शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करा, केंद्रीय अवर सचिवांनी पत्राद्वारे दिले प्रशासनाला आदेश

औरंगाबाद | केंद्र व राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने या निधीतून शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय अवर सचिवांनी प्रशासनाला दिले आहे. औरंगाबाद शहरातील नागरिक सुरज अजमेरा यांनी शासन निधीतून पालिकेमार्फंत शहरात … Read more

लॉकडाऊनबाबत येत्या काही तासांत निर्णय; पालकमंत्र्यांचे सुतोवाच

औरंगाबाद : शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यातील 85 टक्के रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत तसेच मृत्यू दरही एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाचा संसर्ग रोखला पाहिजे. यामुळे अंशतः लॉकडाऊन केला रात्रीची संचारबंदी ही लावली, परंतु रुग्ण संख्या वाढतच आहे. यामुळे कडक लॉकडाऊन लावण्याबाबत विचार करावा लागेल. येत्या … Read more

नागरिकांची पिळवणूक थांबवा; भाजपची पालकमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद : कोरोना परिस्थितीतही जिल्हयातील नागरिकांची होणारी पिळवणूक त्वरित थांबवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन देखील देसाई यांना देण्यात आले आहे. त्यात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना महामारीसारख्या परिस्थिती मध्ये शहरात दररोज दीड ते दोन हजार रुग्ण आढळून येत आहेत. अशा वेळी शासकीय यंत्रणा नागरिकांना सेवा देण्यासाठी … Read more

औरंगाबाद जिल्हयात 58154 कोरोनामुक्त, 14189 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 1034 जणांना (मनपा 800, ग्रामीण234) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 58154 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1595 (शहर 1135, ग्रामीण 460)कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 73848  झाली आहे. आजपर्यंत एकूण 1505 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 14189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे … Read more

महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना घ्यावी लागणार काळजी

औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील  आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे सांगितले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राजस्थान राज्यात जाताना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक केले आहे. कोणत्याही … Read more

दहावी- बारावीच्या विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा देऊ द्या, हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने केली बोर्डाकडे विनंती

औरंगाबाद | दहावी- बारावीच्या परीक्षेत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनीना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमती द्यावी, यासह आदी मागण्यांसाठी हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ औरंगाबाद  विभागीय सचिव  सुगता पुन्ने यांची भेट घेतली. हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या वतीने बोर्डाच्या सचिव पुन्ने यांच्याशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा … Read more

दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ … Read more

शहरातील रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा -पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद | शासन अनुदानीत शहरी सडक योजनअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महानगरपालिकेच्या विकास कामांच्या … Read more

घाटीत आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी

औरंगाबाद | घाटी रुग्णालयात आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे घाटी रुग्णालयाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा एकीकडे वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी दहा रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला … Read more

महापालिकेची नोकरभरती लांबणीवर, सेवाभरती नियमांत सरकारने काढल्या त्रुटी

औरंगाबाद | राज्य सरकारने औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचे आकृतीबंध मंजूर केले आहेत, पण सेवाभरती नियम मंजूर करताना राज्यातील सर्व महापालिकांमधील सर्व पदांसाठीची पात्रता सारखी असावी, असा निकष नगरविकास विभागाने ठरवला आहे. त्यादृष्टीने एकत्रित सेवाभरती नियमांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेत आकृतीबंधाचे भिजत घोंगडे होते. पाच वर्षांपासून आकृतीबंधाच्या प्रस्तावावर काथ्याकुट केला जात होता. … Read more