कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढणाऱ्या होर्डिंगमुळे खळबळ

कोल्हापूर प्रतिनिधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून विरोधकांवर कडाडून हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गनिमी कावा करीत मुख्यमंत्री आणि जनादेश यात्रेवर पोस्टरबाजीतून निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने रॅली काढणार आहेत त्या मार्गावरील प्रमुख चौकात राष्ट्रवादीने रातोरात फडणवीस यांच्या विरोधात फलक उभारले आहेत. रात्री … Read more

सांगलीत विधानसभा उमेदवारीवरून आयारामांविरुद्ध भाजप निष्ठावान आक्रमक

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सांगलीत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ऐन वेळी आलेल्यांना आणि आयात केलेल्यांनाच उमेदवारी दिली जात आल्याचा आरोप होत असतानाच आता पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. बुधगाव मध्ये भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेबाबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली … Read more

सांगली, मिरज विधानसभेच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे मागील काही वर्षात जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुका आठवडा भरात जाहीर होणार असून सांगली, मिरज आणि तासगाव-कवठेमंकाळ या विधानसभेच्या जागा सेनेला मिळाव्या म्हणून जिल्हा शिवसेना संघटन आग्रह धरत आहेत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी सांगितले. जिल्ह्यातील माजी आमदार सेनेच्या संपर्कात असून … Read more

‘पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार’; मुख्यमंत्री होण्याबाबत दानवेंची सावध भूमिका

जालना प्रतिनिधी | राजकारणात सरपंच पदापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदं भोगून झाली आहेत आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही आहे. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत पुढे विचार करणार असल्याचं म्हणत रावसाहेब दानवे यांनी आपली मुख्यमंत्री पदाबाबत सावध भूमिका घेत सूचक वक्तव्य केले. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नैतृत्वाखाली राज्यभर महाजानदेश यात्रा करण्यात आली होती. तेव्हा आगामी निवडणुकीत विजय … Read more

भाजपने पूर्ण दारे उघडली तर विरोधकांचे अस्तित्व धोक्यात येईल ! – अमित शहा

टीम, HELLO महाराष्ट्र | ‘भाजपने आपली दारे पूर्णपणे उघडली तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीच शिल्लक राहणार नाही,’ अशी टोलेबाजी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केली. भाजपच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या दुसऱ्या टप्प्याचा रविवारी सोलापूरमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर समारोप झाला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार … Read more