Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 2980

अर्थसंकल्प 2022: एसेट मॉनिटायझेशनसाठी निश्चित केले जाऊ शकते लक्ष्य

नवी दिल्ली । आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये एसेट मॉनिटायझेशन ही एक महत्त्वाची थीम असू शकते. आगामी अर्थसंकल्पात निर्गुंतवणूक, टॅक्स आणि नॉन टॅक्स उत्पन्नासाठी ज्या प्रकारे उद्दिष्टे निश्चित केली आहेत, त्याच पद्धतीने यासाठीही लक्ष्य निश्चित केले जाऊ शकते. मॉनिटायझेशनसाठी नॅशनल मॉनिटायझेशन पाइपलाइन एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल.

पुढील 4 वर्षांत एकूण 6 लाख कोटी रुपयांचे एसेट मॉनिटायझेशन करणे शक्य होईल असा अंदाज आहे. NMP एसेट मॉनिटायझेशनसाठी चार वर्षांची योजना तयार करते. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने मनीकंट्रोलला सांगितले की,”येत्या अर्थसंकल्पापासून मॉनिटायझेशनसाठी वार्षिक लक्ष्य निश्चित केले जाईल.” NMP ची घोषणा करताना चालू आर्थिक वर्षासाठी 80000 कोटी रुपयांच्या एसेट मॉनिटायझेशनचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. अर्थसंकल्पात हा निर्धार करण्यात आलेला नाही. मात्र पुढील अर्थसंकल्पापासून ही व्यवस्था बदलताना दिसणार आहे.

या अधिकाऱ्याने मनीकंट्रोलला सांगितले की,”केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023 साठी एसेट मॉनिटायझेशनचे लक्ष्य अजूनही निश्चित केलेले नाही मात्र ते 1 लाख कोटी रुपये असू शकेल.” सरकारने सप्टेंबरमध्ये NMP ची घोषणा केली होती. ज्यांचे उद्दिष्ट खाजगी क्षेत्रासह व्यापक क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये मूल्य अनलॉक करणे हे होते. या अंतर्गत महसुलाची वाटणी खाजगी क्षेत्रांसोबत केली जाईल मात्र मालकी सरकारकडे राहील.

ही व्यवस्था पब्लिक पार्टनरशिपसारखी असेल. या मॉनिटायझेशनमधून मिळालेला पैसा सरकार वापरणार नाही, उलट हा पैसा सरकारी कंपन्या आणि सरकारी संस्थांकडे जाईल आणि या कंपन्या शेअर बायबॅक आणि डिव्हिडंडच्या माध्यमातून सरकारला काही पैसे देतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI), भारत संचार निगम (BSNL) यांसारख्या कंपन्यांच्या बाबतीत, सर्व पैसे शेअर बायबॅकद्वारे केंद्र सरकारकडे जातील.

कर्ज फेडता न आल्याने तरुण शेतकऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

अकोला : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही वर्षांपासून विदर्भ आणि मराठवाड्याला अतिवृष्टी आणि दुष्काळाने मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. या सगळ्या संकटाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. यावर्षी देखील विदर्भ आणि मराठवाड्याला अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात झोपडले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सततच्या अस्मानी संकटामुळे राज्यातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतीतून काहीच उत्पन्न निघत नसल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. तसेच हे कर्ज फेडता न आल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

अशीच एक मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सायखेड या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव नारायण असे असून तो अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सायखेड येथील रहिवासी आहेत. मृत नारायण यांनी आपल्या सहा महिन्यांच्या बाळाच्या पाळण्याच्या दोरीच्या सहाय्य्यने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. मृत नारायण यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत नारायण यांच्या आई सुमनबाई यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक धाबा येथून दोन वर्षांपूर्वी पीक कर्ज घेण्यात आले होते. हे पीककर्ज अजूनही थकीत आहे. यातील काही कर्ज माफ झाले होते. तरीदेखील 96 हजार रुपयांचं कर्ज मृत नारायण यांच्यावर होते. पण सततची नापिकी, दुष्काळी स्थिती उद्भवल्याने नारायण यांना आईच्या नावावरील कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पण कर्जाची परतफेड कशी करायची याची चिंता त्यांना सतावत होती. यामुळे त्यांनी याच चिंतेतून आपल्या आयुष्याचा शेवट केला.

अमृता फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर विद्या चव्हाणांनी दिले ‘दोन’ शब्दात उत्तर; ट्विट करत म्हणाल्या…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. तसेच ट्विट करीत निर्वाणीचा इशाराही दिला आहे. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी फडणवीसांना दोन शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. ढोंगीपणाची उंची ! कोण बोलत आहे बघ?, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना ट्वीट द्वारे नोटीस पाठवत कारवाईचा इशारा दिला. त्यावर विद्या चव्हाण यांनीही ट्विट करीत तसेच माध्यमांशी संवाद साधत प्रत्युत्तर दिले. सुरुवातीला चव्हाण यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ढोंगीपणाची उंची ! कोण बोलत आहे बघ?, असे म्हंटले आहे.

 

 

अमृता फडणवीसांनी काय केली आहे टीका –

अमृता फडणवीस यांनी विध्या चव्हाण यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असून याबाबत ट्विट करीत इशाराही दिला आहे. अमृता फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हंटले आहार की, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल. तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !,

नेमके प्रकरण काय आहे ?

काल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. या प्रकरणी त्यांनी निषेध नोंदवत असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याचे नाव घेत त्यांच्यावरही निशाणा साधला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकत त्यांना नोटीस पाठवली आहे.

केंद्रीय मंत्र्याचा ‘असाही’ साधेपणा ! भर रस्त्यात गाडी थांबवून साधला गावकऱ्यांशी ‘संवाद’

औरंगाबाद – आपल्या साधेपणा रांगडेपणासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ओळखले जातात. अनेकांनी ते बोलताना आपले वाटत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी रस्त्यावर बसून जेवण केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आज सकाळी मुंबईहून रावसाहेब दानवे रेल्वेने जालन्याला पोहोचले. भोकरदनला जात असताना त्यांनी रस्त्यात गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.

या प्रसंगी त्यांच्या भोवती लहान मुले जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्रीपदाचा आव बाजूला ठेवून सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची कला दानवे यांच्यात आहे. एकाला तर त्यांनी मिठाई भरवल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी सर्व प्रोटोकाॅल बाजूला ठेवले असल्याचे दिसले. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दानवे म्हणतात, की मुंबईहून रेल्वेने प्रवास करुन आज पहाटेच जालन्याला पोहोचलो. जालना ते भोकरदन प्रवासात, माझ्या गावी जाताना वाटेमध्ये लागणाऱ्या राजूर, लिंगेवाडी, बाभूळगाव येथील गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच गावकऱ्यांनी देखील आपली मते व्यक्त केली.

दिल्लीला असताना शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतली होती. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

नोकरीची सुवर्णसंधी !! MPSC मार्फत 547 पदांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 547 पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील 547 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अर्जप्रक्रिया ही ऑनलाइन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2022 आहे.

एकूण पदे – ५४७

पात्रता – कायद्याची पदवी असणे अनिवार्य

अनुभव – उच्च न्यायालयात वकील म्हणून किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये काही कमीत कमी ५ वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.

काय आहे वयोमर्यादा – जास्तीत जास्त ३८ वर्षे ( आरक्षित वर्गाला ४३ वर्षे )

वेतन – ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये

अर्ज करण्याची फी-
खुला गट – ७१९ रुपये
मागासवार्गीय/ आर्थिक दुर्बल घटक – ४४९ रुपये

अर्जप्रक्रिया – ऑनलाईन

कुठे करायचा अर्जClick Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२२

मूळ जाहिरात https://t.co/dNO6kc7mUs

अमृता फडणवीसांचा चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा; नोटीसीद्वारे दिला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मध्ये ओढत त्यांना डान्सिंग डॉल असे संबोधले होते. चव्हाण यांनी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडले असून, अमृता फडणवीस यांनी आज चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. तसेच ट्विट करीत निर्वाणीचा इशाराही दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठविलेली नोटीस ट्वीट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल. तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण !, अशी एकेरी भाषेत आक्रमक प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

नेमके प्रकरण काय आहे ?

काल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. या प्रकरणी त्यांनी निषेध नोंदवत असताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याचे नाव घेत त्यांच्यावरही निशाणा साधला. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकत त्यांना नोटीस पाठवली आहे.

चाफळच्या श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश

कराड | पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले चाफळ येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रातीला (दि. 14 जानेवारी) सीतामाईची यात्रा मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडते. यादिवशी चाफळला मकर संक्रातीचे हळदी- कुंकू आणि अखंड साैभाग्याचा वसा घेण्यासाठी गर्दी करत असतात. मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने चालू वर्षी सीतामाईची यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्रीराम देवस्थान ट्रस्टने घेताला आहे. तसेच यादिवशी मंदिर परिसरात 200 मीटर परिसरात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

पाटण तालुक्यातील चाफळ येथे श्रीरामाचे मंदिर आहे. राज्यासह देशातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीराम मंदिरात मकर संक्रातीला सीतामाईची यात्रा 1985 पासून मोठ्या उत्साहात भरते. यादिवशी महिला साैभाग्याचा वसा घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. या दिवशी कराड, पाटण तसेच सातारा येथील बस आगारातून भाविकांसाठी बसेसच्या फेऱ्याही वाढविल्या जातात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

शासन आदेशानुसार 14 जानेवारी रोजी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी व महिलांनी चाफळला दर्शनासाठी येवू नये, असे आवाहन अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, व्यवस्थापक धनंजय सुतार व विश्वस्त मंडळाने केले आहे.

क्रूरतेचा कळस ! जन्मदात्या बापानेच केला मुलाचा अमानवीय छळ

crime

औरंगाबाद – आईचे निधन झाल्यानंतर बापानं दुसऱ्या महिलेशी लग्न केले. पण लेकरात त्याचं काळीज कधी विरघळलंच नाही. असा क्रूर बाप आणि सावत्र आईनं बारा वर्षाच्या बालकावर अगणित अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला. या मुलाला घरकाम करायला लावण्यापासून ते लाटणे, कुकरचे झाकण, इतर भांडी अशा हाताला येईल त्या गोष्टींनी बेदम मारहाण केली. काड्याची पेटीची काडी, मेणबत्तीने ठिकठिकाणी चटकेही दिले. मोठ्या भावाच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांमध्ये या पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी बारा वर्षीय मुलाच्या 21 वर्षीय मोठ्या भावाने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, 2015 मध्ये निधन झाले. 2016 मध्ये त्याच्या वडिलांनी नुसरत खान नामक महिलेसोबत दुसरे लग्न केले. दोघेही भाऊ त्यांच्यासोबत राहत होते. मात्र क्षुल्लक कारणामुळे वडील आणि सावत्र आई सतत शिवीगाळ करु लागल्याने या मोठ्या भावाने सहा महिन्यांपूर्वीच घर सोडले. तो आरेफ कॉलनीतील आजोबांकडे राहू लागला. मोठा भाऊ निघून गेल्यानंतर लहान भाऊ वडीलांकडेच रहात होता. मात्र या सावत्र आई आणि वडिलांनी लहान मुलावर अगणित अत्याचार करायला सुरुवात केली. लाटणे, कुकुरचे झाकण, लाकूड हाताला येतील त्या भांड्यांनी त्याला मारहाण झाली. काडेपेटीची काडी, मेणबत्तीचे चटकेही दिले. सगळे घरकाम करायला लावू लागले.

इतक्यावरच न थांबता 27 डिसेंबर रोजी तर सावत्र आई नुससरतने मुलाच्या तोंडावर बुक्का मारून दात पाडून जखमी केले. त्याचे भिंतीवर डोके आपटले. यामुळे त्याला चक्कर येऊ लागली. 28 डिसेंबर रोजी सकाळी मोठा भाऊ लहान भावाला भेटण्यासाठी गेला तेव्हा तोंडाला मार लागलेला पाहून त्याने चौकशी केली. त्यानंतर लहान भावाने सगळा प्रकार सांगितला. भावाने त्याला तत्काळ आजोबांकडे नेले. वडिलांनी विरोध केला, मात्र मोठ्या भावाने तो जुमानला नाही. या सर्व प्रकाराविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

PNB कडून ग्राहकांना जोरदार धक्का !! 15 जानेवारीपासून ‘या’ सेवांसाठीचे शुल्क वाढवले

Punjab National Bank

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेने आपल्या खातेदारांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या काही सेवांसाठीचे शुल्क वाढवले ​​आहे. PNB च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन शुल्क 15 जानेवारी 2022 पासून लागू होईल. यामध्ये लॉकरचा चार्ज आणि मिनिमम डिपॉझिट यांचा समावेश आहे

मेट्रो शहरांतील ग्राहकांसाठी खात्यातील तिमाही मिनिमम बॅलन्सचे लिमिट सध्याच्या 5,000 रुपयांवरून 10,000 रुपये करण्यात आली आहे. बँकेच्या या निर्णयाचा परिणाम नवीन आणि जुन्या ग्राहकांवर होणार आहे.

मिनिमम बॅलन्स नसल्यास किती शुल्क आकारले जाईल ते जाणून घ्या
>> शहरी आणि मेट्रो भागात 10 हजारांपेक्षा कमी बॅलन्स असल्यास 600 रुपये शुल्क लागू होईल. आत्तापर्यंत ती 300 रुपये होती. हे शुल्क तिमाहीसाठी आकारले जाईल.

>> त्याचवेळी, ग्रामीण आणि निमशहरी भागात मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दलचे शुल्क 200 रुपयांवरून 400 रुपये प्रति तिमाही करण्यात आले आहे. मात्र बँकेने ग्रामीण आणि शहरी भागासाठी मिनिमम बॅलन्स लिमिट एक हजार रुपयेच ठेवली आहे.

लॉकर चार्ज मध्ये बदल

>> XL आकाराचे लॉकर वगळता सर्व क्षेत्रांसाठी आणि सर्व प्रकारच्या लॉकर्ससाठी लॉकर फी वाढवण्यात आली आहे.

>> शहरी आणि मेट्रो भागात लॉकरच्या चार्ज मध्ये 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

>> छोट्या आकाराच्या लॉकरचा चार्ज पूर्वी ग्रामीण भागात एक हजार रुपये होते, जे आता 1,250 रुपये होणार आहे. तर शहरी भागात ते 1,500 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढले आहे.

>> मध्यम आकाराच्या लॉकरचा चार्ज ग्रामीण भागात 2 हजार रुपयांवरून 2,500 रुपये आणि शहरी भागात 3 हजार रुपयांवरून 3,500 रुपये झाले आहे.

>> मोठ्या लॉकरचा चार्ज ग्रामीण भागात 2,500 रुपयांवरून 3,000 रुपये करण्यात आले आहे. तर शहरी भागात ते 5 हजारांवरून 5,500 रुपयांपर्यंत वाढले.

पोलिसांचा दणका : सातारा जिल्ह्यात विनामास्क आढळल्यास 500 रूपये दंड

सातारा | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींवर कारवाई दंड वसुल करण्यास सुरूवात केलेली आहे. सातारा शहरासह कराड शहरातही मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा सपाटा लावलेला आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट वाढू लागल्याने पोलिसाकडून विनामास्क वाहन चालकांला 500 रूपयांचा दंड आकारला जात आहे.

सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील मोठया गांवामध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसलेचे दिसून येत आहे. जिल्हयातील पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांना मोठया आस्थापना व गर्दीचे ठिकाणे येथे भेट देऊन जेथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येईल तेथे दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन यांचेमार्फत सातारा शहर, कराड शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी दंडात्मक कारवाई सोबत वाहनेही जप्त करण्यात येत आहे. सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील स्थानिक प्रशासनाकडून वाहनाव्दारे व्यावसायिक तसेच इतर दुकानदार यांना त्यांचे आस्थापनांमध्ये मास्क घालणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत लाऊडस्पिकरव्दारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही मास्कचे वापर न करणाऱ्यावर 500 रूपयांचा दंड आकारला जात आहे.