उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग 

वृत्तसंस्था । उत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पौरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथील जंगलाला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तेथील वनअधिकारी अनिता कुंवर यांनी ही माहिती दिली आहे. एकूण ५-६ हेक्टर परिसरात ही आग पसरली असून तिला विझवणे अवघड झाले आहे. त्यामुळे अधिक पथकांना बोलावण्यात आले आहे. Uttarakhand: Forest fire broke … Read more

शेतकऱ्यांनी केले कांद्याला क्वारंटाईन, अपेक्षित भाव मिळत नसल्यानं निर्णय

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शेतमालाला चांगला उठाव होऊन त्याला चांगला दरही मिळेल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या रब्बी हंगामातील कांदा आपल्या शेतातच क्वारंटाईन करून ठेवने पसंद केले आहे . सध्या सगळीकडे रब्बी उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे . सोलापूर जिल्ह्यातील रोपळे येथील शेतकरीही कांदा काढणीत व्यस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोपळे येथील सेवानिवृत्त … Read more

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सदाभाऊंचे घरासमोर आंदोलन

सांगली प्रतिनिधी । रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २२ जिल्हयांमध्ये शासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लघंन न करता अंगण हेच आंदोलन हे ऐतिहासिक डिजिटल आंदोलन पार पडले. डिजिटल आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी अन्यथा भविष्यात सरकारची झोप उडवणारे अनोखे आंदोलन केले जाईल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. सध्या … Read more

जेव्हा मुलाला दुखापत होते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही; पंतप्रधानांनीही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवावेत – राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या देशातील विविध पत्रकार आणि विचारवंतांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत आहेत. आज राहुल यांनी काही पत्रकारांसोबत व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर टीका करत शेतकरी आणि कामगारांच्या थेट खात्यावर सरकारने पैसे पाठवावेत अशी मागणी केली. जेव्हा … Read more

मोदींच्या मेगा आर्थिक पॅकजमध्ये शेतकऱ्यांसाठी आहेत ‘या’८ तरतुदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज आत्मनिर्भर भारत अभियानाच्या आर्थिक पॅकेजचा दुसरा टप्पा जाहीर केला. या पॅकजमध्ये शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सरकारने काय आर्थिक उपायोजना केल्यात त्याची माहिती सीतारमन यांनी दिली. १)शेतीकरिता … Read more

अर्थमंत्री LIVE: प्रवासी मजुरांसाठी सरकारने उघडले रोजगार हमी योजनेचे दरवाजे; अजून बरंच काही

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाच्या घोषणांवर भर दिला. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून लोकांनी कोरोनाकाळात चांगलं काम उभं केल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. ग्रामीण बँकांकडून २९ हजार … Read more

भाव नसल्यनाने तरुण शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवला 25 टन कांदा..

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथिल शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने कांदा चाळ बनवली आहे. तसेच कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने त्यात 25 टन कांदा साठवून ठेवला आहे. ज्ञानेश्वर पाटील अस या शेतकऱ्याचं नाव आहे. पाटील यांनी आपल्या शेतातील केळीच्या सव्वादोन एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड केली आहे. या शेतकऱ्याने कांद्याच्या आंतरपिकापासून ५६ टन कांद्याचे उत्पादन … Read more

धक्कादायक! पोलीस पाटलाची शेतकऱ्याला कुऱ्हाडीने मारहाण; कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर का नेला, असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून पोलीस पाटील याने गावातीलच एकाच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण केल्याची तर इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हवेलीवाडी-सवादे ता. कराड येथे शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अनिल राजाराम एैर वय ४१ रा. हवेलीवाडी-सवादे ता. कराड … Read more

पंढरपूरात शेतकऱ्यांना मोबदला न देताच पालखी मार्गाचे काम सुरु; शेतकऱ्यांनी रोखले काम

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर ते आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न देताच काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी आज जमिनीचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी रस्त्याचे काम रोखले आहे. लाॅकडाऊन सुुरु असतानाही रस्त्याची कामे सुरु झाली आहेत. पालखी मार्गासाठी … Read more

सोलापूरमध्ये आठवड्याभरात दगावल्या 20 शेळ्या, रोगाचे निदान न झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती

सोलापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 700- 800 लोकवस्ती असणार वसंतराव नाईक नगर गाव आहे. या गावात 90-95 कुटुंबांचं वास्तव्य आहे. इथल्या सर्वच कुटुंबांचा शेळीपालन हाच मुख्य व्यवसाय आहे.अशात मागच्या आठवड्याभरात गावातील 20 शेळ्या जुलाब होऊन दगावल्या आहेत. मात्र अद्याप शेळ्यांना नेमका कोणता रोग झाला आहे याच निदान झालं नाही. गरीबाची गाय म्हणून शेळीकडे पाहिलं … Read more