सांगलीत मतदान शांततेतच मात्र सोशल मिडीयावर आफवांचे पेव

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे, सांगली लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी सोशल मिडियातून मात्र अफवांच्या बाजाराला ऊत आला होता. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विश्वजीत कदम यांना बसला. त्यांच्या पाठींब्याचे व त्यांच्या नावाने अनेक जुने फोटो व व्हिडीओ व्हायरल केले जात होते. दरम्यान प्रशासकीय पातळीवरही अनागोंदीचा सामना मतदारांना … Read more

महाराष्ट्रात कॉंग्रेस आघाडी २८ ते ३० जागा जिंकेल

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी पक्षासह संयुक्त पुरोगामी आघाडीस राज्यातील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आघाडी या निवडणुकीत चांगला स्कोअर करेल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले आहे. माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज आज राज्यात मतदान होणाऱ्या १४ जागापैकी जास्त जागा आम्ही जिंकू. … Read more

अच्छे दिनच्या जागी लुच्चे दिन आणणाऱ्यांना हद्दपार करा : राजू शेट्टी

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकसभेच्या निवडणुकीत अच्छे दिन येतील म्हणून भाजपच्या कळपात शिरलो ही घोडचूक झाली. मात्र अच्छे दिन आले नाही तर लुच्चे दिन आले आहेत. मात्र आम्ही हाडाचे शेतकरी आहोत, जसे कमळ फुलवता येते तसे तणनाशक देखील मारायला येते. त्यामुळे या निवडणुकीत हिटलरशाही भाजपला पाडाव करण्यासाठी उठाव करा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते … Read more

जयंत पाटलांनी आशीर्वाद दिला तर वसंतदादांचा नातू खासदार होईल : विशाल पाटील

Untitled design

सांगली । प्रतिनिधी जिल्ह्यात दादा-बापू वाद पेटवून दोन्ही घराण्यांना सत्तेच्या बाहेर काढले व स्वत: सत्तेत शिरले. त्यामुळे आता पाडापाडीचे राजकारण बंद करणे काळाची गरज आहे. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे पालकतत्व आहे. त्यांनीच माझ्या उमेदवारीचे नाव घेतले. त्यामुळे त्यांनी माझे पालकतत्व स्वीकारून आशीर्वाद देतील व दादांचा नातू खासदार होईल, असा विश्‍वास कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना … Read more

जयंतरावांची अवस्था ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ : चंद्रकांतदादा पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला स्वतःचे नेते, कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. जे-जे कोण आमच्याकडे येईल, त्यांना आम्ही सामावून घेणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांना न सांभाळता येणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची अवस्था नाचता येईना, अंगण वाकडे,’ असल्याची तोफ महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डागली. सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार खासदार … Read more

भाजपसोबत जाण्याऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार – जयंत पाटील

Jayant Patil

अहमदनगर प्रतिनिधी | महानगरपालिका महापौर निवडणूक नुकतीच पार पडली, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला ऐनवेळी पाठिंबा दिल्या मुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर तिथे निवडून आला. मात्र पक्षाच्या स्थानीक नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयाचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपसोबत जाण्याऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार असे पाटील यांनी म्हटले आहे. ‘अहमदनगरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

शेतकऱ्यांना आम्ही दिलेली मदत त्यांना कमीच वाटणार, सदाभाऊ खोत यांचा राज ठाकरे, जयंत पाटील यांना टोला

Sadabhau Khot and Raj Thakray

सांगली | शेतकऱ्यांना काहीच मदत न करणाऱ्या लोकांना आमची मदत कमीच वाटणार, असं म्हणून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज ठाकरे आणि जयंत पाटील यांना टोला लगावला. कांद्याच्या दरावरुन ठाकरे आणि पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ‘आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या … Read more

उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण – जयंत पाटील

Jayant Patil

मुंबई | आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले. राज आणि उद्धव दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत आहेत. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. कदाचित त्यासोबत विधानसभा … Read more

वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीवर कोणाच्याही स्मारकाची उंची जाऊ नये म्हणुनच शिवस्मारकाची उंची कमी करण्यात आली – आ.जयंत पाटील

unnamed file

मुंबई | वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीवर कोणाच्याही स्मारकाची उंची जाऊ नये म्हणुनच शिवस्मारकाची उंची कमी करण्यात आली असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. ‘शिवस्मारकाची उंची कमी केली याचे कारण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या … Read more

सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी – आ. जयंत पाटील

Jayant Patil NCP

मुंबई | बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प राज्यात आले खरे परंतू त्यासाठी घेतलेले कर्ज आता आपल्या राज्याच्या माथ्यावर आदळणार आहे तेव्हा सरकारने आता ‘आपले सरकार, कर्जबाजारी सरकार’ अशी जाहिरात करावी असे वक्तव्य करत विधिमंडळ गटनेते आ.जयंत पाटील यांनी सरकारवर निशाना साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या … Read more