Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5856

अन.. मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट, केली २० मिनीट चर्चा

मुंबई । राज्यावर कोरोनाचं संकट असताना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आज अत्यंत साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. यंदाचं वर्ष हे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६०वा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ मात्र, या मंगल घडीला अमंगल अशा कोरोनानं उत्सवाचं स्वरुप येऊ दिलं नाही. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांमध्ये जवळपास २० मिनिटं चर्चा सुरु होती. याआधी उद्धव ठाकरेंच्या हस्ते मंत्रालय परिसरात ध्वजारोहण करण्यात आलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपालांची भेट राज्यातील राजकीय परिस्थितीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर राज्यात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना आयोगाने कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २१ दिवसांनी विधानपरिषद निवडणूक पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कणखर देशा, पवित्र देश, महाराष्ट्र देशा……’

आज १ मे महाराष्ट्र दिन. शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या या महाराष्ट्राने सदैव संकट समयी देशाचे नेतृत्व केले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी लोकमान्य टिळकांच्या रूपाने असो की सामाजिक चळवळीत महात्मा फुलेंच्या रूपाने असो. १०५ हुताम्यांच्या बलिदानानंतर निर्माण झालेल्या या महाराष्ट्राने १९६० पासूनच सर्वच क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केलेले दिसते.

महाराष्ट्र कृषी, सहकार, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन, शिक्षण आदी अनेक क्षेत्रांत भरारी मारली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आणि गुंतवणूक विषय सकारात्मक धोरणाची तुलना करता महाराष्ट्राचा देशातील अन्य राज्याशीच नव्हे तर अनेक देशांप्रमाणे पेक्षाही वरचा क्रमांक लागतो.

महाराष्ट्राच्या प्रगतीत अनेक अडथळे आलेत. दुष्काळ, बॉम्बस्फोट , दहशतवादी हल्ले, महापूर मात्र महाराष्ट्राने या सर्वांवर मात करत आपली प्रगती चालूच ठेवली. इतकेच नव्हे तर संपूर्ण देशात अनेक पुरोगामी, क्रांतिकारी, लोकहिताचे कार्यक्रम राबविण्यात आपली आघाडी कायम ठेवली. रोजगार हमी योजना, ग्रामस्वच्छता अभियान, माहितीचा अधिकार, महिला आरक्षण असे अनेक निर्णय अगोदर महाराष्ट्राने घेतले नंतर ते देशपातळीवर स्वीकारले गेले. ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

महाराष्ट्राच्या राज्यकर्तेयांनी ही राज्याच्या हिताला चालना दिल्याचे दिसतेय. स्व.यशवंतरावानी शिक्षण, शेती, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला एक रोडमॅप आखून दिला. वसंतराव नाईकांनी हरितक्रांतीतुन राज्याला स्वयंपूर्ण केले. शंकररावानी प्रशासनावर वचक ठेऊन जनहीताची कामे केली. वसंतदादानी सहकार आणि शिक्षण क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवारांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

आर्थिक उदारीकरनांनंतरही महाराष्ट्रानी वित्त, माहिती तंत्रज्ञान,आदी क्षेत्रासाठी उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळाची उपलब्ध होण्याच्या बाबतीतही वृद्धी केली. अशा प्रकारे प्रगतीचा चालू असलेला हा रथ कायम चालू ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

आज आपल्या महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापन दिन आहे. आज सद्य परिस्थिती मध्ये जागतिक आरोग्य संकट निर्माण झाल्यामुळे आजचा हा वर्धापनदिन आपण शांतपणे, साधेपणाने आणि नवीन संकल्प करून साजरा करूयात. व पुढे येऊ घातलेले आर्थिक संकट यातून आपले राज्य नक्की सावरेल व पुनः पहिल्या सारखी आनंदी स्थिती निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करूयात. कारण सह्याद्री नेहमी हिमालयाच्या संकट समयी उभा असतो. म्हणूनच सेनापती बापट म्हणतात,
”महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न चाले.”
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा…!!

– अतुल मोरे ( मंठा)

Maharashtra Day 2018: Chronology of statehood of Maharashtra ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातेमुळे कराडात त्या ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली होती. आता बाळंतपणासाठी आलेल्या गरोदर मातेमुळे कराडातील त्या ६ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8 नागरिकांचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

प्राथमिक तपासण्यानंतर या सर्वांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालू आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासन कष्टाची पराकाष्ठा करत आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने नागरिकांच्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषकरून कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असलेने कराड शहर आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर घरातून बाहेर पडणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या सातारा जिल्ह्यात एकूण 52 कोविड-19 बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राची पुण्याई म्हणून महाराष्ट्र दिनीच ‘हा’ निर्णय झाला- संजय राऊत

मुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली असून आयोगाच्या या निर्णयाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात आला आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. महाराष्ट्राची मोठी पुण्याई म्हणून महाराष्ट्र दिनीच हा निर्णय झाला. हा महाराष्ट्रासाठी शुभ संकेत आहे, असं सांगतानाच काल काय झालं हे महत्त्वाचं नाही. आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले कि, ”निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात करोनामुळे चिंतेचं वातावरण असताना त्यात अशी अस्थिरता निर्माण होता कामा नये. उद्धव ठाकरेंना निवडून येण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण करोनाच्या संकटामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: पुढाकार घेऊन निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या निवडणुका घ्यायला सांगितल्या. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता या घटनेचं कुणीही राजकारण करू नये. ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर एकमेकांना सांभाळून घेण्याची आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. काल काय झालं हे महत्त्वाचं नसून आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे,” असं राऊत यांनी म्हटलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची आहे. आज एक नवा अध्याय सुरु होत आहे. महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातच पाच वर्ष राहणार आहे. मग कशाला राजकीय खेळ करायचे. निवडणूक आयोगाने राज्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रासाठी हा शिवसंकेत आणि शुभनिर्णय आहे” असं सांगतानाच राऊत यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचेही आभार मानले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

उद्धव ठाकरेंवरचं संकट टळलं; निवडणूक आयोगाची विधान परिषद निवडणुकीला परवानगी

मुंबई। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येत असून राज्यात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना आयोगाने कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २१ दिवसांनी विधानपरिषद निवडणूक पार पडणार असल्याचं निश्चित झालं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या पक्षांनी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांसाठी निवडणुका घेण्याबाबत आयोगाला विनंती करणारे पत्र पाठवले होते.  मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही तशी विनंती केली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका घेण्याबाबतची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. शिवसेनेचे गटनेते आणि मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही पत्रे राज्यपालांपर्यंत पोहोचवली. राज्यपाल कोश्यारी यांनीही निवडणूक आयोगाला या विधानपरिषद निवडणूक घेणे किती आवश्यक आहे हे सांगितले होते. त्यानंतर आज सकाळी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यावर ही निवडणूक बिनविरोध होण्याबाबतचा प्रस्ताव आल्यास भारतीय जनता पक्षाची भूमिका सहकार्याची राहील, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर या घडामोडी घडल्या असून त्यामुळे राज्यपालांशी संघर्षांऐवजी आपसातील संवादाने तोडगा निघाला आहे. निवडणूक आयोग लवकरच विधान परिषदेची निवडणूक जाहीर करेल असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

पवार साहेब तेव्हा खोटे बोलले होते!

किस्से राजकारण्यांचे | कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान सध्या वाद सुरू आहे. कनसेचा नेता भीमाशंकर पाटील याने ‘सिमाप्रश्नासाठी लढणाऱ्या नेत्याना गोळ्या घातल्या पाहिजेत.’असे उर्मट विधान करून स्वतःभोवती सगळा कर्नाटकी मीडियाचा झोत वळवून घेतला आहे. त्याचवेळी त्याला सीमाभाग आणि महाराष्ट्रातील जनतेकडून जोरदार उत्तर दिले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाद सुरू झाल्यावर काही वर्षांपूर्वी सिमाभागातील कन्नड सक्तीच्या विरोधात जेष्ठ नेते शरद पवार यांनी एक आंदोलन केले होते.त्या आंदोलनात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पवारांचे अनेक सहकारी सहभागी होते.

बेळगाव येथे हे आंदोलन होणार होते मात्र या आंदोलनाला शरद पवारच काय पण महाराष्ट्रातील पक्षीही येणार नाही असे तत्कालीन कर्नाटकी राज्यकर्त्यांनी सांगितले होते. मात्र आडमार्गाने एका कोळश्याच्या ट्रकमधून साध्या शेतकऱ्याच्या वेशात शरद पवार कर्नाटकात पोहोचले होते. हा ट्रक सांगली जवळच्या हरिपूर या गावचा होता आणि या ट्रकमध्ये सांगली जिल्ह्यातील कोतवडे गावचे सुरेश यादव होते. त्यांनीच मला या आंदोलनाची माहिती दिली.

ते म्हणाले,”संपत,आंदोलनाच्या रात्री शरद पवार बेळगावात पोहोचले. त्याच्या अगोदर दोन दिवस ते अज्ञातवासात असल्याच्या बातम्या येत होत्या. कर्नाटकातील प्रशासन बुचकळ्यात पडले होते. त्याच वेळी वेगवेगळ्या मार्गाने शेकडो लोक बेळगावच्या आसपासच्या गावात पाहुण्याच्या रुपात राहिले होते. सगळ्यांनी मिळून सकाळी दहा वाजता राणी चौकात जमायचे होते. सकाळी दहा वाजता ठरल्याप्रमाणे सगळे लोक पोहोचले. शिट्टी वाजली की शरद पवार यांनी यायचं अस ठरलेलं. मग शिट्टी वाजली आणि ते आले. आंदोलन सुरू झालं. महाराष्ट्रातील लोकांना बघताच कर्नाटकी पोलीस बिथरले. त्यांनी लाठीमार सुरू केला. लोकांच्या बरोबर शरद पवार यांनाही पाठीवर मार बसला. धोंडिराम मोहिते यांच्या कानाला मार बसल्याने कान फुटला. मग आम्हा सगळयांना अटक करून नेले. काही वेळाने पत्रकार आले. पत्रकार आल्यावर मी त्यांना सांगायला लागलो. ‘आम्हाला पोलिसांनी मारले. साहेबांनाही मारले. ‘ते ऐकताच साहेब माझ्यावर ओरडले”चूप…” साहेब लगेच पत्रकारांना म्हणाले “मला मारहाण झालेली नाही. आमची काही तक्रार नाही.”

सुरेश यादव यांच्याकडून मी हा प्रसंग अनेकदा ऐकला आहे. ‘पोलिसांनी लाठीमार करूनही पवारांनी मला मारलेल नाही असं का सांगितलं? ते खोटे का बोलले. कारण ते खरे बोलले असते तर महाराष्ट्रात असणारे कर्नाटकचे लोक, हॉटेल व्यवसायिक, परिवहन महामंडळाच्या गाड्या, त्यातील प्रवाशी यांच्यावर हल्ले झाले असते. आज त्यांची एवढी क्रेझ आहे. तेव्हा तर ते तरुण होते. महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत होते. आपल्याला मारहाण झालेलं महाराष्ट्रात समजलं तर अनर्थ होईल. तो टाळावा म्हणून पवार साहेब शांत बसले. पाठीवर लाठीचे तडाखे बसूनही हा माणूस म्हणाला, “मला कोणीही मारलेलं नाही. माझी कसलीही तक्रार नाही.”
– संपत मोरे
8208044298

रस्त्यांवर पडलेल्या वृध्दाला डॉ. सोळंकीच्या माणुसकीचा आधार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराडची माणुसकी या ग्रुपचे सदस्य असणारे डॉ. सोळंकी आणि संदिप कोटणीस हे उंब्रज (ता. कराड) येथील मेडिकल कॅम्प संपवून कराडला येत होते. यावेळी उंब्रजच्या वेशीवर पोहचाताच त्यांच्यासमोर एक वृद्ध गृहस्थ रस्त्यांवर आडवे पडले होते. मात्र या रस्त्यांवर वेदनांनी कळवळत असणाऱ्या वृध्दाला डॉ. सोळंकीच्या माणुसकीचा आधार मिळाल्याची माहीती संदिप कोटणीस यांनी फोटो शेयर करून दिली आहे.

घटनास्थळावरील माहीती अशी, डॉ. सोळंकी हे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून मेडिकल कॅम्पला ठिकठिकाणी जात आहेत. गुरूवारीही ते उंब्रज येथे गेले होते. मेडिकल कॅम्प संपल्यानंतर ते कराडला येत असताना त्यांना एक वृध्द रस्त्यांवर वेदनांनी कळवळत असताना दिसून आला. डॉक्टरांनी लगेच गाडीतुन खाली उतरून त्या ग्रहस्थांची चौकशी केली. त्यांनी त्याला व्यवस्थित तपासले. तेव्हा त्या वृध्दाचे खुब्याचे हाड मोडले होते. लगेच अँबुलन्सला फोन लावला आणि उंब्रजला त्वरित येण्याचे निर्देश दिले.

तोपर्यंत डॉ. सोळंकी यांनी माणुसकी जपत आधी त्या गृहस्थाला उचलून रस्त्यांच्या बाजूला आडोशाला घेतले. पेशंटच्या वेदना कमी होण्यासाठी स्वतःकडची औषधे दिली. काही वेळातच त्या वृध्दाचा मुलगा तिथे पोहोचला. त्याला सगळी परिस्थिती डॉक्टरांनी समजावली, काय नेमके करायचे ह्याचे मार्गदर्शन दिले. तसेच पुढील तपासणीसाठी जाताना काही मदत लागल्यास स्वतःचा मोबाईल नंबर देखील दिला. कोणतीही अडचण असल्यास मला फोन कर हे बजावून सांगितले. सध्या जेव्हा करोनाच्या भीतीपोटी लोक एकमेकांशी बोलणे देखील टाळतायत तिथे या डॉक्टरांनी दाखवलेली माणुसकी वाघीणण्याजोगी आहे.

Big Breaking | रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था । रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीन यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः मिशस्टीन यांनी अध्यक्ष व्लेदमीर पुतीन यांच्यासोबतच्या एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान याबाबत खुलासा केला आहे. तसेच आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होत असून पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशन मध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जानेवारी महिन्यातच मिशस्टीन यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती. रशियातील कोरोना विरुद्धच्या लढ्याचे ते नेतृत्व करत होते. मात्र आता खुद्द पंतप्रधानानांच कोरोनाची लागण झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. उपपंतप्रधान आंद्रेइ बेलोसोव्ह हे आता पंतप्रधान म्हणून कामकाज पाहणार असून याला अध्यक्ष पुतीन यांनी परवानगी दिली आहे.

रशियात मागील २४ तासांत एकूण ७०९९ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रशियातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखांहून अधिक असल्याची माहिती आहे.

कराड उपजिल्हा रुग्णालयातील 6 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५२ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 6 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8 नागरिकांचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, प्राथमिक तपासण्यानंतर या सर्वांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार कराड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 41 वर पोहोचली आहे. तर सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा 52 झाला आहे. कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाच कोरोनाची बाधा झाल्यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाधितांमध्ये आरोग्य सेविकांचा समावेश असून सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे अर्धशतक पुर्ण आहे. याआधी सातारा जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर सातारा शहर आणि आसपासची 9 गावे संपूर्ण सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते.

दरम्यान, कराड तालुक्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर हळू हळू रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. महिणाभरात तालुक्यातील रुग्णसंख्या आता 41 वर पोहोचली आहे. कराड शहर आणि मलकापूरसह आसपासची 11 गावे जिल्हाधिकारी यांनी याआधीच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. सातारा जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यात असल्याने इथे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरिही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केरळचे डावे सरकार कोरोनाशी लढण्यात उजवे कशामुळे ठरत आहे ?

लढा कोरोनाशी । विजय प्रसाद, सुबीन डेनीस

चीन मधून जेव्हा कोरोनावायरस बाबतच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती, तेव्हा केरळच्या डाव्या लोकशाही सरकारमधील आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी २५ जानेवारी २०२० मध्ये एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि २६ जानेवारी २०२० ला त्यांनी एका नियंत्रण कक्षाची स्थापना केली. केरळच्या आरोग्य खात्याने विविध प्रकारच्या १८ समित्या स्थापन केल्या. रोज संध्याकाळी बैठका केल्या जाऊ लागल्या. त्यासोबतच महत्त्वाची बाब होती – रोज सुरुवातीला के. के. शैलजा आणि नंतर मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची होणारी पत्रकार परिषद. यामध्ये जनतेला परिस्थितीच्या गंभीरतेबाबत समजावले आणि त्यासोबतच मिळून लढण्यासाठी तयार केलं गेलं.

३० जानेवारी, २०२० ला वुहान मधून आलेला विद्यार्थी हा कोरोनावायरसचा केरळमधील पहिला रुग्ण होता आणि त्यानंतर वुहानमधून आलेले अजून २ विद्यार्थी सापडले. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले गेले आणि ते बरेपण झाले. त्यामुळे समुदायात प्रसार (community spreading) झाला नाही. पण मार्चमध्ये जसे युरोपमधून लोक यायला लागले त्यासोबतच केसेस वाढायला सुरुवात झाली.

साखळी मोडा, “Break The Chain” ही डाव्या सरकारची घोषणा होती. सोबतच तपासणी (टेस्टिंग) मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या.
भारतातील सुरुवातीच्या सर्वात जास्त तपासण्या केरळमध्ये झाल्या आहेत. रुग्ण ज्या कोणत्या लोकांसोबत संपर्कांत आला असेल त्यांचा माग काढण्यात आला. कोरोना प्रभावित रुग्ण ज्या ज्या कोणत्या ठिकाणी गेला असेल ती ठिकाणे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमार्फत जाहीर करण्यात आली. जी ही लोकं या काळात त्या ठिकाणी उपस्थित होती त्यांना संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले. हे सगळं काम स्थानिक सरकारी अधिकारी आणि आशा आरोग्य सेविका यांनी मिळून केलं.

केरळ सरकारला जसं कळलं की वायरस हा पृष्ठभागावर राहतो, तसं सरकारने मोठ्या प्रमाणावर Hand Sanitizers आणि मास्क तयार करायला सुरुवात केली. सरकारी कंपनी आणि डीवायएफआय (Democratic Youth Federation of India) व इतर संघटनांनी सॅनिटायझर्स बनवायला सुरुवात केली. तर महिला सहकारी संस्थांनी मास्क बनवायला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले. रिकाम्या असलेल्या इमारती सरकारने ताब्यात घेतल्या आणि त्या ठिकाणी रुग्णांसाठीचा विलगीकरण कक्ष बनवण्यात आला. या ठिकाणचा सगळा खर्च सरकारने उचलला. कॉल सेंटर उभारण्यात आले. ज्यामध्ये २३१ समुपदेशकांनी आतापर्यंत २३,००० समुपदेशन सत्रे केली आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जनतेला ज्या दिवशी टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगितल्या, त्याच दिवशी केरळने २०,००० करोड चे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यामध्ये महिला सहकारी संस्था कुदुंबश्री मार्फत कुटुंबांना कर्ज, रोजगार हमी योजनेसाठी जास्तीचा पैसा, वृध्दांना दोन महिन्यांचं पेंशन, मोफ़त धान्य, सवलतीच्या दरात उपहारगृहांकडून अन्न, त्यासोबतच पाणी आणि वीज बिलात माफी आणि कर्जावरील व्याज रद्द हे सामील आहेत.

नवउदारवादाचं एक सर्वात‌ मोठं यश हे आहे की त्याने कमजोर राज्य आणि युद्ध व पैशांमध्ये गुंतलेल्या सरकारला – लोकशाही सरकार म्हणून लोकांत ठसवले आणि जी सरकारं सर्वसामान्यांचं आयुष्य अजून चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करतात त्यांना हुकुमशाही म्हणून लोकांत बिंबवले आहे. त्यामुळे चीन आणि केरळने कशा पद्धतीने या संकटाला तोंड दिले याची कल्पना करणे सुद्धा नवउदारवाद्यांना शक्य झाले नाही. (ते मुद्दाम करत नाहीत. देशात सुरुवातीला केरळमध्येच टेस्टिंगमुळे सर्वात जास्त पेशंट असताना सर्व माध्यमांत केरळबद्दलच्या बातम्या होत्या. परंतु केरळने नियंत्रण मिळवल्यावर एकही बातमी माध्यमांनी दाखवली नाही.)

कोरोनाविरोधातील लढा संपलेला नाही. आपल्याला अजून जागरुक राहावे लागेल. यावरचा उपाय (vaccines) शोधावा लागेल. पण केरळपासून धडा घ्यायलाच हवा.

महामारीसारख्या संकटात विचारी व्यक्तिला भांडवलशाही समाजापेक्षा समाजवादी समाजात राहायला आवडेल, कारण समाजवादी समाजातील लोकंच एकत्र येऊन या प्रकारच्या संकटाला तोंड देऊ शकतात, भांडवलशाहीत नाही.

http://janataweekly.org/kerala-is-a-beacon-to-the-world-for-taking-on-the-coronavirus/ (27th Mar)
(विजय प्रसाद हे भारतीय इतिहासकार, संपादक, पत्रकार आहेत. सुबीन डेनीस हे अर्थतज्ञ आहेत.)
भाषांतर – प्रा. स्वप्निल, एम.बी.ए झाले आहेत आणि लोकायत संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
8806966933