असले चाळे बंद करा : पंकजा मुंडे

परळी प्रतिनिधी | महाराष्ट्रातील कोणताही नेता असो, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, अशोक चव्हाण यांच्या पंचायत समित्यांचे उद्घाटन करायचे असल्याने त्याला माझी एनओसी घ्यावी लागते. तुम्ही परळीचे काय घेऊन बसलात. आता ते असले छिलोर चाळे बंद करा असे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव नघेता सुनावले आहे. काल धनंजय मुंडे यांनी परळीच्या पंचायत … Read more

 ‘सर्वोदय’ कारखाना प्रकरणी जयंत पाटील यांना मोठा धक्का!

प्रथमेश गोंधळे । सांगली प्रतिनिधी कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचा राजारामबापू सहकारी कारखान्याशी झालेला करार राज्य शासनाने जानेवारी २०१९ मध्ये बेकायदा ठरवला होता. तो आदेश बदलण्यास आज उच्च न्यायालयाने नकार देत अपील फेटाळले. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार हा करार बेकायदा ठरला असून त्याविरोधात योग्य तेथे पुढील अपील करण्यास उच्च न्यायालयाने मुभा दिली आहे. राजारामबापू … Read more

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीचा ‘हा’ बडा नेता थोपटणार दंड

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात महायुती चांगलाच तगडा उमेदवार देण्याच्या विचारात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष पराभूत केल्यानंतर भाजपला आता राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष पराभूत करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जयंत पाटील आमदार असलेल्या इस्लामपूर … Read more

चंद्रकांत पाटलांनी केला भूखंड घोटाळा ? जयंत पाटलांनी केली राजीनाम्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील बालेवाडी येथे दोन भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. त्यांनी या प्रकरणात गैरव्यवहार केल्याने त्यांनी राजीनामा दावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी राखीव असणारा भूखंड चंद्रकांत पाटील यांनी शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांना मिळवून देण्यास मदत … Read more

जयंत पाटलांनी केली सेना आमदाराची स्तुती ; सोशल मीडियावर राष्ट्रवादी ट्रोल

सांगली प्रतिनिधी |राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत शिवसेनेच्या आमदाराची केलेली स्तुती त्यांच्या चांगलीच आंगलट आली आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनी ज्या मतदारसंघात लक्ष घालून मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच मतदारसंघातील विद्यमान सेना आमदाराची जयंत पाटील यांनी स्तुती केली आहे. जयंत पाटील म्हणजे मोकळे ढाकळे बोलणारे गावाकडचे माणूस. मात्र त्यांनी आटपाडी खानापूर मतदारसंघाचे … Read more

सदाभाऊ खोत इस्लामपूर मधून ‘कमळ’ चिन्हावर लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे भाजपने आगामी विधानसभा लढण्याची जोरदार तयारी केली असून भाजप व शिवसेना प्रत्येकी १३५ व मित्र पक्षांना १८ जागा असा फॉर्म्युला तयार केला आहे. मात्र मित्रपक्षांमधील अनेक जागा या कमळ चिन्हावर लढविल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना सहा जागा मागत असली तरी किमान तीन … Read more

धैर्यशील मानेंच्या विजयाचा वाळवा तालुक्यात जल्लोष

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात महायुतीचे तरूण, तडफदार उमेदवार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस व राष्ट्रवादी महाआघाडीचे उमदेवार राजू शेट्टी यांचा १ लाखांच्या मताधिक्क्यानी पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर उमेदवार धैर्यशील माने व ना.सदाभाऊ खोत यांना कार्यकर्त्यांनी खांदयावर उचलून घेत गुलालाची उधळण केली. इस्लामपूरसह वाळवा तालुक्यात … Read more

#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?

Untitled design

हातकणंगले प्रतिनिधी|२०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या साथीने लढून विजयी ठरलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपपासून वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात प्रचार केला आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडी सोबत हातमिवणी केली. त्यांची हीच कृती शेतकरी मतदाराच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात जाऊन शेतकऱ्यांनी मतदान केले आहे. आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; … Read more

मुख्यमंत्र्यांना ए.सी.मध्ये बसून दुष्काळाच्या झळा कशा कळणार – जयंत पाटील

Untitled design

जयंत पाटलांचा बागणी गावातील ग्रामस्थांशी केली थेट चर्चा. सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्याचे मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले. मात्र आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ए.सी.मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बागणी येथे बोलताना केले. … Read more

‘या’ कारणामुळे लग्नाच्या वाढदिवशी जयंत पाटीलांना बायकोने दिली गाई भेट

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्या पत्नीकडून लग्नाच्या वाढदिवशी चक्क गाय भेट म्हणुन मिळालीय. लग्नाच्या वाढदिवशी गाय का बरं दिली असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय. याबाबत पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून सर्व प्रकार सांगितलाय. ‘महाराष्ट्रात दुष्काळात जनावरे अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत. अशीच एक गाय माझ्या पत्नीला औंधच्या यमाईच्या दर्शनावरून परत येताना अन्नपाण्यावाचून … Read more