नागरिकांनो सावधान! व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण….

औरंगाबाद | मनपा आरोग्य विभाग व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकायार्ने शहरात सहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून 61 व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एसएसएस शाळेत 119 पैकी 12 पॉझिटिव्ह, पैठण गेट 125 मधून आठ पॉझिटिव्ह, महावीर भवनात 77 पैकी 9 पॉझिटिव, शहागंज मध्ये 143 पैकी 13, अग्रसेन भवनात 150 पैकी … Read more

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more

पॉझिटिव्ह रूग्ण एक हजारांपर्यंत गेल्याने शहरात २१ कोवीड केअर सेंटर सुरू करणार

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांवर कुठे उपचार करावेत, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला असून, युध्दपातळीवर २१ कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील ९ केंद्रे सुरूही झाली आहेत. आजा सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाउसफुल्ल होत आहे. दररोज … Read more

रुग्णांना कुठलीही असुविधा होता कामा नये, विभागीय आयुक्तांनी टोचले मनपा अधिकाऱ्यांचे कान

औरंगाबाद | औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमधील असुविधा संबंधी सातत्याने वृत्त प्रकाशित होत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मेल्ट्रोन व एम आय टी येथे सुरू केलेल्या कोविड सेंटर ला सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी सर्व सुविधांचा आढावा घेऊन, रुग्णांना कुठल्याही असुविधा होता कामा नये. अशा शब्दात त्यांनी मनपा डॉक्टर व अधिकाऱ्यांचे कान टोचले असल्याचे … Read more

बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

शहरवासीयं व्हायरल आजाराने त्रासले; सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांचे प्रमाण जास्त

औरंगाबाद | शहरात गेल्या आठ दिवसांपासून सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याने खासगी डॉक्टरांकडे रूग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतल्या. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजाराचे औषधोपचार सुरू केले आहेत. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता पालिकेच्या … Read more

वाळूज महानगरीत दीड महिन्यात ४२५ कोरोनाबाधित, २ कोवीड सेंटरमध्ये १९१ रूग्णांवर उपचार

औरंगाबाद |  वाळूज उद्योगनगरीला कोरोनाचा विळखा वाढत चालला असून, दीड महिन्यात ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागातील दोन कोवीड सेंटरमध्ये १९१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील मुख्य बाजारपेठा, भाजीमंडई तसेच कंपन्यांमध्ये अनेक जण मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचा वापर करीत नसल्यामुळे कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी … Read more

१ लाख २७ हजार विद्यार्थी देताहेत पदवी परीक्षा, ऑफलाईन परीक्षेसाठी २१२ केंद्रे

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा मंगळपासून सुरू झाल्या. २१२ परीक्षा केंद्रांवर १ लाख २७ हजार ७८७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पदवी अभ्यासक्र माच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षांना मंगळवार, १६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. येवले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. औरंगाबाद, जालना, … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, धर्मगुरु, पुजारी, महंतांना सहकार्य करण्याचे आवाहन

औरंगाबाद | विविध धर्मगुरु, पुजारी, महंत यांनी प्रशासन आणि जनतेतील दुवा व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विविध धर्मगुरु तसेच धार्मिक स्थळांचे प्रमुख यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. समाजात धर्मगुरूंना मानाचे स्थान आहे. आपण सांगितलेलं लोक ऐकतात. आपला … Read more

तर…थेट 4 एप्रिल पर्यंत होईल दुकान सील; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा

औरंगाबाद | कोरोना वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.या पार्श्वभूमीवरच शहरात आज मध्यरात्रीपासून अंशतः लॉक डाऊन सुरू करण्यात येणार आहे. यात दुकानदाराने सांगितलेल्या नियमांचे पालन केले नाही तर थेट 4 एप्रिल पर्यंत दुकान सील करण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे.गेले आठवडाभर दररोज … Read more