Monday, December 15, 2025
Home Blog Page 1674

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्यामागे भाजपचा हात; मनसेच्या आरोपाने खळबळ

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केल्यांनतर आता मनसेच्या आणखी एका बड्या नेत्याने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्यामागे भाजपचा (BJP) हात आहे, महाराष्ट्र भाजपही या पापात सहभागी आहे असा थेट आरोप मनसेचे दिग्गज नेते प्रकाश महाजन यांनी केलाय. त्यामुळे भाजप आणि मनसेत सर्व काही आलबेल नाही असंच दिसत आहे.

प्रकाश महाजन म्हणाले, जेव्हा राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हा भाजपाच्या एका टिनपाट गुंडाने अयोध्येत न येण्याची धमकी त्यांना दिली. तेव्हा ही लोकं गप्प होती. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या पापात भाजप सामिल आहे.

आता नवीन राज्य आल्यानंतर सर्व लोक शिवतीर्थवर येतात. मात्र या सरकारला काही वाटत नाही की राज ठाकरेंवर असलेल्या खोट्या केसेस मागे घ्याव्यात. राज ठाकरेंवरील जुन्या केसेस मागे घेतल्या नाही तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देवू, असा थेट इशारा महाजन यांनी दिला. प्रकाश महाजन यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप आणि मनसेमध्ये काही बिनसलं आज का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

साताऱ्यात लग्नातून 4 महिलांचे सोन्याचे दागिने लंपास

सातारा | शहरातील संगमनगर परिसरातील एका मंगल कार्यालयातून चार महिलांचे सुमारे 1 लाख 83 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत. संगमनगर परिसरात सातारा- कोरेगाव रस्त्यावर मंगल कार्यालय आहे. दुपारी तीन ते साडेपाच या कालावधीत मंगल कार्यालयातील कार्यक्रमात आलेल्या चार महिलांचे अनोळखी चोरट्याने दागिने लांबविले.

एका लग्नास आलेल्या आशा रामचंद्र अनपट (रा. अनपटवाडी, ता. वाई), शुभांगी धनाजी जाधव (रा. शिवराज पेट्रोल पंप, सातारा), हेमलता विजय मोरे (रा. दुर्गा पेठ, सातारा), प्रणिता सागर बर्गे (रा. कोरेगाव, ता. कोरेगाव) या चार महिलांचे एकूण 1 लाख 83 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरून नेले आहेत.

याबाबत आशा अनपट यांनी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. महिला हवालदार अवघडे तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांनी पाहणी केली. गुन्ह्याच्या तपासासाठी पथक तयार करण्यात आले आहे. मंगल कार्यातून गेल्या महिन्यात चक्क नवरी मुलीचे लाखो रूपयाचे दागिने लंपास करण्यात आले होते. त्यामुळे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

शिंदें गटाच्या आमदाराला देवीच्या दर्शनापासून रोखल्यामुळे कार्यकर्ते-भाविकांमध्ये बाचाबाची

Santosh Bangar

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – सध्या हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे मसाई देवीची यात्रा सुरू आहे. यादरम्यान हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना गावकऱ्यांनी यात्रेमध्ये देवीचं दर्शन घेण्यापासून रोखले. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी आले होते, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना थांबवले.

गावातील यात्रेत कोणत्याही पक्षाचे आमदार, खासदार, नेते येण्याची प्रथा नसल्याचे कारण देऊन गावकऱ्यांनी आमदार बांगर यांना अडवलं. यानंतर गावकरी आणि आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी आमदार बांगर यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यानंतर बांगर (Santosh Bangar) यांचे समर्थक आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि बघता बघता त्या ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झाली. यानंतर गावकऱ्यांनी सामोपचाराने आमदार संतोष बांगर यांना यात्रेत दर्शन घ्यायला जाऊ दिले. तसेच यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. मी देवीच्या यात्रेत जाऊन दर्शन घेतले, मला गावकऱ्यांनी रोखलं नाही. काही चार-पाच उनाड लोकांनी विनाकारण गोंधळ घातला अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती

रोहित पवार आता क्रिकेटच्या मैदानात; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

rohit pawar MCA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहित पवार यांनी आपले आजोबा शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचे दिसत आहे. कारण शरद पवारांनी सुद्धा अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. तसेच आयसीसी आणि बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सुद्धा ते राहिले होते.

आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन कमिटीची बैठक पार पडली. यावेळी रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. रोहित पवार यांसोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय सचिवपदी शुभेंद्र भंडारकर, सहसचिवपदी संतोष बोबडे आणि खजिनदारपदी संजय बजाज यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शरद पवार आणि क्रिकेट यांचं नातं संपूर्ण देशाला माहित आहे. शरद पवारांनी अनेक वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन, तसेच आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले आहे. क्रिकेटमध्ये शरद पवारांनी अनेक मोठे निर्णय घेतले होते. आता रोहित पवार सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकटच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांची कारकीर्द कशी होते हे आता पाहावं लागेल.

दरम्यान, खेळासाठी मी माझ्यापरीने काम करतच आहे पण माझ्या आवडीच्या क्रिकेट या खेळासाठीही काम करण्याची खूप दिवसांची इच्छा होती. आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे #MCA च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून तशी संधी मिळाली.आदरणीय पवार साहेबांनी सर्वच खेळासाठी सह्याद्रीइतकं मोठं काम केलं. ती उंची गाठणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शक्य नसलं तरी आदरणीय पवार साहेबांच्या रूपातील सह्याद्रीच्या शिखराकडं दीपस्तंभाप्रमाणे पाहूनच आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी खेळासाठी प्रामाणिकपणे काम करत राहील! अस ट्विट रोहित पवारांनी केलं.

खेळातुन एखादा राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू निर्माण व्हावा- रामकृष्ण वेताळ

ramkrishna vetal

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलासुप्त गुणांना वाव मिळाला, खेळातून एकदा राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण व्हावा. खेळामुळे आपले मन ,शरीर कणखर व दणकट बनते. साहस, जिद्द, चिकाटी,सराव आणि सातत्य असले की खेळात यश मिळते असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले. यशवंत शिक्षण संस्थेचे सुर्ली माध्यमिक विद्यालयत आयोजित संस्था अंतर्गत क्रीडा स्पर्धा चे उद्घाटन वेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव डी. ए.पाटील, सरपंच दत्तात्रय वेताळ,प्रा.सचिन जाधव, सुजाता जाधव.मुख्याध्यापक ए.आर.मोरे,डी.पी.पवार,व्ही.एच.कदम,जी.बी देशमाने,के.आर.साठे व सर्व शाखांचे क्रिडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

रामकृष्ण वेताळ म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यासाठी स्वर्गीय ए.व्ही.पाटील यांनी ग्रामीण भागात शाळा सुरू केली. यामुळे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले. क्रिडा स्पर्धेत जय पराजय होतो, यामध्ये खेळाडूनी खिळाडूवृत्तीने खेळावे.

यावेळी संस्था सचिव डी.ए.पाटील म्हणाले की, विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी संस्था शाळा स्तरावर विविध सहशालेय उपक्रम राबविते. खेळाने आपले अंगी चपळपणा येतो. खेळामुळे मन, मेंदू,मनगट,शरीर दणकट व निरोगी राहते. जिद्द, चिकाटी व मेहनत घेतली की खेळात यश मिळते. शासकीय क्रिडा स्पर्धेत ही संस्था मधील शाळांनी हॉलीबॉल स्पर्धेत, वैयक्तिक कुस्ती,जुदो, स्केटिंग मध्ये यश संपादन केले आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.जे.मुळीक, स्वागत मुख्याध्यापिका के.आर.साठे यांनी सुत्रसंचलन एन.पी.पाटील यांनी व आभार आर.टी.पाटील यांनी मानले.

…. तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते; राज ठाकरे असं का म्हणाले?

raj thackeray ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज ते मुख्यमंत्री झाले असते असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. पुण्यात ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचं आयोजन आलं आहे. यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा सत्कार राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकेबाजी केली तसेच अशोक सराफ यांचे कौतुक केलं.

कलावंतांचे आपल्या देशावर खूप उपकार आहेत. कलाकार नसते तर देशात कधीच अराजकता आली असती. आपला देश चुकीच्या दिशेला गेला नाही, त्याला कारण अशोक सराफ यांच्यासारखे कलावंत आहेत. असं राज ठाकरे म्हणाले. आज जर अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असती तर मुख्यमंत्री झाली असती. त्यांच्या 40 – 40 फूट कटावेजवर दुग्धभिषेक झाला असता. पण आपल्या महाराष्ट्रात याच काही नाही. आपल्याकडे प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत असेही ते म्हणाले.

कलाकारांचे महत्त्व काय असत ते परदेशात गेल्यावर कळत. हाच कार्यक्रम जर युरोपात असता तर त्या देशाचे पंतप्रधान कार्यक्रमात हजर राहिले असते. राज ठाकरे म्हणाले. तर तर अशोक सराफ हे मूळ बेळगावचे आणि जन्म मुंबईचा आहे. खरंतर त्यांनी बेळगाव सीमावाद प्रश्न सोडवायला हवा असं राज ठाकरे म्हणताच सगळीकडे हशा पिकला.

प्रीतम मुंडेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान! म्हणाल्या “सगळे घाव झेलायला ताई आणि…..”

pankaja and pritam munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी आपली मोठी बहीण पंकजा मुंडेंबाबत एक मोठे विधान केले आहे. “सगळे घाव झेलायला ताई आणि मलई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले आहे.

काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?
“आज ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे. पण हा नारा प्रत्यक्षपणे 40 वर्षे ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात एक व्यक्ती जगली. ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे. माझा जन्म त्यांच्या घरी झाला, त्यामुळे माझ्याइतकं भाग्यवान कुणी नाही, असं मला वाटतं. त्यापेक्षा माझं (pritam munde) मोठं भाग्य म्हणजे माझा जन्म पंकजाताईंच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायला ताई आहे आणि त्याची सगळी मलई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं.

तसेच त्या पुढे म्हणल्या, आयुष्यात संघर्ष करा, कष्ट करा, हे गोपीनाथ मुंडेंच्या घरी जन्मलेल्या मुलींनी व्यासपीठावर बसून सांगू नये, असं काहींना वाटत असेल. पण माझा येथे बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. ठीक आहे… आम्ही नशिबवान आहोत. कारण माझा किंवा राहुल कराडचा आमच्या घरी जन्म झाला. पण गोपीनाथ मुंडे कुठल्या मोठ्या माणसाच्या घरी जन्मले नव्हते किंवा विश्वनाथ कराड कुठल्या दिग्गज माणसाच्या घरी जन्मले नव्हते.”“त्यामुळे तुम्हाला राहुल कराड व्हायचंय की विश्वनाथ कराड व्हायचंय हा तुमचा निर्णय आहे. तुम्हाला प्रीतम मुंडे (pritam munde) व्हायचंय की गोपीनाथ मुंडे व्हायचंय हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही ठरवलं तर तुम्ही गोपीनाथ मुंडे किंवा विश्वनाथ कराड का होऊ शकत नाही? ही जिद्द मनाशी बाळगा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा, असं केलंत तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल,” असे प्रीतम मुंडे नाशिक येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणल्या आहेत.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

‘या’ Penny Stock ने गेल्या 20 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात केली 150 पटींनी वाढ

Penny Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Penny Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी अगदी कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी प्रत्येकाला भविष्यात मोठा नफा कमावून देणाऱ्या पेनी स्टॉकविषयीची माहिती हवी असते. जर आपणही अशाच पेनी स्टॉकच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. मात्र, हे ध्यानात घ्या कि, Penny Stock मध्ये गुंतवणूक करणे धोकादायक मानले जाते. असे स्टॉक कोट्यवधी रुपये मिळवून देत असले तरीही त्यामध्ये पैसे बुडण्याचा धोकाही जास्त असतो. आज आपण अशाच एका पेनी स्टॉकबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने कमी कालावधीत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे.

Stock Market Today: Stocks Close Higher After Terrible Tuesday | Kiplinger

आज आपण ज्या कंपनीच्या शेअर्सबाबत चर्चा करणार आहोत त्याचे नाव Kaiser Corporation असे आहे. हे लक्षात घ्या कि, BSE वर लिस्टेड असलेल्या या शेअर्सने अवघ्या 20 महिन्यांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये मिळवून दिले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 1,312.16 टक्के इतका जबरदस्त रिटर्न दिला आहे. Penny Stock

Kaiser Corporation share delivered 20000 percent return in one year 1 lakh  turn to 2 crore rupees - Business News India - 39 पैसे का शेयर 78 रुपये का  हुआ, सालभर में 1 लाख का निवेश बन गया ₹2 करोड़

1 लाखाची गुंतवणूक दीड कोटी केली

मे 2021 मध्ये 35 पैसे किंमत असलेले हे शेअर्स आज 52.25 रुपयांच्या पातळीवर आहेत. गेल्या 20 महिन्यांच्या कालावधीत या शेअर्सच्या किंमती 150 पटीने वाढल्या आहेत. जर एखाद्याने मे 2021 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याच्या गुंतवणूकीचे मूल्य 1.5 कोटी रुपये झाले असते. Penny Stock

करोड़पति स्टॉक: 10 रु से कम के इन 5 शेयरों ने बनाया अमीर, 200 गुना तक बढ़ाए  पैसे

कंपनीचा रेकॉर्ड जाणून घ्या

Kaiser Corporation च्या शेअर्सचा रेकॉर्ड चढ-उतारांनी भरलेला आहे. या कंपनीच्या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक 130.55 रुपये आहे तर गेल्या 52 आठवड्यांचा विक्रमी नीचांक रुपये 3.37 आहे. मात्र गेल्या 6 महिन्यांत या शेअर्समध्ये जवळपास 50 टक्क्यांनी घसरण झाली आहे. जुलै 2022 मध्ये103.25 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 52.25 रुपयांच्या पातळीवर आहेत. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 9 टक्क्यांची घसरण झाल्याचे पहायला मिळते आहे. Penny Stock

Indian Currency In A White Background Stock Photo - Download Image Now -  Indian Currency, Stock Market Data, India - iStock

Kaiser Corporation च्या व्यवसायाबाबत जाणून घ्या

Kaiser Corporation Limited (KCL) या स्मॉल कॅप कंपनीची मार्केट कॅप 275 कोटी रुपये आहे. ही कंपनी लेबल, स्टेशनरी आर्टिकल्स, मासिके आणि कार्टनच्या व्यवसायात गुंतलेली आहे. याशिवाय, कंपनी तिच्या उपकंपन्यांद्वारे इंजिनिअरिंग गुड्स, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग प्रोजेक्टमध्ये देखील काम करते. 1993 मध्ये सुरू झालेली ही एक भारतीय कंपनी आहे. मार्च 1995 मध्ये, Kaiser प्रेस लिमिटेडची पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. तसेच 2013 मध्ये कंपनीचे नाव बदलून Kaiser Corporation Limited असे करण्यात आले.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/kaiser-corporation-limited/kacl/531780

हे पण वाचा :
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट
Car च्या डिक्कीत ठेवा ‘हे’ Device; पंक्चर टायर एका मिनिटांत होईल ठीक
Gold Price : गेल्या आठवड्याभरात सोने महागले तर चांदीची चमक पडली फिकी, नवीन वर्षात काय होईल ते जाणून घ्या

Auto Expo 2023 मध्ये दिसणार ‘ही’ जबरदस्त Electric Sedan; 700 किमी रेंज

byd seal electric sedan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑटो एक्स्पो 2023 मध्ये (Auto Expo 2023) आपल्याला अनेक दमदार गाड्या पाहायला मिळणार आहेत. भारतातील या मोठ्या ऑटोमोबाईल इव्हेंट मध्ये चीनी ऑटोमेकर कंपनी BYD आपली नवीन इलेक्ट्रिक कार सील सेडान सादर करण्याची शक्यता आहे. या कारमध्ये नेमके काय फीचर्स असतील याबाबत आपण जाणून घेऊया.

वैशिष्ट्ये – (Auto Expo 2023)

BYD सील इलेक्ट्रिक सेडान कार (Auto Expo 2023) आधीच जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या सेडानची लांबी 4.80 मीटर, रुंदी 1.87 मीटर, उंची 1.46 मीटर आणि व्हीलबेस 2.92 मीटर आहे. ही इलेक्ट्रिक कार आकाराने मोठा मोठी असल्याने केबिन स्पेसही मोठा मिळतो.

byd seal electric sedan
byd seal electric sedan

BYD च्या सेडान कार सील मध्ये फ्लश फिटिंग डोअर हँडल, चार बूमरँग आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन आणि मागील बाजूस पूर्ण-रुंदीचा एलईडी लाइट बार मिळेल. याशिवाय गाडीच्या आतील भागात 15.6-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हेड्स-अप डिस्प्ले मिळेल.

byd seal electric sedan
byd seal electric sedan

700 किलोमीटर रेंज-

BYD सीलमध्ये ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानाचा (Auto Expo 2023) वापर करण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक सेडान दोन बॅटरी पॅकसह येते. यापैकी एक 61.4kWh आणि दुसरा 82.5kWh बॅटरी पॅक आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, यातील पहिल्या बॅटरीवर ही कार 550 किमीची रेंज देऊ शकते. तर दुसरी बॅटरी एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक सेडान तब्बल 700 किलोमीटर धावू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग वाढवू शकते.