मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून घरी परतणाऱ्या वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-सोलापूर रोडवर काळेगाव पाटीजवळ एक विचित्र अपघात घडला. या अपघातात दोन दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन दोन्ही दुचाकी जागीच पेटल्या. या आगीच्या भडक्यामध्ये एक जण जागीच मृत झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने बार्शीला हलवण्यात आले आहे. या अपघातात मोहोळ तालुक्यातील वाळूजचे सुरतिशेन मोटे व रामचंद्र मोटे … Read more

साहित्यिक द.ता.भोसले यांच्या पुस्तकास राज्य शासनाचा पुरस्कार

सोलापूर प्रतिनिधी । ग्रामीण साहित्यिक द.ता.भोसले यांच्या “संवाद बळीराजाशी” या ‘सकाळ’ प्रकासनाच्या पुस्तकास राज्य शासनाचा वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रूपये रोख असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. भोसले यांना यापूर्वी राज्य शासनाचे सहा पुरस्कार मिळाले आहेत. भोसले यांनी अँग्रोवन मधून लेखन केले आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे अनेक स्थरातून अभिनंदन केलं जात … Read more

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपुरात ११०० नागरिकांची आर्थिक फसवणूक

दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपूर परिसरातील सुमारे अकराशे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे ही समोर आले आहे. त्यामुळे मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या चार ठकसेनांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात? खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका

देशाच्या माजी गृहमंत्र्यांना पराभूत करून थाटात सोलापूरची खासदारकी मिळवलेल्या सिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी धोक्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जयसिद्धेश्वर महाराज यांना खासदारकी गमवावी लागू शकते. यासंदर्भातील गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून १८ जानेवारीला यासंदर्भातील योग्य ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश सिद्धेश्वर महाराज यांना देण्यात आले आहेत.

पंढरपुरात मृतांच्या रक्षेची होतेय चोरी; सोन्याच्या हव्यासापोटी मृताची विटंबना

सोन्याच्या हव्यासापोटी सोलापूर जिल्हयातील पंढरपूरमध्ये चक्क मृतांच्या रक्षा चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले दिसत आहेत. येथील स्मशानभूमीत मृत व्यक्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिणे मिळवण्यासाठी चोरांनी चक्क रक्षा चोरीचा फंडा अवलंबला आहे. वाढत्या रक्षा चोरीमुळे मृताची विटंबना केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण नीर्माण झाले आहे.

परदेशात जाण्याची ओढ असलेल्या राहुल गांधींना सावरकर कळणार नाहीत- माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावकार यांच्यावर टीका केली होती. या टिकेमुळं राहुल गांधी यांच्यावर भाजपने जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. राष्ट्रीय तसेच राज्यातील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. याच संदर्भात माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आता राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

माढ्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; नेते,अधिकाऱ्यांनी पळवलेल्या रस्त्याचे काम अखेर थांबले

माढा तालुक्यात वडशिंगे ते रेल्वे स्टेशन दरम्यानचा १ कोटी ८६ लाख रुपयांचा दोन किलोमीटरचा रस्ता अन्यत्र पळवण्यात आला होता. रस्ता परत मिळावा या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

कावळ्यांना दररोज खायला घालणारे अनोखे ‘कावळे मामा’

बदलते हवामान, वाढते औद्योगिकरण आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या ह्रासामुळे चिमण्या ,कावळे हे रोजच्या दिसण्यातले पक्षी सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या कावळ्याच्या प्रजातीदेखील यामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र काळाचे आणि पर्यावरण संतुलनाचे महत्व ओळखून माढा येथील हाॅटेल चालक अर्जून भांगे यांनी कावळांच्या संवर्धऩासाठी एक पाऊल उचलेले आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून दररोज सकाळी कावळ्यांना विविध प्रकारचे खाद्य देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या नित्य नियमामुळे माढा परिसरात कावळ्यांची संख्या वाढली आहे.

कांद्याचे भाव तब्बल ५ हजारांनी घसरले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला २० हजार रुपये देण्याची विक्रमी घोषणा केल्यानंतर शनिवारी जवळपास ५०० ते ७०० ट्रक कांदा बाजार समितीत दाखल झाला. मात्र हा कांदा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने कांद्याचा दर सरासरी ५ हजाराने कोसळला आहे. साठवणूक केलेला कांदा व्यापारी पुन्हा बाजारात आणत असल्याने आवक वाढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज सरासरी कांदा ३ हजार ते १० हजार प्रति क्विंटल दराने गेला आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.