सोने-चांदी खरेदी करण्यासाठी केवायसी आवश्यक असेल का? सत्य काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपण सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात …? अलीकडेच असा रिपोर्ट समोर आला होता ज्यामध्ये असे म्हटले गेले होते की, आतापासून सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी केवायसीची आवश्यकता असेल. ही बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. या मेसेजमध्ये असे सांगितले जात आहे की, आता सोने खरेदी करण्यासाठी पॅन आणि आधार कार्डची आवश्यकता भासू शकते. चला तर मग या बातमीच्या सत्यतेबद्दल जाणून घ्या-

जेव्हा प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने या बातमीचा तपास केला तेव्हा ती पूर्णपणे बनावट असल्याचे आढळले … अर्थात असा कोणताही नियम लागू केलेला नाही. ट्वीट करून PIB ने काय म्हटले ते जाणून घ्या-

PIB ने ट्विट केले
पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले की, एका अधिसूचनेनुसार केवळ 10 लाख रुपयांच्या दागिन्यांवर केवायसी करणे आवश्यक आहे. या माध्यम अहवालात असा दावा केला जात आहे की, तुम्हाला जर सोन्या-चांदीचे कितीही दागिने खरेदी करायचे असतील तर पॅन / आधार कार्ड आधारित #KYC मिळणे आवश्यक असेल. पीआयबीने सांगितले की, हा दावा पूर्णपणे खोटा आहे, सरकारने असा कोणताही नियम जारी केलेला नाही.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1347447921310982145?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347447921310982145%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Fit-is-claimed-that-aadhaar-and-pan-card-kyc-will-be-necessary-for-buy-gold-and-silver-pib-fact-check-ndss-3410459.html

सरकार काय म्हणाले माहित आहे?
मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट, 2002 (PML Act, 2002) अंतर्गत 28 डिसेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, सोन्याचे, चांदी, दागिने व दहा लाख रुपयांच्या किंवा त्याहून अधिक किंमतीच्या धातुंच्या रोकड व्यवहारासाठी केवायसी डॉक्युमेंट दाखवावे लागतील. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने 28 डिसेंबर 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ज्वेलरी, सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंचे रत्ने व दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या दागिन्यांची खरेदीसाठी केवायसीची आवश्यकता गेल्या काही वर्षांपासून देशामध्ये जारी करण्यात आली आहे. आहे. आणि ते अजूनही चालू आहे.

https://t.co/MRR2BePKjx?amp=1

कोरोना काळात बनावट बातम्या वाढत आहेत
कोरोना काळात देशभरात ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यामध्ये अनेक बनावट बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने या व्हायरल बातमीचा इन्कार करत म्हटले आहे की, सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोना कालावधीत अशा बनावट बातम्यांचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारनेही अनेक प्रयत्न केले आहेत.

https://t.co/k41ljuuAuB?amp=1

आपणही फॅक्ट चेक करू शकता
आपणासही असा मेसेज मिळाला असल्यास आपण https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः [email protected] वर फॅक्ट चेकसाठी पीआयबीला पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

https://t.co/a6vt1pL463?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment