राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, काँग्रेसचा ‘हा’ नेता मांडणार बाजू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात सरकार स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यपालांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आता शिवसेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कडून सेनेने सदर याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी … Read more

राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची राष्ट्रपतींना शिफारस?

विशेष प्रतिनिधी | राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल पाठवला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवार संध्याकाळी ८:३० … Read more

बंगालमध्ये ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा तडाखा

दिल्ली प्रतिनिधी । बंगाल राज्यातील कोलकाता शहर, चोवीस परगणा व पूर्व मिदनापुर ह्या जिल्ह्यांना बुलबुल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. सुमारे ताशी १७० किलोमीटर वेगाने वाहणारे ह्या वाऱ्यांमुळे बंगाल परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत दहा बळी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यात आगामी येऊ घातलेली नियोजित यात्रा यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी । आदर्श आचारसंहितेचे जनक व निवडणूक सुधारणांचा प्रारंभ करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेलई नारायण अय्यर (टीएन) शेषन यांचे काल ह्रदयविकारामुळे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या दिड वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. टी एन सेशन यांच्याबद्दल – -टीएन शेषन हे 1955 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तामिळनाडू केडरचे अधिकारी होते. … Read more

अयोध्या निकालावर तापसी म्हणते, ‘हो गया. बस. अब?’

मुंबई प्रतिनिधी | आज अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विटरवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Ho gaya. Bas. Ab ? — taapsee pannu (@taapsee) November 9, 2019 तापसीने … Read more

मी पुन्हा येईल म्हणणार्‍या फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. ‍‌१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज ८ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9 — ANI (@ANI) November … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट? अॅटर्नी जनरल व राज्यपालांच्या दरम्यान चर्चा

मुंबई प्रतिनिधी | राज्यात अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले आहे. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र भाजपने उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान विधानसभेचा … Read more

दिल्लीत आजपासून सम-विषम; नियमभंग केल्यास ४ हजार दंड

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या प्रदुषण पातळी मध्ये वाढ झाल्यामुळे संपूर्ण शहरात धुराचा एक थर हवेमध्ये तयार झाला आहे. त्यामुळे स्वच्छ असलेलं वातावरण आता धुरमय झाल्याने नागरिकांना श्वसनाचा व इतर त्रास होत आहे. यासाठी दिल्ली मध्ये पुन्हा ०४-०५ नोव्हेंबर पासून सम विषम योजनेवर कार धावतील. यातून दिल्ली सरकारने अपंग व्यक्ती, दुचाकी आणि आपत्कालीन … Read more

50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन

नवी दिल्ली प्रतिनिधी । ‘इफ्फी’ (IFFI) म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा 50 वे वर्ष आहे. यानिमित्त गोवा इथं 20-28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये अकादमी विजेते म्हणजेच ऑस्कर पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या चित्रपट महोत्सवामध्ये ‘ऑस्कर रिट्रोस्पेक्टिव्ह’ या शीर्षकाचे एक स्वतंत्र दालन असणार आहे. या दालनामध्ये मिशेल कर्टिज यांचा ‘कॅसाब्लांका’, व्हिक्टर … Read more

कलम ३७० चा प्रचार भाजपवर उलटला

लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामा हल्ल्याचा वापर करून सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळालं खरं. न भूतो न भविष्यती अशा प्रकारे कामगिरी करत भाजपने ३५० जागा काबीज केल्या. परंतु २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपची ही डाळ शिजली नाही. राज्यात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी जवळपास ७० हुन अधिक सभा घेत काश्मीरचा प्रश्न मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.