महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार ?

सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेना यांच्यात अजूनही दिलजमाई झालेली नाही आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदावर आपला दावा सोडायला तयार होताना दिसत नाही. तर भाजपा एक पाऊल मागे येऊन शिवसेनेच्या मागणीला दाद देतांना दिसत नाही आहे. अशा सर्व परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आम्हाला आमचं वास्तव माहित आहे, राष्ट्रवादी स्वप्नरंजनात नाही – जयंत पाटील

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत बसतांना आपल्या अटींवर कायम असून राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत शिवसेना इतर पर्यायांचा विचार करू शकते असे संजय राऊत वारंवार सां

‘कमळ’ वाला निवडून आला तर सांगतोच; ईव्हीएम घोळवरून सातारकर संतप्त

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी ईव्हीएममध्ये गडबड असल्याच्या घटना मतदानादिवशी उघडकीस आल्या आहेत. कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळालाच जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आपला राग सातारा जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांच्यावर काढला आहे. तुम्ही मोदी-शहांचं कंत्राट घेऊन काम करता का? अशा शब्दांत नागरिकांनी मोनिका सिंग यांना खडे बोल सुनावले आहेत. साताऱ्यातील नवलेवाडी येथे ‘ईव्हीएम’मध्ये घोळ झाल्याने नागरिक संतप्त झाले होते.

बुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. परंतु या निवडणुकी दरम्यान मतदान प्रकियेच्या गोपनीयतेचा भंग झाला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मतदान प्रक्रियेनंतर काही मतदानकर्त्यांनी मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून याकडे निवडणूक विभागाचं किती दुर्लक्ष आहे हे यावरून दिसून येत आहे.

अनिल गोटेंचा ईव्हीएमच्या गाडयांना पहारा; आपल्या वाहनात रात्रभर ठिय्या

अनिल गोटे मात्र मतदान पार पडल्यानंतरही एका वेगळ्याच कामात व्यस्त होते. मागील काही निवडणुकांपासून ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जात असल्याने त्यामध्ये काही फेरफार होतो की काय म्हणून गोटे हे चक्क या गाड्यांच्या बाहेर आपल्या वाहनात ठिय्या मांडून होते. पहाटे तीन वाजता ज्या ठिकाणी या मशीन ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी गोटेंनी ठिय्या मांडला होता

राज्यात 55 टक्के मतदान, शहरी भागात मतदान घटले

राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या ठोक्याला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 24 तारखेला निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात एकूण ५५ टक्के मतदान झालंय. ग्रामीण भागात अधिक मतदानाची नोंद झालीये. तर शहरी भागात मात्र मतदान कमीच झालं.

हो, फडणवीस पुन्हा येणार..!! महायुतीला मिळणार १८५ ते १९५ जागा

टीम हॅलो महाराष्ट्र । दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपेक्षा मतदानाची टक्केवारी खालावली असून ठाण्यात मतदानाच्या टक्केवारीचा निच्चांक पहायला मिळाला. विरोधकांचं निष्प्रभ असणं, ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं पक्षांतर, कलम ३७० चा निवडणूक प्रचारासाठी केलेला वापर, कार्यक्षम मुख्यमंत्री अशी प्रतिमा ठसवण्यात देवेंद्र फडणवीसांना आलेलं यश … Read more

परभणी जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदान, गोदाकाठच्या ७ गावांचा मतदानावर बहिष्कार कायम

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात मतदान संथ गतीने चालू असुन दुपारी ३ पर्यंत ४७.५३ टक्के मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५२.८६ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ पाथरी मतदारसंघात ४९.३५ टक्के तर गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ४३.९२ आणि ४३.७४ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांचा केंद्रात येण्याचा वेग वाढेल आणि ६० ते ६५ टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे.

साताऱ्यात मतदानाची सरासरी टक्केवारी निम्म्यापेक्षा कमीच; घटलेल्या मतदानाचा अर्थ काय?

सातारा जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ४ वाजेपर्यंत ४८.४५ टक्के मतदान झाल्याचं पहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील सातारा-जावली,कोरेगाव,खंडाळा,कराड उत्तर,कराड दक्षिण, फलटण, माण-खटाव आणि पाटण या ८ मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानातून ही सरासरी काढण्यात आली आहे. आजच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही होती. मतदार पुनर्रचनेत फलटण आणि माण-खटाव हे दोन मतदारसंघ माढा लोकसभेत गेल्याने उर्वरित ६ मतदारसंघातील नागरिकांनी लोकसभेच्या जागेसाठीही मतदान केलं.

‘अब की बार २५० टच !’ – चंद्रकांत पाटील

‘भाजपा’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावला. कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावरील शिलादेवी शिंदे सरकार महाविद्यालयाच्या ६१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरती पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.