पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो ठरतोय चर्चेचा विषय; पहा नक्की काय आहे या फोटोत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचारात उडी मारली असून ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शनिवारी नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दक्षिण 24 परगणामधील सोनारपूर येथे एक जाहीर सभा घेतली. या सभेतील … Read more

फडणवीसजी, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली? काँग्रेसचा सवाल

modi fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून अजून देखील राज्य सरकारने कोरोना साठी पॅकेज जाहीर केले नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच मोदींनी 20 लाख कोटींच पॅकेज जाहीर केले होते असेही ते म्हणाले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीसजी, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला किती … Read more

अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते? शिवसेनेचा खोचक सवाल

sanjay raut nirmala sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पबजत योजनांवरील व्याजदरावरून (Small Savings Interest Rate) केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची देशभर चांगलीच चर्चा झाली. अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय सरकारला काही तासांतच मागे घ्यावा लागला. यावरूनच शिवसेनेने केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. सामान्य जनतेला तुम्हाला दिलासा देता येत नसेल तर देऊ नका, पण त्यांच्यावर व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी … Read more

बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात मोदींना कोणत्या जेलमध्ये ठेवले याची माहिती त्यांनी दिली तर…; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यावर असताना विधान केलं होतं की ते बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले होतो. तसेच माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल होत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना जोरदार टोला लगावला आहे. … Read more

मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने एकत्र यावं ; काँग्रेस नेत्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होत असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं असून, देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे लक्षात … Read more

त्यांची फक्त दाढी वाढली, पण स्क्रू ढीला झालाय; ममतादीदींचा मोदींवर हल्लाबोल

mamata didi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक सध्या देशाच्या केंद्रस्थानी आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याना भाजपचे कडवे आव्हान असून खर तर ममता दीदी आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, इथे उद्योगविश्वाचा विकास थांबला आहे, फक्त त्यांची दाढी वाढते आहे. … Read more

कोणत्या कायद्याअंतर्गत मोदींनी अटक करण्यात आली?, मोदी कोणत्या तुरुंगात होते? काँग्रेसकडून आरटीआय दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केले. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल. दरम्यान मोदींच्या या विधानावरून विरोधकानी पुन्हा एकदा मोदींना घेरण्याचा प्रयत्न … Read more

मोदीजी, अजून किती फेकणार ?? ; पंतप्रधानांच्या ‘त्या’ विधानावरून काँग्रेसचा हल्लाबोल

narendra-modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी मोठं विधान केले. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं तसेच यासाठी मी तुरुंगात देखील गेलो होतो असे मोदी यांनी म्हंटल. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही … Read more

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार? ; जयंत पाटलांचा मोदी सरकारवर निशाणा

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज देशाच्या अर्थव्यवस्थेवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?,” असा सवाल जयंत पाटील यांनी केला केला. जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्रावर निशाणा साधला. शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण … Read more

राष्ट्रीय संपत्ती गेल्या 70 वर्षांतली, त्यात तुमचं योगदान काय?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं लावलेल्या खासगीकरणाच्या धडाक्याची सध्या देशात जोरदार चर्चा आहे. बँक कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या विरोधात नुकताच संप पुकारला होता. आता रेल्वे आणि एलआयसीच्या खासगीकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं या सगळ्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. देशाची ही राष्ट्रीय संपत्ती गेल्या 70 वर्षांतली असून त्यात तुमचं योगदान काय? असा थेट सवाल … Read more