बच्चू कडूंचे स्टिंग ऑपरेशन; वेषांतर करून कंटेनमेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न मात्र…

अकोला । राज्यात कोरोना विषाणूने चांगलेच थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही १७ मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. राज्य सरकार देखील लॉकडाऊन १७ मे नंतर वाढवण्याच्या विचारात आहे. पोलीस प्रशासन कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी पोलिसांचेच स्टिंग ऑपरेशन केले आहे. #अकोला | आमदार … Read more

अचलपुरात सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण; अमरावती जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७९ वर

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालूक्यातील ४२ वर्ष वयोगटातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर व्यक्ती परसापूर या गावातील रहिवासी असून शनिवारी त्याचा नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झालेला होता. आज त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी माहिती अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी … Read more

बाहेर दुध, भाजीपाला मिळेल का माहीत नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल – बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई आपण सध्या कोरोना आजाराच्या तिसर्‍या टप्प्यात जात आहोत. तेव्हा पुढचे १० दिवश अतिशय महत्वाचे आहेत. बाहेर दुध, भाजीपाला मिळेल की नाही माहिती नाही पण कोरोना मात्र नक्की मिळेल असं म्हणत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोरोना बाधीतांची वाढतच चाललेली संख्या हा अतीशय गंभीर विषय … Read more

शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत गंभीर आरोप

मुंबई | शालेय पोषण आहार, धानखरेदी, आश्रमशाळा वस्तुखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून, विशिष्ट कंपनी, नेत्यांना फायदा मिळण्यासाठी हा संपूर्ण गैरव्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुराव्यासह विधानसभेत केला. 2020-21 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले की, शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. विशिष्ट व्यक्तींना … Read more

राम शेवाळकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती स्थळांना विकासनिधी

अमरावती प्रतिनिधी । प्रबोधनकार ठाकरे आणि राम शेवाळकर यांच्या स्मृती स्थळांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजुरी दिल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचे आभार मानलेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अकोट अंतर्गत येणाऱ्या नरनाळा या ऐतिहासिक किल्ल्याचा विकास कामासाठी सुद्धा २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथील राम शेवाळकर यांच्या वाडा तसेच परतवाड्यातील प्रबोधनकार ठाकरे … Read more

सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे! संपूर्ण कर्जमाफीचे बच्चू कडूंनी केलं सूतोवाच

”सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे” असं सूतोवाच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विटा येथील कार्यक्रमात एका केलं. दोन लाखांपर्यंतची जी कर्जमाफी आहे. त्यात सर्वच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे दोन लाखांवरील जे कर्जदार शेतकरी आहेत. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, तसेच जे नियमित कर्ज भरतात. त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी हा पहिला टप्पा असून तीन टप्प्यात कर्जमाफी करण्याचा विचार असल्याचं यावेळी बच्चू कडूंनी सांगितलं. विटा येथे आयोजित नागरी सत्कार आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

‘कामाची फाईल थांबली तर तुमची नोकरी थांबली’; मंत्री बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी

“माझ्या खात्याच्या अंतर्गत येणारी कोणतीही फाईल विनाकारण थांबली तर त्या अधिकाऱ्याची नोकरी थांबली समजा ” अशा खड्या शब्दात राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. बच्चु कडु आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या विभागांची एकत्रित बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

मंत्रीपद गेलं तरी बेहत्तर मात्र कामचुकारांची खैर नाही – बच्चू कडू

बच्चू कडू यांना चालू मंत्रिमंडळात बऱ्याच जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. जवळपास ४ विभागातील राज्यमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी आलेल्या बच्चू कडू यांनी यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

अब्दुल सत्तारांना ग्रामविकास तर बच्चू कडूंना शालेय शिक्षण व कामगार; पहा संपूर्ण खातेवाटप

मुंबई | कृषी खाते कोणाकडे जाणार यावरून काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आणि शिवसेनेचे दादा भुसे कृषी मंत्री झाले. खाते वाटपा संबंधी अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेली यादी अंतिम मानली जात आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना कोणते खाते मिळाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले … Read more

लढवय्ये बच्चूभाऊ बनले मंत्री, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला पेढे वाटून आनंद साजरा

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे सलग चार वेळा आमदार म्हणुन निवडून आलेले प्रहारचे आमदार, दिव्यांगाचे मसिहा ओळख असलेले आणि शेतकरी प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन करणारे दबंग आमदार बच्चू कडू यांनी आज राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी आशिष गवई येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रहारचे कार्यकर्ते ऊपस्थित होते.