दिल्ली हिंसाचारा दरम्यान जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टवरही पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात उत्तर-पूर्व दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणात आपली चार्जशीट दाखल केली आहे. कमालीची बाब म्हणजे, या चार्जशीटमध्ये एका डॉक्टरच्या नावाचा समावेश दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी अल हिंद रुग्णालयाचे मालक असलेले डॉ. एम. ए अनवर यांच्यावर दंगलीसाठी लोकांना भडकावण्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चार्जशीटमध्ये आपलं नाव … Read more

जामियाची विद्यार्थिनी सफुरा जरगरला जामीन मंजूर

नवी दिल्ली । उत्तर पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी सफुरा जरगर हिला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवी आधारावर सफुरा हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. याला केंद्र सरकारनंही समर्थन दिलं आहे. दिल्ली हिंसाचार प्रकरणातील चौकशीवर परिणाम होईल अशा कोणत्याही कृत्यात सहभागी न होण्याच्या अटीवर दिल्ली उच्च … Read more

कोरोना संकटामध्ये CAAविरोधी आंदोलकांना अटक; जावेद अख्तर यांची गृह मंत्रालयावर टीका

मुंबई । एकीकडे देशातील नागरिक आणि सरकार कोरोनानं त्रस्त असताना, दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलकांना अटक करण्यावरून लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे. ‘देश करोना आणि त्याच्याशी निगडीत समस्यांशी झुंजत असताना गृह मंत्रालय सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना अटक करण्यात व्यग्र आहे’ असं ट्विट करत जावेद अख्तर यांनी गृह मंत्रालयावर … Read more

करोनामुळे शाहीनबाग आंदोलकांना हटवलं; पोलिसांनी केली कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक पावलं उचलत आहे. दिल्लीमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. संपूर्ण दिल्लीत कर्फ्यूसारखी परिस्थिती आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग खाली करण्यात आलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेत पोलिसांनी शाहिनबाग आंदोलकांना जागा खाली करण्याचं आवाहन करण्यात आलं होत. मात्र, आंदोलकांनी जागा खाली न केल्यानं अखेर … Read more

कर्नाटक भाजप नेत्याचा प्रताप; स्वातंत्र्य सैनिकाला म्हटलं ‘पाकिस्तानी एजेंट’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका आमदारानं सीएएला विरोध करणारे १०२ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक एच.एस. दुरईस्वामी यांच्याविषयी अभद्र टिप्पणी केल्यानं राज्यात राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. कर्नाटकमधील स्वातंत्र्यसैनिक एच.एस. दुरईस्वामी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधातील आंदोलनाचा चेहरा बनले आहेत. तसेच दुरईस्वामी यांनी केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारच्या धोरणांवर उघडपणे टीका केल्यानं विजयपुरा नगरचे भाजप आमदार … Read more

सोलापूरमध्ये नागरिकत्व कायद्याच्या शासन निर्णयाची होळी

सोलापूर प्रतिनिधी । नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. याचे पडसाद सोलापुरात हि पडलेले पाहायला मिळतात. त्यामुळे – हम जवाब नहीं देंगे ,हम कागज नहीं दिखाएंगे ! – चा सामूहिक नारा सोमवारी सोलापुरात ऐकायला मिळाला. यावेळी कॉ आडम मास्तर आणि त्यांच्या … Read more

दिल्ली हिंसाचारात ‘आप’मधील कोणीही सामील असेल त्याला दुप्पट शिक्षा द्या- केजरीवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या अनेक भागातील हिंसाचाराबाबत आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ”आम आदमी पक्षाचा कोणताही नेता जर या दंगलीत सामील झालेला आढळला असेल तर त्याला दुप्पट शिक्षा द्या. आम आदमी पक्षाचे (आप) नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यावर दिल्ली … Read more

दिल्लीत शांतता राखण्याची जबाबदारी सरकारचीच- भैय्याजी जोशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून दिल्लीत झालेल्या भीषण हिंसाचारावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी महत्वाचं विधान केलं आहे. दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने दिल्लीची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे असं भैय्याजी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रातील भाजप सरकारची मार्गदर्शक संस्था असल्यानं जोशी यांचे विधान सूचक … Read more

दिल्लीतील हिंसाचार: गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला नाल्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु झालेल्या या हिंसाचारामध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासून एकूण ४ मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. यात इंटेलिजन्स ब्युरो(आयबी) या गुप्तचर यंत्रणेच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. अंकित शर्मा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आज सकाळी अंकित यांचा मृतदेह चांदबाग परिसरातील एका नाल्यात आढळून … Read more

दिल्लीतील हिंसाचार आटोक्यात येत नसेल तर लष्कराला बोलवा- केजरीवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर प्रतिकिया दिली आहे. दिल्लीच्या हिंसा प्रभावित भागात सैन्य बोलावून कर्फ्यू लावावा यासंदर्भात आपण गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी याविषयी ट्वीट “मी रात्रभर बर्‍याच लोकांशी संपर्क साधत आहे … परिस्थिती चिंताजनक आहे … सर्व प्रयत्न … Read more