‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री उशिरा पर्यंत चालले मतदान

जिल्ह्यात काल विधानसभेचे मतदान शांततेत मतदान पार पडले असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. काल सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान करण्याची वेळ होती. या गावात ८.३० पर्यंत मतदान चालू होते. या मतदान केंद्रामध्ये तब्बल ३००० मतदार असताना सुद्धा केवळ दोन व्हीव्हीपॅट वर काम चालू होते.

कमी मतदानामुळे प्रमुख उमेदवारांच्या चिंतेत वाढ !

नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदार संघात पन्नास टक्यापेक्षा कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह, तीन दिवसाच्या सुट्टीचा बेत, मतदानातील उदासीनता, नोकरदारांचे स्थलांतर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवरील संशय यामुळे मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणूकीपेक्षा घसरली असल्याची चर्चा सुरू होती.

राज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५५ टक्के मतदान झालंय. ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झालीये. तर शहरी भागात मात्र मतदान कमीच झालं.

मतदान केंद्रावर ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्याचा राडा; ईव्हीएमवर शाई फेकत दिल्या घोषणा

राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र मतदान करण्यासाठी अवघा एक तास उरला असताना ठाण्यातील एका मतदान केंद्रामध्ये ईव्हीएमवर शाई फेकण्याची घटना घडली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या एक कार्यकर्ता मतदानासाठी मतदान केंद्रावर आला असता त्याने निवडणूक कर्मचाऱ्यांजवळील शाईची बाटली हिसकावली आणि ईव्हीएमवर शाई फेकली. यावेळी मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. सुनील खांबे असे या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. खांबे यांनी शाई फेकल्यानंतर ‘ईव्हीएम मुर्दाबाद’च्या घोषणाही दिल्या. पोलिसांनी सुनील खांबे यांना ताब्यात घेतले.

परभणी जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदान, गोदाकाठच्या ७ गावांचा मतदानावर बहिष्कार कायम

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदान संथ गतीने चालू असुन दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५२.८६ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ पाथरी मतदारसंघात ४९.३५ टक्के तर गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ४३.९२ आणि ४३.७४ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांचा केंद्रात येण्याचा वेग वाढेल आणि ६० ते ६५ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे.

साताऱ्यात मतदानाची सरासरी टक्केवारी निम्म्यापेक्षा कमीच; घटलेल्या मतदानाचा अर्थ काय?

सातारा जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ४ वाजेपर्यंत ४८.४५ टक्के मतदान झाल्याचं पहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील सातारा-जावली,कोरेगाव,खंडाळा,कराड उत्तर,कराड दक्षिण, फलटण, माण-खटाव आणि पाटण या ८ मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानातून ही सरासरी काढण्यात आली आहे. आजच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होती. मतदार पुनर्रचनेत फलटण आणि माण-खटाव हे दोन मतदारसंघ माढा लोकसभेत गेल्याने उर्वरित ६ मतदारसंघातील नागरिकांनी लोकसभेच्या जागेसाठीही मतदान केलं.

‘अब की बार २५० टच !’ – चंद्रकांत पाटील

‘भाजपा’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावरील शिलादेवी शिंदे सरकार महाविद्यालयाच्या ६१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरती पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

अकोला जिल्हयात ३ वाजेपर्यँत ४२.६ टक्के मतदान

जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मुर्तीजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमधील १७०३ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासून मतदानास सुरुवात झाली. ढगाळ वातावरण असतानाही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत पाचही मतदारसंघांमध्ये सरासरी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सरासरी ४२.६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अकोट- ४५. ४१ टक्के, २९-बाळापूर टक्के, ४६.६३ टक्के, अकोला पश्चिम- ३७.८६ टक्के, अकोला पूर्व- ४०.७१ टक्के, मूर्तिजापूर- ४०.६९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मत कुणालाही द्या, पण मत द्या – नितीन गडकरी

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या खालोखाल सर्वाधिक प्रचारसभा नितीन गडकरी यांनी घेतल्या होत्या. यावेळी केंद्रात रस्ते, वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रीपद भूषवणाऱ्या नितीन गडकरी यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केलं. लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणं अत्यावश्यक असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले.

करमाळ्यात मतदानाला गालबोट, संजय शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा प्रकार

सोलापूर प्रतिनिधी । अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या मारहाणीत नारायण पाटलांचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला जबर मार बसल्याने कार्यकर्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माढ्यातील दहिवली भागात … Read more