शेतकरी पुत्राने साकारली शरद पवार यांची जगातील सर्वात मोठी ग्रास पेंटिंग

आज राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस. शरद पवार यांचा जनमानसातील आणि एकूणच राजकारणातील दबदबा पाहत त्यांच्यावर देशभरातून आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, उंस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी गावच्या शेतकरी सुपुत्राने आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्या दिल्या आहेत.

कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत तब्बल ११ हजार शेतकरी; सातबारावर नोंद नसल्याने अडचण

अवकाळी पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. हाता तोंडाशी आलेले पीक गेल्याने त्यांचे कंबरडे मोडले. याचा परिणाम म्हणून आवक नसल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा राहिला त्यांना उच्चांकी भाव मिळाला. मात्र असंख्य शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. मात्र मागील वर्षी कांद्याचे उत्पादन चांगले आले होते.

मुंबईत कांदा चोरांचा सुळसुळात, दोघांना अटक

मुंबई | कांद्याच्या किंमतींत गेल्या काही दिवसात वाढ झाली असून भारतातील विविध राज्यांत प्रति किलो १०० डॉलर दराने विक्री होत आहे. कांद्याच्या भाववाढीनंतर मुंबई पोलिसांनी डोंगरीतील दोन दुकानांतून २१,१६० रुपये किमतीची कांदा चोरल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चोरी एक आठवड्यापूर्वी झाली होती परंतु मंगळवार, १० डिसेंबर रोजी ही अटक करण्यात आली … Read more

टोमॅटोचे दर ५ रुपये किलोंवर! शेतकरी मोठ्या चिंतेत

उशिरापर्यंत राहिलेला पाऊस आणि नंतर आलेला अवकाळी पाऊस यांनी शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. एकीकडे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीमधून शेतकरी उभारी घेत असताना मागील काही दिवसांमध्ये बाजारात टोमॅटोची आवक वाढली. सोमवारी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७० क्विंटल आवक झाल्याने टोमॅटोची ३ ते ५ रुपये किलोने विक्री झाली. बाजारात टोमॅटो आणण्याचा खर्चही न निघाल्याने येथील एका शेतकऱ्याने टोमॅटो चक्क रस्त्यावर टाकून दिला.

अमरावती उपविभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी घुसविल्या थेट बैलजोड्या

शेती वहीवाटीच्या पांदण रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करा. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सोमवारी अमरावती उपविभागीय कार्यालयात थेट बैलजोड्या घुसविल्या. यावेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले दिसत होते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकऱ्यांनी या बैलजोड्या कार्यालयाबाहेर काढल्या.

कडकनाथ घोटाळा प्रकरण; रॅली धडकणार मंत्रालयावर

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातील घोटाळ्याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी बेळगाव येथून मोटारसायकल रॅली मोर्चा काढण्यात आला आहे. कोल्हापूर-सातारा-पुणे मार्गे हा मोर्चा शुक्रवार, दि. 13 रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. 

कांद्याचे भाव तब्बल ५ हजारांनी घसरले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याला २० हजार रुपये देण्याची विक्रमी घोषणा केल्यानंतर शनिवारी जवळपास ५०० ते ७०० ट्रक कांदा बाजार समितीत दाखल झाला. मात्र हा कांदा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने कांद्याचा दर सरासरी ५ हजाराने कोसळला आहे. साठवणूक केलेला कांदा व्यापारी पुन्हा बाजारात आणत असल्याने आवक वाढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आज सरासरी कांदा ३ हजार ते १० हजार प्रति क्विंटल दराने गेला आहे.

शेतकऱ्याने शासनाला परत केला नुकसान भरपाईचा धनादेश

मूल तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी झाल्यामुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. जमिनीचीही खरड झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यातच शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन मदत दिली. मात्र ही मदत अत्यंत अल्प असल्यामुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याने शासनाने दिलेला धनादेश शासनालाच परत पाठवून आपला निषेध व्यक्त केला आहे. तसं निवेदनही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना उपविभागिय अधिकारी यांच्यामार्फत पाठविल आहे.

देशातील सर्वात महाग कांदा सोलापुरमध्ये !

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यातील नव्हे तर चक्क देशातील सर्वात उच्चांकी दर कांद्याला मिळाला आहे. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याला चक्क २०,००० हजार रूपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. प्रति क्विंटल ला इतका दर मिळाल्यामुळे सर्वांच्या नजरा सध्या कृषी सोलापूरकडे वळल्या आहेत. कांद्याला मिळालेला आजवरचा हा विक्रमी दर आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी पोलिस अधिकाऱ्याचा पुढाकार, १ महिन्याचा पगार पाठवून उचलला खारीचा वाटा

पावसाळ्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला. यामध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडुन कर्जमाफीची अपेक्षा आहे. परंतु सरकारला सुद्धा सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे लक्षात घेऊन माढ्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आपला एक महिन्याचा पगार देऊ केला असून याबाबतचे पत्र देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.