्या अनेक प्रकरणांवरून राज्य सरकावर टीका केली जात आहे. राज्यात होत असलेल्या गर्भपाताच्या घटना आणि आर्वी तालुक्यातील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली यावरून चित्रा वाघ यांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. “राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे; आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करीत राज्य सरकावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आर्वी तालुक्यात 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भधारणा झाली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलाच्या चुकीच्या कृत्याला पाठीशी घालणारे आई, वडील आणि मुलीचा गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला आर्वी पोलिसांनी अटक केली. 30 हजार रुपये घेऊन गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे.

“राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे; आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. ३०-३० हजारात सौदेबाजी चाललीय चिमुकल्या जीवांशी खेळण्याची. कायदे कमजोर नाहीत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

पोलिसांना खोदकामात कवट्या हाडं गर्भपिशव्या आढळल्या.. इतक्या क्रूरपणे चिमुकल्या जीवांची छळवणूक केली. नियम धाब्यावर बसवले, कायदे पायदळी तुडवले, कायदे कमजोर नाहीत. त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही राहण्याची गरज आहे. पुन्हा एकदा भरारी पथकं स्थापा आणि यात सापडलेल्या एकाही हरामखोराला सोडू नका, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

त्यांच्या छेडछाडीला कंटाळून 9 वीत शिकणार्‍या सिद्धीनं शेवटी स्वत:लाच संपवलं…

sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. या मुलीने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोटसुद्धा लिहिली आहे. या मुलीने गावातील तीन मुलांच्या छेडछाडीला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ‘आब्या’मुळे आयुष्याचा शेवट करत आहे असे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बोरी या ठिकाणी गावातील मुलांच्या छेडछाडीला कंटाळून सिद्धी गजानन भिटे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. काल संध्याकाळी तिने साडेपाच वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मुलीने आपल्या आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये, म्हणून हे पाऊल उचलले आहे. हि विद्यार्थिनी इयत्ता नववीत शिक्षण घेत होती.

सुसाईड नोटमध्ये ‘आब्या’चा उल्लेख
या मुलीने आत्महत्या करण्याच्या अगोदर जी चिट्ठी लिहीली होती त्यामध्ये तिने ‘आब्या’मुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

गावातील तीन मुलांकडून छेडछाड
या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होती. यानंतर पोलिसांनी सिद्धीचे वडील गजानन भिटे यांच्या तक्रारीवरून तिघा मुलांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सिद्धीने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LIC ची महिलांसाठीची विशेष योजना; दररोज 29 रुपये जमा आणि मिळवा लाखो रुपये

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC सतत नवनवीन विमा योजना आणत असते. यावेळी त्यांनी महिलांसाठी आणलेली विशेष विमा योजना जास्त लोकप्रिय होत आहे. ‘आधार शिला’ असे या योजनेचे नाव आहे. त्याच्या नावाला आधार जोडण्याचा विशेष उद्देश आहे. ही पॉलिसी फक्त त्याच महिला खरेदी करू शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे.

ही योजना 1 फेब्रुवारी 2020 रोजी लाँच करण्यात आली. लाइफ कव्हरसोबत, ही पॉलिसी बचत देखील देते. जर एखाद्या महिलेने या पॉलिसीमध्ये दररोज 29 रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळतील. या काळात या योजनेत कर्जही घेता येते.

योजना किती काळासाठी घेता येईल
८ ते 55 वयोगटातील कोणतीही महिला ही पॉलिसी घेऊ शकते. ही 10 वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते. याची जास्तीत जास्त मुदत 20 वर्षे आहे. मॅच्युरिटीच्या वेळी महिलेचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

विमा रक्कम
या योजनेअंतर्गत, किमान 75 हजार रुपयांचा विमा मिळू शकतो तर कमाल रक्कम 30 लाख रुपये आहे. यामध्ये पॉलिसीधारक अपघाताचा लाभ घेऊ शकतो.

प्रीमियम किती असेल ?
जर एखादी महिला 20 वर्षांची असेल आणि पॉलिसीची मुदत देखील 20 वर्षांची असेल आणि तिने 3 लाख रुपयांचा विमा उतरवला असेल, तर तिला वार्षिक सुमारे 10,649 रुपये प्रीमियम भरावा लागेल. मात्र, पुढील वर्षी हा प्रीमियम 10,868 रुपयांपर्यंत खाली येईल.

मॅच्युरिटी बेनिफिट
मॅच्युर झाल्यावर त्याला 4 लाख रुपये मिळतील. 2 लाख विमा रक्कम आणि शिल्लक रक्कम ही लॉयल्टी बोनस असेल.

प्रीमियम पेमेंट
या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम जमा केले जाऊ शकतात. तुम्ही वेळेवर प्रीमियम भरण्यास विसरल्यास, तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल. मात्र, तुम्ही मासिक आधारावर प्रीमियम भरण्याचे निवडल्यास, तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.

कॅश बेनिफिट
पॉलिसी सुरू झाल्यापासून 5 वर्षांच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, विम्याच्या रकमेइतकी रक्कम दिली जाईल. मात्र, यानंतर मृत्यू झाल्यास, नॉमिनी व्यक्तीला विमा रक्कम आणि लॉयल्टी बोनस देखील मिळेल.

सेटलमेंट
मॅच्युरिटी झाल्यावर, तुम्ही पूर्ण पेमेंट एकाच वेळी किंवा हप्त्यांमध्ये मिळवू शकता.

सरेंडर करणे
सलग दोन वर्षे प्रीमियम भरल्यानंतर ही पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते.