जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनचे संकेत, आता पर्यंत टाळले,वेळ आली तर उद्योगाबाबत विचार करू

औरंगाबाद | आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत जिल्ह्यात अंशतःलॉक डाऊन लावून देखील नागरिक कारणे दाखवून रस्त्यावर फिरत आहेत. नागरिकांनी मदत करावी आता पर्यन्त प्रशासनाने लॉकडाऊन टाळले मात्र वेळ आलीच तर उद्योगा बाबत विचार केला जाईल.असे म्हणत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबादेत लॉकडाऊनचे संकेत तर दिले नाही ना अशी चर्चा सुरू आहे. आज … Read more

महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना घ्यावी लागणार काळजी

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील  आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे सांगितले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राजस्थान राज्यात जाताना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक केले आहे. कोणत्याही … Read more

दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ … Read more

घाटीत आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी

औरंगाबाद | घाटी रुग्णालयात आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे घाटी रुग्णालयाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा एकीकडे वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी दहा रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला … Read more

महापालिकेचा निष्काळजीपणा ट्रकचालकाला भोवला; दुभाजकाला धडकून ट्रक उलटला…

औरंगाबाद | सिल्लोडहून पुण्याला मका घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी (ता.२५) पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील जळगाव रस्त्यावरील चौकातील वोक्खार्ड दुभाजकाला धडकला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व मकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एका बाजूने जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. महापालिकेतर्फे या चौकात पोलचे काम करण्यात येत आहे. यासाठी रस्त्यावर … Read more

पोलीस ऍक्शन मोड मध्ये; नियम मोडणाऱ्या हॉटेल,सलून, पानटपरी सह टवाळखोरावर गुन्हे दाखल

औरंगाबाद | कोरोनाच्या पर्शवभूमीवर जिल्हा प्रशासनाने ठरविलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या हॉटेल चालक, सलून, पान टपरी, सह विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यावर पोलिसांनी जोरदार कारवाई करीत थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या शहरात कोरोनाची स्थिती बघता कडक स्वरूपाचे नियम लागू आहेत. तरी देखील काही भागात हॉटेल, सह विविध दुकाने छुप्या पद्धतीने सुरू आहेत. अशा ठिकाणी … Read more

कोरोनाबरोबरच शहरातील किराणा, औषधी दुकानेही वाढली

औरंगाबाद | कोरोनामुळे शहरातील औषधी दुकानांचा व्यवसायही तेजीत चालला आहे. लॉकडाऊन असो वा नसो औषधी दुकाने सुरूच असतात. यामुळे फार्मसी झालेल्या युवकांनी आपली औषधी दुकाने सुरू केली. केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन आधी शहरात २,२०० औषधी दुकाने होती, त्यात मागील वर्षभरात ७० नवीन औषधी दुकानांची भर पडली आहे. संघटनेचे विनोद लोहाडे यांनी सांगितले … Read more

घाटीत गंभीर रूग्णांसाठी खाटा वाढवा, विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या सूचना

औरंगाबाद | घाटीत प्रत्येक गंभीर रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. येथे गंभीर रुग्णांना नाकारले जाते, असे होता कामा नये. घाटीची प्रतिमा मलीन होऊ नये. यासाठी खाटांची संख्या वाढवा. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल. ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना मनपाच्या काेविड केअर सेंटरला पाठवा, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घाटी प्रशासनाला केली. घाटीत अधिष्ठातांच्या कक्षात … Read more

घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एकाच बेडवर तीन रुग्ण; बेडअभावी रुग्णांना झोपावे लागते फरशीवर

औरंगाबाद | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केले आहे. श्वेता महाले यांनी फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं … Read more

दिलासादायक ! ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत, मनपा प्रशासकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती…

औरंगाबाद | शहरातील ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज येणारी रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाचेही धाबे दणाणले आहे. परंतु दुसरीकडे दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठलेही लक्षणे नसल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण … Read more