Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 2963

‘या’ क्षुल्लक कारणावरून आरोपीकडून भिक्षुकाची निर्घृणपणे हत्या

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काळू पावरा या नराधमाने भिक्षुकाने दारात उभे राहून भिक्षा मागितल्याचा राग अनावर न झाल्याने भिक्षुकाची निर्घृणपणे हत्या केली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील होळनांथे या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील अमरीश नगर या ठिकाणी चैन्या पावरा हा अविवाहित भिक्षुक गावामध्ये दिवसभर भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होता. यावेळी गावातीलच काळू गणपत पावरा याच्या घराबाहेर उभे राहून चैन्या पावरा याने भीक मागितली. आपल्या दारासमोर भीक मागितल्याने काळू गणपत पावरा याला आपला राग अनावर झाला. यानंतर काळू गणपत पावरा याने भिक्षुक चैन्या पावराला दंडुक्याने मोठ्या प्रमाणात मारहाण केली.

आरोपी घटनास्थळावरून पसार
कालू पावरा याने केलेल्या मारहाणीत चैन्या पावरा हा मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. यानंतर आरोपीने चैन्या पावरा या भिक्षुकास दूरवर असलेल्या गटाराच्या जवळ टाकून दिले आणि त्या ठिकाणाहून पसार झाला. यानंतर गावातील काही लोकांना चैन्या पावरा हा जखमी अवस्थेत आढळून आला. यानंतर त्यांनी चैन्या पावरा याच्या घरच्यांना त्याची माहिती दिली. भिक्षुक चैन्या पावरा याच्या मोठ्या भावाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत याची माहिती पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना याची माहिती देत पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी चैन्या पावरा याला शासकीय रुग्णालयमध्ये दाखल केले मात्र त्यागोदरच त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी करून आरोपी काळू पावरा याला अटक केली आहे.

वर्षभरात मराठवाड्यात 887 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

Farmer waiting for Rain
Farmer waiting for Rain

औरंगाबाद – शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही मराठवाड्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच आहेत र्षभरात 887 शेतकऱ्यांनी विविध कारणाने आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 210 आत्महत्या बीड जिल्ह्यात तर सर्वात कमी 36 आत्महत्या हिंगोली जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे. यापैकी 681 शेतकर्‍यांना शासनाकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त भाग म्हणून मराठवाड्याची ओळख आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या चा प्रदेश म्हणूनही मराठवाडा ओळखला जातो. नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ यामुळे या भागातील शेती नेहमीच तोट्याची राहिली आहे. येथील बहुतांश शेतकरी शेतीवरच अवलंबून असल्याने कोणत्याही कारणाने उत्पादन शेतकरी हताश होऊन जीवन यात्रा संपवितात. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकल्प योजना राबविण्यात येत आहेत. परंतु त्यानंतरही आत्महत्या रोखण्यात यश आलेले नाही. मागील वर्षी म्हणजेच 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2019 च्या काळात तब्बल 887 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक 210 आत्महत्यांची नोंद बीड जिल्ह्यात तर सर्वात कमी 36 आत्महत्यांची नोंद हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. वर्षभरात सर्वाधिक 101 आत्महत्या या नोव्हेंबर महिन्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल जून महिन्यात 91, ऑक्टोबर 89, डिसेंबर 83, ऑगस्ट 81,सप्टेंबर 80, मार्च 75, फेब्रुवारी 70, जुलै 64, जानेवारी 57, मे 50 तर एप्रिलमध्ये 46 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील जिल्हे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या –
बीड – 210
औरंगाबाद – 172
उस्मानाबाद – 124
नांदेड – 119
परभणी – 83
जालना – 79
लातूर – 64
हिंगोली – 36
एकूण – 887

राज्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवणार, 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत – राजेश टोपे

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज पाच राज्यातील आरोग्य मंत्र्यांशी बैठक घेत चर्चा केली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणं नाही असे टोपे यांनी म्हंटल तसेच राज्यात आता जिल्हा स्तरावर आरोग्य किट तयार करण्यात येणार आहे. टेस्टिंगची संख्या वाढवणार असल्याची माहिती डॉ. टोपे यांनी दिली.

डॉ. राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत मध्य माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी नागरिकांचे लसीकरण जास्त झाले आहे. त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही कमी आहे. त्यामुळे राज्यात आता लसीकरणाची गती आणखी वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

राज्यातील जवळपास 90 टक्के लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली असून 69 टक्के लोकांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत. देशभरात क्वारंटाईनचा कालावधी हा सातच दिवस राहणार, त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

धक्कादायक ! पोटच्या दोन मुलांसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीच्या मालडोंगरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पती-पत्नी सतत होणाऱ्या वादामुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे. मात्र अद्याप खरे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे.

दीपा रवींद्र पारधी असे मृत महिलेचे नाव असून तिने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मालडोंगरी भागात मृत दीपा रवींद्र पारधी या आपला पती रवींद्र मुरलीधर पारधी आणि दोन मुलांसह राहत होत्या. घटनेच्या आदल्या दिवशी पती रवींद्र व पत्नी दीपा यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे रागाच्या भरात पत्नी दीपा आपल्या दोन मुलांसह घरातून निघून गेल्या.

यानंतर पती राजेंद्र याने नातेवाईक- शेजार्‍यांसह शोधाशोध केली असता सकाळी मालडोंगरीकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातील विहिरीत गावकऱ्यांना दीपाचा मुलांसह मृतदेह आढळून आला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तिन्ही मृतदेह बाहेर काढले. पती पत्नीमध्ये सतत होणाऱ्या वादामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. ब्रह्मपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आता आधार कार्डही केले जाऊ शकते लॉक, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।  आजच्या काळात आधार कार्ड हे एक आवश्यक डॉक्युमेंट्स बनले आहे. ऑनलाइन बँकिंगपासून ते रेशनकार्ड दुकानापर्यंत आधार कार्डचा वापर केला जातो. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे.

आधार कार्डच्या वाढत्या महत्त्वामुळे त्याचा गैरवापर होत असल्याच्या बातम्याही येत आहेत. आधार कार्डचा गैरवापर होऊ नये, यासाठी सरकार वेळोवेळी त्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना करत असते. एकीकडे, जिथे तुम्हाला घरबसल्या खऱ्या आणि बनावट आधारकार्डची माहिती सहज मिळू शकते, तिथे ते लॉकही केले जाऊ शकते जेणेकरुन इतर कोणी तुमचे आधार कार्ड वापरू शकणार नाही. तुम्ही तुमच्या घरच्या आरामात तुमचे आधार कार्ड लॉक किंवा अनलॉक करू शकता.

लॉक करण्याचे फायदे

UIDAI, आधार कार्ड जारी करणारी संस्था, तुम्हाला तुमचे आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा देखील देते. आधार कार्ड लॉक करण्याचा फायदा म्हणजे तुमचे आधार कार्ड कुठेतरी हरवले तर कोणीही त्याचा वापर करू शकत नाही. अशा प्रकारे आधारशी लिंक केलेला तुमचा डेटा सुरक्षित राहतो.

आधार कार्ड कसे लॉक करावे ?

आधार कार्ड लॉक करण्यासाठी, पहिले तुम्हाला तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर GETOTP मेसेज पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तुम्हाला ‘LOCKUID आधार नंबर’ टाइप करून हा OTP पुन्हा 1947 वर पाठवावा लागेल. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड लॉक होईल.

अनलॉक कसे करावे ?

तुम्हाला तुमचे लॉक केलेले आधार कार्ड पुन्हा अनलॉक करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवरून 1947 वर GETOTP एसएमएस पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला ‘UNLOCKUID आधार नंबर’ आणि OTP लिहून 1947 वर पाठवावा लागेल. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड अनलॉक होईल.

ऑनलाइन लॉक करा

सर्व प्रथम UIDAI वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक करा. वेबपेज खाली स्क्रोल करा आणि आधार सेवा कॉलममधील आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी अंतर्गत lock/unlock biometric वर क्लिक करा. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. हे पेज खाली स्क्रोल करा आणि कन्फर्म करा वर क्लिक करा. त्या खाली, lock/unlock biometric वर क्लिक करा. आता कॅप्चा कोड असलेले पेज उघडेल. येथे तुम्हाला 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल. कॅप्चा कोड टाका आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. पेजमध्ये हा OTP टाका आणि सबमिट वर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड लॉक होईल.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी बंद; आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय

औरंगाबाद – कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लेणी पूर्णतः बंद करण्यात येऊ नयेत, अशी मागणी उद्योजक आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची गैरसोय झाली आहे. ज्यांनी बुकिंग करून भारतामध्ये पर्यटनाचा बेत आखला आहे, त्यांनी आता काय करावे, असा प्रश्न आहे. कोरोनामुळे तिसऱ्यांदा पर्यटनस्थळे बंद झाली आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर वेरूळ आणि अजिंठा लेणी बंद होणार आहेत. मात्र लेणी बंद वातावरणात असलेल्या शॉपिंग मॉल्स आणि सिनेमा थिएटरपेक्षा नैसर्गिकरीत्या हवेशीर असतात. त्यामुळे संपूर्ण कोविड प्रोटोकॉलसह ही स्मारके सुरू ठेवावीत, परंतु पूर्णपणे बंद करू नयेत. कारण यामुळे औरंगाबादच्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या सर्वांचे प्रचंड नुकसान होईल, असे कोठारी यांनी नमूद केले.

शॉपिंग मॉल्स, सिनेमा थिएटर्स आणि आता जिम्नॅशियमला 50 टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी आहे. पण वेरूळ आणि अजिंठा यासारखी स्मारके पूर्णपणे बंद झाली तर पर्यटन क्षेत्रासाठी अन्यायकारक आहे. ही स्मारके वारंवार बंद केल्यामुळे गाईड, कार, बस आणि टॅक्सी ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हस्तकला आणि यासारख्या पर्यटन उद्योगातील सर्व भागधारकांवर नकारात्मक प्रभाव पडेल, असे सुनीत कोठारी यांनी नमूद केले आहे.

वाई पोलिसाची कारवाई : शहरात चोरी करणाऱ्या 4 मुलांना अटक, मुद्देमाल जप्त

Wai Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई शहरातील जोशी विद्यालयतील चोरी आणि बांधकाम व्यावसायिकांचे साहित्य चोरणाऱ्या चार मुलांना वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारांच्या माहीतीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 जानेवारी रोजी त. ल. जोशी विद्यालय, वाईचे उपमुख्याध्यापक दादा भानुदास बनसोडे (रा. रामनगर ता. जि. सातारा) यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यामध्ये म्हटले होते की, दि. 1 जानेवारी रोजी 11.30 ते दिनांक 3 जानेवारी 2022 रोजीचे सकाळी 10.30 वाजण्याच्या दरम्यान शाळेतील संगणक विभागाचे खोलीच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरटयाने शाळेतील मॉनिटर, अँप्लीफायर, माईक स्टण्डसह, केबल व फॅन असे एकुण 26 हजार रुपयांचे साहीत्य चोरीस गेलेले आहे.

वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक वाई शहर व पोलीस स्टेशन हद्दीतील गावामध्ये पेट्रोलिंग करुन व बातमीदारामार्फत अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत होते. सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर वाई पो.स्टेशनचे पोलीस निरीक्षक  बाळासाहेब भरणे यांना त्यांच्या खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गुरेबाजार झोपडपट्टी,सिध्दनाथवाडी, वाई येथे राहणारी 3 मुले व 1 विधी संघर्ष बालकाने वाई शहरात बरेच चोऱ्या केलेल्या आहेत. त्यानंतर बाळासाहेब भरणे यांनी सदरची माहीती गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांना देवून आरोपींना तात्काळ पकडणे बाबत सुचना दिल्या. त्यानूसार तीन आरोपी व एक विधी संघर्ष बालक यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचाऱ्यांनी वाई शहरात फिरत असताना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनी त. ल. जोशी विद्यालय वाई येथील चोरी केली असल्याचे कबूल केले.

त्याशिवाय गंगापूरी व मच्छि मार्केट वाई येथील नविन बांधकामाच्या ठिकाणच्या 20 सेंन्ट्रींग प्लेटा, पुलाच्या नविन बांधकामाच्या ठिकाणची केबल चोरली असल्याचे कबूल केले. या गुन्ह्यात चोरलेला सुमारे 80 हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, वाईच्या उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शितल जान्हवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाई बाळासाहेब भरणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, महीला पोलीस नाईक सोनाली माने, पो. कॉ. अमित गोळे, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड यांनी केलेली आहे.

देशाच्या GDP साठी महत्त्वाच्या आहेत ‘या’ तीन बँका, जर बुडल्या तर उद्ध्वस्त होईल भारतीय अर्थव्यवस्था

नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यात बँकिंग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषत: त्या तीन बँका, ज्यांच्या बुडण्याने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नुकतीच एक लिस्ट प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये SBI सोबतच खाजगी क्षेत्रातील ICICI बँक आणि HDFC बँक या देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या बँका आहेत. RBI च्या मते, या तिन्ही बँका इतक्या महत्त्वाच्या आहेत की, त्या बुडल्या तर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. D-SIB अंतर्गत येणाऱ्या बँका महत्त्वाच्या मानल्या जातात.

‘या’ बँकांनुसार तयार केली जातात धोरणे
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ‘या बँका अशा बँकाही मानल्या जातात, ज्यांचे अपयश इतके हानिकारक असू शकते की धोरणकर्ते त्यांच्या अपयशाचा कोणताही धोका पत्करू शकत नाहीत. अशा स्थितीत या महत्त्वाच्या बँकांसाठीचे धोके कमी करता येतील, या आधारावर धोरणे ठरवली जातात. संकटाच्या वेळी त्यांना हाताळण्यासाठी सरकारकडून सहकार्य अपेक्षित आहे. गरज पडेल तेव्हा सरकार त्यांना मदत करते.

D-SIB फ्रेमवर्क म्हणजे काय ?
या श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या बँकांना त्यांच्या रिस्क वेटेड एसेट्सचा काही भाग अतिरिक्त सामान्य इक्विटी टियर-1 (CET-1) स्वरूपात ठेवावा लागतो. CET-1 हा भांडवलाचा तो भाग आहे, जो बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडे इक्विटी म्हणून असतो. टियर-1 भांडवल हे बँक किंवा वित्तीय संस्थेचे मुख्य भांडवल असते, जे राखीव म्हणून ठेवले जाते. याद्वारे बँका त्यांच्या ग्राहकांच्या व्यावसायिक क्रियाकलापांना निधी देतात.

तसेच बँकांचे आर्थिक स्वास्थ्यही सांगते. त्यात कॉमन स्टॉक्स, डिस्क्लोज्ड रिझर्व्ह आणि काही इतर एसेट्सचा समावेश होतो
या श्रेणीत, बँका बकेट्समध्ये ठेवल्या जातात. प्रत्येक बकेट्ससाठी CET-1 ची अतिरिक्त भांडवलाची आवश्यकता वेगळी आहे. पाचव्या बकेट्समध्ये, ही रिस्क वेटेड एसेट्सच्या 1 टक्के, चौथ्या बकेट्समध्ये 0.80 टक्के, तिसऱ्या बकेट्समध्ये 0.60 टक्के, दुसऱ्यामध्ये 0.40 टक्के आणि पहिल्या बकेट्समध्ये 0.20 टक्के आहे.

पहिल्या बकेट्समध्ये ICICI आणि HDFC बँक
D-SIB फ्रेमवर्कनुसार, ICICI बँक आणि HDFC बँक पहिल्या बकेट्समध्ये ठेवण्यात आली आहेत. याचा अर्थ त्यांना CET-1 म्हणून जोखीम भारित मालमत्तेच्या अतिरिक्त 0.20 टक्के ठेवणे आवश्यक आहे. SBI साठी ते 0.60 टक्के आहे कारण ते तिसऱ्या बकेटमध्ये आहे.

SBI पहिल्यांदा 2015 मध्ये सामील झाले होते
RBI च्या मते, D-SIB साठी अतिरिक्त CET-1 आवश्यकता 1 एप्रिल 2016 पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आली. 1 एप्रिल 2019 पासून ते लागू झाले. 2015 मध्ये एसबीआयचा पहिले या श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला होता. एका वर्षानंतर, 2016 मध्ये, ICICI बँकेचा त्यात समावेश करण्यात आला. 31 मार्च 2017 रोजी HDFC बँक देखील D-SIB म्हणून चिन्हांकित केली गेली आहे.

इंस्टाग्रामच्या सवयीमुळे 11 वीत शिकणाऱ्या मुलाने उचलले ‘हे’ पाऊल

yogesh bawal

जयपूर : वृत्तसंस्था – एखादा व्यक्ती कोणत्याही गोष्टीच्या आहारी गेला तर आणि ती जर नाही भेटली तर तो व्यक्ती आपल्या जीवाचे बरेवाईटदेखील करत असतो. अशीच एक घटना राजस्थानातील पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. 16 वर्षीय योगेशला इंस्टाग्रामवर रील्स बनवायचे व्यसन जडले होते. ह्या रिल्स बनवत असताना अभ्यास तर सोडा त्याला खाण्यापिण्याचीसुद्धा आठवण येत नव्हती. त्याच्या या सवयीला त्याची आई खूप वैतागली होती. या गोष्टीवरून ती सतत त्याला ओरडत असायची. मात्र तिच्या बोलण्याचा योगेशवर फारसा काही प्रभाव पडत नव्हता. यानंतर त्याच्या आईने रागाने त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. आईच्या या कृत्याचा त्याला इतका राग आला कि त्याने विहिरीत उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

मुंडारा गावाचे रहिवाशी ट्रक ड्राइवर हरिलाल मेघवाल यांचा 16 वर्षांचा मुलगा योगेश बावल हा 11वीत सायन्समध्ये शिकत होता. वडील ट्रक ड्राइवर असल्यामुळे ते कामासाठी अधिकतर बाहेर असत. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी योगेशची आई लीलादेवी यांच्यावर होती. मागच्या काही महिन्यांपासून योगेशला मोबाइलवर शॉर्ट व्हिडीओ तयार करण्याचे व्यसन जडले होते. कॉलजमधून घरी आला कि तो मोबाइल घेऊन घराबाहेर पडायचा. यानंतर तो गावातील तलावाशेजारी किंवा इतर ठिकाणी आपले शॉर्ट व्हिडिओ तयार करायचा.

त्याच्या या सवयीला वैतागून 7 जानेवारी रोजी योगेशच्या आईने त्याला दिवसभर मोबाइल दिला नाही. याचा राग आल्याने योगेश सायंकाळी साधारण 5 वाजता घरच्यांना काही न सांगताच घराबाहेर पडला. तो खूप वेळ झाला आला नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही सापडला नाही. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर रविवारी गावातील विहिरीत योगेशचा मृतदेह तरंगताना दिसला. यानंतर पोलिसांना बोलावून मृतदेह बाहेर काढण्यात आला. आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून त्याच्या आईला जबर मानसिक धक्का बसला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेणारी एकही सक्षम व्यक्ती नाही ; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने राज्यातील शाळा सरसकट बंद करण्याच्या निर्णय घेतला. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आज महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “राज्यात गरिबांची मुले ही आता सरकारच्या या निर्णयामुळे कशी शिकणार याचा विचार या सरकारने नियमावली बनवताना, शाळा बंदचा निर्णय घेण्यापूर्वी करायला हवा होता. या महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती नाही,” अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त म्हणाले की, जेव्हा कोरोना राज्यात आला आहे. त्या वेळेपासून राज्यामध्ये या आघाडी सरकारचे धोरण हे पूर्णपणे गोंधळलेले आहे. निर्बध लावताना, शाळा बंदसह इतर निर्णय घेत असताना नेमके काय करावे? काय निर्णय घ्यावा? याबाबत विचार करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता या सरकारमध्ये निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती नसल्यामुळे सरकारचा हा गोंधळ अनेकदा उघडा होतोय.

राज्य सरकावर टीका करताना पडळकर पुढे म्हणाले कि, राज्य सरकारने नुकताच शाळा बंदचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात दारुची दुकाने चालू आहेत आणि शाळा बंद केल्या जात आहेत. आता या सगळ्या मराठी शाळांमध्ये मुले ही गोरगरिबांची आहेत. राज्य सरकारच्या या शाळा बंदच्या निर्णयामुळे पुढच्या पिढीचे केवढे मोठे नुकसान होणार आहे. पुढच्या दहा वर्षानंतर आपल्याला याचे परिणाम जाणवणार आहेत, असेही यावेळी पडळकर यांनी म्हंटले.