Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2836

बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग, त्यांना येरवड्यात उपचाराची गरज

banda tatya karadkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी निशाणा साधला. बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग आहे अशी टीका त्यांनी केली.

रुपाली पाटील यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतीनिधी व लोकनेत्याच्या लेकींना दारू पिऊन नाचतात म्हणणारे बंडातात्या वारकरी संप्रदायाला लागलेला डाग आहे.’ तसेच तात्याला येरवड्यात उपचाराची गरज असून समस्त महिलांची त्यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा खळखट्याक अटक आहे, असेही पाटील म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावरून बंडातात्या कराडकर यांच्यावर टीका केली आहे. एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची फार पूर्वीपासून गरज होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं की ते कोण आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

बंडातात्या कराडकर हे खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची गरज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. बंडा तात्या कराडकर हे खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची गरज आहे असं आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, एका किर्तनकाराच्या तोंडी अशी भाषा येणं म्हणजे तो किर्तनकार आहे की नाही हा प्रश्न उभा राहतो. बंडातात्या कराडकर, यांची मुळं कुठे आहेत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलले. यात मनावर घेण्यासारखं काही नाही.

पंकजा ताई असो किंवा सुप्रियाताई असो..एका किर्तनकाराने महिलांवर घसरावं ही महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची संस्कृती नाही. त्यामुळे ते खरे वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची फार पूर्वीपासून गरज होती. आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून महाराष्ट्राला सिद्ध करून दिलं की ते कोण आहेत”, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

बंडातात्या नेमकं काय म्हणाले-
हभप बंडातात्या कराडकर यांनी सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर दारु पिण्याचे आरोप केले. या सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारुपिऊन रस्त्यावर नाचतात असा आरोप बंडातात्या यांनी केला. सुप्रिया सुळे दारुपिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो तुम्हाला ढिगाने मिळतील. राजकारणात येण्याआधी त्या दारुपिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतायत”, असं बंड्यातात्या म्हणाले.

आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : बंडातात्या कराडकरांची सातारा पोलिसांकडून चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून राज्य महिला आयोगाच्यावतीने सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सातारा पोलिसांनी या वक्तव्याबाबत बंडा तात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच याचा अहवाल 48 तासाच्या आत आयोगास सादर करावा, अशी मागणी केली होती.

राज्य महिला आयोगाच्या मागणीनुसार सातारा पोलिसांनी आज सकाळी सातारा येथील कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या पिंपरजमधील मठात जाऊन चौकशी करण्यास सुवात केली आहे. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांविरोधात काल गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.

“माझं चुकलं…”; आक्षेपार्ह वक्तव्यानंतर बंडातात्या कराडकरांकडून माफी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून त्यांच्यासह 125 वारकऱ्यांवर सातारा पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी आता बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. “मी या चारही लोकांची माफी मागत आहे. काल मी जे काही बोललो ते अनावधानाने बोललो. माझा अपमान करण्याचा हेतू नव्हता. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दोघींचेही वर्तन तशा प्रकारचे नाही,” असे बंडातात्या कराडकर यांनी म्हंटले.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्याच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्याने त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत माफी मागितली. यावेळी ते म्हणाले की, “माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही. काल मी जे काही बोललो ते अनावधानाने बोललो. माझा अपमान करण्याचा हेतू नव्हता. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दोघींचेही वर्तन तशा प्रकारचे नाही. मी जे काही उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यासह काही लोकांबाबत बोललो. ते अनावधानाने मी बोललो” असे कराडकर यांनी म्हंटले.

काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर ?

काल सातारा येथे केलेल्या आंदोलनादरम्यान बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचे सांगत काही जणांची नावे देखील घेतली. तसेच पतंगराव कदम यांच्या मुलाचे निधन कसे झाले होते ते विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचे नाव सांगा असे आव्हानच त्यांनी दिले.

बंडातात्या कराडकर अडचणीत : महिला आयोगाकडून गंभीर दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाने लक्ष घातले आहे. महिलाबद्दल बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन या बाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

काल साताऱ्यात व्यसनमुक्ती संस्थेच्या आंदोलनात ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली. याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करीत पोलिसांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करावी. याचा अहवाल 48 तासाच्या आत महिला आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा”, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

बंडातात्या यांनी काल सातारा येथे केलेल्या अक्षेपार्ह विधानामुले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. हे खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी, अशी मागणी केली त्यांनी केली आहे.

…तर शिवरायांच्या पुतळ्याचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा आम्ही करु

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – गेल्या नऊ वर्षांपासून शिवप्रेमींनी पाठपुरावा, आंदोलने केल्यानंतर अखेर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान झाला असून, कारागिरांकडून सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आगामी १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचे नियोजन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने केले आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारीला सायंकाळी किंवा जयंती दिनी सकाळी शिवरायांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महापालिका प्रशासनाने करावा. चालढकल केली तर आम्हीच लोकार्पण करू, असे उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून बजावले.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किंवा जयंतीदिनीच क्रांती चौकातील पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पालिकेने आयोजित करावा. कोणाला बोलवायचे हा मनपा प्रशासनाचा अधिकार आहे. मुख्यमंत्री किंवा शिवरायांचे वंशज आले तर आनंदच आहे. मात्र, कोणाला खूश करण्यासाठी घोळ घालून चालढकल अजिबात चालणार नाही, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात ते मनपा प्रशासकांना लवकरच भेटणार आहेत.

पुण्यात बेसमेंटची जाळी कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू; पाच जण गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री एक दुर्घटना घडली. येरवडा येथील वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या तळमजल्याचे काम सुरु असताना त्याच्या स्लॅबची जाळी कोसळली. या घटनेत पाच कामागारांचा मृत्यू असून पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते. याच दरम्यान स्लॅबसाठी लोखंडाच्या सळ्यांची तयार केलेली जाळी कोसळून त्याखाली १० कामगार अडकले. यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात आले. तर पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

पुण्याचे महापौर मुलीधर मोहोळ यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. “येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे,” असे महापौर यांनी ट्विटमध्ये सांगितले.

परमबीर सिंग यांच्या आरोपांवर अनिल परबांची प्रतिक्रिया ; म्हणाले कि…

anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामध्ये राज्यातील पोलीस विभागात बदल्यांसाठीच्या याद्या अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असा आरोप त्यांनी केला. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणावर ज्या यंत्रणा आम्हाला प्रश्न विचारतील, त्यांच्यासमोर आम्ही आमचा खुलासा करू”, असे परब यांनी म्हंटले आहे.

अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत खुलासा केला. ईडीच्यावतीने करण्यात येणाऱ्या चौकशीवेळी खुलासा करण्यासाठी आपण तयार आहोत. पोलिसांच्या बदलाच्या या प्रकरणावर ज्या यंत्रणा आम्हाला प्रश्न विचारतील, त्यांच्यासमोर आम्ही आमचा खुलासा करू,’ असेही परब यांनी सांगितले आहे.

चौकशीत नेमके काय म्हणाले परमबीर सिंह?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीच्या चौकशी दरम्यान अनिल परब याचे नाव घेतले. मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये पीएसआय ते डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली होती. ही यादी मला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकदा दिली होती. त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर यांनीही अनेकदा दिली होती. बदल्यांची ही यादी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून दिली जात होती, अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली.

बंडातात्या कराडकर यांच्यासह 125 जणांवर गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

ह.भ.प बंडातात्या कराडकर यांच्यासह 100 ते 125 जणांवर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या वाईन विक्री विरोधात व्यसनमुक्त युवक संघाने साताऱ्यात आंदोलन केल्या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोणतीही परवानगी नसताना आंदोलन केल्याने विलास शंकर जवळ (रा.जवळवाडी ता मेढा जि. सातारा), मनोज सतिष निंबाळकर, सुरेश दिनानाथ कदम, अरविंद रामचंद्र जवळ, आकाश विलास जवळ (रा. जवळवाडी ता. जावळी जि.सातारा), उत्तम जानु सावंत (रा. चंदननगर- एमआयडीसी सातारा), विलास जवळ (रा. जवळवाडी ता. मेढा जि.सातारा), प्रकाश सदाशिव जत्रे उर्फ बंडातात्या कराडकर (रा.करवडी ता कराड जि. सातारा), संदीप विठठल जगताप (रा. एमआयडीसी, सातारा), बाळासाहेब भिमराव निकम (रा. शेरे, ता कराड, जि. सातारा), योगेश जाधव (सचिव व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र), घनशाम आबासाहेब नांदगांवकर (रा. नांदगांव ता.कराड जि. सातारा), दिपक वासुदेव जाधव (रा. मळोली ता. माळशिरस जि.सोलापुर), सचिन शिंदे (व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र), योगेश जाधव मार्गदर्शक व इतर 100 ते 125 जण यांनी विनापरवाना परवानगी नाकारली असतानाही. जमाव जमवुन पोवईनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी चालत जावुन मोर्चा काढला. सदवरेळी उपस्थित पोलीस अधिकारी यांनी त्यांना सुचना देवुनही सुचनांचे पालन केले नाही.

तसेच जिल्हादंडाधिकारी सातारा यांचेकडील आदेश क डीसी / एमएजी/ २ / एसआर/०७/२०२२ सातारा दिनांक १.२.२०२२ अन्वये कोवीड १९ अनुषंगाने सीआरपीसी १४४ प्रमाणे जिल्हादंडाधिकारी व सातारा यांचेकडील आदेश क. डीसी / एमएजी/ २ / एसआर / ०६ / २०२२ सातारा दिनांक २४१.२०२२ अन्वये संपूर्ण सातारा जिल्हयात दिनांक २५.१.२०२२रोजीचे ००.०० ते ३.२.२०२२ रोजीचे २४.०० वा. पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागु केलेला आदेशचा भंग केला आहे. तसेच त्यांना दिलेल्या नोटीसीचा भंग केला आहे म्हणुन त्यांचेवर भादविस कलम १८८.२६९,२७०, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ कलम ३७(१) (३)/१३५ आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ब साथरोग अधिनियम १८८७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताडकळस ‘या’ ठिकाणी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताडकळस : हॅलो महाराष्ट्र – परभणीतील ताडकळस येथून जवळच असलेल्या फुलकळस या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गुरुवारी सकाळी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन एका युवकाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गजानन लक्ष्मण शिराळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून स्पष्ट झाले नाही.

मृत गजानन शिराळे हा आज सकाळी जनावरांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने त्याचा भाऊ शिवहार लक्ष्मण शिराळे हा त्याला शोधण्यासाठी शेतात गेला असता गजानन शिराळे याने शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यानंतर शिवहार शिराळे याने याची माहिती ताडकळस पोलिसांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गजाननचा मृतदेह आरोग्य केंद्रातील डॉ. वसंत कांबळे यांच्याकडे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. शवविच्छेदन केल्यानांतर गजानन शिराळे याचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर रात्री उशिरा मृत गजानन शिराळे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय रामोड, प्रभाकर राठोड, धनंजय कणके यांच्याकडून करण्यात येत आहे.