गलवान नदीचे पाणी वाढले; चीनवर नजर ठेवण्यासाठी भारतीय सैनिकांना हवे वॉटरप्रुफ पोशाख

लडाख । सध्या भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचे केंद्र झालेल्या गलवान खोऱ्यातून भारताच्यादृष्टीने चिंतेची आणखी एक बातमी समोर आली आहे. गलवान नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय सैनिकांना आता पाण्यापासून बचाव करणाऱ्या विशेष पोशाखाची गरज निर्माण झाली आहे. गलवानमध्ये जे भारतीय लष्कर चीनविरोधात तैनात आहे त्यांना आता हे पोशाख मिळणं अत्यावश्यक वाटू लागलं … Read more

चीनची खैर नाही! भारतीय लष्कर शक्तिशाली टी-९० भीष्म टॅंक गलवान खोऱ्यात करणार तैनात

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव टिपेला पोहोचला आहे. चीनकडून सातत्यानं मोठा फौजफाटा सीमेवर तैनात होत असलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सुद्धा तयार आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० टँक तैनात केले आहेत. हे टँक क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा … Read more

निशस्त्र जवानांना चीनशी मुकाबला करण्यासाठी का धाडलं? प्रियंका गांधींचा मोदींना सवाल

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन देशांमधला तणाव चांगलाच वाढला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखी वाढला आहे. या घटनेनंतर गलवान खोऱ्यात चीननं घुसखोरी केली नसल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी … Read more

भारत-चीन युद्ध झाल्यास रशिया तटस्थ राहिल ? पण का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅलवान व्हॅली स्टँड-ऑफपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्‍यावर गेलेले आहेत. चीनशी वाढत्या ताणतणावाच्या दरम्यान हा दौरा म्हणजे जुना मित्र असलेल्या रशियाची मदत घेण्याचे धोरण म्हणूनही पाहिले जाते हे उघड आहे. मात्र , रशियाने नुकतेच स्पष्ट केले आहे की भारत आणि चीन … Read more

लडाख दौऱ्यात लष्करप्रमुखांनी जखमी जवानांची विचारपूस करत वाढवलं मनोबल

लेह । सीमा वादावरून भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. लडाख सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. चीनशी झालेल्या तणावाच्या परिस्थितीत लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लेह येथे पोहोचले. त्यांनी एकूण परिस्थितीची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, त्यांनी लेहच्या सैन्य रुग्णालयात भेट दिली आणि गलवान खोऱ्यातील संघर्षांतील जखमी सैनिकांची विचारपूस केली. … Read more

तरी चीनकडून मोदींचं कौतुक का? राहुल गांधींचा संतप्त सवाल

नवी दिल्ली । भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखमध्ये चीननं घोसखोरीचं केली नसल्याच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधी पक्षांचा तिखट सूर मावळत नाही, तोच गांधी यांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित करत सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित केला आहे. चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्ताचा संदर्भ … Read more

अखेर चीननं गलवान खोऱ्यात आपले सैनिक मारले गेल्याचं केलं मान्य

बीजिंग । लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात पहिल्यांदाच चीनने आपले सैनिक ठार झाल्याचं कबूल केलं आहे. चीनने आपले २० पेक्षा कमी सैनिक मारले गेले असल्याचं सांगितलं आहे. आयएएनएसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यातील संघर्षात ठार झालेल्या १६ चिनी जवानांचे मृतदेह चीनकडे सोपवले असल्याचं वृत्त आल्यानंतर चीनने ही कबुली दिली आहे. … Read more

धक्कादायक! गलवान संघर्षात चिनी सैन्याने धारदार शस्त्रांनी भारतीय जवानांवर केला होता वार

नवी दिल्ली । लष्करातील कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखाली १५-१६ जूनच्या रात्री चीनच्या सैन्याने भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यावेळी दोन्ही सैन्यात अतिशय हिंसक स्वरूपाची ही झडप झाली होती. या हल्ल्यात भारतीय सैन्यातील कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवान शहीद झाले. सूत्रांच्या माहितीनुसार या संघर्षामध्ये भारतीय जवानांना बऱ्याच गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या असून, त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी … Read more

भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे- डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली । लडाखच्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला उद्देशून एक पत्र लिहले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत-चीन परिस्थितीविषयी मोदी सरकारने पारदर्शी राहावे, असा आग्रह पत्रात केला आहे. अपप्रचार हा कधीही कूटनीति किंवा खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरू शकत नाही. खुषमस्करी करणाऱ्या सहकाऱ्यांकडून खोट्या गोष्टी पसरवून सत्याची मुस्कटदाबी … Read more

भारत-चीन तणाव: राहुल गांधींनी शुल्लक राजकारणातून बाहेर यायला हवं- अमित शहा

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या दाव्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न … Read more