सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ वाढणार!

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने देशातील क्रिकेटच्या प्रशासनासाठी मंडळाला सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ही बाब स्पष्ट झाली, त्यासोबत बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. … Read more

‘क्रिकेट वर्ल्ड कप’ दर ३ वर्षांनी? बीसीसीआय-आयसीसी मध्ये वादाची ठिणगी!

आयसीसी च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा कालावधी ठरलेला असतो. त्यानुसार एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर चार वर्षांनी तर टी २० स्पर्धा दर दोन वर्षांनी खेळवली जाते. आता मात्र टी २० विश्वचषक स्पर्धा दरवर्षी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा दर ३ वर्षांनी आयोजित करण्याचा विचार आयसीसी करत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यात मतभेद होताना दिसून येत आहेत.

आता दरवर्षी अनुभवा ‘टी-२० वर्ल्ड कप’ चा थरार !!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वतीनं एक मोठा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलबरोबरच आता दरवर्षी टी-२० वर्ल्ड कप पाहण्याची संधी मिळणार आहे. याबाबत आयसीसीनं अंतिम निर्णय घेतला नसला तरी, यावर विचारविनिमय सुरू आहे. आयसीसीनं नव्यानं जाहीर केलेल्या प्रस्तावात प्रत्येक वर्षी टी-२० वर्ल्ड कप तर, दर तीन वर्षांनी एकदिवसीय वर्ल्ड कप होणार आहे.

सौरव गांगुलीचे ‘बीसीसीआय’ अध्यक्ष म्हणून नाव निश्चित

क्रिकेट विश्वावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा बॉस होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मुंबईत रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळं त्याची निवड निश्चित मानली जात आहे.

कोहलीची कर्णधार पदावरून होणार उचल बांगडी ; हा घेतला मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सध्या खलनायकाच्या भूमिकेत सर्वांच्या मनात सलू लागला आहे. कारणही तसे तगडेच आहे. कारण भारतीय संघाला विश्वचषकाच्या सेमी फायनल मधून हार स्वीकारून मायदेशी माघारी यावे लागले आहे. तर या पराभवाचे खापर विराट कोहलीच्या खराब नेतृत्वावर फोडले जाते आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. … Read more

धोनी तू निवृत्त हो ! अन्यथा तुला खेळू दिले जाणार नाही

मुंबई प्रतिनिधी |  महेंद्रसिंग धोनीच्या बॅटमध्ये ती जुनी जादू राहिली नाही. त्यामुळे धोनी पहिल्या सारखा करिष्मा करू शकत नाही. तसेच सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड करून दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात धोनी धीम्या गतीने खेळला म्हणून त्याच्यावर चहूबाजूने टीकेचा वर्षाव केला जातो आहे. अशा अवस्थेत बीसीसीआय कडून देखील धोनीला निवृत्तीसाठी दबाव टाकला जाण्याची शक्यता आहे. माजी … Read more

world cup 2019 : भारतीय क्रिकेट संघ जाहीर असे असणार खेळाडू

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | आयपीएलचा सीजन भरत आला असताना इंग्लंड मध्ये होणाऱ्या २०१९ सालच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० जून पासून सुरु होणाऱ्या या क्रिकेट सामन्यासाठी भारताने नेतृत्वाची धुरा विराट कोहली याच्यावर सोपवली आहे. तर उपकर्णधाराची जबाबदारी रोहित शर्मा याच्या कडे देण्यात आली आहे. २०१९ विश्व चषकासाठीचा भारतीय क्रिकेट संघ  … Read more

राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती

thumbnail 1530802788938

दिल्ली : बीसीसीआयच्या अंतरिम संविधानावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका रोखून धरत त्यावर स्थगिती आणत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. बीसीसीआयचे प्रशासन शिस्तबद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार असून राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणूकांचा निकाल राखून ठेवल्याचे न्यायालयाने निकालादरम्यान सुनावले आहे.