शरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय? राम कदमांचे सरकारवर ताशेरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र सरकार निष्फळ आहे असे अनेक भाजपा नेते यांनी याआधी विविध माध्यमातून मांडले आहेच. आता त्यामध्ये भाजपाचे वादातीत नेते आणि घाटकोपर पश्चिम चे आमदार राम कदम यांचीही भर पडली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. इथे अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असताना तुम्हांला खुर्चीचा कसला विचार पडतो आहे? असा सवाल त्यांनी या व्हिडिओत विचारला आहे. तसेच खुर्चीचा विचार नंतर करा आधी इकडे बघा असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आपले घर सोडून मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर का जावे लागते आहे असा सवालही कदम यांनी यावेळी केला आहे.

ते म्हणाले, ‘६१ दिवसांच्या संचारबंदीनंतर महाराष्ट्राच्या घराघरात उपासमार सुरु झाली आहे. मुंबईसारख्या शहरात रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत, रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णालयात बेड मिळत नाहीत म्हणून रुग्ण घरामध्ये मृत्यूमुखी पडत आहेत. रेशन चे मोफत अन्न अनेक ठिकाणी पोहोचलेले नाही आणि तुम्हाला खुर्चीच काय पडलंय?” या व्हिडिओत त्यांनी महाराष्ट्राच्या रेल्वेसंदर्भातील विषयाला हात घालून आमच्याकडे यादी तयार आहे म्हणता तर दोन दिवस निघून गेले तरी तुम्ही अजून यादी रेल्वे प्रशासनाला का दिली नाही? असा स्पष्ट प्रश्न विचारत तुम्ही का खोटे बोलला? असा टोमणा मारला.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे आपले घर सोडून मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी का जावे लागते आहे. आणि काँग्रेस चे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण स्वतः हे सरकार अपयशी आहे असं म्हणत असताना तुम्ही त्याचा विचार का करत नाही. केवळ सरकार स्थित आहे म्हणता आहात. सरकार आणि खुर्ची सोडा आणि या गंभीर परिस्थितीचा विचार करा असा सल्लाही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. मध्यंतरी आपल्या वादातीत विधानामुळे आमदार राम कदम चांगलेच चर्चेत आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment