कार्यकर्त्यासारखा झटणारा फक्त एकच ‘सत्यजित’ – धैर्यशील माने

‘दिवसातले २४ तास घरचा तसेच कोणताही विचार न करता उपलब्ध असणारा तसेच २८८ पैकी एवढा झटणारा आमदार जर कोण असेल तर तो सत्यजित पाटील आहे’ असे वक्तव्य हातकणंगले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे.

२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही – मुख्यमंत्री

”२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. प्रत्येकाला सरकारच्या माध्यमातून घर बांधुन देऊन त्याला सर्व सुविधा देणार” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ काल वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

या निवडणुकीत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा – स्मृति ईराणी

आपण सर्वजण दिवाळीच्या आगोदर घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे येत्या विधानसभेला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा. राष्ट्रवादीबद्दल मी बोलणार नाही कारण ”जिनका समय ही खराब हो वो दुसरों का क्या भला करेंगे’,क्योंकी उनकी घडी बंद पड चुकी है ”अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. सांगली विधानसभा निवडणुकीसाठीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ मारुती चौक येथे घेण्यात आलेल्या जाहीरसभेत स्मृती ईराणी बोलत होत्या.

‘तुबची-बबलेश्वर’चे पाणी देणारच अन्यथा जतमध्ये पाऊल देखील ठेवणार – विश्वजीत कदम

काँग्रेस  ही संकल्पना काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांची असून या योजनेमुळे जतला पाणी मिळणार आहे. जतकरांना जर का हे पाणी मिळाले नाही तर मी जतमध्ये पाऊल देखील ठेवणार नसल्याचा निर्वाळा पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांनी केला. येत्या जानेवारीत आम्ही दोन कारखान्यांचे काम सुरू करणार असल्याचे हे त्यांनी यावेळी सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव व कुंभारी येथील जाहीर सभेत बोलत होते.

ठाण्यातील १८ विधानसभा मतदार संघातील ९०० कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा?

वारंवार सुचना, पत्रव्यवहार करुनही विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणार्‍या ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील तब्बल ९०० कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रथम प्रशिक्षण वर्गास हजर राहून दुसऱ्या प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाऱ्या सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरु झाली आहे.

५ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे – नितीन गडकरी

गेल्या ५ वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिचर अजून बाकी आहे’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारात विश्वास व्यक्त केला. गडकरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

१५ वर्षात पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? – अमित शहा

‘पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात ‘आघाडी’ची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना कोल्हापूरातील सभेत विचारला आहे. ”चार लाख करोड रुपयांची मदत केवळ पाच वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला दिल्या”चे त्यांनी यावेळी नमूद केलं.

‘पंकजा मुंडे माझ्यावर नाराज नाहीत’ – आमदार मोनिका राजळे

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ‘भाजपा’ने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा बराच मोठा वर्ग या मतदारसंघात आहेत. त्यातच गेल्या काही दिवसापासून आमदार राजळे यांच्यावर पंकजा नाराज असल्याची चर्चा चालू होती. मात्र, आज प्रचाराच्या शुभारंभावेळी पंकजा आपल्यावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक म्हणजे ‘हमखास रोजगार योजना’; घर सांभाळून महिलांचा रोजंदारीवर प्रचार

महिलांचे विश्व आता केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी केव्हाच घराचा उंबरठा ओलांडून आकाशाला कवेत घेतले आहे. सर्वच क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱ्या महिलांनी राजकीय क्षेत्रातही आश्वासक पावले टाकल्याची किती तरी उदाहरणे आहेत. राजकारण हा मध्यमवर्गीयांचा विषय नाही ही समजूतही आता कालबाह्य झाली आहे. याउलट बहुतांश निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका घेणाऱ्या महिलाही आता निवडणुकांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, हा प्रचार केवळ आपल्या नेत्याच्या विजयाकरिता करण्यापुरता मर्यादित राहिला नाही आहे. तर निवडणूक दरम्यान दोन पैसे कमावता येऊन पोटाची खडगी भरता येईल हे ही त्यामागचे एक कटू सत्य आहे.

वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार

जिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.