राजू शेट्टींनी व्यक्त केली राज्याचे कृषीमंत्री होण्याची इच्छा, मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळेल का?

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सह पक्षांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत.

कांद्याचे भाव गगनाला; कांदा १३ हजार प्रति किंटल पार

गेल्या दोन महिन्यांपासून आवक मंदावल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव इथं सोमवारी कांद्याला १३ हजार रुपये भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुन्हा संकट? राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे,हवामान विभागाने वर्तवली शक्यता

संपूर्ण देशभरात उशिरा पर्यंत राहिलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. तसेच अवकाळी पावसामुळे देखील मोठे थैमान घातले. याचा मोठा परिणाम राज्यामध्ये झाला. सध्या पाऊस संपून थंडीचे आगमन होत आहे. देशभरातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीचे वेध लागले आहे. मात्र बळीराजाच्या चिंतेत भर टाकणारी शक्यता हवामान विभागाने सध्या वर्तवली आहे.

बँक खात्यांचा होल्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांचा स्टेट बँकेत ठिय्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

वर्धा जिल्ह्यातील निंभा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचे कित्येक शेतकऱ्यांकडे पिक कर्ज थकीत असल्याने त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील बॅक खात्याला बॅंकेकडून होल्ड लावल्याने शेतकऱ्यांचे व्यवाहर ठप्प झाले आहेत. यासंबंधी‌ २८ नोव्हेंबरला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे होल्ड काढण्याची मागणीही केली होती.

चंद्रपूर शहरालगत कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या अस्वलाचा धुमाकूळ

चंद्रपूर शहरातील कोळसा खाण वसाहत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहत्या घरांच्या आसपास अस्वलीचा संचार होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे. शहरालगतच्या वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या शक्तिनगर या कोळसा खाण कर्मचारी वसाहतीत दिवसाढवळ्या एक अस्वल धुमाकूळ घालत आहे.

परभणीत जिल्हात आजपासून शासकिय कापुस खरेदीचा शुभारंभ

यंदाच्या हंगाममध्ये परभणी विभागातील शासकीय कापूस खरेदीचा खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या कापूस खरेदी प्रक्रियेत सीसीआयचे सब एजंट म्हणून कापुस पणन महासंघातर्फे पाथरी व गंगाखेड येथे सोमवार दि.२ डिसेंबर रोजी केंद्र शासनाच्या शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कास्तकारांना मोबदला मिळणार आहे.

म्हणुन शेतकर्‍याने चक्क कुत्र्याला रंग लाऊन बनवलं वाघ

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कर्नाटकमधील नालुरु गावातील शेतकरी श्रीकांता गौडा यांच्या शेतातील पीक माकड उद्धवस्त करत होती. श्रीकांता यांनी माकडांना पळवून लावण्याचे केलेले सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. एक दिवस त्यांना आठवले की भटकळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने शेतात खेळण्यातले मोठे वाघ ठेवल्यानंतर त्याच्या शेतात माकडं येणे बंद झाले. श्रीकांता यांनी हाच प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. पण … Read more

परभणी जिल्ह्यात गामपंचायती जोडल्या जाणार वेगवान इंटरनेटने

संपूर्ण राज्यात भारतनेट-महानेट प्रकल्प् महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यांत येत असून या प्रकल्पा्द्वारे परभणी जिल्हाातील ४ तहसिल कार्यालये व त्यांअंतर्गत येणारे ४२८ ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबर नेटवर्कने जोडले जाणार आहेत. ग्रामस्तवरावरील नागरिकांना डिजिटल सेवा देऊन त्यांना जगाशी जोडण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारव्दारे हा उपक्रम सुरु केला आहे.

साखर आयुक्तांचा ७ साखर कारखान्यांना दणका ! ‘एफआरपी’ची रक्कम न भरल्याने परवाने रोखले

शासकीय भागभांडवला सह शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’ची रक्कम न दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्तांनी रोखून धरला आहे. यातील बहुतांशी कारखान्यांनी गेल्या दोन ते तीन वर्षातील एफआरपी ची रक्कम दिलेली नाही. यामध्ये हलकर्णी मधील दौलत , हमीदवाडा मधील मंडलिक यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. तर विभागातील सात कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला नसल्याची माहिती समोर आली. यामध्ये कोल्हापूर मधील दोन आणि सांगलीतील तीन कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी या दोन्ही जिल्ह्यातून 38 कारखान्यांनी हंगाम घेतला होता. मात्र यावर्षी सांगली जिल्ह्यातील किमान तीन ते चार कारखाने सुरू होणार नसल्याचे वास्तव आहे.

बेदाणा सौद्यास २१५ रुपयांचा भाव

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे दिवाळीनंतर एक महिन्याच्या सुट्टीनंतर मार्केट यार्डामध्ये पहिल्या बेदाणा सौद्यात किलोला २१५ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. सौदयासाठी ५० गाड्यांची आवक झाली. सौद्यामध्य सरासरी दर १६० ते २१० रुपये राहिला. अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. यापुढील कालावधीत बेदाण्याची आवक घटणार असून चांगला दर मिळणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर … Read more