फडणवीसांच्या गाडीला रस्ता देण्यासाठी केंद्रीय मंत्री उतरले रस्त्यावर 

  औरंगाबाद – शहरातील पाणी प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात हजारो भाजप कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.   यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या गाडी जागा दिली जात नव्हती. यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रस्तावर उतरुन कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. त्यांनी भाजपचा झेंडा घेत … Read more

दाम्पत्याची क्रुरपणे हत्या; घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह 

    औरंगाबाद – पुन्हा एका दाम्पत्याच्या क्रूर हत्येने शहरात संतापाची लाट पसरली आहे. पुंडलिकनगर येथे कुजलेल्या अवस्थेत पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. या दाम्पत्याची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पुंडलिक नगर येथे राहणारे पती शामसुंदर कलंत्री (वय – ५५), पत्नी किरण कलंत्री (वय -४५) यांची राहत्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली … Read more

‘आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यावर आणणार काय ?’; भाजपच्या बॅनरच्या शेजारी सेनेने लावले बॅनर

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात पाण्यावरून राजकारण तापले असतानाच आता याच पाण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये बॅनर बाजी रंगल्याचे दिसून आले आहे.   शहरातील खडकेश्वर मंदिराच्या समोर भाजपने लावलेल्या जल आक्रोश मोर्चाचा बॅनरच्या शेजारीच शिवसेनेने देखील बॅनर लावून प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यावर आणणार काय ?’ या आशयाचे बॅनर शिवसेनेच्यावतीने … Read more

औरंगाबाद हादरले! दिवसाढवळ्या कॉलेज जवळून ओढत नेत विद्यार्थिनीची हत्या (CCTV)

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजजवळून ओढत नेत विद्यार्थिनींची हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ तरुणीची भोसकून हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.   View this post on Instagram   A post shared by Hello Maharashtra (@hellomaharashtra.in) मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजजवळून ओढत नेत एका विद्यार्थिनींची … Read more

साली आधी घरवाली ! जावयाने सासरवाडीहून अल्पवयीन मेहुणीलाच पळवले 

Love Affair

  औरंगाबाद – करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीला म्हणजेच मेहुणीला सासरवाडीहून पळवून नेल्याची घटना वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे उघडकीस आली. सालीला पळवून नेल्यामुळे सासरवाडीतील मंडळी हैराण झाल्याने त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जावयासह त्याच्या साथीदाराविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

आजपासून औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद; पुरातत्व विभागाचा निर्णय

औरंगाबाद – खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा वादविवाद सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाची कबर पर्यटक व इतर लोकांसाठी पाहण्यासाठी बंद करण्यात आली आहे. या बाबतचा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाने काल दुपारनंतर काढला आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे वरिष्ठ नेते तेलंगणाचे आ. अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर जावून पुष्प अर्पण … Read more

आधी दारु पाजली अन् शीर धडावेगळे केले; खुनाचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले 

  औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी पोलिसांना धडावेगळे शीर असलेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यास औरंगाबाद पोलिसांना यश आले आहे. गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात दोन दिवसांपूर्वी निर्घुण हत्या झालेला मृतदेह आढळला होता. एका वादातून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने गळा चिरून हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. लक्ष्मण रायभान नाबदे (55, रा. बोलेगाव, ह.मु. गंगापूर) असे मृत … Read more

औरंगाबादेत पेट्रोल-डिझेलची टंचाई होण्याची शक्यता

Petrol Diesel

    औरंगाबाद – सध्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियम डेपोमध्ये पेट्रोल, डिझेलला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यातच टॅंकरचा तुटवडा असल्याचे कारण देत इंधनाचा पुरवठा कमी करण्यात येत आहे. कोरोनानंतर अपेक्षेपेक्षा जास्त मागणी नोंदविलेली नसताना, तुटवडा कसा निर्माण झाला, हे समजून घेण्यास डीलर्स अपयशी ठरत आहेत. हे असेच सुरू राहिल्यास भविष्यात पेट्रोल, डिझेलचे 15 ते … Read more

बायकोला साडी नेसता येत नसल्याने तरुणाने संपविले जीवन

Suicide

  औरंगाबाद – पत्नी माझ्यापेक्षा वयाने 5 वर्षे मोठी आहे. तिला नीट स्वयंपाक येत नाही. चांगली साडी घालता येत नाही. हॉटेलात जेवायला गेल्यावर ती प्लेट उचलून ठेवते, अशी सुसाइड नोट लिहून आय क्विट असे स्टेटस ठेवून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे … Read more

‘या’ महिन्यात होणार औरंगाबाद मनपा निवडणूक? 

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयोगाकडून शहराचा नकाशा मंगळवारी महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होईल, या अंदाजानुसार कामे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.   कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर … Read more