दहावी- बारावीच्या विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा देऊ द्या, हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने केली बोर्डाकडे विनंती

औरंगाबाद | दहावी- बारावीच्या परीक्षेत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनीना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमती द्यावी, यासह आदी मागण्यांसाठी हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ औरंगाबाद  विभागीय सचिव  सुगता पुन्ने यांची भेट घेतली. हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या वतीने बोर्डाच्या सचिव पुन्ने यांच्याशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा … Read more

दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ … Read more

शहरातील रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा -पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद | शासन अनुदानीत शहरी सडक योजनअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महानगरपालिकेच्या विकास कामांच्या … Read more

घाटीत आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी

औरंगाबाद | घाटी रुग्णालयात आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे घाटी रुग्णालयाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा एकीकडे वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी दहा रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला … Read more

महापालिकेची नोकरभरती लांबणीवर, सेवाभरती नियमांत सरकारने काढल्या त्रुटी

औरंगाबाद | राज्य सरकारने औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचे आकृतीबंध मंजूर केले आहेत, पण सेवाभरती नियम मंजूर करताना राज्यातील सर्व महापालिकांमधील सर्व पदांसाठीची पात्रता सारखी असावी, असा निकष नगरविकास विभागाने ठरवला आहे. त्यादृष्टीने एकत्रित सेवाभरती नियमांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेत आकृतीबंधाचे भिजत घोंगडे होते. पाच वर्षांपासून आकृतीबंधाच्या प्रस्तावावर काथ्याकुट केला जात होता. … Read more

नागपूर-रायगडपर्यंत तरुणांनी सुरू केला सायकलवर प्रवास धाडस ग्रुपच्या युवकांचे स्वागत; सामाजिक विषयांवर जनजागृती

औरंगाबाद | नागपूर ते रायगडपर्यत असा प्रवास सायकलवर प्रवास करणाऱ्या धाडस ग्रुपच्या तरुणांचे स्वागत औरंगाबाद जिल्हा सायकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नागपूर ते रायगड असा प्रवास करण्याचे लक्ष धाडस ग्रुपच्या वतीने ठेवण्यात आले आहे. यामध्ये नागपूर- मेहकर-जालना- औरंगाबाद- प्रवारासंगम-पुणे – अहमदनगर मार्गे रायगड असा प्रवास सायकलवर केला जात असून ३१ तारखेला ते … Read more

जि.प. शिक्षकांची 4 कोटींची देयके निधीअभावी धूळखात, देयके कालबाह्य होण्याची शिक्षकांमध्ये भीती

औरंगाबाद | तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची 4 कोटींची देयके निधी अभावी धूळखात पडून असून ही देयके न मिळाल्यास देयके कालबाह्य होण्याची भीती शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेवर सुमारे 1250 शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी दोनशे ते अडीशे शिक्षक- शिक्षिका यांचे सन 2019 पासूनचे मेडिकल परिपूर्तीचे, अर्जित रजा, दीर्घ मुदतीच्या आजारी रजा, वेतन तफावत फरक … Read more

मावशीकडे राहणाऱ्या मुलीचे अपहरण करून अत्याचार, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाळूज महानगर | १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर पुण्यात लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुध्द बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने ती लहानपणापासून रांजणगाव परिसरात मावशीकडे राहात होती. तिची मावशी व काका हे दोघे १६ मार्चला कामासाठी घराबाहेर पडले होते. घरमालकाने तिच्या मावशीला … Read more

महापालिकेचा निष्काळजीपणा ट्रकचालकाला भोवला; दुभाजकाला धडकून ट्रक उलटला…

औरंगाबाद | सिल्लोडहून पुण्याला मका घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी (ता.२५) पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील जळगाव रस्त्यावरील चौकातील वोक्खार्ड दुभाजकाला धडकला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व मकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एका बाजूने जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. महापालिकेतर्फे या चौकात पोलचे काम करण्यात येत आहे. यासाठी रस्त्यावर … Read more

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व यंत्रणांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील वाढीव रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि अंशतः … Read more