साखर कारखानदारीमुळेच राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला – शरद पवार

पुणे : साखर कारखानदारीमुळेच राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. शिक्षण,आरोग्य व मूलभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती घडून आली. त्यामुळे सध्या अडचणीत आलेला साखर उद्योग जगावा, वृद्धिंगत व्हावा व त्यायोगे ग्रामीण भागातील माझा शेतकरी सुखी-संपन्न व्हावा, यासाठी मी तत्परतेने प्रयत्न करेन, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवारांनी व्यक्त केले. लोकसत्ता परिवाराने पुण्यात आयोजित केलेल्या साखर … Read more

समाजातील शोषित घटकांना उभं करण्यासाठी राज्य करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज – शरद पवार

कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : समाजातील शोषित, पीडित, उपेक्षित घटकांना उभं करण्यासाठी सत्तेचा वापर करून रयतेसाठी राज्य करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा गौरव केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज कोल्हापूरमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. … Read more

शिर्डीकरांना सद्बुद्धी यावी याकरिता परभणीत ‘साई जागर’; खासदार आमदारांनी केले भजन

परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे : साईबाबांच्या जन्मस्थानाचा वाद चांगलाच पेटलाय. जन्मस्थानाच्या मुद्यावरून शिर्डीकरांनी आज बंद पुकारला आहे तर शिर्डीकरांना सद्बुद्धी मिळावी याकरिता परभणीत साई जागर सुरु करण्यात आला. या साई जागरामध्ये जिल्ह्याचे खासदार संजय जाधव व पाथरीचे विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी भजन करत सहभाग घेतला आहे. पाथरी येथील साई मंदिरामध्ये मंगळवारपासून महाआरतीचे आयोजन करण्यात … Read more

इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, तो निधी वाडिया हॉस्पिटलला द्या – प्रकाश आंबेडकर

पुणे : इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध आहे, त्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलला देण्यात यावा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाकडे केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जो निधी आंबेडकर पुतळ्यासाठी किंवा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी दिला असेल तो निधी वाडिया हॉस्पिटलसाठी वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने काढावा, अशी माझी विनंती आहे. … Read more

कर्नाटकी दहशतवादाचा महाराष्ट्र भाजप निषेध करेल काय? संजय राऊत उद्या बेळगाव दौऱ्यावर

टीम हॅलो महाराष्ट्र : बेळगाव सीमा प्रश्नी लढताना हौताम्य पत्करलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून रोखण्यात आले. तसेच कर्नाटक पोलिसांकडून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना धक्काबुकी करण्यात आली. या प्रकरणी संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा निषेध करेल काय, असा प्रश्न संजय राऊत यांनी … Read more

कर्नाटक पोलिसांची मुजोरी; राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना धक्काबुक्की करत घेतलं ताब्यात, वाचा सविस्तर रिपोर्ट

कोल्हापुर हॅलो महराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बेळगाव पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. यानंतर बेळगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध केला आहे. राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर बेळगावात हुतात्मा चौकात होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमात सहभागी … Read more

अडचणींमध्ये असणार्‍यांसाठी सत्ता वापरणे हेच महाविकासआघाडीचं तत्व – शरद पवार

टीम हॅलो महाराष्ट्र : अडचणींमध्ये असणार्‍यांसाठी सत्ता वापरणे हेच महाविकासआघाडीचं तत्व असल्याच मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनी व्यक्त केले. ते दौंड येथील कार्यक्रमात बोलत होते. दौंड येथे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन सहाय्यक वैद्यकीय उपकरणांचे मोफत वितरण करण्यात आले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सर्व … Read more

संभाजी भिडे यांचे उद्या सांगली बंदचे आवाहन; संजय राऊतांना पदावरून हटवण्याची मागणी

सांगली | उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद सातारा, सांगली भागात पडताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली बंदचं आवाहन केलं आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर … Read more

साईबाबांच्या जन्मभूमीचा वाद पेटला; जन्मभूमीच्या विकासासाठी घोषित झालेला निधी पाथरीला की शिर्डीला?

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, गजानन घुंबरे : महाराष्ट्र शासनाकडून साईजन्मभूमीच्या विकासासाठी शंभर कोटींच्या निधीची घोषणा झाल्यावर साईजन्मभूमी म्हणुन पाथरीच्या विकासाला शिर्डीवासीयांनी विरोध दर्शविला आहे. पाथरीकरांनी मात्र जन्मभूमी असल्याबद्दल आमच्याकडे पुरावे आहेत यावर वाद नको म्हणत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. या संदर्भात पाथरीमध्ये आज ग्रामस्थ, विश्वस्त आणि कृतिसमितीने बैठक घेतली. यामध्ये साईबाबांच्या कर्मभूमी शिर्डी प्रमाणेच जन्मभूमी पाथरीचा … Read more

छत्रपतींच्या वंशजांचा पराभव घडवून आणला, त्याबद्दल भाजप शिवरायांच्या वंशजांची माफी मागणार काय? – संजय राऊत

मुंबई : छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत हा प्रश्न विचारला आहे. त्यांनी म्हंटले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक … Read more